कोट्यवधी रुपयाच्या पेट्रोल चोरीचा प्रकार उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाने आतापर्यंत ५८ पेट्रोलपंपावर धाड टाकून १८ जणांना अटक केली आहे. तब्बल १५ दिवस चाललेल्या या कारवाईत पोलिसांना काही पाळेमुळे हाती लागली आहे. राज्यात ७० टक्के पेट्रोलपंपात असे गैरप्रकार होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपांमध्ये सॉफ्टवेअर चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलमध्ये घोटाळा करणाऱ्या दोन संशयितांना ठाणे पोलिसांनी डोंबिवली आणि पुण्यातून अटक केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्यभर पेट्रोलपंपांवर धाडी टाकून हा घोटाळा उघड केला. या चोरीचे लोण राज्यभर पसरले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे काही जणांनी हा छुपा चोरीचा प्रकार तात्पुरता बंद केला आहे. पल्सर मशिनमध्ये फेरफार करून एक चिप पेट्रोलपंपांच्या मशिनमध्ये बसविली की, पाच लिटर पेट्रोलमागे २०० मिलिलिटर ते ६०० मिली लिटरची चोरी करण्याचा हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून बिनबोभाट सुरू असल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. मात्र, याप्रश्नी अजूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोट्यवधीच्या या गोरखधंद्यात अनेकांचे हात बरबटले असल्यामुळे हा धंदा थोपवणे सोपे नाही. पण यातून थेट ग्राहकांना नुकसान होत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या चोरीची आॅइल कंपन्यांनी गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसत नाही. ज्या वैधमापन शास्त्रावर अचूक मापाने पेट्रोल देण्याची जबाबदारी आहे ते इतके दिवस काय करत होते असाही प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रकरण एप्रिल महिन्यात उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे अपर पोलिस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभर मोहीम उघडली होती. त्यात राज्यातील १,६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपांची तपासणी करण्यात आली, त्यात २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. पण, तोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल मशिनमध्ये बदल करणारे हे ठाणे येथील आहे हे पुढे आले नव्हते. उत्तर प्रदेश पोलिस व ठाणे गुन्हे शाखेने या गुन्हेगारांना पकडले व त्यानंतर राज्यातही असाच घोटाळा झाल्याचे समोर आले. अनेक दिवसांपासून ही चोरी होत असतानाही संबंधित कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष कसे केले हा प्रश्नही कायम आहेच.
नाशिक जिल्ह्यात विविध कंपन्यांचे ३६० पेट्रोलपंप आहेत. त्यात किती पेट्रोलपंपांवर अशी हेराफेरी केली गेली हे अटकेत असलेल्यांना माहिती आहे. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखेने नाशिकमध्ये येऊन कारवाई केली. या टोळीबरोबरच अजूनही टोळ्या कार्यरत असू शकतात, त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारात पल्सरमध्ये टॅम्परिंग व शोल्डरिंग कशी केली गेली, याचा शोध आॅइल कंपन्यांनी घेणे गरजेचे आहे. पेट्रोल कमी जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने वैधमापनशास्त्र विभागाने भरारी पथक नेमून ते रोखायला हवे. पोलिसांनी यासंदर्भातील सहा संशयित तंत्रज्ञांनाना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली आहे. या अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने १५०० पेट्रोलपंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे राज्यातील या पेट्रोलचोरीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.
पेट्रोल पंपामध्ये भेसळीमुळे अनेक ठिकाणी शुध्द पेट्रोल मिळत नाही त्यात हा चोरीचा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या संतापात भर टाकणारा आहे. मुख्य गुन्हेगारांना शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेेशन विभागाने ही कारवाई केली आहे. पण त्यानंतर ही कारवाई स्थानिक पातळीवर सर्वच सरकारी अधिका-यांनी वारंवार करणे गरजेचे आहे. महसूल खाते, पोलिस, आॅइल कंपन्या व वैधमापन शास्त्र विभागाने आपले पथक तयार करुन हा चोरीचा धंदा रोखणे गरजेचे आहे. या चोरी प्रकरणाचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी तो देशभर कोट्यवधीच्या घरात आहे. राज्यातही तो मोठा आहे पण त्याची खोलात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे.
अगोदर डेपोतून पेट्रोलपंपापर्यंत जाणा-या टँकरमधून ही चोरी होत होती त्यातून ग्राहकांना थेट नुकसान होत नव्हते. पण आता थेट ग्राहकांच्या खिशाला चाट बसत असल्यामुळे ग्राहक संघटनांनी सुध्दा यात लक्ष घालणे गरजेचे आहे. पेट्रोलपंपावर केवळ झिरो वर लक्ष घेवून आता चालणार नाही तर शंका आल्यास मापात पाप होते आहे का याचा जाब विचारुन पाच लिटरच्या मापात ते चेक करुन बघणे गरजेचे आहे. त्यातूनच याला आळा बसणार आहे. खरं तर वाहनांच्या टाक्यामध्ये पेट्रोल मिटर असले तरी ते अचूक आकडा सांगत नाही. त्यामुळे भविष्यात किती लिटर पेट्रोल टाकीत आहे हे सांगणारे यंत्र येत नाही तोपर्यंत ही चोरी सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहन कंपनीने सुध्दा पेट्रोलचे मोजमाप करणारे यंत्र भविष्यात विकसीत करणे गरजेचे आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत ठाणे येथील २६, नाशिकचे १२ ,रायगड ६, आैरंगाबाद ५, पुणे, सातारा, मुंबई, नागपूर व रत्नागिरी येथील पेट्रोलपंपावर धाडी टाकण्यात आल्या आहे. त्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पंप जास्त आहे. त्याखालोखाल इंडियन आॅइलचे पेट्रोल पंप आहे. आता ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर देशातला पेट्रोल चोरीचा हा मोठा घोटाळा असणार आहे हे मात्र नक्की.
उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपांमध्ये सॉफ्टवेअर चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलमध्ये घोटाळा करणाऱ्या दोन संशयितांना ठाणे पोलिसांनी डोंबिवली आणि पुण्यातून अटक केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्यभर पेट्रोलपंपांवर धाडी टाकून हा घोटाळा उघड केला. या चोरीचे लोण राज्यभर पसरले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे काही जणांनी हा छुपा चोरीचा प्रकार तात्पुरता बंद केला आहे. पल्सर मशिनमध्ये फेरफार करून एक चिप पेट्रोलपंपांच्या मशिनमध्ये बसविली की, पाच लिटर पेट्रोलमागे २०० मिलिलिटर ते ६०० मिली लिटरची चोरी करण्याचा हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून बिनबोभाट सुरू असल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. मात्र, याप्रश्नी अजूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोट्यवधीच्या या गोरखधंद्यात अनेकांचे हात बरबटले असल्यामुळे हा धंदा थोपवणे सोपे नाही. पण यातून थेट ग्राहकांना नुकसान होत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या चोरीची आॅइल कंपन्यांनी गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसत नाही. ज्या वैधमापन शास्त्रावर अचूक मापाने पेट्रोल देण्याची जबाबदारी आहे ते इतके दिवस काय करत होते असाही प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रकरण एप्रिल महिन्यात उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे अपर पोलिस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभर मोहीम उघडली होती. त्यात राज्यातील १,६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपांची तपासणी करण्यात आली, त्यात २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. पण, तोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल मशिनमध्ये बदल करणारे हे ठाणे येथील आहे हे पुढे आले नव्हते. उत्तर प्रदेश पोलिस व ठाणे गुन्हे शाखेने या गुन्हेगारांना पकडले व त्यानंतर राज्यातही असाच घोटाळा झाल्याचे समोर आले. अनेक दिवसांपासून ही चोरी होत असतानाही संबंधित कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष कसे केले हा प्रश्नही कायम आहेच.
नाशिक जिल्ह्यात विविध कंपन्यांचे ३६० पेट्रोलपंप आहेत. त्यात किती पेट्रोलपंपांवर अशी हेराफेरी केली गेली हे अटकेत असलेल्यांना माहिती आहे. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखेने नाशिकमध्ये येऊन कारवाई केली. या टोळीबरोबरच अजूनही टोळ्या कार्यरत असू शकतात, त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारात पल्सरमध्ये टॅम्परिंग व शोल्डरिंग कशी केली गेली, याचा शोध आॅइल कंपन्यांनी घेणे गरजेचे आहे. पेट्रोल कमी जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने वैधमापनशास्त्र विभागाने भरारी पथक नेमून ते रोखायला हवे. पोलिसांनी यासंदर्भातील सहा संशयित तंत्रज्ञांनाना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली आहे. या अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने १५०० पेट्रोलपंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे राज्यातील या पेट्रोलचोरीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.
पेट्रोल पंपामध्ये भेसळीमुळे अनेक ठिकाणी शुध्द पेट्रोल मिळत नाही त्यात हा चोरीचा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या संतापात भर टाकणारा आहे. मुख्य गुन्हेगारांना शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेेशन विभागाने ही कारवाई केली आहे. पण त्यानंतर ही कारवाई स्थानिक पातळीवर सर्वच सरकारी अधिका-यांनी वारंवार करणे गरजेचे आहे. महसूल खाते, पोलिस, आॅइल कंपन्या व वैधमापन शास्त्र विभागाने आपले पथक तयार करुन हा चोरीचा धंदा रोखणे गरजेचे आहे. या चोरी प्रकरणाचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी तो देशभर कोट्यवधीच्या घरात आहे. राज्यातही तो मोठा आहे पण त्याची खोलात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे.
अगोदर डेपोतून पेट्रोलपंपापर्यंत जाणा-या टँकरमधून ही चोरी होत होती त्यातून ग्राहकांना थेट नुकसान होत नव्हते. पण आता थेट ग्राहकांच्या खिशाला चाट बसत असल्यामुळे ग्राहक संघटनांनी सुध्दा यात लक्ष घालणे गरजेचे आहे. पेट्रोलपंपावर केवळ झिरो वर लक्ष घेवून आता चालणार नाही तर शंका आल्यास मापात पाप होते आहे का याचा जाब विचारुन पाच लिटरच्या मापात ते चेक करुन बघणे गरजेचे आहे. त्यातूनच याला आळा बसणार आहे. खरं तर वाहनांच्या टाक्यामध्ये पेट्रोल मिटर असले तरी ते अचूक आकडा सांगत नाही. त्यामुळे भविष्यात किती लिटर पेट्रोल टाकीत आहे हे सांगणारे यंत्र येत नाही तोपर्यंत ही चोरी सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहन कंपनीने सुध्दा पेट्रोलचे मोजमाप करणारे यंत्र भविष्यात विकसीत करणे गरजेचे आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत ठाणे येथील २६, नाशिकचे १२ ,रायगड ६, आैरंगाबाद ५, पुणे, सातारा, मुंबई, नागपूर व रत्नागिरी येथील पेट्रोलपंपावर धाडी टाकण्यात आल्या आहे. त्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पंप जास्त आहे. त्याखालोखाल इंडियन आॅइलचे पेट्रोल पंप आहे. आता ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर देशातला पेट्रोल चोरीचा हा मोठा घोटाळा असणार आहे हे मात्र नक्की.