-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
'आपण नदीपासून दुरावत गेलो की आपलं उदात्तपणही हिरावून गेलं. माणसाच्या जगण्यातला निसर्गदत्त आणि निसर्गरूप विचार एवढीच सरळसोट असलेली संस्कृतीची व्याख्या आपण तोडून मरोडून आपल्या सोयीनुसार बदलून टाकली आणि संस्कृतीच्या नावाखाली वाटेल ते लादण्यास सुरुवात केली. विकास या शब्दाखाली सारेच निभावून नेण्याचा प्रयत्न केला...' 'नदीष्ट' कादंबरीच्या सुरुवातीचा हा परिच्छेद. मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट' या अलिकडेच प्रकाशित माणसातले माणूसपण जागे करणाऱ्या या कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. 'नदीष्ट' कादंबरी वाचताना ती एक दीर्घ संवेदनशील कविता असल्याचेच जाणवते.
नदीच्या खोऱ्यात संस्कृती विकसित झाली. वाढली. रुजली. काळ बदलला तशी संस्कृती बदलत गेली. आता पैशांच्या लालसेपोटी लोक नदीतील वाळू उपसतात ही गोष्ट लेखकाला अस्वस्थ करते. बोरगावकर यांना नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भाशयासारखा वाटतो. जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठेतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला 'नदीष्ट'मध्ये गवसते.
आज आपण बऱ्याचदा आत्ममग्न आयुष्य जगतो. आपल्याला कुणाचं काही देणे घेणे नसते. हे आत्ममग्न वागणे मध्यमवर्गाचा-प्रस्थापित वर्गाचा स्वभावच नाही, तर त्यांची जीवनशैली असते. मात्र, लेखक आयुष्य जगताना कायम माणूसपण सोबतीला ठेवतो. खरेतर ते माणूसपण प्रत्येकाने सोबत ठेवायला हवे. लेखक ते ठेवतो, त्यामुळे नदीवर भेटणारे उपेक्षित जिवांच्या कहाण्या तो जाणून घेतो. ज्यांचे माणूसपण नाकारले त्यांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची गोष्ट म्हणजे 'नदीष्ट'!
'नदीष्ट' या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभय्या, पुजारी, बामनवाड, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रशांत, भिकाजी ही पात्रे भेटतात. या सगळ्यां पात्रांची एक वेगळी कहाणी आहे. या सगळ्यांचं जगणं-त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा लेखकाने प्रयत्न केला. कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना या आपल्याला विचार करावयास भाग पाडतात. ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टिकोन आणि जगण्याचे भान देऊन, संवेदनशील बनवते. लेखकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव भूतकाळातील आईच्या मरणाच्या प्रसंगाने भावूक होतात. ते आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगतात. मेलेल्या आईचे दूध पिण्याचा प्रसंग सुन्न केल्याशिवाय राहत नाही.
सगुणाची या तृतीयपंथीची कहाणी आपल्याला संवेदनशील बनवते. प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली. सुरुवातीला जेव्हा ट्रेनमध्ये लेखकाला सगुणा भेटते तेव्हा तिच्याकडे लेखक तुच्छ नजरेने बघतो. पण नंतर पुन्हा एकदा तिची लेखकाशी भेट होते आणि ती सगळी भडास लेखकावर काढते. सगुणापासून दूर पळणाऱ्या लेखकाला सगुणा प्रश्न विचारते, 'नजर चुरानेवाले तुम... और हिजडे हम... वा रे व्वा... सच्ची बता, आँख में आँख डाल के देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा?' हा प्रश्न सगुणाने केवळ लेखकाला विचारलेला नाही, तर समस्त प्रस्थापित व्यवस्थेतील मानवजातीला विचारलेला आहे. तृतीयपंथीयांच्या वापरातील शब्द लेखकाने कादंबरीत वापरले. त्यातून लेखकाची संशोधकवृत्तीचे दर्शन आपल्याला घडते. तृतीयपंथीयांविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत गवसतात.
कादंबरीतील भिकारी असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारतो. त्यामुळे कादंबरी वाचताना सुरुवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटतो. अनावधानाने झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला १५ वर्षांची शिक्षा होते. तो कायम स्वतःला अपराधी समजत राहतो. त्यांनंतरच्या अनेक प्रसंगचित्रणातून त्याच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते.
नवस फेडण्यासाठी आलेल्या स्त्रीवर बामनवाडच्या डोळ्यांसमोर बलात्कार होतो. पण, जिवाच्या भीतीने बामनवाड काही करू शकत नाही. नदीजवळ बलात्कार होऊनही त्या बाईला घरी जाऊन नवऱ्यासोबत शरीरखेळ करावाच लागेल, तेव्हा या दोन्हीपैकी कोणता बलात्कार त्या बाईला असहाय्य झाला असेल? हा लेखकाला पडलेला प्रश्न वाचकांना अंतर्मुख करून सोडतो. कादंबरीतील एक प्रसंग माकड आणि माणूस यांच्यातील संबंध दर्शवतो.
या कादंबरीची निवेदनशैली प्रथमपुरुषी एकवचनी आहे. त्यामुळे ही कादंबरी आत्मकथनात्मक आहे असे वाटते. तरीही लेखक हा या कादंबरीचा नायक वाटत नाही, तर कादंबरीतील उपेक्षित पात्र या कादंबरीचे नायक वाटतात. कादंबरीचे निवेदन 'मी' करत आहे, त्यामुळे लेखकाने या 'मी'ला माणूस म्हणून रेखाटले आहे असे वाटते.
कादंबरीतील भाषा प्रवाही असून काही हिंदू, उर्दू शब्द कादंबरीची भाषिक श्रीमंती वाढवतात. 'नदीष्ट' ही कादंबरी जगातल्या कुठल्याही नदीच्या काठावर-पात्रावर घडू शकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही कादंबरी प्रदेशमुक्त आणि भाषामुक्त वाटते. कालू भैय्या, पुजारी यांच्या विषयाचे प्रसंग त्रोटक वाटतात. या पात्रांच्या जगण्याविषयी, सुख-दुःखाचे चित्रण लेखकाने करावयास हवे होते, असे वाटते.
या कादंबरीत निसर्गातील अनेक सूक्ष्म बारकावे आले आहेत. निसर्ग आणि निसर्गातील अनेक गोष्टी लेखकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केले. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवते. शिवाय परिसरातील अनेक तपशील प्रचंड ताकतीने शब्दबद्ध झाले असल्याने ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब प्रसंगचित्र उभे राहतात.
नदीकाठावर घडलेली 'नदीष्ट' ही कादंबरी; नदी आणि नदीची विविध रूपे तसेच नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदीचे आदिम नाते लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केले आहे. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजे 'नदीष्ट' ही कादंबरी आहे. संवेदनशीलता, गांभीर्य, काळाचं भान आणि वास्तवता हे बोरगावकर यांच्या लेखनीचे वैशिष्ट्ये वाचकांना कादंबरीच्या कथानकात गुंतवून ठेवतात.
सगुना निघून जाते तेव्हा कादंबरी संपेल असे वाटते. मात्र, पुढच्या पानावर लेखकाला फकीर भेटतो आणि मग कादंबरी संपते. फकीर लेखकाला का भेटतो? लेखकाला याच्या पुढचा भाग लिहायचा आहे का, अशी उत्सुकता ही कादंबरी वाचकांच्या मनात निर्माण करते.
कादंबरी : नदीष्ट
लेखक : मनोज बोरगावकर
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन
पाने : १६८
मूल्य : २०० रुपये
'आपण नदीपासून दुरावत गेलो की आपलं उदात्तपणही हिरावून गेलं. माणसाच्या जगण्यातला निसर्गदत्त आणि निसर्गरूप विचार एवढीच सरळसोट असलेली संस्कृतीची व्याख्या आपण तोडून मरोडून आपल्या सोयीनुसार बदलून टाकली आणि संस्कृतीच्या नावाखाली वाटेल ते लादण्यास सुरुवात केली. विकास या शब्दाखाली सारेच निभावून नेण्याचा प्रयत्न केला...' 'नदीष्ट' कादंबरीच्या सुरुवातीचा हा परिच्छेद. मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट' या अलिकडेच प्रकाशित माणसातले माणूसपण जागे करणाऱ्या या कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. 'नदीष्ट' कादंबरी वाचताना ती एक दीर्घ संवेदनशील कविता असल्याचेच जाणवते.
नदीच्या खोऱ्यात संस्कृती विकसित झाली. वाढली. रुजली. काळ बदलला तशी संस्कृती बदलत गेली. आता पैशांच्या लालसेपोटी लोक नदीतील वाळू उपसतात ही गोष्ट लेखकाला अस्वस्थ करते. बोरगावकर यांना नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भाशयासारखा वाटतो. जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठेतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला 'नदीष्ट'मध्ये गवसते.
आज आपण बऱ्याचदा आत्ममग्न आयुष्य जगतो. आपल्याला कुणाचं काही देणे घेणे नसते. हे आत्ममग्न वागणे मध्यमवर्गाचा-प्रस्थापित वर्गाचा स्वभावच नाही, तर त्यांची जीवनशैली असते. मात्र, लेखक आयुष्य जगताना कायम माणूसपण सोबतीला ठेवतो. खरेतर ते माणूसपण प्रत्येकाने सोबत ठेवायला हवे. लेखक ते ठेवतो, त्यामुळे नदीवर भेटणारे उपेक्षित जिवांच्या कहाण्या तो जाणून घेतो. ज्यांचे माणूसपण नाकारले त्यांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची गोष्ट म्हणजे 'नदीष्ट'!
'नदीष्ट' या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभय्या, पुजारी, बामनवाड, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रशांत, भिकाजी ही पात्रे भेटतात. या सगळ्यां पात्रांची एक वेगळी कहाणी आहे. या सगळ्यांचं जगणं-त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा लेखकाने प्रयत्न केला. कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना या आपल्याला विचार करावयास भाग पाडतात. ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टिकोन आणि जगण्याचे भान देऊन, संवेदनशील बनवते. लेखकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव भूतकाळातील आईच्या मरणाच्या प्रसंगाने भावूक होतात. ते आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगतात. मेलेल्या आईचे दूध पिण्याचा प्रसंग सुन्न केल्याशिवाय राहत नाही.
सगुणाची या तृतीयपंथीची कहाणी आपल्याला संवेदनशील बनवते. प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली. सुरुवातीला जेव्हा ट्रेनमध्ये लेखकाला सगुणा भेटते तेव्हा तिच्याकडे लेखक तुच्छ नजरेने बघतो. पण नंतर पुन्हा एकदा तिची लेखकाशी भेट होते आणि ती सगळी भडास लेखकावर काढते. सगुणापासून दूर पळणाऱ्या लेखकाला सगुणा प्रश्न विचारते, 'नजर चुरानेवाले तुम... और हिजडे हम... वा रे व्वा... सच्ची बता, आँख में आँख डाल के देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा?' हा प्रश्न सगुणाने केवळ लेखकाला विचारलेला नाही, तर समस्त प्रस्थापित व्यवस्थेतील मानवजातीला विचारलेला आहे. तृतीयपंथीयांच्या वापरातील शब्द लेखकाने कादंबरीत वापरले. त्यातून लेखकाची संशोधकवृत्तीचे दर्शन आपल्याला घडते. तृतीयपंथीयांविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत गवसतात.
कादंबरीतील भिकारी असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारतो. त्यामुळे कादंबरी वाचताना सुरुवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटतो. अनावधानाने झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला १५ वर्षांची शिक्षा होते. तो कायम स्वतःला अपराधी समजत राहतो. त्यांनंतरच्या अनेक प्रसंगचित्रणातून त्याच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते.
नवस फेडण्यासाठी आलेल्या स्त्रीवर बामनवाडच्या डोळ्यांसमोर बलात्कार होतो. पण, जिवाच्या भीतीने बामनवाड काही करू शकत नाही. नदीजवळ बलात्कार होऊनही त्या बाईला घरी जाऊन नवऱ्यासोबत शरीरखेळ करावाच लागेल, तेव्हा या दोन्हीपैकी कोणता बलात्कार त्या बाईला असहाय्य झाला असेल? हा लेखकाला पडलेला प्रश्न वाचकांना अंतर्मुख करून सोडतो. कादंबरीतील एक प्रसंग माकड आणि माणूस यांच्यातील संबंध दर्शवतो.
या कादंबरीची निवेदनशैली प्रथमपुरुषी एकवचनी आहे. त्यामुळे ही कादंबरी आत्मकथनात्मक आहे असे वाटते. तरीही लेखक हा या कादंबरीचा नायक वाटत नाही, तर कादंबरीतील उपेक्षित पात्र या कादंबरीचे नायक वाटतात. कादंबरीचे निवेदन 'मी' करत आहे, त्यामुळे लेखकाने या 'मी'ला माणूस म्हणून रेखाटले आहे असे वाटते.
कादंबरीतील भाषा प्रवाही असून काही हिंदू, उर्दू शब्द कादंबरीची भाषिक श्रीमंती वाढवतात. 'नदीष्ट' ही कादंबरी जगातल्या कुठल्याही नदीच्या काठावर-पात्रावर घडू शकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही कादंबरी प्रदेशमुक्त आणि भाषामुक्त वाटते. कालू भैय्या, पुजारी यांच्या विषयाचे प्रसंग त्रोटक वाटतात. या पात्रांच्या जगण्याविषयी, सुख-दुःखाचे चित्रण लेखकाने करावयास हवे होते, असे वाटते.
या कादंबरीत निसर्गातील अनेक सूक्ष्म बारकावे आले आहेत. निसर्ग आणि निसर्गातील अनेक गोष्टी लेखकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केले. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवते. शिवाय परिसरातील अनेक तपशील प्रचंड ताकतीने शब्दबद्ध झाले असल्याने ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब प्रसंगचित्र उभे राहतात.
नदीकाठावर घडलेली 'नदीष्ट' ही कादंबरी; नदी आणि नदीची विविध रूपे तसेच नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदीचे आदिम नाते लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केले आहे. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजे 'नदीष्ट' ही कादंबरी आहे. संवेदनशीलता, गांभीर्य, काळाचं भान आणि वास्तवता हे बोरगावकर यांच्या लेखनीचे वैशिष्ट्ये वाचकांना कादंबरीच्या कथानकात गुंतवून ठेवतात.
सगुना निघून जाते तेव्हा कादंबरी संपेल असे वाटते. मात्र, पुढच्या पानावर लेखकाला फकीर भेटतो आणि मग कादंबरी संपते. फकीर लेखकाला का भेटतो? लेखकाला याच्या पुढचा भाग लिहायचा आहे का, अशी उत्सुकता ही कादंबरी वाचकांच्या मनात निर्माण करते.
कादंबरी : नदीष्ट
लेखक : मनोज बोरगावकर
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन
पाने : १६८
मूल्य : २०० रुपये