आयआयटीमधील, अभियांत्रिकी क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेेले विद्यार्थी इथे शिकून परदेशात जाऊन स्थायिक होतात, असा आत्तापर्यंतचा प्रवाह होता. मात्र गेल्या काही वर्षांत हे प्रमाण कमी झाले आहे. सांगतायत... नवीन काबरा आणि अमित परांजपे.
ऐंशी-नव्वदच्या-दशकांमध्ये ब्रेनड्रेनचे प्रमाण इतके अधिक होते की, परदेशामध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकच परवानगी द्यायचे नाही. नानाविध कारणे सांगून त्यांना इथेच थांबवून ठेवण्यासाठी आटापिटा सुरू होता. एकदा परदेशात गेलेले सर्वोत्तम महाविद्यालयांतील विद्यार्थी पुन्हा देशात परतण्याची शक्यता फारच कमी. मात्र २०००च्या आसपास हे वातावरण बदलत गेले. सगळेच स्मार्ट, हुशार विद्यार्थी परदेशामध्ये जाण्याचं प्रमाण आटू लागलं, भारतामध्येही उद्योग आणि संशोधन, सॉफ्टवेअरसारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामाची सुरुवात होत होती. नव्या संधी खुणावत होत्या. त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी इथल्या कामाला पसंती द्यायला सुरुवात केली. परदेशात गेलेले विद्यार्थी भारतात परतून काम करण्यासाठी उत्सुक होते.
या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अभ्यासाचा चांगला फायदा उद्योग (इंडस्ट्री) क्षेत्राला झाला. संशोधनाच्या क्षेत्राला मात्र अद्याप त्याचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. त्यालाही दोन कारणं आहेत, एकतर संशोधन उद्योगासाठी पूरक असावे लागते. उद्योगक्षेत्राच्या गरजा कोणत्या आहेत याचा विचार करून संशोधन केले तर त्यामुळे त्या उद्योगांना गती मिळते, त्याचा लाभ उद्योग वाढण्यासाठी होतो. संशोधनक्षेत्रामध्ये देशाचे नावही उज्ज्वल होते. आज सूक्ष्मपणे पाहिले तर संशोधनक्षेत्रात परदेशातून येऊन काम करणाऱ्या मुलांची संख्या फार नाही. परदेशामध्ये ज्याप्रमाणे संशोधननिधीची उपलब्धता असते तशी आपल्याकडे अभावाने आहे. परदेशांत उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच सरकारही संशोधनासाठी आग्रही राहते. तसा पाठिंबा व निधीची उपलब्धता भारतात मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे होणारी संशोधनाची कामे उभी राहतात मात्र ती पूरक ठरत नाही. उद्योगाभिमुख संशोधनकार्यासाठी लागणारा निधी उभा करणे ही उद्योगव्यवसायांचीही जबाबदारी असते. उद्योगउदीमांच्या बाबतीत मात्र चांगल्या संधी असल्याने या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे.
परदेशात जाऊन स्थायिक होण्यात, तिथे काम करण्यात आर्थिक स्थैर्याचा मुद्दाही होता.
आज मात्र त्यादृष्टीनेही भारतामध्ये स्थैर्य आले आहे. अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत पैसे मिळत नसले तरीही समाधानकारक पगार दिले जातात. त्यामुळे त्याही पातळीवर परदेशात जाऊन त्या देशाला लाभ देण्यापेक्षा भारतामध्येच राहण्याचा कल वाढता असल्याचे दिसते. जे ज्ञान मिळाले आहे त्याचा वापर करताना ज्या पद्धतीचे काम बाजारपेठेमध्ये उपलब्ध असावे लागते, तसे आव्हानात्मक काम ८०च्या दशकांमध्ये नव्हते, आता तशा कामांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. परदेशामध्ये राहून तिथले प्रशिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. तसेच तेथील कंपन्याही मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी उत्सुक असतात. या परदेशी संस्कृतीने बिंबवलेला टीमवर्कचा भाग भारतातल्या कॉर्पोरेट सेक्टरला उद्दष्टि गाठण्यासाठी एक महत्त्वाचा भाग वाटतो. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जी व्यावसायिकता वाढते आहे त्याला खूप मोठा हातभार लावण्याचे, नेमकी दिशा देण्याचे काम परदेशात राहून परत आलेल्यांनी टीमवर्कच्या महत्त्वाच्या गुणामुळेही मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही.
आज परदेशातल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, फ्लिपकार्ट, ओरॅकलसारख्या कंपन्याही या विद्यार्थ्यांना तिथे बोलावण्यापेक्षा भारतातल्या त्यांच्या शाखांमध्ये काम देणे अधिक पसंत करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी, ग्राहकांसाठीही एक मोठी बाजारपेठ खुली होते. ही बाजारपेठ आता वेगाने वाढते आहे. आयआयटीअन्समधील गुणवत्तेवर विश्वास ठेवून सेवा, उत्पादने, सुविधा देणारा परदेशी कंपन्यांचा एक ‘मेगाहब’ तयार होतोय.
सन २०२० पर्यंत उद्योगाभिमुख पूरक व्यवस्था आणण्याचे धोरण असले तरीही ते एका रात्रीत होणारे नाही. आजच्या सरकारने स्टार्टअपसारखे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, उद्योगांना चालना देणारी काही धोरणे आखली असली तरीही त्याचा दृश्यपरिणाम दिसायला काही वर्षे जावी लागणार आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेचे अंतरंगही बदलेल. यापूर्वी अमेरिककडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा वाढता होता. त्याला कारणही तसेच होते. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात अमेरिकेची मक्तेदारी होती. त्यात भाषेचाही मुद्दा होताच. जपान, फ्रान्ससारख्या देशांमध्ये जायचे व तिथे उच्च शिक्षण घ्यायचे वा करिअर करायचे, तर या देशांची भाषा अवगत असावी लागत होती. त्यामुळे या देशांकडे जाण्याचा कल फारसा नव्हता. केवळ याच अटीमुळे मागे राहतो हे लक्षात आल्यावर या देशांनी आता इंग्रजी भाषेची मदत घेत काही प्रशिक्षण वर्गांची सुरुवात केली, काही नवीन प्रोग्रॅम डिझाइन केले, त्यामुळे या वेगळ्या मुलखामध्ये जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक दिसतात.
अमेरिका एके अमेरिका हेच त्यांचे ध्येय राहिले नाही. या क्षेत्रात मुलींनी म्हणावी तशी भरारी मारलेली नाही. मात्र येत्या काळात या क्षेत्रांतील संधी मुलींनाही साद घातलीत आणि त्याही अन्य क्षेत्राप्रमाणे येथेही आपल्या नावाची मोहर उमटवतील यात शंका नाही
(शब्दांकन ः शर्मिला कलगुटकर)
ऐंशी-नव्वदच्या-दशकांमध्ये ब्रेनड्रेनचे प्रमाण इतके अधिक होते की, परदेशामध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकच परवानगी द्यायचे नाही. नानाविध कारणे सांगून त्यांना इथेच थांबवून ठेवण्यासाठी आटापिटा सुरू होता. एकदा परदेशात गेलेले सर्वोत्तम महाविद्यालयांतील विद्यार्थी पुन्हा देशात परतण्याची शक्यता फारच कमी. मात्र २०००च्या आसपास हे वातावरण बदलत गेले. सगळेच स्मार्ट, हुशार विद्यार्थी परदेशामध्ये जाण्याचं प्रमाण आटू लागलं, भारतामध्येही उद्योग आणि संशोधन, सॉफ्टवेअरसारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामाची सुरुवात होत होती. नव्या संधी खुणावत होत्या. त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी इथल्या कामाला पसंती द्यायला सुरुवात केली. परदेशात गेलेले विद्यार्थी भारतात परतून काम करण्यासाठी उत्सुक होते.
या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अभ्यासाचा चांगला फायदा उद्योग (इंडस्ट्री) क्षेत्राला झाला. संशोधनाच्या क्षेत्राला मात्र अद्याप त्याचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. त्यालाही दोन कारणं आहेत, एकतर संशोधन उद्योगासाठी पूरक असावे लागते. उद्योगक्षेत्राच्या गरजा कोणत्या आहेत याचा विचार करून संशोधन केले तर त्यामुळे त्या उद्योगांना गती मिळते, त्याचा लाभ उद्योग वाढण्यासाठी होतो. संशोधनक्षेत्रामध्ये देशाचे नावही उज्ज्वल होते. आज सूक्ष्मपणे पाहिले तर संशोधनक्षेत्रात परदेशातून येऊन काम करणाऱ्या मुलांची संख्या फार नाही. परदेशामध्ये ज्याप्रमाणे संशोधननिधीची उपलब्धता असते तशी आपल्याकडे अभावाने आहे. परदेशांत उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच सरकारही संशोधनासाठी आग्रही राहते. तसा पाठिंबा व निधीची उपलब्धता भारतात मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे होणारी संशोधनाची कामे उभी राहतात मात्र ती पूरक ठरत नाही. उद्योगाभिमुख संशोधनकार्यासाठी लागणारा निधी उभा करणे ही उद्योगव्यवसायांचीही जबाबदारी असते. उद्योगउदीमांच्या बाबतीत मात्र चांगल्या संधी असल्याने या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे.
परदेशात जाऊन स्थायिक होण्यात, तिथे काम करण्यात आर्थिक स्थैर्याचा मुद्दाही होता.
आज मात्र त्यादृष्टीनेही भारतामध्ये स्थैर्य आले आहे. अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत पैसे मिळत नसले तरीही समाधानकारक पगार दिले जातात. त्यामुळे त्याही पातळीवर परदेशात जाऊन त्या देशाला लाभ देण्यापेक्षा भारतामध्येच राहण्याचा कल वाढता असल्याचे दिसते. जे ज्ञान मिळाले आहे त्याचा वापर करताना ज्या पद्धतीचे काम बाजारपेठेमध्ये उपलब्ध असावे लागते, तसे आव्हानात्मक काम ८०च्या दशकांमध्ये नव्हते, आता तशा कामांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. परदेशामध्ये राहून तिथले प्रशिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. तसेच तेथील कंपन्याही मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी उत्सुक असतात. या परदेशी संस्कृतीने बिंबवलेला टीमवर्कचा भाग भारतातल्या कॉर्पोरेट सेक्टरला उद्दष्टि गाठण्यासाठी एक महत्त्वाचा भाग वाटतो. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जी व्यावसायिकता वाढते आहे त्याला खूप मोठा हातभार लावण्याचे, नेमकी दिशा देण्याचे काम परदेशात राहून परत आलेल्यांनी टीमवर्कच्या महत्त्वाच्या गुणामुळेही मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही.
आज परदेशातल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, फ्लिपकार्ट, ओरॅकलसारख्या कंपन्याही या विद्यार्थ्यांना तिथे बोलावण्यापेक्षा भारतातल्या त्यांच्या शाखांमध्ये काम देणे अधिक पसंत करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी, ग्राहकांसाठीही एक मोठी बाजारपेठ खुली होते. ही बाजारपेठ आता वेगाने वाढते आहे. आयआयटीअन्समधील गुणवत्तेवर विश्वास ठेवून सेवा, उत्पादने, सुविधा देणारा परदेशी कंपन्यांचा एक ‘मेगाहब’ तयार होतोय.
सन २०२० पर्यंत उद्योगाभिमुख पूरक व्यवस्था आणण्याचे धोरण असले तरीही ते एका रात्रीत होणारे नाही. आजच्या सरकारने स्टार्टअपसारखे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, उद्योगांना चालना देणारी काही धोरणे आखली असली तरीही त्याचा दृश्यपरिणाम दिसायला काही वर्षे जावी लागणार आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेचे अंतरंगही बदलेल. यापूर्वी अमेरिककडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा वाढता होता. त्याला कारणही तसेच होते. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात अमेरिकेची मक्तेदारी होती. त्यात भाषेचाही मुद्दा होताच. जपान, फ्रान्ससारख्या देशांमध्ये जायचे व तिथे उच्च शिक्षण घ्यायचे वा करिअर करायचे, तर या देशांची भाषा अवगत असावी लागत होती. त्यामुळे या देशांकडे जाण्याचा कल फारसा नव्हता. केवळ याच अटीमुळे मागे राहतो हे लक्षात आल्यावर या देशांनी आता इंग्रजी भाषेची मदत घेत काही प्रशिक्षण वर्गांची सुरुवात केली, काही नवीन प्रोग्रॅम डिझाइन केले, त्यामुळे या वेगळ्या मुलखामध्ये जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक दिसतात.
अमेरिका एके अमेरिका हेच त्यांचे ध्येय राहिले नाही. या क्षेत्रात मुलींनी म्हणावी तशी भरारी मारलेली नाही. मात्र येत्या काळात या क्षेत्रांतील संधी मुलींनाही साद घातलीत आणि त्याही अन्य क्षेत्राप्रमाणे येथेही आपल्या नावाची मोहर उमटवतील यात शंका नाही
(शब्दांकन ः शर्मिला कलगुटकर)