अ‍ॅपशहर

सूरतालाचा छंद

संसार, करिअर या सर्व तारेवरच्या कसरती सांभाळूनही छंद जोपण्यासाठी आणि रसिकांपर्यंत ही कला पोहोचविण्यासाठी एकत्र आलेल्या ‘म्युझिक्राफ्ट गायनॅक’ या आगळ्यावेगळ्या ग्रुपबाबत...

Maharashtra Times 19 Nov 2017, 4:00 am
मागील आठवड्यात ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एक आगळीवेगळी सूरसंध्या रंगली. हिंदी चित्रपटसृष्टीतील तब्बल ८६ वर्षांतील बदलांचा वेध संगीताच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला आण‌ि त्याला रसिकांनीही भरभरून दाद दिली. त्यावेळी मंचावर कला सादर करणाऱ्या कलाकारांपैकी कोणी इंजिनीअर होते तर कोणी डॉक्टर, काहीजण पायलट तर काही आर्किटेक्ट, कोणाच्याही क्षेत्राचा संगीताशी संबंध नाही, मात्र तरीही वय, करिअर असे अनेक भेद विसरून सर्वजण संगीताच्या धाग्यात एकत्र बांधले गेलेले. संसार, करिअर या सर्व तारेवरच्या कसरती सांभाळूनही छंद जोपण्यासाठी आणि रसिकांपर्यंत ही कला पोहोचविण्यासाठी एकत्र आलेल्या ‘म्युझिक्राफ्ट गायनॅक’ या आगळ्यावेगळ्या ग्रुपबाबत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम people with different carriers came together of music
सूरतालाचा छंद


सानिका कुसूरकर

शाळा-कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. कुणी मैदानातील खेळात रमतो, तर कुणी पुस्तकांमध्ये. गाणी, संगीत, नृत्य या कला तर बहुतांश सर्वांच्याच प्रिय असतात. मात्र छंदांचा पाठपुरावा करत त्यांनाच करिअर म्हणून पाहणाऱ्या कलाकारांची संख्या तुलनेने कमी असते. उर्वरित सर्वजण उच्च शिक्षण, त्याचे क्षेत्र, नोकरी, संसार यांच्यात गुंतून राहतो आणि पुढे चालताना मागील कलांच्या आठवणीही पुसट होतात. मात्र भावणाऱ्या या कला केवळ चर्चेपुरत्या अथवा आठवणींच्या किश्श्यांपुरत्या मर्यादित न राहता इतरवेळीही त्याचा आनंद उपभोगता यावा, असा नवा विचार ठाण्यातील काही कलाकारांनी मांडला. नोकरी आणि करिअर सुरू असले तरी त्यातून वेळ काढत कलेसाठी काहीतरी अनोखे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. डॉ. रामनाथ अय्यर, डॉ. शंतनू दास आणि अमृत अचिपालिया या कलाकारांनी त्याची सुरुवात केली आणि त्यानंतर अशाच प्रकारच्या अनेक कलाकारांचा समावेश या ग्रुपमध्ये होऊ लागला. या ग्रुपचे नाव ‘म्युझिक्राफ्ट गायनॅक’ असे ठेवण्यात आले आणि ‘गाना आये या ना आये’ हे नाव कलाकारांनी सार्थ ठरविले. संगीताची ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी जे. एस. एस. म्युझिक अकॅडमी यांच्या माध्यमातून काम सुरू झाले.

आजही अनेक कलाकार त्यामध्ये संगीताचे धडे गिरवित आहेत, मात्र संगीत हे केवळ शिकण्यापेक्षा त्याला व्यासपीठ देणे गरजेचे आहे, असे मानून या संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजपर्यंत तब्बल तीसहून अधिक कार्यक्रमांत या कलाकारांचे सूर निनादले आहेत. अवघ्या मोजक्या कलाकारांसह या संस्थेची स्थापना झाली होती, त्यात श्रीराम नरसुले आण‌ि वैष्णवी श्रीराम यांचाही सहभाग होता. सात ते ७८ या वयोगटातील सर्व कलाकार एकमेकांच्या साथीने हा संगीतप्रवास करत आहेत. शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण यांचा तर समावेश आहेच; मात्र विविध क्षेत्रांतील डॉक्टर, तज्ज्ञ, इंजिनीअर, आर्क्टिटेक्ट अशा अनेक क्षेत्रांतील शहरातील नामांकित व्यक्तींचाही त्यात सहभाग आहे. मोजक्या कलाकारांनी सुरुवात झालेल्या या उपक्रमांमध्ये सध्या पन्नासहून अधिक कलाकार एकत्र आले आहेत. विविध नाट्यगृहे, संगीत महोत्सव, शहरांतील अनेक संस्थांचे कार्यक्रम अशा अनेक मंचावर या गायकांचे स्वर सध्या ऐकू येत आहेत. प्रत्येकाचे काम, त्याची वेळ, ठिकाण यामध्ये असलेले वैविध्य यांमुळे कार्यक्रमाची पूर्वतयारी, रियाज ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागते, मात्र वेळेचे नियोजन आणि प्रत्येकाला संगीताप्रती असेलली श्रद्धा यांमुळे सर्वांचा वेळ जुळून येतो. अवघ्या दोन वर्षांत ठाण्यातच नव्हे; तर मुंबईतही या संस्थेचे कलाकार कार्यक्रम सादर करत आहेत. कलेच्या या सादरीकरणातून मनोरंजनासह सामाजिक कार्यासाठीही मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज