प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमीपासून चित्रपट टीव्ही मालिका अशा चौफेर क्षेत्रात सुलभाताईंनी काम केले. आविष्कार संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आविष्कार व नंतर छबिलदासमधील चळवळ म्हणजे आमचे हक्काचे व्यासपीठ होते. त्या शिक्षिका असल्याने लहान मुलांशी त्यांची चांगलीच नाळ जुळली होती. लहान मुलांच्या नाट्य चळवळीतील दुर्गा झाली गौरी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील बेणारेबाईची भूमिका म्हणजे मानदंड असलेली भूमिका होती. ससा व कासवमधील त्यांची भूमिकाही गाजली होती.
माझे वडिल दामू केंकरे यांच्या घेतलं शिंगावर नाटकातील त्यांची विनोदी भूमिकाही गाजली. नाट्य व्यवसायावर त्यांची कमालिची आस्था व प्रेम होते. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे त्यांनी फुकट नाटक कधीही पाहिले नाही. प्रत्येक नाटकाचे तिकीट विकत घेऊनच नाटकाचा खेळ पाहिला. केवळ मराठी रंगभूमीमध्ये त्यांचे योगदान नाही तर हिंदी रंगभूमीवरही त्यांचे योगदान आहे. सखाराम बाईंडर या नाटकाचे हिंदीतही त्यांनी दिग्दर्शन केले. प्रायोगिक संस्थेत लोकशाही असावी लागते, ही त्यांची भूमिका होती. आविष्कारचे ढोलताशे हे नाटक मी दिग्दर्शित केले. त्या नाटकाचा शेवट त्यांच्या सुचनेवरून मी बदलला होता. त्यांनी पहिला प्रयोग पाहिला. त्यानतंर त्यांनी नाटकाचा शेवट बदलण्याची सूचना केली होती. या नाटकाचा शेवट गाजला होता. त्या उत्तम अभिनेत्री होत्याच पण त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्यही होते. नाट्यचळवळीतील संघटिक कार्यकर्ती असे त्यांचे चौफेर व्यक्तिमत्त्व होते. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.
विजय केंकरे
मी आज जो आहे तो सुलभाताईंमुळेच!
मी आज जो आहे तो सुलभाताईंमुळेच!
मी गर्दीत एकटा उभा होतो. त्या गर्दीतून अरविंद आणि सुलभाताईंनी मला रंगमंचावर आणलं, केवळ आणलंच नाही तर त्यावेळी मला पोसलंसुद्धा! प्रचंड क्षमता असूनही आपल्या अभिनयाविषयी कोणताही अविर्भाव नसलेल्या अशा त्या होत्या. आपण केलेल्या कामाबद्दल उगाच अभिमान नाही, वा कुणी काही बोलले म्हणून दुःखही नाही. जे ठरले ते करण्यावर त्यांचा भर असे. त्या सतत आनंदी, हसतमुख अन् प्रसन्न असायच्या. कधीच कशाबद्दलही तक्रार नव्हती. यशाचा ढिंढोरा नाही, मिंधेपण नाही. कशाचंही दुःख नाही. इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं हे कठीण असतं. आईच म्हणायचो मी तिला..अरविंद, सुलभाताई हे माझे ब्रह्माविष्णूच होते. काळजातली वेदना त्यांनी कधीच कुणाला सांगितली नाही.
-नाना पाटेकर
नाटकांचा ध्यास
नाटकांचा ध्यास ही सुलभाताईंमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. त्यांच्या बहिणींनाही हा ध्यास होता. नाटक करता-करता त्या मुलांना घडवतही होत्या. सुलभाताईंचा पहिल्यापासून प्रायोगिक रंगभूमीशी संबध आला. आधी रंगायन, त्यानंतर अविष्कार. अविष्कारमध्येही त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. माझ्या अग्निदिव्यमध्ये त्यांची अत्यंत छोटी मात्र महत्वाची भूमिका होती. नावाजलेल्या अभिनेत्री असूनही कोणतीही तक्रार न करता त्यांनी ती भूमिका समजून केली. माझ्या इनव्हेस्टमेंट या चित्रपटामध्येही त्या होत्या. त्यादरम्यान आमची जवळीक अधिक वाढली, तेव्हा इतक्या वर्षानंतरही त्यांची काम करण्याची इच्छाशक्तीही तितकीच आहे, हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. नाटक प्रायोगिक असो वा व्यावसायिक दिग्दर्शकाने दिलेली भूमिका अचूक करणे यावर त्यांचे लक्ष असे.
-रत्नाकर मतकरी
माझे वडिल दामू केंकरे यांच्या घेतलं शिंगावर नाटकातील त्यांची विनोदी भूमिकाही गाजली. नाट्य व्यवसायावर त्यांची कमालिची आस्था व प्रेम होते. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे त्यांनी फुकट नाटक कधीही पाहिले नाही. प्रत्येक नाटकाचे तिकीट विकत घेऊनच नाटकाचा खेळ पाहिला. केवळ मराठी रंगभूमीमध्ये त्यांचे योगदान नाही तर हिंदी रंगभूमीवरही त्यांचे योगदान आहे. सखाराम बाईंडर या नाटकाचे हिंदीतही त्यांनी दिग्दर्शन केले. प्रायोगिक संस्थेत लोकशाही असावी लागते, ही त्यांची भूमिका होती. आविष्कारचे ढोलताशे हे नाटक मी दिग्दर्शित केले. त्या नाटकाचा शेवट त्यांच्या सुचनेवरून मी बदलला होता. त्यांनी पहिला प्रयोग पाहिला. त्यानतंर त्यांनी नाटकाचा शेवट बदलण्याची सूचना केली होती. या नाटकाचा शेवट गाजला होता. त्या उत्तम अभिनेत्री होत्याच पण त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्यही होते. नाट्यचळवळीतील संघटिक कार्यकर्ती असे त्यांचे चौफेर व्यक्तिमत्त्व होते. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.
विजय केंकरे
मी आज जो आहे तो सुलभाताईंमुळेच!
मी आज जो आहे तो सुलभाताईंमुळेच!
मी गर्दीत एकटा उभा होतो. त्या गर्दीतून अरविंद आणि सुलभाताईंनी मला रंगमंचावर आणलं, केवळ आणलंच नाही तर त्यावेळी मला पोसलंसुद्धा! प्रचंड क्षमता असूनही आपल्या अभिनयाविषयी कोणताही अविर्भाव नसलेल्या अशा त्या होत्या. आपण केलेल्या कामाबद्दल उगाच अभिमान नाही, वा कुणी काही बोलले म्हणून दुःखही नाही. जे ठरले ते करण्यावर त्यांचा भर असे. त्या सतत आनंदी, हसतमुख अन् प्रसन्न असायच्या. कधीच कशाबद्दलही तक्रार नव्हती. यशाचा ढिंढोरा नाही, मिंधेपण नाही. कशाचंही दुःख नाही. इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं हे कठीण असतं. आईच म्हणायचो मी तिला..अरविंद, सुलभाताई हे माझे ब्रह्माविष्णूच होते. काळजातली वेदना त्यांनी कधीच कुणाला सांगितली नाही.
-नाना पाटेकर
नाटकांचा ध्यास
नाटकांचा ध्यास ही सुलभाताईंमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. त्यांच्या बहिणींनाही हा ध्यास होता. नाटक करता-करता त्या मुलांना घडवतही होत्या. सुलभाताईंचा पहिल्यापासून प्रायोगिक रंगभूमीशी संबध आला. आधी रंगायन, त्यानंतर अविष्कार. अविष्कारमध्येही त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. माझ्या अग्निदिव्यमध्ये त्यांची अत्यंत छोटी मात्र महत्वाची भूमिका होती. नावाजलेल्या अभिनेत्री असूनही कोणतीही तक्रार न करता त्यांनी ती भूमिका समजून केली. माझ्या इनव्हेस्टमेंट या चित्रपटामध्येही त्या होत्या. त्यादरम्यान आमची जवळीक अधिक वाढली, तेव्हा इतक्या वर्षानंतरही त्यांची काम करण्याची इच्छाशक्तीही तितकीच आहे, हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. नाटक प्रायोगिक असो वा व्यावसायिक दिग्दर्शकाने दिलेली भूमिका अचूक करणे यावर त्यांचे लक्ष असे.
-रत्नाकर मतकरी