विजय साळुंके
पाकिस्तानी लष्कर व त्याची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) जगभर बदनाम आहे. भारतीय उपखंडात भारत, अफगाणिस्तान व बांगलादेशात तर त्यांच्याविषयी घृणा बाळगली जाते. अमेरिकी सामरिक तज्ज्ञ स्टीफन कोहेन यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करावर दोन स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. ‘ब्रिटिश इंडियन आर्मीतून निर्माण झालेल्या या दोन स्वतंत्र देशांच्या लष्कराचा डीएनए त्यांच्या निर्मितीमधील मूल्यांशी निगडित आहे. पाकिस्तानी लष्कराकडून राजकीय सत्ता नियंत्रितच नव्हे, तर राबविण्याचे, लष्करी राजवटी लागू करून राज्यघटना गुंडाळून ठेवण्याचे जे सातत्याने प्रयत्न झाले त्याचे खरे कारण हा नैसर्गिक देशच नाही,’ असे स्टीफन कोहेन यांचे मत आहे. पाकिस्तान निर्मितीसाठी बॅ. महंमद अली जीना यांनी धर्माचा आधार घेतला. तेव्हाच भविष्यातील राजकीय व्यवस्थेच्या अवमूल्यनाची बीजे रोवली गेली. पाकिस्तानी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप, भारताबरोबर युद्धाची खुमखुमी याविषयी तेथील काही बुद्धिवादी, समंजस पत्रकार अलीकडे स्पष्टपणे बोलू लागले आहेत. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील १९४७पासूनची सर्व युद्धे पाकिस्ताननेच सुरू केली व त्यात प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभव झाला, असे स्पष्टपणे सांगणारे एअर मार्शल अशगर खान (वय ९६) यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या पस्तिशीत ते पाकिस्तानी हवाई दलाचे पहिले स्वदेशी प्रमुख बनले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश रॉयल एअरफोर्सच्या माध्यमातून भाग घेतला होता.
स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश इंडियन आर्मीतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण इंग्लंडमधील सँडहर्स्ट मिलिटरी अकॅडमीत व्हायचे. याच संस्थेच्या धर्तीवर स्वातंत्र्योत्तर काळात भारताने नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी काढली. डेहराडूनमधील रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज हेही ब्रिटिशकालीन. तेथे अशगर खान यांचे शिक्षण झाले होते. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या संरक्षण दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी या संस्थांत एकत्रित शिक्षण घेतलेले होते. पुढे उभय देशात युद्धे व वैर झाली तरी माणूस या पातळीवर त्यांच्यात सद् भाव टिकून होता. जनरल झिया उल हक यांनी राजकीय सत्ता हाती घेतल्यानंतर आपल्या राजवटीला बळकट करण्यासाठी इस्लामी मूलतत्त्ववादाचा आधार घेतला. त्यांच्या काळात भरती व प्रशिक्षण झालेल्या पाक लष्करात धर्मांधता पेरली गेली. भारतीय जवानांचा शिरच्छेद करणे, मृतदेहांची विटंबना करणे असे प्रकार धर्मांधतेच्या विषामुळेच घडले. एअर मार्शल अशगर खान यांना हा रानटीपणा मान्य नव्हता. गेल्या काही वर्षांत ते सातत्याने पाकिस्तानी लष्कराच्या हस्तक्षेपावर टीका करीत होते. ‘भारत हा पाकिस्तानचा शत्रू नाही, पाकिस्तानच्या सर्व समस्यांचे मूळ भारतद्वेषात आहे,’ असे ते स्पष्टपणे म्हणत होते. जनरल झिया यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर (२५ ऑगस्ट १९८८) पाकिस्तानात ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी, मोहंमद खान जुनेजो आणि नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते. अशगर खान तेहरिक ए इस्तिक्लाल या पक्षाचे नेते होते. ब्रिटिश रॉयल एअर फोर्सपासून त्यांचे मित्र असलेले एअर मार्शल यशवंत मालसे यांनी प्रस्तुत लेखकाकडे त्यांच्यासाठी पत्र दिले होते. इस्लामाबादेतील पक्ष कचेरीत मतदानाच्या आदल्या दिवशी बैठक चालू असतानाच प्रस्तुत लेखकाने त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड व मालसे साहेबांचे पत्र पाठविल्यावर बैठक मध्येच थांबवून एअर मार्शल अशगर खान बाहेर आले व त्यांनी प्रस्तुत लेखकालाच आलिंगन दिले. औपचारिक मुलाखतीनंतर तुम्ही कुठे उतरला, वाहनाची काय व्यवस्था आहे अशी चौकशी करीत हॉटेलऐवजी माझ्या घरीच राहायला या, असे ते म्हणाले होते. ‘माझा पक्ष सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा जिंकणार नसला तरी भारताबरोबरचे संबंध सुरळीत करण्याची इच्छा असलेल्या बेनझीर भुट्टोंना गरज वाटली तर मी निश्चितच मदत करेन,’ असे ते म्हणाले होते. मालसे साहेबांप्रमाणेच एअरमार्शल हृषीकेश मुळगावकर व इतरांचीही त्यांनी चौकशी केली. जनरल झियांच्या राजवटीत उभय देशातील संबंध बिघडल्याने पत्रव्यवहाराला मर्यादा आल्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
फाळणीच्या वेळी ब्रिटिश इंडियन आर्मीतील अधिकारी व जवानांना भारत आणि पाकिस्तान यातील पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते. त्या वेळचा एक प्रसंग एअर मार्शल अशगर खान यांनी सांगितला. पुढे मालसेसाहेबांनीही त्याला दुजोरा दिला होता. मालसेसाहेब पेशावर येथील हवाईतळावर होते. त्यांनी भारतात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा जनरल याह्याखान पेशावरमध्येच होते. १९७१ मधील भारत पाक युद्ध व बांगलादेश निर्मितीच्या वेळी जनरल याह्याखान यांची लष्करी राजवट होती. याच खान यांनी ‘बुचर ऑफ इस्ट पाकिस्तान’ नावाने कुप्रसिद्ध असलेल्या जनरल टिक्काखान यांच्याकरवी पूर्व पाकिस्तानातील तीस लाख लोकांची कत्तल केली होती; परंतु, १९४७ मध्ये त्यांच्यातील माणुसकी जिवंत होती. एअर मार्शल मालसे यांची रेल्वे निघायच्या बेतात असताना याह्याखान धावत प्रत्येक डब्यात मालसे यांना शोधत होते. शेवटी भेट झाल्यानंतर त्यांनी एक बॉक्स मालसे यांच्या हातात दिला. बॉक्समध्ये सुकामेवा असेल, असे मालसेंना वाटले. फाळणीच्या वेळी निर्वासितांनी भरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर वाटेत हल्ला होत होते. याह्याखान यांनी दिलेल्या बॉक्समध्ये हातबॉम्ब होते. भारतात सुखरूप पोचण्यासाठी वाटेतील हल्लेखोरांना पिटाळण्यासाठी हे हातबॉम्ब कामी आले. हा भ्रातृभाव, ही माणुसकी जनरल झियांच्या राजवटीपासून उत्तरोत्तर कमी होत गेली.
फाळणीवेळी दोन्ही बाजूंकडून झालेल्या प्रचंड रक्तपाताची कटूता विसरून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील चाणक्यपुरीतील पाकिस्तानी वकिलातीची जागा स्वत: निवडली होती. ‘नेहरूंमधील तो गुण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये थोडासा जरी असता तर उभय देशातील वैरभावना आज दिसते तेवढी राहिली नसली,’ असे अशगर खान म्हणाले होते. भारताच्या पंजाबमधील खलिस्तानच्या विभाजनवादी चळवळीला जनरल झियांनी हातभार लावला. बेनझीर भुट्टोंकडे देशाचे नेतृत्व आले तर पाकिस्तानच्या भूमिकेत बदल होईल, असे त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात तसे घडलेही. बेनझीर भुट्टो आणि राजीव गांधी या दोन तरुण पंतप्रधानांमध्ये समझोता झाला आणि पाकिस्तानातील खलिस्तानी अतिरेक्यांची यादी भारताला सोपविण्यात आली.
जनरल झियांनी इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना हाताशी धरून पाकिस्तानात सर्व पातळ्यांवर धर्मांधता पसरवली. सँडहर्स्ट आणि डेहराडूनमधील स्पिरीट नंतरच्या पिढ्यातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये उरले नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे आजी माजी लष्करी अधिकारी अण्वस्त्र वापराच्या धमक्या देत असतात. पाकिस्तानच्या धर्मांधतेशी आता भारतही स्पर्धा करताना दिसतो आहे. काही तथाकथित राष्ट्रवादी चॅनेलांमधील अँकरशी स्पर्धा करीत मेजर जनरल जी. डी. बक्षींसारखे माजी अधिकारी आक्रमक होताना दिसतात. धर्मांधतेच्या आहारी गेलेला पाकिस्तान विनाशाच्या कडेलोटाकडे पोचला आहे. त्यापासून काही शिकण्याऐवजी विकासाचा धोशा लावणारा भारतातील राज्यकर्ता पक्ष भारताला हिंदू पाकिस्तान बनविण्याच्या दिशेने निघाला आहे. याबद्दल अखेरच्या काही दिवसांत एअर मार्शल अशगर खानांसारखेच पाकिस्तानातील काही विवेकी लोक चिंता व्यक्त करीत होते. १९६५ व १९७१च्या युद्धात पाकिस्तानी हवाई दलाचे नेतृत्व करणाऱ्या अशगर खान यांना युद्धाच्या मर्यादांचे भान होते.
पाकिस्तानी लष्कर व त्याची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) जगभर बदनाम आहे. भारतीय उपखंडात भारत, अफगाणिस्तान व बांगलादेशात तर त्यांच्याविषयी घृणा बाळगली जाते. अमेरिकी सामरिक तज्ज्ञ स्टीफन कोहेन यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करावर दोन स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. ‘ब्रिटिश इंडियन आर्मीतून निर्माण झालेल्या या दोन स्वतंत्र देशांच्या लष्कराचा डीएनए त्यांच्या निर्मितीमधील मूल्यांशी निगडित आहे. पाकिस्तानी लष्कराकडून राजकीय सत्ता नियंत्रितच नव्हे, तर राबविण्याचे, लष्करी राजवटी लागू करून राज्यघटना गुंडाळून ठेवण्याचे जे सातत्याने प्रयत्न झाले त्याचे खरे कारण हा नैसर्गिक देशच नाही,’ असे स्टीफन कोहेन यांचे मत आहे. पाकिस्तान निर्मितीसाठी बॅ. महंमद अली जीना यांनी धर्माचा आधार घेतला. तेव्हाच भविष्यातील राजकीय व्यवस्थेच्या अवमूल्यनाची बीजे रोवली गेली. पाकिस्तानी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप, भारताबरोबर युद्धाची खुमखुमी याविषयी तेथील काही बुद्धिवादी, समंजस पत्रकार अलीकडे स्पष्टपणे बोलू लागले आहेत. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील १९४७पासूनची सर्व युद्धे पाकिस्ताननेच सुरू केली व त्यात प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभव झाला, असे स्पष्टपणे सांगणारे एअर मार्शल अशगर खान (वय ९६) यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या पस्तिशीत ते पाकिस्तानी हवाई दलाचे पहिले स्वदेशी प्रमुख बनले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश रॉयल एअरफोर्सच्या माध्यमातून भाग घेतला होता.
स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश इंडियन आर्मीतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण इंग्लंडमधील सँडहर्स्ट मिलिटरी अकॅडमीत व्हायचे. याच संस्थेच्या धर्तीवर स्वातंत्र्योत्तर काळात भारताने नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी काढली. डेहराडूनमधील रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज हेही ब्रिटिशकालीन. तेथे अशगर खान यांचे शिक्षण झाले होते. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या संरक्षण दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी या संस्थांत एकत्रित शिक्षण घेतलेले होते. पुढे उभय देशात युद्धे व वैर झाली तरी माणूस या पातळीवर त्यांच्यात सद् भाव टिकून होता. जनरल झिया उल हक यांनी राजकीय सत्ता हाती घेतल्यानंतर आपल्या राजवटीला बळकट करण्यासाठी इस्लामी मूलतत्त्ववादाचा आधार घेतला. त्यांच्या काळात भरती व प्रशिक्षण झालेल्या पाक लष्करात धर्मांधता पेरली गेली. भारतीय जवानांचा शिरच्छेद करणे, मृतदेहांची विटंबना करणे असे प्रकार धर्मांधतेच्या विषामुळेच घडले. एअर मार्शल अशगर खान यांना हा रानटीपणा मान्य नव्हता. गेल्या काही वर्षांत ते सातत्याने पाकिस्तानी लष्कराच्या हस्तक्षेपावर टीका करीत होते. ‘भारत हा पाकिस्तानचा शत्रू नाही, पाकिस्तानच्या सर्व समस्यांचे मूळ भारतद्वेषात आहे,’ असे ते स्पष्टपणे म्हणत होते. जनरल झिया यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर (२५ ऑगस्ट १९८८) पाकिस्तानात ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी, मोहंमद खान जुनेजो आणि नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते. अशगर खान तेहरिक ए इस्तिक्लाल या पक्षाचे नेते होते. ब्रिटिश रॉयल एअर फोर्सपासून त्यांचे मित्र असलेले एअर मार्शल यशवंत मालसे यांनी प्रस्तुत लेखकाकडे त्यांच्यासाठी पत्र दिले होते. इस्लामाबादेतील पक्ष कचेरीत मतदानाच्या आदल्या दिवशी बैठक चालू असतानाच प्रस्तुत लेखकाने त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड व मालसे साहेबांचे पत्र पाठविल्यावर बैठक मध्येच थांबवून एअर मार्शल अशगर खान बाहेर आले व त्यांनी प्रस्तुत लेखकालाच आलिंगन दिले. औपचारिक मुलाखतीनंतर तुम्ही कुठे उतरला, वाहनाची काय व्यवस्था आहे अशी चौकशी करीत हॉटेलऐवजी माझ्या घरीच राहायला या, असे ते म्हणाले होते. ‘माझा पक्ष सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा जिंकणार नसला तरी भारताबरोबरचे संबंध सुरळीत करण्याची इच्छा असलेल्या बेनझीर भुट्टोंना गरज वाटली तर मी निश्चितच मदत करेन,’ असे ते म्हणाले होते. मालसे साहेबांप्रमाणेच एअरमार्शल हृषीकेश मुळगावकर व इतरांचीही त्यांनी चौकशी केली. जनरल झियांच्या राजवटीत उभय देशातील संबंध बिघडल्याने पत्रव्यवहाराला मर्यादा आल्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
फाळणीच्या वेळी ब्रिटिश इंडियन आर्मीतील अधिकारी व जवानांना भारत आणि पाकिस्तान यातील पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते. त्या वेळचा एक प्रसंग एअर मार्शल अशगर खान यांनी सांगितला. पुढे मालसेसाहेबांनीही त्याला दुजोरा दिला होता. मालसेसाहेब पेशावर येथील हवाईतळावर होते. त्यांनी भारतात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा जनरल याह्याखान पेशावरमध्येच होते. १९७१ मधील भारत पाक युद्ध व बांगलादेश निर्मितीच्या वेळी जनरल याह्याखान यांची लष्करी राजवट होती. याच खान यांनी ‘बुचर ऑफ इस्ट पाकिस्तान’ नावाने कुप्रसिद्ध असलेल्या जनरल टिक्काखान यांच्याकरवी पूर्व पाकिस्तानातील तीस लाख लोकांची कत्तल केली होती; परंतु, १९४७ मध्ये त्यांच्यातील माणुसकी जिवंत होती. एअर मार्शल मालसे यांची रेल्वे निघायच्या बेतात असताना याह्याखान धावत प्रत्येक डब्यात मालसे यांना शोधत होते. शेवटी भेट झाल्यानंतर त्यांनी एक बॉक्स मालसे यांच्या हातात दिला. बॉक्समध्ये सुकामेवा असेल, असे मालसेंना वाटले. फाळणीच्या वेळी निर्वासितांनी भरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर वाटेत हल्ला होत होते. याह्याखान यांनी दिलेल्या बॉक्समध्ये हातबॉम्ब होते. भारतात सुखरूप पोचण्यासाठी वाटेतील हल्लेखोरांना पिटाळण्यासाठी हे हातबॉम्ब कामी आले. हा भ्रातृभाव, ही माणुसकी जनरल झियांच्या राजवटीपासून उत्तरोत्तर कमी होत गेली.
फाळणीवेळी दोन्ही बाजूंकडून झालेल्या प्रचंड रक्तपाताची कटूता विसरून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील चाणक्यपुरीतील पाकिस्तानी वकिलातीची जागा स्वत: निवडली होती. ‘नेहरूंमधील तो गुण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये थोडासा जरी असता तर उभय देशातील वैरभावना आज दिसते तेवढी राहिली नसली,’ असे अशगर खान म्हणाले होते. भारताच्या पंजाबमधील खलिस्तानच्या विभाजनवादी चळवळीला जनरल झियांनी हातभार लावला. बेनझीर भुट्टोंकडे देशाचे नेतृत्व आले तर पाकिस्तानच्या भूमिकेत बदल होईल, असे त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात तसे घडलेही. बेनझीर भुट्टो आणि राजीव गांधी या दोन तरुण पंतप्रधानांमध्ये समझोता झाला आणि पाकिस्तानातील खलिस्तानी अतिरेक्यांची यादी भारताला सोपविण्यात आली.
जनरल झियांनी इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना हाताशी धरून पाकिस्तानात सर्व पातळ्यांवर धर्मांधता पसरवली. सँडहर्स्ट आणि डेहराडूनमधील स्पिरीट नंतरच्या पिढ्यातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये उरले नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे आजी माजी लष्करी अधिकारी अण्वस्त्र वापराच्या धमक्या देत असतात. पाकिस्तानच्या धर्मांधतेशी आता भारतही स्पर्धा करताना दिसतो आहे. काही तथाकथित राष्ट्रवादी चॅनेलांमधील अँकरशी स्पर्धा करीत मेजर जनरल जी. डी. बक्षींसारखे माजी अधिकारी आक्रमक होताना दिसतात. धर्मांधतेच्या आहारी गेलेला पाकिस्तान विनाशाच्या कडेलोटाकडे पोचला आहे. त्यापासून काही शिकण्याऐवजी विकासाचा धोशा लावणारा भारतातील राज्यकर्ता पक्ष भारताला हिंदू पाकिस्तान बनविण्याच्या दिशेने निघाला आहे. याबद्दल अखेरच्या काही दिवसांत एअर मार्शल अशगर खानांसारखेच पाकिस्तानातील काही विवेकी लोक चिंता व्यक्त करीत होते. १९६५ व १९७१च्या युद्धात पाकिस्तानी हवाई दलाचे नेतृत्व करणाऱ्या अशगर खान यांना युद्धाच्या मर्यादांचे भान होते.