अ‍ॅपशहर

बाबासाहेबांच्या वस्तू लुटल्या!

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची जागा माझ्या मालकीची असून, तसे जमीन नोंदणीचे रेकॉर्डही माझ्याकडे आहे’, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘प्रेसलगतची जागा द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या नावे असून, त्याबाबतचा वाद धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि कोर्टात प्रलंबित आहे’, असे सांगतानाच, पाडकामाच्या वेळी बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू लुटून नेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Maharashtra Times 26 Jun 2016, 4:00 am
प्रकाश आंबेडकर यांचा ट्रस्टवर आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr ambedkar building issue
बाबासाहेबांच्या वस्तू लुटल्या!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची जागा माझ्या मालकीची असून, तसे जमीन नोंदणीचे रेकॉर्डही माझ्याकडे आहे’, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘प्रेसलगतची जागा द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या नावे असून, त्याबाबतचा वाद धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि कोर्टात प्रलंबित आहे’, असे सांगतानाच, पाडकामाच्या वेळी बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू लुटून नेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादरचे आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची वास्तू शनिवारी पहाटे अडीच-तीनच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘बाबासाहेबांच्या लढ्यातील महत्त्वाचे दस्तावेज, ‘बहिष्कृत भारत’चे दुर्मिळ अंक, बाबासाहेबांची जुनी तिजोरी अशा अमूल्य वस्तू ती वास्तू पाडणाऱ्यांनी लुटून नेल्या. इतकेच नव्हे तर वीज मीटरही काढून नेले. हा एकप्रकारे दरोडा असून, त्या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी आपण पोलिसांना २४ तासांची मुदत दिली आहे. अन्यथा या घटनेच्या विरोधात राज्यातील आंबेडकरी जनता तीव्र आंदोलन करेल’, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे. ‘प्रेसच्या शेजारच्या ट्रस्टच्या ताब्यातील दुसऱ्या जागेच्या मालकी हक्क व पुनर्विकासाच्या प्रश्नावर आमच्यात वाद आहेत. मुळात त्या ट्रस्टचे सर्व जुने ट्रस्टी हयात असताना रत्नाकर गायकवाड यांच्या गटाने नवे विश्वस्त ट्रस्टमध्ये घेतले’, असा आरोपही आंबेडकर यांनी
केला आहे.

‘राज्य सरकारचा आशीर्वाद’

बाबासाहेबांशी संबंधित वास्तू जमीनदोस्त करण्याचा उद्योग राज्य सरकारच्या आशीर्वादाने झाल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी केला आहे. या जागेवर पंचतारांकित हॉटेल अथवा मॉल उभारण्याचा डाव असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज