अरे त्यांनी ना इतके ढोल लावले... आता आपण त्यांच्याहून जास्त ढोल लावायचे, त्यांचा ताशा काय कडाडतो ना रे, तुम्ही किती सुपाऱ्या वाजवल्या यंदाच्या गणपतीत, नाक्यानाक्यावर नव्याने स्थापन होणाऱ्या ढोलताशा पथकांमधील तरुणांच्या या संवादांची जागा, आता शांतता क्षेत्र, डेसिबलचा प्रश्न, पोलिसांची भीती या शब्दांनी घेतली आहे. मागील चार ते पाच वर्षांत पुण्याहून मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या लहान मोठ्या शहरांमध्ये उदयास आलेली ही ‘युवा’ जल्लोष असलेली ढोलताशा पथकांची ‘गर्जना’ यामुळेच कायमचीच ‘क्षीण’ होण्याची दाट शक्यता आहे.
क्तेदारी कायमच दिसून आली आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण प्रसिद्ध असताना ‘ठाणे तिथेही काय उणे’ असे एकंदर चित्र ठाण्यातील ढोलताशा पथकांनी गेल्या दोन ते तीन वर्षांत तयार केले.
पुण्याच्या सुप्रसिद्ध ढोलताशा पथकांमधील नामवंत वादकांना ठाण्यात पाचारण करून येथील पथकांनीही स्वतःची एक वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न सुरू केला. गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती तसेच विविध सांस्कृतिक मिरवणुकांमधून वादन करणाऱ्या या प्रत्येक ढोलताशा पथकाची एक स्वतंत्र शैली सुरुवातीच्या काही वर्षात उदयास आली. मात्र तालबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने वादन करणाऱ्या पथकांमध्ये काही मोजक्याच ढोलताशा पथकांची नावे अग्रभागी होती. त्यामुळे एकाच रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने उभे असणारे ढोलवादक, त्यांच्या मध्यभागी असणारा ताशावादकांचा जत्था, किणकिणारा टोल आणि साथीला त्या तालावर भगवे झेंडे नाचाविणारे ‘ध्वजवाहक’ असा लवाजमा घेऊन प्रत्येक ढोलताशा पथकांनी उभा केला. त्यातच मराठी नववर्षाच्या निमित्ताने गुढी पाडव्याच्या दिवशी शहाराच्या मुख्य भागातून जाणाऱ्या ‘श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत ‘सेवार्थ’ (निशुल्क) वादन करण्याची ढोलताशा पथकांना संधी अनायसे मिळू लागली. त्यामुळे पथकांसह स्वागत यात्रेलाही एकप्रकारे ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले. मात्र एकीकडे या प्रसिद्धीचा फायदा घेत शहरात प्रत्येक सणागणिक नवनवीन ढोलताशा पथके उदयास येऊ लागली. अनेक मोठ्या पथकांची दोन शकले झाली. एकीकडे मराठी संस्कृती जपण्याचा अट्टाहास धरत वादन करणाऱ्या या पथकांना मराठ्यांचाच दुहीचा शाप लागला. प्रत्येक सुपाऱ्यांगणिक मिळणाऱ्या लाखोंच्या रकमांच्या मागे पथके धावू लागली. त्यामुळे काही मोजक्याच सणांसाठी केले जाणारे वादन आता मोठमोठ्या शोरूम्सच्या उदघाटनापासून ते थेट राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठीही केले जाऊ लागल्याने त्यातील नावीन्य हरवत चालल्याची प्रतिक्रिया खुद्द ढोलपथकातील अनेक वादक खासगीत कबूल करतात.
उच्च न्यायालयाची ध्वनिप्रदूषणाबाबत असणारी काटेकोर नियमावली दहीहंडीतील डीजे, गणेशोत्सवातील आवाजाच्या मर्यादा आदींपासून आता थेट स्वागतयात्रेत ढोलताशा पथकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणापर्यंत येऊन पोहचली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ढोलताशा पथकांनी संघटित होण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे बहुतांश राजकीय पक्षांनीही ‘संस्कृती’ रक्षणाच्या नावाखाली स्वतःची ‘राजकीय’ पोळी भाजून घेण्याची सुर्वणसंधी या निमित्ताने दवडली नाही. त्यामुळे एकीकडे वाद्य, संगीत, ऊर्जा, उत्साह आदींचा मिलाफ असणाऱ्या या ढोलताशा पथकांना प्रवास कुठेतरी दहीहंडीतील गोविंदा पथकांच्या दिशेने तरी सुरू झालेला नाही ना, अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे.
ज्या पुण्यातून ढोलताशा संस्कृती खऱ्या अर्थाने नावारूपास आली. त्याठिकाणीच आजमितीस ढोलताशा वादनातील टोल वाद्यावर बंदी घालण्यात आली आहे. ढोलताशा संस्कृतीचा हा प्रवास भविष्यात कोणत्या दिशेने नेईल, हा येणारा काळच ठरवेल. मात्र ध्वनी प्रदूषण नियमावलीच्या अनुषंगाने आलेली आवाजाची मर्यादा लक्षात घेता हा पथकांनीही या वादनाआडून नवनवीन प्रयोग करण्याची अधिकाधिक गरज आहे.
मर्यादित ढोल आणि ताशांच्या साथीने प्रसिद्ध ‘बर्ची’ नृत्य, सुरेख ध्वजवादन, उत्तम पद्धतीचे रिंगण करून कलेचे सादरीकरण असे नवनवीन कलाप्रकार या ढोलताशा पथकांनी सादर केल्यास ध्वनिप्रदूषणाच्या काटेकोर नियमावलीची बंधने त्यांना उरणार नाहीत. तसेच या पद्धतीच्या सादरीकरणातूनही संघटन, ऊर्जा, उत्साह या बाबी चिरंतन टिकून राहणार आहेत, हेही तितकेच खरे.
क्तेदारी कायमच दिसून आली आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण प्रसिद्ध असताना ‘ठाणे तिथेही काय उणे’ असे एकंदर चित्र ठाण्यातील ढोलताशा पथकांनी गेल्या दोन ते तीन वर्षांत तयार केले.
पुण्याच्या सुप्रसिद्ध ढोलताशा पथकांमधील नामवंत वादकांना ठाण्यात पाचारण करून येथील पथकांनीही स्वतःची एक वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न सुरू केला. गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती तसेच विविध सांस्कृतिक मिरवणुकांमधून वादन करणाऱ्या या प्रत्येक ढोलताशा पथकाची एक स्वतंत्र शैली सुरुवातीच्या काही वर्षात उदयास आली. मात्र तालबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने वादन करणाऱ्या पथकांमध्ये काही मोजक्याच ढोलताशा पथकांची नावे अग्रभागी होती. त्यामुळे एकाच रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने उभे असणारे ढोलवादक, त्यांच्या मध्यभागी असणारा ताशावादकांचा जत्था, किणकिणारा टोल आणि साथीला त्या तालावर भगवे झेंडे नाचाविणारे ‘ध्वजवाहक’ असा लवाजमा घेऊन प्रत्येक ढोलताशा पथकांनी उभा केला. त्यातच मराठी नववर्षाच्या निमित्ताने गुढी पाडव्याच्या दिवशी शहाराच्या मुख्य भागातून जाणाऱ्या ‘श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत ‘सेवार्थ’ (निशुल्क) वादन करण्याची ढोलताशा पथकांना संधी अनायसे मिळू लागली. त्यामुळे पथकांसह स्वागत यात्रेलाही एकप्रकारे ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले. मात्र एकीकडे या प्रसिद्धीचा फायदा घेत शहरात प्रत्येक सणागणिक नवनवीन ढोलताशा पथके उदयास येऊ लागली. अनेक मोठ्या पथकांची दोन शकले झाली. एकीकडे मराठी संस्कृती जपण्याचा अट्टाहास धरत वादन करणाऱ्या या पथकांना मराठ्यांचाच दुहीचा शाप लागला. प्रत्येक सुपाऱ्यांगणिक मिळणाऱ्या लाखोंच्या रकमांच्या मागे पथके धावू लागली. त्यामुळे काही मोजक्याच सणांसाठी केले जाणारे वादन आता मोठमोठ्या शोरूम्सच्या उदघाटनापासून ते थेट राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठीही केले जाऊ लागल्याने त्यातील नावीन्य हरवत चालल्याची प्रतिक्रिया खुद्द ढोलपथकातील अनेक वादक खासगीत कबूल करतात.
उच्च न्यायालयाची ध्वनिप्रदूषणाबाबत असणारी काटेकोर नियमावली दहीहंडीतील डीजे, गणेशोत्सवातील आवाजाच्या मर्यादा आदींपासून आता थेट स्वागतयात्रेत ढोलताशा पथकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणापर्यंत येऊन पोहचली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ढोलताशा पथकांनी संघटित होण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे बहुतांश राजकीय पक्षांनीही ‘संस्कृती’ रक्षणाच्या नावाखाली स्वतःची ‘राजकीय’ पोळी भाजून घेण्याची सुर्वणसंधी या निमित्ताने दवडली नाही. त्यामुळे एकीकडे वाद्य, संगीत, ऊर्जा, उत्साह आदींचा मिलाफ असणाऱ्या या ढोलताशा पथकांना प्रवास कुठेतरी दहीहंडीतील गोविंदा पथकांच्या दिशेने तरी सुरू झालेला नाही ना, अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे.
ज्या पुण्यातून ढोलताशा संस्कृती खऱ्या अर्थाने नावारूपास आली. त्याठिकाणीच आजमितीस ढोलताशा वादनातील टोल वाद्यावर बंदी घालण्यात आली आहे. ढोलताशा संस्कृतीचा हा प्रवास भविष्यात कोणत्या दिशेने नेईल, हा येणारा काळच ठरवेल. मात्र ध्वनी प्रदूषण नियमावलीच्या अनुषंगाने आलेली आवाजाची मर्यादा लक्षात घेता हा पथकांनीही या वादनाआडून नवनवीन प्रयोग करण्याची अधिकाधिक गरज आहे.
मर्यादित ढोल आणि ताशांच्या साथीने प्रसिद्ध ‘बर्ची’ नृत्य, सुरेख ध्वजवादन, उत्तम पद्धतीचे रिंगण करून कलेचे सादरीकरण असे नवनवीन कलाप्रकार या ढोलताशा पथकांनी सादर केल्यास ध्वनिप्रदूषणाच्या काटेकोर नियमावलीची बंधने त्यांना उरणार नाहीत. तसेच या पद्धतीच्या सादरीकरणातूनही संघटन, ऊर्जा, उत्साह या बाबी चिरंतन टिकून राहणार आहेत, हेही तितकेच खरे.