प्रशांत भरवीरकर
prashant.bharvirkar@timesgroup.com
संजीवन समाधींची नाशिकला मोठी परंपरा आहे, एकमुखी दत्त मंदिरामागे रघुनाथ भटजी महाराज समाधी, कपालेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला अजगरेश्वर महाराज समाधी, कानडे मारूती लेनमध्ये स्वामीनारायण महाराज आणि वामन महाराज समाधी तसेच नारोशंकराच्या मंदिराच्या बाजूला असलेली नरसिंग महाराजांची समाधी अशा या समाधींमध्ये पुणे विद्याथी गृहातील केशव महाराजांची समाधीदेखील संजीवनमध्ये येते. नाशिककरांसाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी संकटहरण केल्याच्या आख्यायिका आजही ऐकू येतात.
नाशिक निवासी केशवस्वामी महाराज हे शौचे कुटुंबातील दक्षिणी देशस्थ ब्राह्मण होते. ते वेद पारंगत व मोठे योगी होते. सन १८४६ साली गणेश विठ्ठलराव किबे यासह काहीजणांनी साधारणत: सव्वा एकर टेकडीवरील जमीन खरेदी करून महाराजांसाठी आश्रम बांधला याच आश्रमात महाराज रहात होते. महाराजांची ख्याती पंचक्रोशीत असल्याने मुमूक्षु जीव त्यांच्याकडे येऊन आपल्या शंकांचे समाधान करून घेत असत. महाराजांच्या लीला अगाध होत्या, भक्तांसाठी ते अचानक काही लीला करीत असत, त्यापैकीच एक म्हणजे एकदा ते मठात बसलेले असताना एक शेतकरी रडतच त्यांच्याकडे आला. स्वामींनी त्याची आस्थेने विचारपूस केली. तर आपली गाय अचानक मरण पावली असल्याचे त्याने सांगितले. स्वामी म्हणाले, ‘गाय तर पलिकडे चरत आहे, मेली नाही.’ आणि काय आश्चर्य मठाबाहेर गाय जिवंत होती. हा चमत्कार क्षणार्धात पंचक्रोशीत पसरला आणि केशवस्वामींच्या नावाचा उदोउदो होऊ लागला. त्यांच्या वाणीमध्ये प्रचंड ताकद होती, ते म्हणत तसेच घडत असे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक भक्तांची श्रध्दा होती.
सन १८४७ साल उजाडले. नाशिकमध्ये हाहाकार झाला. ताप आणि कॉलराची साथ आली होती. रोजच असंख्य माणसे मरू लागली कारण कुणालाच सापडेना. सकाळी चालता फिरता माणूस संध्याकाळी निवर्तल्याचे वृत्त कानी येऊ लागले. यातून कसे बाहेर निघावे कुणालाच काही कळेना. माणसे तर रोजचीच मरत होती. एकटा दुकटा माणूस मृत्यू पावला तर समजण्यासारखे होते परंतु येथे अनेक माणसे दगावत होती. अशा परिस्थितीत काय करावे, कोण वाली, काही मार्ग निघेना. परिस्थिती हाताबाहेर चालली होती. जागोजागी चिता पेटत होत्या. वैद्यांचाही काहीच उपाय चालेना झाले. अशावेळी जाणकार वृध्दांनी महाराजांकडे जाऊन या संकटातून मुक्तता करण्यासाठी विनंती करायची ठरवले. लोक केशव महाराजांकडे धावले. त्यांची करूणा भाकली. रोजच माणसे दगावत असल्याची वार्ता त्यांच्याही कानी आली होती. आपल्याला मोठे बलिदान देऊन या परिस्थितीवर नियंत्रण आणावे लागणार असल्याचे त्यांना समजून चुकले होते त्यामुळे त्यांनी यावर काही उपाय सुचवले. त्यानुसार माणसे कामाला लागली. केशव महाराजांचे अनुष्ठान सुरू झाले होते. या अनुष्ठानाचा शेवट काय होणार हे कुणालाच ज्ञात नव्हते परंतु केशव महाराजांना त्याची पूर्ण जाणीव होती त्यांनी त्यावेळी कुणाशीही बोलणे टाळले आणि महामारीवर काय उपाय करता येईल या चिंतनात गढून गेले. महाराजांनी देवाची करूणा भाकली. आणि त्यांच्या मुखातून उदगार निघाले, ‘आठ दिवस! आठच दिवसात या रोगापासून नाशिक पूर्णपणे मुक्त होईल.’ उपाय सुचला होता, लोकही निश्चिंत होऊन घरी गेले.
केशव महाराजांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे आठ दिवसात लोकांचे मृत्युचे प्रमाण कमी होत गेले. आणि आठव्या दिवशी संपूर्ण शहर रोगमुक्त झाले. त्यावेळी महाराजांचे शिष्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत वेदमंत्राच्या घोषात त्यांची विधीवत पूजा केली. अन् महाराजांनी सर्वांवर तो घणाघाती प्रहार केला. त्यांनी सांगितले की, ‘मी उद्या समाधी घेणार आहे.’ सगळीकडे शांतता पसरली. आनंदाच्या वातावरणावर एकदम विरजण पडल्यासारखे झाले. भक्तांनी एकच कल्लोळ केला. महाराज समाधी घेणार, महाराज समाधी घेणार ही वार्ता कर्णोपकर्णी झाली. भक्तसमुदाय चिंतेत पडला, महाराजांनी इतक्या लवकर समाधी घेतल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? परंतु केशव महाराजांनी सर्वांना आश्वस्त केले. १८४७ साली त्यांनी समाधी घेतली. ही नाशिकमधील संजीवन समाधी होय. काळाराम मंदिराच्या मागे पुणे विद्यार्थी गृहात ही समाधी आहे.
पुणे विद्यार्थी गृहात एका बाजूला केशव महाराजांचे मंदिर असून ते दोनमजली छोटेसे कौलारू घरच आहे. केशव महाराजांचा मठ म्हणून तो ओळखला जातो. वाड्यासारखा असलेल्या या मठात आतमध्ये शिरताच प्रसन्न वातावरणाची जाणीव होते. गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तसेच शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. येथे एक मोठा पितळी नागदेखील आहे. चौथऱ्यावर एक नंदादीप कायम तेवत असतो. या मठातून बाहेर निघताना उजव्या हाताला आणखी एक समाधी आहे. ही समाधी केशव महाराजांचे मुख्य शिष्य चिंतू लवटे यांची आहे. त्यांनी महाराजांनंतर बराच काळ या मठाची व्यवस्था बघितली. महाराजांच्या कृपेने ते देखील सिध्द पदाला पोहोचले होते. त्यांनी सुध्दा १८९० मध्ये वैशाख वद्य अमावास्येलाच मठात समाधी घेतली. चिंतू लवटे म्हणजे प्रल्हाद नरहरी यांचे आजोबा.
आजोबांनंतर मठाचा कारभार प्रल्हाद नरहरी सप्रे पाहू लागले. त्यांनी १९०८ साली मठाचा जीर्णोध्दार केला. त्यांच्या धर्मपत्नी सन १९२८ मध्ये महाराजांच्या चरणी लीन झाल्या. त्यानंतर मठाची व्यवस्था पाहण्यासाठी सप्रे यांनी पंचांची व्यवस्था केली. आणि सन १९३० ला चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर ते देवलोकी गेले. त्यानंतर प्रल्हाद महाराजांच्या कुटुंबातील गं.भा.पार्वतीबाई शंकर या पंचाच्या सहाय्याने मठाची व्यवस्था पाहू लागल्या. परंतु निधीअभावी त्यांना व्यवस्था करणे कठीण जाऊ लागल्याने एक योजना बनवून पुणे विद्यार्थी गृहाची एक शाखा स्थापन केली. या संस्थेचे संचालक विश्वनाथ गंगाधर केतकर व इतरांनी मिळून मठाच्या विश्वस्तांची बैठक होऊन त्यात दरमहा पार्वतीबार्इंना पंचवीस रूपये देण्याचे ठरवले. त्यातून पंधरा रूपये उदरनिर्वाहासाठी व पाच रूपये केशव महाराजांच्या नित्य फुल व नैवेद्यासाठी आणि पाच रूपये दत्तात्रेय गोपाळ भानोसे यांना दोन वेळच्या पूजेसाठी नियुक्त करून ठरविण्यात आले. आजही महाराजांची पूजा नित्य सुरू आहे.
prashant.bharvirkar@timesgroup.com
संजीवन समाधींची नाशिकला मोठी परंपरा आहे, एकमुखी दत्त मंदिरामागे रघुनाथ भटजी महाराज समाधी, कपालेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला अजगरेश्वर महाराज समाधी, कानडे मारूती लेनमध्ये स्वामीनारायण महाराज आणि वामन महाराज समाधी तसेच नारोशंकराच्या मंदिराच्या बाजूला असलेली नरसिंग महाराजांची समाधी अशा या समाधींमध्ये पुणे विद्याथी गृहातील केशव महाराजांची समाधीदेखील संजीवनमध्ये येते. नाशिककरांसाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी संकटहरण केल्याच्या आख्यायिका आजही ऐकू येतात.
नाशिक निवासी केशवस्वामी महाराज हे शौचे कुटुंबातील दक्षिणी देशस्थ ब्राह्मण होते. ते वेद पारंगत व मोठे योगी होते. सन १८४६ साली गणेश विठ्ठलराव किबे यासह काहीजणांनी साधारणत: सव्वा एकर टेकडीवरील जमीन खरेदी करून महाराजांसाठी आश्रम बांधला याच आश्रमात महाराज रहात होते. महाराजांची ख्याती पंचक्रोशीत असल्याने मुमूक्षु जीव त्यांच्याकडे येऊन आपल्या शंकांचे समाधान करून घेत असत. महाराजांच्या लीला अगाध होत्या, भक्तांसाठी ते अचानक काही लीला करीत असत, त्यापैकीच एक म्हणजे एकदा ते मठात बसलेले असताना एक शेतकरी रडतच त्यांच्याकडे आला. स्वामींनी त्याची आस्थेने विचारपूस केली. तर आपली गाय अचानक मरण पावली असल्याचे त्याने सांगितले. स्वामी म्हणाले, ‘गाय तर पलिकडे चरत आहे, मेली नाही.’ आणि काय आश्चर्य मठाबाहेर गाय जिवंत होती. हा चमत्कार क्षणार्धात पंचक्रोशीत पसरला आणि केशवस्वामींच्या नावाचा उदोउदो होऊ लागला. त्यांच्या वाणीमध्ये प्रचंड ताकद होती, ते म्हणत तसेच घडत असे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक भक्तांची श्रध्दा होती.
सन १८४७ साल उजाडले. नाशिकमध्ये हाहाकार झाला. ताप आणि कॉलराची साथ आली होती. रोजच असंख्य माणसे मरू लागली कारण कुणालाच सापडेना. सकाळी चालता फिरता माणूस संध्याकाळी निवर्तल्याचे वृत्त कानी येऊ लागले. यातून कसे बाहेर निघावे कुणालाच काही कळेना. माणसे तर रोजचीच मरत होती. एकटा दुकटा माणूस मृत्यू पावला तर समजण्यासारखे होते परंतु येथे अनेक माणसे दगावत होती. अशा परिस्थितीत काय करावे, कोण वाली, काही मार्ग निघेना. परिस्थिती हाताबाहेर चालली होती. जागोजागी चिता पेटत होत्या. वैद्यांचाही काहीच उपाय चालेना झाले. अशावेळी जाणकार वृध्दांनी महाराजांकडे जाऊन या संकटातून मुक्तता करण्यासाठी विनंती करायची ठरवले. लोक केशव महाराजांकडे धावले. त्यांची करूणा भाकली. रोजच माणसे दगावत असल्याची वार्ता त्यांच्याही कानी आली होती. आपल्याला मोठे बलिदान देऊन या परिस्थितीवर नियंत्रण आणावे लागणार असल्याचे त्यांना समजून चुकले होते त्यामुळे त्यांनी यावर काही उपाय सुचवले. त्यानुसार माणसे कामाला लागली. केशव महाराजांचे अनुष्ठान सुरू झाले होते. या अनुष्ठानाचा शेवट काय होणार हे कुणालाच ज्ञात नव्हते परंतु केशव महाराजांना त्याची पूर्ण जाणीव होती त्यांनी त्यावेळी कुणाशीही बोलणे टाळले आणि महामारीवर काय उपाय करता येईल या चिंतनात गढून गेले. महाराजांनी देवाची करूणा भाकली. आणि त्यांच्या मुखातून उदगार निघाले, ‘आठ दिवस! आठच दिवसात या रोगापासून नाशिक पूर्णपणे मुक्त होईल.’ उपाय सुचला होता, लोकही निश्चिंत होऊन घरी गेले.
केशव महाराजांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे आठ दिवसात लोकांचे मृत्युचे प्रमाण कमी होत गेले. आणि आठव्या दिवशी संपूर्ण शहर रोगमुक्त झाले. त्यावेळी महाराजांचे शिष्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत वेदमंत्राच्या घोषात त्यांची विधीवत पूजा केली. अन् महाराजांनी सर्वांवर तो घणाघाती प्रहार केला. त्यांनी सांगितले की, ‘मी उद्या समाधी घेणार आहे.’ सगळीकडे शांतता पसरली. आनंदाच्या वातावरणावर एकदम विरजण पडल्यासारखे झाले. भक्तांनी एकच कल्लोळ केला. महाराज समाधी घेणार, महाराज समाधी घेणार ही वार्ता कर्णोपकर्णी झाली. भक्तसमुदाय चिंतेत पडला, महाराजांनी इतक्या लवकर समाधी घेतल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? परंतु केशव महाराजांनी सर्वांना आश्वस्त केले. १८४७ साली त्यांनी समाधी घेतली. ही नाशिकमधील संजीवन समाधी होय. काळाराम मंदिराच्या मागे पुणे विद्यार्थी गृहात ही समाधी आहे.
पुणे विद्यार्थी गृहात एका बाजूला केशव महाराजांचे मंदिर असून ते दोनमजली छोटेसे कौलारू घरच आहे. केशव महाराजांचा मठ म्हणून तो ओळखला जातो. वाड्यासारखा असलेल्या या मठात आतमध्ये शिरताच प्रसन्न वातावरणाची जाणीव होते. गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तसेच शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. येथे एक मोठा पितळी नागदेखील आहे. चौथऱ्यावर एक नंदादीप कायम तेवत असतो. या मठातून बाहेर निघताना उजव्या हाताला आणखी एक समाधी आहे. ही समाधी केशव महाराजांचे मुख्य शिष्य चिंतू लवटे यांची आहे. त्यांनी महाराजांनंतर बराच काळ या मठाची व्यवस्था बघितली. महाराजांच्या कृपेने ते देखील सिध्द पदाला पोहोचले होते. त्यांनी सुध्दा १८९० मध्ये वैशाख वद्य अमावास्येलाच मठात समाधी घेतली. चिंतू लवटे म्हणजे प्रल्हाद नरहरी यांचे आजोबा.
आजोबांनंतर मठाचा कारभार प्रल्हाद नरहरी सप्रे पाहू लागले. त्यांनी १९०८ साली मठाचा जीर्णोध्दार केला. त्यांच्या धर्मपत्नी सन १९२८ मध्ये महाराजांच्या चरणी लीन झाल्या. त्यानंतर मठाची व्यवस्था पाहण्यासाठी सप्रे यांनी पंचांची व्यवस्था केली. आणि सन १९३० ला चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर ते देवलोकी गेले. त्यानंतर प्रल्हाद महाराजांच्या कुटुंबातील गं.भा.पार्वतीबाई शंकर या पंचाच्या सहाय्याने मठाची व्यवस्था पाहू लागल्या. परंतु निधीअभावी त्यांना व्यवस्था करणे कठीण जाऊ लागल्याने एक योजना बनवून पुणे विद्यार्थी गृहाची एक शाखा स्थापन केली. या संस्थेचे संचालक विश्वनाथ गंगाधर केतकर व इतरांनी मिळून मठाच्या विश्वस्तांची बैठक होऊन त्यात दरमहा पार्वतीबार्इंना पंचवीस रूपये देण्याचे ठरवले. त्यातून पंधरा रूपये उदरनिर्वाहासाठी व पाच रूपये केशव महाराजांच्या नित्य फुल व नैवेद्यासाठी आणि पाच रूपये दत्तात्रेय गोपाळ भानोसे यांना दोन वेळच्या पूजेसाठी नियुक्त करून ठरविण्यात आले. आजही महाराजांची पूजा नित्य सुरू आहे.