अ‍ॅपशहर

जलीकट्टू का ठरतोय वादग्रस्त खेळ?

Maharashtra Times 20 Jan 2017, 12:48 pm
पिसाळलेले बैल/सांड यांना गर्दीत सोडून देऊन जीवावर खेळून शांत करण्याचा वादग्रस्त खेळ म्हणजे 'जलीकट्टू'. तामिळनाडूतील या प्रसिद्ध पारंपरिक खेळाला 'मंजू विरट्टू' असेही म्हटले जाते. कित्येक शतके जुना असा हा प्राचीन खेळ खेळण्याची परंपरा तामिळनाडूत जपली जात असताना सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी आणली. काही निर्बंधासह हा खेळ खेळला जावा यासाठी केंद्राने 2016 मध्ये सूचनांसह परवानगी मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार होते. मात्र तामिळनाडूतील चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने आठवडाभर कोणताही आदेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. जलीकट्टू खेळाची पंरपरा जपणारे केवळ सामान्य लोकच रस्त्यावर उतरलेले नाहीत तर अभिनेता कमल हसन, संगीतकार ए.आर. रहमान, प्रख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद, आर.अश्विन, श्री.श्री.रविशंकर आदी तामिळनाडूतील सेलिब्रिटी मंडळीही या खेळाच्या समर्थनार्थ उभी ठाकली आहेत... त्यानिमित्ताने पाहुयात जलीकट्टूचे महत्त्व दर्शविणारा हा इन्फोग्राफ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम important things to know about jallikattu tamilnadus traditional game
जलीकट्टू का ठरतोय वादग्रस्त खेळ?


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज