शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ या दिवशी शिवसेनेची स्थापना केली. या संघटननेने मराठी मनावर गेली गेली ५० वर्षे अधिराज्य केले. मराठी माणसांच्या हक्कासाठी संघर्ष केला. मराठी अस्मिता, भूमीपुत्रांना नोकऱ्या, हिंदुत्व अशी विविधस्तरावर ही वाटचाल झाली. १९९५ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकला. तर प्रवासात छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यासारखे बडे नेतेही शिवसेनेतून बाहेर पडले. १९ जून २०१६ रोजी रविवारी शिवसेना ५० वा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने शिवसेनेच्या या वाटचालीतील हे महत्त्वाचे टप्पे…
> १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना, त्यापूर्वी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून मराठी माणसाच्या हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरेंकडून विविध आवाहने. मार्मिकमधील वाचा आणि थंड बसा या सदराला तुफान प्रतिसाद
> ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा. या लाखोंची गर्दी. बाळासाहेबांच्या पहिल्याच तडाखेबाज भाषणाने मराठी माणसांची मने जिंकली.
> ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, असे सांगत जन्म घेतलेल्या शिवसेनेने १९६७ मध्ये पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवली. सेना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला.
> १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने जोरदार प्रचार करत उडी घेतली आणि सेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला.
> शिवसेनेचा कम्युनिस्टांबरोबचा संघर्ष सुरू. लालबाग-परळ या गिरणगावात असलेला लाल बावट्याचा जोर शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्काचा वापर करत कमी करायला सुरुवात केली. महाराष्ट्र-कर्नाटक वादात शिवसेनेने उडी घेतली. संघर्ष पेटला. बाळासाहेबांना अटक.
> १९७० साली लालबागमधील कृष्णा देसाई या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला. संशयाची सुई शिवसेनेवर. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करत वामनराव महाडिक प्रचंड मतांनी विजयी
> पुढे मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते यांचा निवड. आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन
> इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर देशात सुरू झालेल्या काँग्रेस लाटेनंतर भाजपची शिवसेनेबरोबर युतीची मुहूर्तमेढ
> शिवसेनेने आक्रमक हिंदुत्ववादाचा स्वीकार केला. बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक भाषणे करून वातावरण ढवळून काढले.
> १९९० च्या निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन बाळासाहेब मैदानात उतरले. एकच लक्ष्य विधानसभा, ही घोषणा होती. युतीने पहिल्यांदाच महाराष्ट्रातील साखरेभोवती फिरणाऱ्या मराठा राजकारणाला हादरा दिला.
> मात्र लागलीच वर्षभराने मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांच्यातील विकोपाला गेलेल्या वादामुळे शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली. छगन भुजबळ पक्षाबाहेर पडले. शिवसेनेला बसलेला तो पहिला मोठा हादरा होता. बाळासाहेबांनी भुजबळ यांच्यावर त्यांच्या आक्रमक शैलीत लखोबा अशी जोरदार टीका केली. भुजबळांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला होता.
> त्याच्या पुढच्याच वर्षी बाबरी मशीद पडली तेव्हा, बाबरी माझ्या शिवसैनिकांची पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे वक्तव्य करण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले. मराठी मतांबरोबर तेव्हा बाळासाहेबांनी हिंदूची मने जिंकली. मुंबईत दंगे भडकले. बाळासाहेबांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेवर टीका होऊ लागली. मात्र पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या नावावर तयार झालेला विशाल जनाधार शिवसेनेच्या हाती आला.
> १९९५ साली शिवसेना-भाजपने पहिली विधानसभा निवडणूक जिंकली आणि राज्याची सत्ता हाती आली. मात्र ही सत्ता पूर्ण नसल्याने काँग्रेसपासून फुटून वेगळ्या झालेल्या आमदारांच्या जीवावर ही सत्ता चालवावी लागली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. शेवटच्या सहा महिन्यांसाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनविले.
> वर्षभरातच राज ठाकरे यांच्यावर रमेश कीणी खून प्रकरणात आरोप झाले. सेना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात.
> १९९९ साली सत्ता गेली. छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक करण्यासाठी आटापिटा केला. बाळासाहेबांना तांत्रिक अटक करून लागलीच सुटका झाली.
> २००४ साली महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्या हाती सेनेची सूत्रे देण्यात आली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले, तेव्हा राज ठाकरे नाराज झाले. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात राणे आणि राज ठाकरे यांचा संघर्ष सुरू होता.
> अखेर २००५ मध्ये नारायण राणे सेनेतून बाहेर पडले. काँग्रेसमध्ये प्रवेश, राणे विरुद्ध सेना जोरदार संघर्ष.
> वर्षभरातच राज ठाकरे यांनी सेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढून स्वतःची वेगळी चूल मांडली, राज आणि राणे यांनी उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केले. परंतु शेवटी उद्धव यांचा पूर्ण अंकुश शिवसेनेवर आला.
> २०१२ बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. सेनेची संपूर्ण धुरा उद्धव यांच्या हाती. त्यापूर्वीच बाळासाहेबांच्या उपस्थित शिवाजी पार्कवर अदित्य ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग
> २०१४ मोदी लाटेत सेना-भाजपचे ४२ खासदार लोकसभेवर. मात्र सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. सेना व भाजप वेगवेगळे लढले. सेनेला भाजपच्या निम्म्या जागा मिळाल्या. सेना-भाजप सुप्त संघर्ष सुरू. सेनेला नाक धरून सत्तेत जाण्याचा पर्याय निवडावा लागला. एकही महत्त्वाचे खाते मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिकांमध्ये सेनेने वर्चस्व सिद्ध केले. मात्र भाजपकडून कडवे आव्हान मिळण्यास सुरुवात झाली.
> १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना, त्यापूर्वी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून मराठी माणसाच्या हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरेंकडून विविध आवाहने. मार्मिकमधील वाचा आणि थंड बसा या सदराला तुफान प्रतिसाद
> ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा. या लाखोंची गर्दी. बाळासाहेबांच्या पहिल्याच तडाखेबाज भाषणाने मराठी माणसांची मने जिंकली.
> ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, असे सांगत जन्म घेतलेल्या शिवसेनेने १९६७ मध्ये पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवली. सेना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला.
> १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने जोरदार प्रचार करत उडी घेतली आणि सेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला.
> शिवसेनेचा कम्युनिस्टांबरोबचा संघर्ष सुरू. लालबाग-परळ या गिरणगावात असलेला लाल बावट्याचा जोर शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्काचा वापर करत कमी करायला सुरुवात केली. महाराष्ट्र-कर्नाटक वादात शिवसेनेने उडी घेतली. संघर्ष पेटला. बाळासाहेबांना अटक.
> १९७० साली लालबागमधील कृष्णा देसाई या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला. संशयाची सुई शिवसेनेवर. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करत वामनराव महाडिक प्रचंड मतांनी विजयी
> पुढे मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते यांचा निवड. आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन
> इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर देशात सुरू झालेल्या काँग्रेस लाटेनंतर भाजपची शिवसेनेबरोबर युतीची मुहूर्तमेढ
> शिवसेनेने आक्रमक हिंदुत्ववादाचा स्वीकार केला. बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक भाषणे करून वातावरण ढवळून काढले.
> १९९० च्या निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन बाळासाहेब मैदानात उतरले. एकच लक्ष्य विधानसभा, ही घोषणा होती. युतीने पहिल्यांदाच महाराष्ट्रातील साखरेभोवती फिरणाऱ्या मराठा राजकारणाला हादरा दिला.
> मात्र लागलीच वर्षभराने मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांच्यातील विकोपाला गेलेल्या वादामुळे शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली. छगन भुजबळ पक्षाबाहेर पडले. शिवसेनेला बसलेला तो पहिला मोठा हादरा होता. बाळासाहेबांनी भुजबळ यांच्यावर त्यांच्या आक्रमक शैलीत लखोबा अशी जोरदार टीका केली. भुजबळांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला होता.
> त्याच्या पुढच्याच वर्षी बाबरी मशीद पडली तेव्हा, बाबरी माझ्या शिवसैनिकांची पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे वक्तव्य करण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले. मराठी मतांबरोबर तेव्हा बाळासाहेबांनी हिंदूची मने जिंकली. मुंबईत दंगे भडकले. बाळासाहेबांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेवर टीका होऊ लागली. मात्र पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या नावावर तयार झालेला विशाल जनाधार शिवसेनेच्या हाती आला.
> १९९५ साली शिवसेना-भाजपने पहिली विधानसभा निवडणूक जिंकली आणि राज्याची सत्ता हाती आली. मात्र ही सत्ता पूर्ण नसल्याने काँग्रेसपासून फुटून वेगळ्या झालेल्या आमदारांच्या जीवावर ही सत्ता चालवावी लागली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. शेवटच्या सहा महिन्यांसाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनविले.
> वर्षभरातच राज ठाकरे यांच्यावर रमेश कीणी खून प्रकरणात आरोप झाले. सेना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात.
> १९९९ साली सत्ता गेली. छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक करण्यासाठी आटापिटा केला. बाळासाहेबांना तांत्रिक अटक करून लागलीच सुटका झाली.
> २००४ साली महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्या हाती सेनेची सूत्रे देण्यात आली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले, तेव्हा राज ठाकरे नाराज झाले. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात राणे आणि राज ठाकरे यांचा संघर्ष सुरू होता.
> अखेर २००५ मध्ये नारायण राणे सेनेतून बाहेर पडले. काँग्रेसमध्ये प्रवेश, राणे विरुद्ध सेना जोरदार संघर्ष.
> वर्षभरातच राज ठाकरे यांनी सेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढून स्वतःची वेगळी चूल मांडली, राज आणि राणे यांनी उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केले. परंतु शेवटी उद्धव यांचा पूर्ण अंकुश शिवसेनेवर आला.
> २०१२ बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. सेनेची संपूर्ण धुरा उद्धव यांच्या हाती. त्यापूर्वीच बाळासाहेबांच्या उपस्थित शिवाजी पार्कवर अदित्य ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग
> २०१४ मोदी लाटेत सेना-भाजपचे ४२ खासदार लोकसभेवर. मात्र सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. सेना व भाजप वेगवेगळे लढले. सेनेला भाजपच्या निम्म्या जागा मिळाल्या. सेना-भाजप सुप्त संघर्ष सुरू. सेनेला नाक धरून सत्तेत जाण्याचा पर्याय निवडावा लागला. एकही महत्त्वाचे खाते मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिकांमध्ये सेनेने वर्चस्व सिद्ध केले. मात्र भाजपकडून कडवे आव्हान मिळण्यास सुरुवात झाली.