महेश विचारे
सर्वप्रथम सुनील तुझे खूप अभिनंदन. १०० पेक्षा अधिक सामन्यात तू भारताचे प्रतिनिधित्व करून एक विक्रम नोंदविला आहेस. जवळपास १३ वर्षांपेक्षा अधिक काळ तू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये वावरतो आहेस. मागे वळून पाहताना काय वाटते?
- खरोखरच, आजवर मी एक फुटबॉलपटू म्हणून जी वाटचाल केली आहे, ती पाहता मला या प्रवासाचे कौतुक वाटते, अभिमान वाटतो. फुटबॉल खेळण्याची मला संधी मिळाली, हे माझे नशीब आहे. त्याहीपेक्षा मला या गोष्टीचे सर्वाधिक समाधान आहे की, मी देशासाठी खेळत आहे. अनेक उत्तमोत्तम आठवणी यानिमित्ताने माझ्या गाठिशी जमा झाल्यात. त्यात उत्तरोत्तर भर पडत राहो, हीच अपेक्षा.
या तुझ्या प्रदीर्घ कारकीर्दीत तू भारताचे प्रतिनिधित्व केलेस, काय वाटते तुला भारतीय फुटबॉलबद्दल?
- भारतीय फुटबॉलला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण मला खात्री आहे की, आपण योग्य दिशेने प्रवास करत आहोत. भारताच्या या मोहिमेत ज्या कुणाचा सहभाग आहे, त्यांच्याकडून असाच पाठिंबा मिळत राहायला हवा.
गेल्या वर्षी आपण १७ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालो होतो. भारतातील युवा फुटबॉलबद्दल तुझे काय मत आहे?
-भारताचा युवा फुटबॉल संघ उत्साही आहे. या संघाला अजून खूप मेहनत घ्यावी लागेल पण त्यांच्याकडे जिद्द नाही असे अजिबात म्हणता येणार नाही. ही त्या संघाच्या दृष्टीने एक सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.
या वर्ल्डकपसाठी निवडलेल्या भारतीय संघात ईशान्य भारतातील सर्वाधिक खेळाडूंचा भरणा होता. अनेक खेळाडू आज या भागातून पुढे येताना दिसून येतात. तुला त्याबद्दल काय वाटते ?
-ईशान्य भारत हा नामांकित फुटबॉलपटूंची निर्मिती करणारे एक प्रमुख केंद्र आहे आणि त्याठिकाणाहून असे खेळाडू यापुढेही मोठ्या संख्येने तयार होत राहतील. त्यासाठी या विभागातील फुटबॉलच्या विकासाला पाठिंबा द्यायला हवा. तिथे फुटबॉलसाठी योग्य अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याची काळजी घ्यायला हवी.
नुकत्याच झालेल्या आंतरखंडीय फुटबॉल सामन्यादरम्यान तू भारतीय फुटबॉलचाहत्यांना स्टेडियमकडे वळण्याचा सल्ला दिलास आणि तसे आर्जवही केलेस. तुला नेमके काय वाटते याबद्दल?
-भारतात फुटबॉल पाहणारा वर्ग वाढतो आहे असे मला वाटते. पण त्यात आणखी वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे. जेव्हा राष्ट्रीय संघ खेळत असतो, तेव्हा संपूर्ण स्टेडियम भरगच्च असेल असे फार कमी वेळा घडते. भारतातील स्टेडियम्समध्ये मोठ्या संख्येने चाहते यायला हवेत.
भारतातील फुटबॉलचाहते परदेशी फुटबॉल विशेषतः युरोपियन फुटबॉल पाहणे पसंत करतात. आपण मग नेमके कुठे मागे आहोत? सुविधांच्या बाबतीत आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत आपली काय स्थिती आहे असे वाटते?
- या प्रश्नाबाबत म्हणाल तर आपल्याला खूप सुधारणा करावी लागेल. फुटबॉलबाबत तर आपल्याला खूप जागरुकता निर्माण करावी लागणार आहे. मग त्यात सोयीसुविधा, पायाभूत सुविधा, तळागाळातील फुटबॉलसाठी योग्य कार्यक्रम अशा सगळ्याच पातळीवर बरीच सुधारणा अपेक्षित आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणामातूनच फुटबॉलमध्ये आपल्याला अपेक्षित बदल होऊ शकतात.
आपण न्यूझीलंड आणि केनियाविरुद्ध आंतरखंडीय सामने नुकतेच खेळलो. या सामन्यातील अनुभवाबद्दल काय सांगशील?
-या लढती आपण जिंकलो हे एका अर्थाने छानच झाले. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन झाले हादेखील एक दखल घेण्याजोगा मुद्दा आहे. या आंतरखंडीय स्पर्धात जे संघ खेळले ते एकमेकांपेक्षा वेगळे होते आणि त्यांच्याकडून भारतीय संघाला मिळालेले आव्हानही भिन्न होते. पण मी नेहमीच म्हणत आलो आहे की, आपल्याला अशा अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळावे लागेल आणि विशेष म्हणजे दर्जेदार आंतरराष्ट्रीय संघांशी आपले कौशल्य आजमावून पाहावे लागेल.
विविध आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांशी आपल्याला जास्तीतजास्त सामने खेळणे अपेक्षित आहे का?
-भारतातील फुटबॉलचाहत्यांकडे हा खेळ न्यायचा असेल, त्यांना या खेळाबद्दल अधिक आकर्षण निर्माण करायचे असेल तर हा मार्गही आपण अवलंबला पाहिजे.
सध्या जागतिक स्तरावर आपण ९७व्या क्रमांकावर आहोत. आपण यापेक्षाही वरच्या स्थानापर्यंत झेप घेऊ शकतो असे वाटते?
- जर आपण सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिलो तर मला असे नक्कीच वाटते की, आपण जागतिक क्रमवारीत आणखी वरच्या स्थानावर पोहोचू. पण मला नेहमीच असे वाटत आले आहे की, क्रमवारी ही तुमच्या प्रगतीचे मोजमाप ठरत नाही. आपल्याला त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार संघांशी झुंज द्यावी लागेल, त्यांच्याशी सामने आयोजित करावे लागतील.
पुढील वर्षी आपण आशिया कप स्पर्धेत खेळणार आहोत. या स्पर्धेत आपण २०११ला सर्व सामने गमावले होते तर २०१५मध्ये आपण पात्रही ठरलो नाही. पुढील वर्षी कसे आव्हान असेल?
- या स्पर्धेत आपण प्रामाणिकपणे चांगला खेळ करून दाखवायला हवा. आपल्या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा मिलाफ झालेला आहे. तेव्हा एक दर्जेदार कामगिरी करून दाखविण्यासाठी आशिया कप हे उत्तम व्यासपीठ म्हणावे लागेल. या स्पर्धेत यापूर्वी आपण जी कामगिरी केली, त्यापेक्षा सरस कामगिरी यावेळी करू, असा मला विश्वास वाटतो.
सर्वप्रथम सुनील तुझे खूप अभिनंदन. १०० पेक्षा अधिक सामन्यात तू भारताचे प्रतिनिधित्व करून एक विक्रम नोंदविला आहेस. जवळपास १३ वर्षांपेक्षा अधिक काळ तू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये वावरतो आहेस. मागे वळून पाहताना काय वाटते?
- खरोखरच, आजवर मी एक फुटबॉलपटू म्हणून जी वाटचाल केली आहे, ती पाहता मला या प्रवासाचे कौतुक वाटते, अभिमान वाटतो. फुटबॉल खेळण्याची मला संधी मिळाली, हे माझे नशीब आहे. त्याहीपेक्षा मला या गोष्टीचे सर्वाधिक समाधान आहे की, मी देशासाठी खेळत आहे. अनेक उत्तमोत्तम आठवणी यानिमित्ताने माझ्या गाठिशी जमा झाल्यात. त्यात उत्तरोत्तर भर पडत राहो, हीच अपेक्षा.
या तुझ्या प्रदीर्घ कारकीर्दीत तू भारताचे प्रतिनिधित्व केलेस, काय वाटते तुला भारतीय फुटबॉलबद्दल?
- भारतीय फुटबॉलला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण मला खात्री आहे की, आपण योग्य दिशेने प्रवास करत आहोत. भारताच्या या मोहिमेत ज्या कुणाचा सहभाग आहे, त्यांच्याकडून असाच पाठिंबा मिळत राहायला हवा.
गेल्या वर्षी आपण १७ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालो होतो. भारतातील युवा फुटबॉलबद्दल तुझे काय मत आहे?
-भारताचा युवा फुटबॉल संघ उत्साही आहे. या संघाला अजून खूप मेहनत घ्यावी लागेल पण त्यांच्याकडे जिद्द नाही असे अजिबात म्हणता येणार नाही. ही त्या संघाच्या दृष्टीने एक सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.
या वर्ल्डकपसाठी निवडलेल्या भारतीय संघात ईशान्य भारतातील सर्वाधिक खेळाडूंचा भरणा होता. अनेक खेळाडू आज या भागातून पुढे येताना दिसून येतात. तुला त्याबद्दल काय वाटते ?
-ईशान्य भारत हा नामांकित फुटबॉलपटूंची निर्मिती करणारे एक प्रमुख केंद्र आहे आणि त्याठिकाणाहून असे खेळाडू यापुढेही मोठ्या संख्येने तयार होत राहतील. त्यासाठी या विभागातील फुटबॉलच्या विकासाला पाठिंबा द्यायला हवा. तिथे फुटबॉलसाठी योग्य अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याची काळजी घ्यायला हवी.
नुकत्याच झालेल्या आंतरखंडीय फुटबॉल सामन्यादरम्यान तू भारतीय फुटबॉलचाहत्यांना स्टेडियमकडे वळण्याचा सल्ला दिलास आणि तसे आर्जवही केलेस. तुला नेमके काय वाटते याबद्दल?
-भारतात फुटबॉल पाहणारा वर्ग वाढतो आहे असे मला वाटते. पण त्यात आणखी वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे. जेव्हा राष्ट्रीय संघ खेळत असतो, तेव्हा संपूर्ण स्टेडियम भरगच्च असेल असे फार कमी वेळा घडते. भारतातील स्टेडियम्समध्ये मोठ्या संख्येने चाहते यायला हवेत.
भारतातील फुटबॉलचाहते परदेशी फुटबॉल विशेषतः युरोपियन फुटबॉल पाहणे पसंत करतात. आपण मग नेमके कुठे मागे आहोत? सुविधांच्या बाबतीत आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत आपली काय स्थिती आहे असे वाटते?
- या प्रश्नाबाबत म्हणाल तर आपल्याला खूप सुधारणा करावी लागेल. फुटबॉलबाबत तर आपल्याला खूप जागरुकता निर्माण करावी लागणार आहे. मग त्यात सोयीसुविधा, पायाभूत सुविधा, तळागाळातील फुटबॉलसाठी योग्य कार्यक्रम अशा सगळ्याच पातळीवर बरीच सुधारणा अपेक्षित आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणामातूनच फुटबॉलमध्ये आपल्याला अपेक्षित बदल होऊ शकतात.
आपण न्यूझीलंड आणि केनियाविरुद्ध आंतरखंडीय सामने नुकतेच खेळलो. या सामन्यातील अनुभवाबद्दल काय सांगशील?
-या लढती आपण जिंकलो हे एका अर्थाने छानच झाले. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन झाले हादेखील एक दखल घेण्याजोगा मुद्दा आहे. या आंतरखंडीय स्पर्धात जे संघ खेळले ते एकमेकांपेक्षा वेगळे होते आणि त्यांच्याकडून भारतीय संघाला मिळालेले आव्हानही भिन्न होते. पण मी नेहमीच म्हणत आलो आहे की, आपल्याला अशा अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळावे लागेल आणि विशेष म्हणजे दर्जेदार आंतरराष्ट्रीय संघांशी आपले कौशल्य आजमावून पाहावे लागेल.
विविध आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांशी आपल्याला जास्तीतजास्त सामने खेळणे अपेक्षित आहे का?
-भारतातील फुटबॉलचाहत्यांकडे हा खेळ न्यायचा असेल, त्यांना या खेळाबद्दल अधिक आकर्षण निर्माण करायचे असेल तर हा मार्गही आपण अवलंबला पाहिजे.
सध्या जागतिक स्तरावर आपण ९७व्या क्रमांकावर आहोत. आपण यापेक्षाही वरच्या स्थानापर्यंत झेप घेऊ शकतो असे वाटते?
- जर आपण सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिलो तर मला असे नक्कीच वाटते की, आपण जागतिक क्रमवारीत आणखी वरच्या स्थानावर पोहोचू. पण मला नेहमीच असे वाटत आले आहे की, क्रमवारी ही तुमच्या प्रगतीचे मोजमाप ठरत नाही. आपल्याला त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार संघांशी झुंज द्यावी लागेल, त्यांच्याशी सामने आयोजित करावे लागतील.
पुढील वर्षी आपण आशिया कप स्पर्धेत खेळणार आहोत. या स्पर्धेत आपण २०११ला सर्व सामने गमावले होते तर २०१५मध्ये आपण पात्रही ठरलो नाही. पुढील वर्षी कसे आव्हान असेल?
- या स्पर्धेत आपण प्रामाणिकपणे चांगला खेळ करून दाखवायला हवा. आपल्या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा मिलाफ झालेला आहे. तेव्हा एक दर्जेदार कामगिरी करून दाखविण्यासाठी आशिया कप हे उत्तम व्यासपीठ म्हणावे लागेल. या स्पर्धेत यापूर्वी आपण जी कामगिरी केली, त्यापेक्षा सरस कामगिरी यावेळी करू, असा मला विश्वास वाटतो.