शर्मिला कलगुटकर
नैराश्य, आत्महत्या, एकटेपणा, भावभावनांचे व्यवस्थापन या सगळ्याच कळीच्या मुद्द्यांवर सातत्याने चर्चा केली जातेय. आरोग्याचं एकूण ‘बेअरिंग’ सांभाळायचं असेल तर शारीरिक आजारांइतकाच मनाचाही तोल सांभाळायला हवा, हे आता समाजमान्य होत आहे. नैराश्य म्हणजे वेडेपणा नाही. मानसिक आजारांचे असंख्य पैलू आता भावनिक, मानसिक आणि मेंदूतील बदलत्या रासायनिक प्रक्रियेशी निगडित असतात हे शहाणपण येण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागलाय. आज मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्या, बरं व्हायचं आहे ही प्रबळ इच्छ मनाशी ठेवून कुटुंबाचीही मदत घेणाऱ्या, मानसिक आजारांविषयी उघड व्यक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ही परिस्थिती मानसिक आरोग्यक्षेत्राला वैद्यकशास्त्रातील मुख्य प्रवाहामध्ये स्थान मिळावं, म्हणून धडपडणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांना निश्चितच दिलासा देणारी आहे.
आता काळजीचं कारण वेगळंच आहे. एकीकडे नैराश्याचं प्रमाण वाढतं आहे. प्रत्येक आठवड्याला मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालयांतून, संस्थामधून मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन स्वतःला संपवून टाकावंस वाटतंय सांगणाऱ्या निराश व्यक्तींचे प्रमाण वाढतंय. परंतु या सगळ्यांना योग्यवेळी मदत करायला, त्यांच्या आजाराचे निदान करून औषधोपचार सुरू करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मात्र महाराष्ट्रात वानवा आहे. वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या विभागात प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असताना मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला मात्र समाधनाकारक दिवस आलेले नाहीत.
दरवर्षी महाराष्ट्रात अवघे २२ मानसोपचार तज्ज्ञ तयार करण्याची क्षमता आहे. एमडीनंतर कमीतकमी सात वर्षांचा अनुभव असेल तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची नेमणूक अट असल्यामुळे अध्यापनासाठी शिक्षकच मिळत नव्हते. ही अट आता पाच वर्ष अनुभवाची झाल्यानंतरही या शाखेकडे स्वतःहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा तसा कमीच असल्याचे दिसून येते. जिथे गुणवत्ता असणारे शिक्षक नाहीत तिथे विद्यार्थी कसे तयार होणार, त्यामुळे वाढीव जागा मागण्यासाठी युक्तिवाद कसा करणार, हा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागापुढेही आहेच. प्लास्टिक सर्जरी, नेत्रविकार, बालरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ होण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्राकडे मात्र पाठ फिरवली आहे.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात डॉक्टर टिकत नसल्याची खंत वारंवार व्यक्त केली जाते. गरज आहे ती त्याच्या कारणांचाही विचार करण्याची, त्यातून मार्ग काढण्याची. पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी येणारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी अध्यापनासाठी कोणते शिक्षक आहे, त्यांचा अनुभव, अध्यापनाची पद्धती, आरोग्यव्यवस्थेमधील जाण या सगळ्यांची 'रेकी' करीत असतात. वैद्यकीय महाविद्यालयांमधील या शाखेकडे येणारे विद्यार्थी अध्यापनाच्या बाबतीत फारसे समाधानी दिसत नाही. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न मानसोपचार विभाग असले तरीही तिथे शस्त्रक्रिया, प्रसूती विभागासारखी 'वेटिंग लिस्ट' नाही. जे. जे.सारख्या रुग्णालयामध्ये एक डॉक्टर अडीचशे रुग्णांना तपासतो. रुग्णांचे प्रमाण वाढते असले तरीही तज्ज्ञांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात नाही. सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्थेत अनुभव घेतला की खाजगी क्षेत्रात प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर निघून जातात, असाही आक्षेप सरकारकडून अनेकदा घेतला जातो. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ हा आक्षेप फेटाळून लावताना काही सबळ कारणेही देतात.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव काम करणारे डॉ. मनोज भाटवडेकर यांच्यासारखे डॉक्टर समाजाचा मानसिक आरोग्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे या क्षेत्राला सर्वच पातळ्यांवर सापत्न वागणूक मिळाल्याचे मत व्यक्त करतात. आज विविध प्रकारच्या आजारांवर जी औषधे निघाली आहेत, ज्या वेगाने प्रगत संशोधन सुरू आहे, तशी परिस्थिती ३०-३५ वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे मानसिक आजार झालेली व्यक्ती बरीच होणार नाही असा समज होता. ज्या शाखेमध्ये रुग्ण बरा होत नाही, त्या शाखेचा गवगवा कशाला करायचा अशी मानसिकता समाजामध्ये दृढ होती. गेल्या काही वर्षात मानसिक आजारांमधील जैवरासायनिक बदलांबद्दलही सातत्याने चर्चा झाल्याने त्याचे विविध पैलू समाजाच्या लक्षात आले. मनोरुग्णालय हे प्रत्येक मानसिक आजारांशी संबधित असलेल्या रुग्णांची जागा नव्हे ही समज आली. 'माझ्या सात पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार नव्हता हो,' हा रुग्णांचा, त्याच्या कुटुंबाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. पूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. फार दूरचे कशाला, अगदी केईएम रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य कक्ष सुरू करण्यासाठी देण्यात आलेली जागा शवागाराच्या शेजारी देण्यात आली होती!
एखाद्या रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसली तर त्याला तपासणारे डॉक्टर मानसोपचाराची गरज आहे, असे स्पष्ट सांगत नव्हते. डॉक्टरांना आपल्याकडे उपचाराला आलेला रुग्ण तुटेल अशी भीती होती अन् त्याचवेळी मनोरुग्ण म्हणून शिक्का बसण्याचा सामाजिक दबावही होता. चित्रपटासारख्या ज्या माध्यमाचा समाजावर सर्वाधिक पगडा असतो, त्या माध्यमामध्येही शॉक ट्रीटमेंट, वेड्यांचा डॉक्टर, विस्कटलेले उद्धवस्त झालेल्या रुग्णांचे चित्र रंगवले जात होते. त्यामुळे या उपचारांपासून समाज दूर पळत होता. आज दीपिका पदुकोणसारखी अभिनेत्री पुढाकार घेऊन नैराश्याबद्दल मोकळेपणाने बोलते तेव्हा अनेकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा ठरतो याचीही नोंद घ्यावी लागेल. मात्र हे होण्यासाठी दीर्घकाळ या सगळ्या सामाजिक, प्रशासकीय पातळ्यांवरील लढे मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांना वारंवार द्यावे लागले आहेत.
मनाची दुखणी शारीरिक दुखण्यांसारखी पटकन बरी होणारी नसतात. त्याच्या उपचारपद्धतीसाठी ठरावीक वेळ द्यावा लागतो. मनाचं दुखणं नेमकं कशामुळे आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या जडणघडणीचा, भोवतालच्या सामाजिक वातावरणाचाही विचार करावा लागतो. कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींच्या मनाची उभारी खचली, नैराश्य आलं हे टप्प्याटप्याने समजून घ्यावं लागतं. या क्षेत्रात काम करायचं असेल तर रुग्णांविषयी कणव, करूणा, तळमळ असावी लागते. समाजाचा, तंत्रज्ञानाचा, पिढीगणिक बदलणारा नूरही अभ्यासावा लागतो. हे बदल समजून घेत असताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकण्याची सहनशक्तीही लागते. या सगळ्याची तयारी असेल तर मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याचा पर्याय निवडता येतो. आज समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर मानसिक आजार वाढत असले तरीही या क्षेत्राला ग्लॅमर नाही. इतर क्षेत्राच्या तुलनेत आर्थिक प्राप्तिही नाही. मुख्य प्रवाहात स्थान नसल्याने या सगळ्याचा एकत्रित परिणाम पुढाकार घेणाऱ्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर होतो. यावर उतारा म्हणून आरोग्य विभागाने एमबीबीएस डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामुळे तातडीने रुग्णांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा पर्याय म्हणजे मध्यममार्ग आहे, कायमचा उपाय नसल्याचे डॉ. प्रवीण शिनगारे स्पष्ट करतात. हा तिढा सोडवण्यासाठी जागा वाढवण्याची, मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. कोणत्याही वैद्यकीय क्षेत्राला प्रशिक्षित सहायक तज्ज्ञाचीही मदत लागते. क्लिनिकल तपासण्यासाठी तंत्रज्ञांची उपलब्धता नाही. समुपदेशक, हा विषय आस्थेने समजून घेऊन प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमामध्ये मदत करणाऱ्या सहायकांचीही मोठी फळी लागते. आयपीएचसारखी संस्था मानसिक आरोग्यक्षेत्राकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सामान्यांचाही सहभाग या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा मानते. कुटुंबाच्या, सपोर्ट ग्रुपच्या पाठिंब्यालाही प्रोत्साहन देते. त्यामुळे असा एखादी आजारी व्यक्ती कुटुंबात असेल तर कुटुंब त्याबद्दल लपवाछपवी करत नाही, मोकळेपणाने त्याविषयी चर्चा करते. ही जाणीवजागृती तयार करण्यासाठीही मनुष्यबळ लागते, दुसरी फळी निर्माण करण्यासाठी नेतृत्व लागते, या सगळ्याच पातळ्यांवर मानसिक आरोग्यक्षेत्र अजूनही बाल्यावस्थेमध्ये आहे. एकीकडे मानसिक आरोग्यविषयक विधेयकांबद्दल चर्चा केली जाते. त्यातील विम्याच्या तरतुदीबद्दल सर्वसामान्यांमध्ये आस्था आहे, पण त्यासाठी उपचार केल्यानंतर अर्ज करण्याची हिंमत नाही. नैराश्यग्रस्त आहोत हे समाजाच्या लक्षात आले तर वाळीत टाकले जाऊ का, ही भीती मन खात राहते.
आरोग्याच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करत असताना आता मानसिक आजार हा मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलांमुळेही होतो, मन या दृश्य स्थितीमध्ये नसलेल्या संज्ञेची दुखणी यापुढे सांगायची की मेंदूमधील बदलाबद्दल वैद्यकीय परिभाषेमध्ये मानसिक आजारांकडे पाहायचं, इतकी प्रगत झेप मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपण घेतली आहे, पण हे सगळं समजून सांगायला, सर्वसामान्यांमध्ये झिरपायला मदत कऱण्यासाठी मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञच नसतील तर काय करणार...?
समुपदेशन आवश्यक
जीएसटीनंतर औषधांच्या वाढीव किमतींबद्दल चर्चा होऊ लागली. अन्य आजारांच्या तुलनेमध्ये मानसिक उपचारांसाठीच्या औषधांच्या किंमती कमी आहेत, त्याची उपलब्धता मात्र शेकडो कंपन्यांच्या शिरकावामुळे प्रचंड वाढली आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी बाजारात आज शंभरहून अधिक प्रकारची अॅण्टीडिप्रेसन्ट उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणती घ्यायची कोणती नाहीत हे नेमकेपणाने सांगायला तज्ज्ञांची गरज आहे. किक लागावी म्हणून औषधविक्रेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या उपलब्धतेवर निर्बंध आले असले तरीही गोळ्यांच्या वापराच्या भीतीची टांगती तलवार आजही कायम आहेच. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने काम करण्याची गरज वारंवार व्यक्त होतेय. परीक्षेच्या ताणतणावामुळे होणाऱ्या आत्महत्या, विद्यार्थ्यांचे बदलते लैंगिक वर्तन, कोवळ्या वयात हातात घेतली जाणारी शस्त्रे त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी या सगळ्यावर उतारा म्हणून समुपदेशकांची गरज आहे. आज मात्र तीन हजार विद्यार्थ्यांच्या मागे असणारे एक वा दोन समुपदेशक बळावणाऱ्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी कसे झुंजणार हा प्रश्न उरतोच.
sharmila.kalgutkar@timesgroup.com
0000000000000000000000000000000
काय झालंय डॉक्टर ?
इन्ट्रो – एका वर्षात महाराष्ट्रात अवघे वीस ते बावीस मानसोपचारतज्ज्ञ तयार होतात. नैराश्याचा विकार कैकपटीने वाढतोय, मानसिक आरोग्याचे प्रश्न कळीचे बनले आहेत. अशावेळी या क्षेत्रात मानसोपचारतज्ज्ञ का येत नाहीत याच्या कारणांची मिमांसा करण्याचीही तितकीच गरज आहे ?
शर्मिला कलगुटकर.
नैराश्य, आत्महत्या, एकटेपणा, हताशा, भावभावनांचे व्यवस्थापन या सगळ्याच कळीच्या मुद्द्यांवर आता सातत्याने चर्चा केली जातेय. आरोग्याचं एकूण ‘बेअरिंग’ सांभाळायचं असेल तर शारिरिक आजारांइतकाच मनाचाही तोल सांभाळायला हवा, हे आता समाजमान्य होत आहे. नैराश्य म्हणजे वेडेपणा नाही. मानसिक आजारांचे असंख्य पैलू आता भावनिक, मानसिक आणि मेंदूतील बदलत्या रासायनिक प्रक्रियेशी निगडित असतात हे शहाणपण येण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागलाय. आज मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणार्या, बरं व्हायचं आहे ही प्रबळ इच्छ मनाशी ठेवून कुटुंबाचीही मदत घेणार्या, मानसिक आजारांविषयी उघडपणे व्यक्त होणार्यांचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ही परिस्थिती मानसिक आरोग्यक्षेत्राला वैद्यकशास्त्रातील मुख्य प्रवाहामध्ये स्थान मिळावं, म्हणून धडपडणार्या मानसोपचारतज्ज्ञांना निश्चितच दिलासा देणारी आहे. आता काळजीचं कारण वेगळंच आहे. एकीकडे नैराश्याचं प्रमाण वेगाने वाढतं आहे. प्रत्येक आठड्याला मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालयांतून, संस्थामधून मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन स्वतःला संपवून टाकावसं वाटतंय सांगणार्या नैराश्यग्रस्त व्यक्तींचे प्रमाण वाढतंय. पण या सगळ्यांना योग्यवेळी मदत करायला, त्यांच्या आजाराचे निदान करून औषधोपचार सुरु करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मात्र महाराष्ट्रात वानवा आहे. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या विभागात प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरु असताना मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला मात्र समाधनाकारक दिवस आलेले नाहीत.
प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात अवघे 22 मानसोपचारतज्ज्ञ तयार करण्याची क्षमता आहे. एमडी नंतर कमीतकमी सात वर्षाचा अनुभव असेल तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची नेमणूक अट असल्यामुळे अध्यापनासाठी शिक्षकच मिळत नव्हते. ही अट आता पाच वर्ष अनुभवाची झाल्यानंतरही या शाखेकडे स्वतःहून येणार्या विद्यार्थ्यांचा ओढा तसा कमीच असल्याचे दिसून येते. जिथे गुणवत्ता असणारे शिक्षक नाहीत तिथे विद्यार्थी कसे तयार होणार, त्यामुळे वाढीव जागा मागण्यासाठी युक्तिवाद कसा करणार, हा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागापुढेही आहेच.एकीकडे प्लॅस्टिक सर्जरी, नेत्रविकार, बालरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ होण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्राकडे मात्र पाठ फिरवली आहे.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात डॉक्टर टिकत नसल्याची खंत वारंवार व्यक्त केली जाते. गरज आहे ती त्याच्या कारणांचाही विचार करण्याची, त्यातून मार्ग काढण्याची. पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी येणारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी अध्यापनासाठी कोणते शिक्षक आहे, त्यांचा अनुभव, अध्यापनाची पद्धती, आरोग्यव्यवस्थेमधील जाण या सगळ्यांची 'रेकी' करत असतात. वैद्यकीय महाविद्यालयांमधील या शाखेकडे येणारे विद्यार्थी अध्यापनाच्या बाबतीत फारसे समाधानी दिसत नाही. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न मानसोपचारविभाग असले तरीही तिथे शस्त्रक्रिया, प्रसूती विभागासारखी 'वेटिंग लिस्ट' नाही. जे.जे.सारख्या रुग्णालयामध्ये एक डॉक्टर अडीचशे रुग्णांना तपासतो. रुग्णांचे प्रमाण वाढते असले तरीही तज्ज्ञांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात नाही. सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्थेत अनुभव घेतला की खाजगी क्षेत्रात प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर निघून जातात, असाही आक्षेप सरकारकडून अनेकदा घेतला जातो. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ हा आक्षेप फेटाळून लावताना काही सबळ कारणेही देतात.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव काम करणारे डॉ.मनोज भाटवडेकरांसारखे डॉक्टर समाजाचा मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनामुळे या क्षेत्राला सर्वच पातळ्यांवर सापत्न वागणूक मिळाल्याचे मत व्यक्त करतात. आज विविध प्रकारच्या आजारांवर जी औषधे निघाली आहेत, ज्या वेगाने प्रगत संशोधन सुरु आहे, तशी परिस्थिती तीस- पस्तीस वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे मानसिक आजार झालेली व्यक्ती बरीच होणार नाही, हा ग्रह होता. ज्या शाखेमध्ये रुग्ण बरा होत नाही त्या शाखेचा गवगवा कशाला करायचा याप्रकारची मानसिकता समाजामध्ये दृढ होती. गेल्या काही वर्षात मानसिक आजारांमधील जैवरासायनिक बदलांबद्दलही सातत्याने चर्चा झाल्याने त्याचे विविध पैलू समाजाला लक्षात आले. मनोरुग्णालय हे प्रत्येक मानसिक आजारांशी संबधित असलेल्या रुग्णांची जागा नव्हे ही समज आली. 'माझ्या सात पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार नव्हता हो,' हा रुग्णांचा, त्याच्या कुटुंबाचा दृष्टीकोन आता बदलू लागला आहे. पूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. फार दूरचे कशाला, अगदी केईएम रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य कक्ष सुरु करण्यासाठी देण्यात आलेली जागा शवागाराच्या शेजारी देण्यात आली होती.!
एखाद्या रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसली तर त्याला तपासणारे डॉक्टर मानसोपचाराची गरज आहे, असे स्पष्टपणे सांगत नव्हते. डॉक्टरांना आपल्याकडे उपचाराला आलेला रुग्ण तुटेल अशी भिती होती अन् त्याचवेळी मनोरुग्ण म्हणून शिक्का बसण्याचा सामाजिक दबावही होता. चित्रपटासारख्या ज्या माध्यमाचा समाजावर सर्वाधिक पगडा असतो, त्या माध्यमामध्येही शॉक ट्रिटमेंट, वेड्यांचा डॉक्टर, विस्कटलेले उद्धवस्त झालेल्या रुग्णांचे चित्र रंगवले जात होते. त्यामुळे या उपचारांपासून समाज दूर पळत होता. आज दिपिका पदुकोणसारखी अभिनेत्री पुढाकार घेऊन नैराश्याबद्दल मोकळेपणाने बोलते तेव्हा अनेकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा ठरतो याचीही आवर्जून नोंद घ्यावी लागेल. मात्र हे होण्यासाठी दीर्घकाळ या सगळ्या सामाजिक , प्रशासकीय पातळ्यांवरील लढती मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांना वारंवार द्याव्या लागल्या आहेत.
मनाची दुखणी शारिरिक दुखण्यांसारखी पटकन बरी होणारी नसतात. त्याच्या उपचारपद्धतीसाठी काही ठराविक वेळ द्यावा लागतो. मनाचं दुखणं नेमकं कशामुळे आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या जडणघडणीचा, भोवतालच्या सामाजिक वातावरणाचाही विचार करावा लागतो. कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींच्या मनाची उभारी खचली, नैराश्य आलं हे टप्प्याटप्याने समजून घ्यावं लागतं. या क्षेत्रात काम करायचं असेल तर रुग्णांविषयी कणव, करुणा, तळमळ असावी लागते. समाजाचा, तंत्रज्ञानाचा, पिढीगणिक बदलणारा नूरही अभ्यासावा लागतो. हे बदल समजून घेत असताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकण्याची सहनशक्तीही लागते. या सगळ्याची तयारी असेल तर मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याचा पर्याय निवडता येतो. आज समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर मानसिक आजार वाढत असले तरीही या क्षेत्राला ग्लॅमर नाही. इतर क्षेत्राच्या तुलनेत आर्थिक कुमकही नाही. मुख्य प्रवाहात स्थान नसल्याने या सगळ्याचा एकत्रित परिणाम पुढाकार घेणार्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर होतो. यावर उतारा म्हणून आरोग्यविभागाने एमबीबीएस डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामुळे तातडीने रुग्णांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा पर्याय म्हणजे मध्यममार्ग आहे, कायमचा उपाय नसल्याचे डॉ. प्रवीण शिनगारे स्पष्ट करतात. हा तिढा सोडवण्यासाठी जागा वाढवण्याची, मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. कोणत्याही
वैद्यकीय क्षेत्राला प्रशिक्षित सहाय्यक तज्ज्ञाचीही मदत लागते. क्लिनिकल तपासण्यासाठी तंत्रज्ञांची उपलब्धता नाही. समुपदेशक, हा विषय आस्थेने समजून घेऊन प्रचार प्रसाराच्या कार्यक्रमामध्ये मदत करणारे सहाय्यकांचीही मोठी फळी लागते. आयपीएच सारखी संस्था मानसिक आरोग्यक्षेत्राकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी सामान्यांचाही सहभाग या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा मानते. कुटुंबाच्या, सपोर्ट ग्रुपच्या पाठिंब्यालाही प्रोत्साहन देते. त्यामुळे असा एखादी आजारी व्यक्ती कुटुंबात असेल तर कुटुंब त्याबद्दल लपवाछपवी करत नाही, मोकळेपणाने त्याविषयी चर्चा करते. ही जाणीवजागृती तयार करण्यासाठीही मनुष्यबळ लागते, दुसरी फळी निर्माण करण्यासाठी नेतृत्व लागते, या सगळ्याच पातळ्यांवर मानसिक आरोग्यक्षेत्र अजूनही बाल्यावस्थेमध्ये आहे. एकीकडे मानसिक आरोग्यविषयक विधेयकांबद्दल चर्चा केली जाते. त्यातील विम्याच्या तरतुदीबद्दल सर्वसामान्यांमध्ये आस्था आहे, पण त्यासाठी उपचार केल्यानंतर अर्ज करण्याची हिंमत नाही. नैराश्यग्रस्त आहोत हे समाजाच्या लक्षात आले तर वाळीत टाकले जाऊ का, ही भिती मन खात राहते.
जीएसटीनंतर औषधांच्या वाढीव किंमतींबद्दल चर्चा होऊ लागली. अन्य आजारांच्या तुलनेमध्ये मानसिक उपचारासाठी घेतली जाणारी औषधांच्या किंमती कमी आहे, त्याची उपलब्धत मात्र शेकडो कंपन्यांच्या शिरकावामुळे प्रचंड वाढली आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी बाजारात आज शंभरहून अधिक प्रकारची अण्टीडिप्रेसन्ट उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणती घ्यायची कोणती नाहीत हे नेमकेपणाने सांगायला तज्ज्ञांची गरज आहे. औषधविक्रेत्यांकडून किक लागावी म्हणून घेतल्या जाणार्या गोळ्यांच्या उपलब्धतेवर निर्बंध आले असले तरीही गोळ्यांच्या वापराच्या भितीची टांगती तलवार आजही कायम आहेच. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने काम करण्याची गरज वारंवार व्यक्त होतेय. परीक्षेच्या ताणतणावामुळे होणार्या आत्महत्या, विद्यार्थ्यांचे बदलते लैंगिक वर्तन, कोवळ्या वयात हातात घेतली जाणारी शस्त्रे त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी..या सगळ्यावर उतारा म्हणून समुपदेशकांची गरज आहे. आज मात्र तीन हजार विद्यार्थ्यांच्या मागे असणारे एक वा दोन समुपदेशक बळावणार्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी कसे झुंजणार आहेत..हा प्रश्न उरतोच..आरोग्याच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करत असताना आता मानसिक आजार हा मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलांमुळेही होतो, मन या दृश्य स्थितीमध्ये नसलेल्या संज्ञेची दुखणी यापुढे सांगायची की मेंदूमधील बदलाबद्दल वैद्यकीय परिभाषेमध्ये मानसिक आजारांकडे पाहायचं, इतकी प्रगत झेप मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपण घेतली आहे, पण हे सगळं समजून सांगायला, सर्वसामान्यांमध्ये झिरपायला मदत कऱण्यासाठी मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञच नसतील तर काय करणार..?
नैराश्य, आत्महत्या, एकटेपणा, भावभावनांचे व्यवस्थापन या सगळ्याच कळीच्या मुद्द्यांवर सातत्याने चर्चा केली जातेय. आरोग्याचं एकूण ‘बेअरिंग’ सांभाळायचं असेल तर शारीरिक आजारांइतकाच मनाचाही तोल सांभाळायला हवा, हे आता समाजमान्य होत आहे. नैराश्य म्हणजे वेडेपणा नाही. मानसिक आजारांचे असंख्य पैलू आता भावनिक, मानसिक आणि मेंदूतील बदलत्या रासायनिक प्रक्रियेशी निगडित असतात हे शहाणपण येण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागलाय. आज मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्या, बरं व्हायचं आहे ही प्रबळ इच्छ मनाशी ठेवून कुटुंबाचीही मदत घेणाऱ्या, मानसिक आजारांविषयी उघड व्यक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ही परिस्थिती मानसिक आरोग्यक्षेत्राला वैद्यकशास्त्रातील मुख्य प्रवाहामध्ये स्थान मिळावं, म्हणून धडपडणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांना निश्चितच दिलासा देणारी आहे.
आता काळजीचं कारण वेगळंच आहे. एकीकडे नैराश्याचं प्रमाण वाढतं आहे. प्रत्येक आठवड्याला मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालयांतून, संस्थामधून मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन स्वतःला संपवून टाकावंस वाटतंय सांगणाऱ्या निराश व्यक्तींचे प्रमाण वाढतंय. परंतु या सगळ्यांना योग्यवेळी मदत करायला, त्यांच्या आजाराचे निदान करून औषधोपचार सुरू करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मात्र महाराष्ट्रात वानवा आहे. वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या विभागात प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असताना मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला मात्र समाधनाकारक दिवस आलेले नाहीत.
दरवर्षी महाराष्ट्रात अवघे २२ मानसोपचार तज्ज्ञ तयार करण्याची क्षमता आहे. एमडीनंतर कमीतकमी सात वर्षांचा अनुभव असेल तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची नेमणूक अट असल्यामुळे अध्यापनासाठी शिक्षकच मिळत नव्हते. ही अट आता पाच वर्ष अनुभवाची झाल्यानंतरही या शाखेकडे स्वतःहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा तसा कमीच असल्याचे दिसून येते. जिथे गुणवत्ता असणारे शिक्षक नाहीत तिथे विद्यार्थी कसे तयार होणार, त्यामुळे वाढीव जागा मागण्यासाठी युक्तिवाद कसा करणार, हा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागापुढेही आहेच. प्लास्टिक सर्जरी, नेत्रविकार, बालरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ होण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्राकडे मात्र पाठ फिरवली आहे.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात डॉक्टर टिकत नसल्याची खंत वारंवार व्यक्त केली जाते. गरज आहे ती त्याच्या कारणांचाही विचार करण्याची, त्यातून मार्ग काढण्याची. पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी येणारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी अध्यापनासाठी कोणते शिक्षक आहे, त्यांचा अनुभव, अध्यापनाची पद्धती, आरोग्यव्यवस्थेमधील जाण या सगळ्यांची 'रेकी' करीत असतात. वैद्यकीय महाविद्यालयांमधील या शाखेकडे येणारे विद्यार्थी अध्यापनाच्या बाबतीत फारसे समाधानी दिसत नाही. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न मानसोपचार विभाग असले तरीही तिथे शस्त्रक्रिया, प्रसूती विभागासारखी 'वेटिंग लिस्ट' नाही. जे. जे.सारख्या रुग्णालयामध्ये एक डॉक्टर अडीचशे रुग्णांना तपासतो. रुग्णांचे प्रमाण वाढते असले तरीही तज्ज्ञांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात नाही. सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्थेत अनुभव घेतला की खाजगी क्षेत्रात प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर निघून जातात, असाही आक्षेप सरकारकडून अनेकदा घेतला जातो. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ हा आक्षेप फेटाळून लावताना काही सबळ कारणेही देतात.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव काम करणारे डॉ. मनोज भाटवडेकर यांच्यासारखे डॉक्टर समाजाचा मानसिक आरोग्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे या क्षेत्राला सर्वच पातळ्यांवर सापत्न वागणूक मिळाल्याचे मत व्यक्त करतात. आज विविध प्रकारच्या आजारांवर जी औषधे निघाली आहेत, ज्या वेगाने प्रगत संशोधन सुरू आहे, तशी परिस्थिती ३०-३५ वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे मानसिक आजार झालेली व्यक्ती बरीच होणार नाही असा समज होता. ज्या शाखेमध्ये रुग्ण बरा होत नाही, त्या शाखेचा गवगवा कशाला करायचा अशी मानसिकता समाजामध्ये दृढ होती. गेल्या काही वर्षात मानसिक आजारांमधील जैवरासायनिक बदलांबद्दलही सातत्याने चर्चा झाल्याने त्याचे विविध पैलू समाजाच्या लक्षात आले. मनोरुग्णालय हे प्रत्येक मानसिक आजारांशी संबधित असलेल्या रुग्णांची जागा नव्हे ही समज आली. 'माझ्या सात पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार नव्हता हो,' हा रुग्णांचा, त्याच्या कुटुंबाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. पूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. फार दूरचे कशाला, अगदी केईएम रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य कक्ष सुरू करण्यासाठी देण्यात आलेली जागा शवागाराच्या शेजारी देण्यात आली होती!
एखाद्या रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसली तर त्याला तपासणारे डॉक्टर मानसोपचाराची गरज आहे, असे स्पष्ट सांगत नव्हते. डॉक्टरांना आपल्याकडे उपचाराला आलेला रुग्ण तुटेल अशी भीती होती अन् त्याचवेळी मनोरुग्ण म्हणून शिक्का बसण्याचा सामाजिक दबावही होता. चित्रपटासारख्या ज्या माध्यमाचा समाजावर सर्वाधिक पगडा असतो, त्या माध्यमामध्येही शॉक ट्रीटमेंट, वेड्यांचा डॉक्टर, विस्कटलेले उद्धवस्त झालेल्या रुग्णांचे चित्र रंगवले जात होते. त्यामुळे या उपचारांपासून समाज दूर पळत होता. आज दीपिका पदुकोणसारखी अभिनेत्री पुढाकार घेऊन नैराश्याबद्दल मोकळेपणाने बोलते तेव्हा अनेकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा ठरतो याचीही नोंद घ्यावी लागेल. मात्र हे होण्यासाठी दीर्घकाळ या सगळ्या सामाजिक, प्रशासकीय पातळ्यांवरील लढे मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांना वारंवार द्यावे लागले आहेत.
मनाची दुखणी शारीरिक दुखण्यांसारखी पटकन बरी होणारी नसतात. त्याच्या उपचारपद्धतीसाठी ठरावीक वेळ द्यावा लागतो. मनाचं दुखणं नेमकं कशामुळे आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या जडणघडणीचा, भोवतालच्या सामाजिक वातावरणाचाही विचार करावा लागतो. कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींच्या मनाची उभारी खचली, नैराश्य आलं हे टप्प्याटप्याने समजून घ्यावं लागतं. या क्षेत्रात काम करायचं असेल तर रुग्णांविषयी कणव, करूणा, तळमळ असावी लागते. समाजाचा, तंत्रज्ञानाचा, पिढीगणिक बदलणारा नूरही अभ्यासावा लागतो. हे बदल समजून घेत असताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकण्याची सहनशक्तीही लागते. या सगळ्याची तयारी असेल तर मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याचा पर्याय निवडता येतो. आज समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर मानसिक आजार वाढत असले तरीही या क्षेत्राला ग्लॅमर नाही. इतर क्षेत्राच्या तुलनेत आर्थिक प्राप्तिही नाही. मुख्य प्रवाहात स्थान नसल्याने या सगळ्याचा एकत्रित परिणाम पुढाकार घेणाऱ्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर होतो. यावर उतारा म्हणून आरोग्य विभागाने एमबीबीएस डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामुळे तातडीने रुग्णांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा पर्याय म्हणजे मध्यममार्ग आहे, कायमचा उपाय नसल्याचे डॉ. प्रवीण शिनगारे स्पष्ट करतात. हा तिढा सोडवण्यासाठी जागा वाढवण्याची, मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. कोणत्याही वैद्यकीय क्षेत्राला प्रशिक्षित सहायक तज्ज्ञाचीही मदत लागते. क्लिनिकल तपासण्यासाठी तंत्रज्ञांची उपलब्धता नाही. समुपदेशक, हा विषय आस्थेने समजून घेऊन प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमामध्ये मदत करणाऱ्या सहायकांचीही मोठी फळी लागते. आयपीएचसारखी संस्था मानसिक आरोग्यक्षेत्राकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सामान्यांचाही सहभाग या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा मानते. कुटुंबाच्या, सपोर्ट ग्रुपच्या पाठिंब्यालाही प्रोत्साहन देते. त्यामुळे असा एखादी आजारी व्यक्ती कुटुंबात असेल तर कुटुंब त्याबद्दल लपवाछपवी करत नाही, मोकळेपणाने त्याविषयी चर्चा करते. ही जाणीवजागृती तयार करण्यासाठीही मनुष्यबळ लागते, दुसरी फळी निर्माण करण्यासाठी नेतृत्व लागते, या सगळ्याच पातळ्यांवर मानसिक आरोग्यक्षेत्र अजूनही बाल्यावस्थेमध्ये आहे. एकीकडे मानसिक आरोग्यविषयक विधेयकांबद्दल चर्चा केली जाते. त्यातील विम्याच्या तरतुदीबद्दल सर्वसामान्यांमध्ये आस्था आहे, पण त्यासाठी उपचार केल्यानंतर अर्ज करण्याची हिंमत नाही. नैराश्यग्रस्त आहोत हे समाजाच्या लक्षात आले तर वाळीत टाकले जाऊ का, ही भीती मन खात राहते.
आरोग्याच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करत असताना आता मानसिक आजार हा मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलांमुळेही होतो, मन या दृश्य स्थितीमध्ये नसलेल्या संज्ञेची दुखणी यापुढे सांगायची की मेंदूमधील बदलाबद्दल वैद्यकीय परिभाषेमध्ये मानसिक आजारांकडे पाहायचं, इतकी प्रगत झेप मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपण घेतली आहे, पण हे सगळं समजून सांगायला, सर्वसामान्यांमध्ये झिरपायला मदत कऱण्यासाठी मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञच नसतील तर काय करणार...?
समुपदेशन आवश्यक
जीएसटीनंतर औषधांच्या वाढीव किमतींबद्दल चर्चा होऊ लागली. अन्य आजारांच्या तुलनेमध्ये मानसिक उपचारांसाठीच्या औषधांच्या किंमती कमी आहेत, त्याची उपलब्धता मात्र शेकडो कंपन्यांच्या शिरकावामुळे प्रचंड वाढली आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी बाजारात आज शंभरहून अधिक प्रकारची अॅण्टीडिप्रेसन्ट उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणती घ्यायची कोणती नाहीत हे नेमकेपणाने सांगायला तज्ज्ञांची गरज आहे. किक लागावी म्हणून औषधविक्रेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या उपलब्धतेवर निर्बंध आले असले तरीही गोळ्यांच्या वापराच्या भीतीची टांगती तलवार आजही कायम आहेच. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने काम करण्याची गरज वारंवार व्यक्त होतेय. परीक्षेच्या ताणतणावामुळे होणाऱ्या आत्महत्या, विद्यार्थ्यांचे बदलते लैंगिक वर्तन, कोवळ्या वयात हातात घेतली जाणारी शस्त्रे त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी या सगळ्यावर उतारा म्हणून समुपदेशकांची गरज आहे. आज मात्र तीन हजार विद्यार्थ्यांच्या मागे असणारे एक वा दोन समुपदेशक बळावणाऱ्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी कसे झुंजणार हा प्रश्न उरतोच.
sharmila.kalgutkar@timesgroup.com
0000000000000000000000000000000
काय झालंय डॉक्टर ?
इन्ट्रो – एका वर्षात महाराष्ट्रात अवघे वीस ते बावीस मानसोपचारतज्ज्ञ तयार होतात. नैराश्याचा विकार कैकपटीने वाढतोय, मानसिक आरोग्याचे प्रश्न कळीचे बनले आहेत. अशावेळी या क्षेत्रात मानसोपचारतज्ज्ञ का येत नाहीत याच्या कारणांची मिमांसा करण्याचीही तितकीच गरज आहे ?
शर्मिला कलगुटकर.
नैराश्य, आत्महत्या, एकटेपणा, हताशा, भावभावनांचे व्यवस्थापन या सगळ्याच कळीच्या मुद्द्यांवर आता सातत्याने चर्चा केली जातेय. आरोग्याचं एकूण ‘बेअरिंग’ सांभाळायचं असेल तर शारिरिक आजारांइतकाच मनाचाही तोल सांभाळायला हवा, हे आता समाजमान्य होत आहे. नैराश्य म्हणजे वेडेपणा नाही. मानसिक आजारांचे असंख्य पैलू आता भावनिक, मानसिक आणि मेंदूतील बदलत्या रासायनिक प्रक्रियेशी निगडित असतात हे शहाणपण येण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागलाय. आज मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणार्या, बरं व्हायचं आहे ही प्रबळ इच्छ मनाशी ठेवून कुटुंबाचीही मदत घेणार्या, मानसिक आजारांविषयी उघडपणे व्यक्त होणार्यांचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ही परिस्थिती मानसिक आरोग्यक्षेत्राला वैद्यकशास्त्रातील मुख्य प्रवाहामध्ये स्थान मिळावं, म्हणून धडपडणार्या मानसोपचारतज्ज्ञांना निश्चितच दिलासा देणारी आहे. आता काळजीचं कारण वेगळंच आहे. एकीकडे नैराश्याचं प्रमाण वेगाने वाढतं आहे. प्रत्येक आठड्याला मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालयांतून, संस्थामधून मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन स्वतःला संपवून टाकावसं वाटतंय सांगणार्या नैराश्यग्रस्त व्यक्तींचे प्रमाण वाढतंय. पण या सगळ्यांना योग्यवेळी मदत करायला, त्यांच्या आजाराचे निदान करून औषधोपचार सुरु करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मात्र महाराष्ट्रात वानवा आहे. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या विभागात प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरु असताना मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला मात्र समाधनाकारक दिवस आलेले नाहीत.
प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात अवघे 22 मानसोपचारतज्ज्ञ तयार करण्याची क्षमता आहे. एमडी नंतर कमीतकमी सात वर्षाचा अनुभव असेल तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची नेमणूक अट असल्यामुळे अध्यापनासाठी शिक्षकच मिळत नव्हते. ही अट आता पाच वर्ष अनुभवाची झाल्यानंतरही या शाखेकडे स्वतःहून येणार्या विद्यार्थ्यांचा ओढा तसा कमीच असल्याचे दिसून येते. जिथे गुणवत्ता असणारे शिक्षक नाहीत तिथे विद्यार्थी कसे तयार होणार, त्यामुळे वाढीव जागा मागण्यासाठी युक्तिवाद कसा करणार, हा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागापुढेही आहेच.एकीकडे प्लॅस्टिक सर्जरी, नेत्रविकार, बालरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ होण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्राकडे मात्र पाठ फिरवली आहे.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात डॉक्टर टिकत नसल्याची खंत वारंवार व्यक्त केली जाते. गरज आहे ती त्याच्या कारणांचाही विचार करण्याची, त्यातून मार्ग काढण्याची. पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी येणारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी अध्यापनासाठी कोणते शिक्षक आहे, त्यांचा अनुभव, अध्यापनाची पद्धती, आरोग्यव्यवस्थेमधील जाण या सगळ्यांची 'रेकी' करत असतात. वैद्यकीय महाविद्यालयांमधील या शाखेकडे येणारे विद्यार्थी अध्यापनाच्या बाबतीत फारसे समाधानी दिसत नाही. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न मानसोपचारविभाग असले तरीही तिथे शस्त्रक्रिया, प्रसूती विभागासारखी 'वेटिंग लिस्ट' नाही. जे.जे.सारख्या रुग्णालयामध्ये एक डॉक्टर अडीचशे रुग्णांना तपासतो. रुग्णांचे प्रमाण वाढते असले तरीही तज्ज्ञांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात नाही. सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्थेत अनुभव घेतला की खाजगी क्षेत्रात प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर निघून जातात, असाही आक्षेप सरकारकडून अनेकदा घेतला जातो. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ हा आक्षेप फेटाळून लावताना काही सबळ कारणेही देतात.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव काम करणारे डॉ.मनोज भाटवडेकरांसारखे डॉक्टर समाजाचा मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनामुळे या क्षेत्राला सर्वच पातळ्यांवर सापत्न वागणूक मिळाल्याचे मत व्यक्त करतात. आज विविध प्रकारच्या आजारांवर जी औषधे निघाली आहेत, ज्या वेगाने प्रगत संशोधन सुरु आहे, तशी परिस्थिती तीस- पस्तीस वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे मानसिक आजार झालेली व्यक्ती बरीच होणार नाही, हा ग्रह होता. ज्या शाखेमध्ये रुग्ण बरा होत नाही त्या शाखेचा गवगवा कशाला करायचा याप्रकारची मानसिकता समाजामध्ये दृढ होती. गेल्या काही वर्षात मानसिक आजारांमधील जैवरासायनिक बदलांबद्दलही सातत्याने चर्चा झाल्याने त्याचे विविध पैलू समाजाला लक्षात आले. मनोरुग्णालय हे प्रत्येक मानसिक आजारांशी संबधित असलेल्या रुग्णांची जागा नव्हे ही समज आली. 'माझ्या सात पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार नव्हता हो,' हा रुग्णांचा, त्याच्या कुटुंबाचा दृष्टीकोन आता बदलू लागला आहे. पूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. फार दूरचे कशाला, अगदी केईएम रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य कक्ष सुरु करण्यासाठी देण्यात आलेली जागा शवागाराच्या शेजारी देण्यात आली होती.!
एखाद्या रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसली तर त्याला तपासणारे डॉक्टर मानसोपचाराची गरज आहे, असे स्पष्टपणे सांगत नव्हते. डॉक्टरांना आपल्याकडे उपचाराला आलेला रुग्ण तुटेल अशी भिती होती अन् त्याचवेळी मनोरुग्ण म्हणून शिक्का बसण्याचा सामाजिक दबावही होता. चित्रपटासारख्या ज्या माध्यमाचा समाजावर सर्वाधिक पगडा असतो, त्या माध्यमामध्येही शॉक ट्रिटमेंट, वेड्यांचा डॉक्टर, विस्कटलेले उद्धवस्त झालेल्या रुग्णांचे चित्र रंगवले जात होते. त्यामुळे या उपचारांपासून समाज दूर पळत होता. आज दिपिका पदुकोणसारखी अभिनेत्री पुढाकार घेऊन नैराश्याबद्दल मोकळेपणाने बोलते तेव्हा अनेकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा ठरतो याचीही आवर्जून नोंद घ्यावी लागेल. मात्र हे होण्यासाठी दीर्घकाळ या सगळ्या सामाजिक , प्रशासकीय पातळ्यांवरील लढती मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांना वारंवार द्याव्या लागल्या आहेत.
मनाची दुखणी शारिरिक दुखण्यांसारखी पटकन बरी होणारी नसतात. त्याच्या उपचारपद्धतीसाठी काही ठराविक वेळ द्यावा लागतो. मनाचं दुखणं नेमकं कशामुळे आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या जडणघडणीचा, भोवतालच्या सामाजिक वातावरणाचाही विचार करावा लागतो. कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींच्या मनाची उभारी खचली, नैराश्य आलं हे टप्प्याटप्याने समजून घ्यावं लागतं. या क्षेत्रात काम करायचं असेल तर रुग्णांविषयी कणव, करुणा, तळमळ असावी लागते. समाजाचा, तंत्रज्ञानाचा, पिढीगणिक बदलणारा नूरही अभ्यासावा लागतो. हे बदल समजून घेत असताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकण्याची सहनशक्तीही लागते. या सगळ्याची तयारी असेल तर मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याचा पर्याय निवडता येतो. आज समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर मानसिक आजार वाढत असले तरीही या क्षेत्राला ग्लॅमर नाही. इतर क्षेत्राच्या तुलनेत आर्थिक कुमकही नाही. मुख्य प्रवाहात स्थान नसल्याने या सगळ्याचा एकत्रित परिणाम पुढाकार घेणार्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर होतो. यावर उतारा म्हणून आरोग्यविभागाने एमबीबीएस डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामुळे तातडीने रुग्णांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा पर्याय म्हणजे मध्यममार्ग आहे, कायमचा उपाय नसल्याचे डॉ. प्रवीण शिनगारे स्पष्ट करतात. हा तिढा सोडवण्यासाठी जागा वाढवण्याची, मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. कोणत्याही
वैद्यकीय क्षेत्राला प्रशिक्षित सहाय्यक तज्ज्ञाचीही मदत लागते. क्लिनिकल तपासण्यासाठी तंत्रज्ञांची उपलब्धता नाही. समुपदेशक, हा विषय आस्थेने समजून घेऊन प्रचार प्रसाराच्या कार्यक्रमामध्ये मदत करणारे सहाय्यकांचीही मोठी फळी लागते. आयपीएच सारखी संस्था मानसिक आरोग्यक्षेत्राकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी सामान्यांचाही सहभाग या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा मानते. कुटुंबाच्या, सपोर्ट ग्रुपच्या पाठिंब्यालाही प्रोत्साहन देते. त्यामुळे असा एखादी आजारी व्यक्ती कुटुंबात असेल तर कुटुंब त्याबद्दल लपवाछपवी करत नाही, मोकळेपणाने त्याविषयी चर्चा करते. ही जाणीवजागृती तयार करण्यासाठीही मनुष्यबळ लागते, दुसरी फळी निर्माण करण्यासाठी नेतृत्व लागते, या सगळ्याच पातळ्यांवर मानसिक आरोग्यक्षेत्र अजूनही बाल्यावस्थेमध्ये आहे. एकीकडे मानसिक आरोग्यविषयक विधेयकांबद्दल चर्चा केली जाते. त्यातील विम्याच्या तरतुदीबद्दल सर्वसामान्यांमध्ये आस्था आहे, पण त्यासाठी उपचार केल्यानंतर अर्ज करण्याची हिंमत नाही. नैराश्यग्रस्त आहोत हे समाजाच्या लक्षात आले तर वाळीत टाकले जाऊ का, ही भिती मन खात राहते.
जीएसटीनंतर औषधांच्या वाढीव किंमतींबद्दल चर्चा होऊ लागली. अन्य आजारांच्या तुलनेमध्ये मानसिक उपचारासाठी घेतली जाणारी औषधांच्या किंमती कमी आहे, त्याची उपलब्धत मात्र शेकडो कंपन्यांच्या शिरकावामुळे प्रचंड वाढली आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी बाजारात आज शंभरहून अधिक प्रकारची अण्टीडिप्रेसन्ट उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणती घ्यायची कोणती नाहीत हे नेमकेपणाने सांगायला तज्ज्ञांची गरज आहे. औषधविक्रेत्यांकडून किक लागावी म्हणून घेतल्या जाणार्या गोळ्यांच्या उपलब्धतेवर निर्बंध आले असले तरीही गोळ्यांच्या वापराच्या भितीची टांगती तलवार आजही कायम आहेच. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने काम करण्याची गरज वारंवार व्यक्त होतेय. परीक्षेच्या ताणतणावामुळे होणार्या आत्महत्या, विद्यार्थ्यांचे बदलते लैंगिक वर्तन, कोवळ्या वयात हातात घेतली जाणारी शस्त्रे त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी..या सगळ्यावर उतारा म्हणून समुपदेशकांची गरज आहे. आज मात्र तीन हजार विद्यार्थ्यांच्या मागे असणारे एक वा दोन समुपदेशक बळावणार्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी कसे झुंजणार आहेत..हा प्रश्न उरतोच..आरोग्याच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करत असताना आता मानसिक आजार हा मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलांमुळेही होतो, मन या दृश्य स्थितीमध्ये नसलेल्या संज्ञेची दुखणी यापुढे सांगायची की मेंदूमधील बदलाबद्दल वैद्यकीय परिभाषेमध्ये मानसिक आजारांकडे पाहायचं, इतकी प्रगत झेप मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपण घेतली आहे, पण हे सगळं समजून सांगायला, सर्वसामान्यांमध्ये झिरपायला मदत कऱण्यासाठी मानसिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञच नसतील तर काय करणार..?