अ‍ॅपशहर

सीसीटीव्हीची नजर तुमच्यावर,गाडी चालविताना बोलू नका फोनवर...

Maharashtra Times 10 Jan 2017, 8:26 am
महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी सादर केलेल्या एका अहवालानुसार, २०१२ ते २०१६ या चार वर्षांमध्ये गाडी चालविताना फोनवर बोलणाऱ्यांना पकडण्याचे प्रमाण तब्बल १०० टक्क्यांनी वाढले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिंचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊ लागल्यानंतर २०१२ मध्ये जिथे ८,३११ गुन्हे उघडकीस आले, तिथे २०१६ मधील हे प्रमाण १६, ५२३ इतके नोंदविले गेले आहे. नियमांचे उल्लंघन करणारे अधिकाधिक लोक पकडले जाऊ लागल्याने त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही त्यामुळे वाढली आहे. तीही तब्बल १६० पटीने. म्हणजे २०१२ मध्ये ६३०० रुपये दंडवसुली झाली होती. तर २०१६ मधील दंडवसुलीचा आकडा १० लाख रुपये इतका आहे. दंडाची रक्कम १०० रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली असल्यानेही ही रक्कम अधिक जमा झालेली आहे. गाडी चालविणे आणि त्याचवेळी फोनवर बोलणे हे काही फार मोठे काम नाही, पण त्यामुळे आपण केवळ आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतो, हे नक्की; असे या एकूण अहवालात पोलिसांनी नोंदविले आहे. एक जागरूक नागरिक म्हणून आपण वाहतूक नियमांचे पालन केल्यास सध्याचे अपघाताचे प्रमाण कमी करणे आपल्याच हातात आहे. या गोष्टीचे जाणीवपूर्वक भान ठेवण्यासाठीच पाहा हा इन्फोग्राफ....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम more caught using phone while driving
सीसीटीव्हीची नजर तुमच्यावर,गाडी चालविताना बोलू नका फोनवर...








महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज