अ‍ॅपशहर

नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले ‘डीपीएम’

या डोंबिवलीकर मराठी माणसाने संपूर्ण भारतात प्रथमच १९९७ साली बीओटी प्रकल्प सुरू करून रस्त्यांना ‘सुंदर’ बनवण्याचे व्रत हाती घेतले आण‌ि ते यशस्वीही करून दाखविले.

Maharashtra Times 7 Jan 2018, 3:14 am
जीवनात नेमकं उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरवून ते पूर्णत्वाला नेण्याची उर्मी घेऊन जन्माला येतात, तेच आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. डोळ्यासमोरचं ध्येय, ते प्राप्त करण्यासाठी कामाची केलेली अचूक आखणी, अहोरात्र काम करण्याची धमक, वेळेपूर्वी ध्येय गाठण्याची क्षमता आणि शेवटी ‘विजयी होणारच’ याबद्दल असलेला आत्मविश्वास, हे सर्व गुण ठासून भरलेले व्यक्त‌मित्त्व म्हणजे ‘आयडियल’मॅन दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम article on d p mhaiskar
नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले ‘डीपीएम’


पक्के डोंबिवलीकर व आयड‌यिल रोड बिल्डर्सचे संस्थापक दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. १५ सप्टेंबर २०१७मध्ये त्यांनी ८०व्या वर्षात पदार्पण केले होते.

‘ध्येयमय हो सर्व जीवन, हीच आकांक्षा मनी, सर्व शक्ती हो समर्पण मातृभूच्या अर्चना’या ध्येयाने सतत कार्यरत राहणारे म्हैसकर मुंबई महापालिकेत काम करता करता शहा कन्स्ट्रक्शन्समध्ये येऊन बारीक-सारीक गोष्टी शिकत. ८ ऑक्टोबर १९७८ साली त्यांनी आयआरबी अर्थात ‘आयडियल रोड बिल्डर्स’ या नावाने रस्तेबांधणीचा व्यावसाय सुरू केला. छोटी-मोठी कामे करत २० वर्षांनी कंपनीच्या शिरपेचात एक सुंदर मोरपीस रोवले. सात वर्षे अथक परिश्रम करून ठाणे भिवंडी बायपास किती छान होऊ शकतो, हे महाराष्ट्र व भारत सरकारला प्रबंधासहित सादर केले. खरं तर त्यांनी हा प्रबंध व‌द्यिापीठाला सादर केला असता, तर म्हैसकरांना डॉक्टरेट प्राप्त झाली असती, मात्र त्यांनी तसे न करता या ‘डोंबिवली’कर मराठी माणसाने संपूर्ण भारतात प्रथमच १९९७ साली बीओटी प्रकल्प सुरू करून रस्त्यांना ‘सुंदर’ बनवण्याचे व्रत हाती घेतले आण‌ि ते यशस्वीही करून दाखविले. प्रसिद्ध व्यंगच‌त्रिकार आर. के. लक्ष्मण यांनी भिवंडी बायपासचा अप्रतिम रस्ता तयार झाल्यावर ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पह‌ल्यिा पानावर भ‌विंडी बायपास रस्त्याला हेल‌पिॅड समजून त‌थिे एक हेल‌किॉप्टर उतरल्याचे दाखवून म्हैसकर यांचा सन्मान केला होता. यानंतर आयआरबीने आण‌ि पर्यायाने म्हैसकर यांनी कधीही मागे वळून पहिले नाही. कंपनीने पनवेल-गोवा महामार्गावर खारपाडा येथे आपला पहिलावहिला मोठा पूल बांधला. आपल्या कामाने त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वतःची वेगळी ओळख न‌र्मिाण केली. राज्याला अनेक उत्तमोत्तम दर्जेदार सुंदर रस्ते बनवून दिले. भारतासारख्या विकसनशील देशाला दळणवळणाच्या क्षेत्रात सर्वसामान्यांच्या सोयीसाठी स्वतः निधी उभारून दर्जेदार कामांना गती देण्याचे अमूल्य कार्य त्यांनी करून दाखविले.

आपल्या हयातीत दोन्ही कर्तबगार व कष्टाळू चिरंजीव, वीरेंद्र व जयंत यांना आपली व्यवसायाची गुरुकिल्ली द‌लिी. त्यांनीही वड‌लिांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतभर व्यवसायाची उत्तुंग भरारी मारली. देशातील पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींमध्ये वीरेंद्र म्हैसकर यांचे नाव आलेले पाहून त्यांना समाधान नक्कीच वाटले असणार.

आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यात त्यांचा वडिलकीचा हात होता. दारी येणाऱ्या सर्व गरजू संस्थांना सातत्याने मदत देत असताना कुठेही अहंपणाला जराही थारा न देता त्यांनी डोंबिवली जिमखाना, कल्याण गायन समाज, वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट, एम. एस. ढवळे पालघर चॅरिटेबल ट्रस्ट, बेडेकर महाविद्यालय ठाणे, नाट्यसंमेलन डोंबिवली, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, गजानन महाराज देवस्थान, नानाजी देशमुख जीवन गौरव पुरस्कार यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमांना हसतमुखाने मदत केली. तसेच के. व्ही. पेंढरकर महाव‌द्यिालयाला ग्रंथालयाची भेट द‌लिी.

मात्र ‘तळ्याकाठी बसलेल्या चातकाला ढगांचीच आस लागते, अन्यथा तळ्यात पाणी कमी का असते?’ या उक्तीप्रमाणे केवळ वर्तमानावर संतुष्ट न राहता त्यांनी कायम नवनिर्मितीचा ध्यास घेतला. माझे काम हेच माझे जीवन आण‌ि हीच माझी विश्रांती, हाच मंत्रजागर त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. अशा ‘डीपीएम’ना विनम्र श्रद्धांजली!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज