•राधिका गोडबोले
‘ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट’पेक्षा ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ महत्त्वाचा मानला जाणारा भूतान हा देश कार्बन न्यूट्रल नव्हे कार्बन निगेटिव्ह आहे. राजपुत्राच्या जन्मोत्सवानिमित्त तेथे नुकतीच एक लाख ऐंशी हजार झाडे लावली गेली. अविकसिततेकडून विकसनशील होताना तिथे संस्कृती, पर्यावरण याचा बळी दिला जात नाहीये. या देशाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा.
भूतानला जाताय? एकदम भूतान काय, त्यापेक्षा बँकॉक पटायाला जा की, तिथे जाऊन काय फक्त मॉनेस्ट्री आणि गरीब लोक बघणार, अशी एक प्रतिक्रिया आणि ‘अरे वा, भूतान, मस्त! निसर्गसौंदर्य भरपूर आहे तिथे’ अशा विरूद्ध प्रतिक्रिया ऐकत भूतान ट्रीपला निघाले.
नेपाळ, भूतान, बांगलादेश हे सर्वच देश जवळ असलेल्या भारतातल्या बागडोगरा या गावातील विमानतळावरून बाहेर पडल्यावर तिथली गर्दी, बकालपण, उकाडा बघून वाटलं खरंच चुकलं की काय आपलं... रस्ता खराब व ट्रॅफिक आहे म्हणून आपला ग्रुप बस किंवा मिनीबस ऐवजी वेगवेगळ्या कार्सने फोइन्टशोलिंगला जातोय, असे आमचा टूर मॅनेजर संदीप पाटील याने सांगितले. जेवणाच्या ब्रेकनंतर भोवतालचा परिसर हळूहळू बदलायला लागला. पाच तासांच्या प्रवासानंतर फोइन्टशोलिंगला पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजत आल्याने अंधार झाला होता. हॉटेलवर पोहचल्यावर आधी गॅलरीत गेलो आणि तेथून अगदी जवळ दिसणारे डोंगर, त्यावरचे लुकलुकते दिवे दुसऱ्या बाजूने गावातले स्वच्छ, अगदी तुरळक वाहतुकीचे रस्ते बघून खुश झालो. दुसऱ्या दिवशीचा प्रवास मिनीबसने होता. १४ प्रवासी आणि लोकल गाइड प्रेमा उर्फ पी. जे. आणि स्थानिक ड्रायव्हर यांच्यासह बस निघाली. दुसऱ्या बसमध्ये सराफ हा लोकल गाइड होता. सराफ हा तेथील बऱ्यापैकी चित्रपट कलावंत, अभिनेता. इतर वेळी गाइड म्हणून काम करतो हे ओळख झाली तेव्हा कळले. भारतीय हिंदी चित्रपट व कलावंत तिकडे खूपच लोकप्रिय. तिथे थिएटरमध्ये परवानगी नसली तरी, विविध वाहिन्या, सीडी यामुळे तिकडे हिंदी सिनेमा सगळेच बघतात. सराफ जरा अबोल होता पण बडबड्या पेमा गाइडने आम्हाला शाहरूख, सलमान, आमीर, सनी देओल आदिंच्या नकला करून दाखवल्या. फून्टशोलिंगहून वळणावळणाच्या निसर्गसुंदर रस्त्याने थिम्पूला आलो, तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात आली तिथे ‘शहरात’ कुठेही पोस्टरवर हिरो, हिरोइन अथवा मॉडेल्स दिसले नाहीत. गाडीच्या काचांपासून हॉटेलमधील फ्रेम्सपर्यंत सगळीकडे त्यांच्या राजाराणीचे हसरे फोटोच होते.
भूतानमध्ये प्रवेश केल्यावर दुसऱ्या दिवशी आमचे इमिग्रेशन झाले. टूरिस्ट असल्यामुळे सगळ्यांचे एक दीड तासात काम झाले पण तिथे मुख्यत: रस्त्याच्या कामासाठी नेपाळ, आसाम, बांगला देश येथून आलेल्या तरुणांची गर्दी बघून त्यांचे काम एकदिवसात तरी होईल की नाही असे वाटले. या तरुणांना काही काळापुरता व्हिसा मिळतो. मात्र एखाद्या तरुणाने तिथल्या मुलीशी लग्न केले. तर त्याला नागरिकत्व मिळते. निसर्गाने आपल्या संपत्तीची मुक्त हस्ते इथे उधळण केलेली असली तरी उपजीविकेची फारशी साधने इथे नाहीत. पर्यटन क्षेत्राचा आता विकास होतोय आणि काही मोबाइल, कम्प्युटर कंपन्या इथे आहेत. तिथे रोजगार मिळतो. भारत आणि इतरही देशांच्याकडून मिळणाऱ्या अनुदानावर इथली विकासाची बरीचशी कामे होत आहेत. इथे मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक. त्यामुळे बहुपत्नीत्व सर्रास आढळते. हॉटेल्स, दुकाने येथे काम करणाऱ्यांमध्ये मुलीच जास्त. थिम्पू ही भूतानची राजधानी. तिथे राजवाडा, स्तूप, चाईल्ड मॉनेस्ट्री, झाँग हे सगळे बघताना जाणवत होते. लोकांच्या मनात राजाविषयी असलेले प्रेम आणि आदर. राजेशाही असूनही राजानेच नागरिकांना लोकशाहीचा रस्ता दाखवला आहे. निसर्गसंपन्न परंतु अविकसित असे हे चिमुकले राष्ट्र विकासासाठी प्रयत्न करीत असताना संस्कृतीची जपणूक हे त्यांचे एक मुख्य ध्येय आहे. चीन व भारत या आकार व लोकसंख्या दोन्ही बाबतीत खूप मोठ्या असलेल्या देशांच्या मध्ये असलेल्या भूतानची लोकसंख्या फक्त सात लाख आहे. अविकसितकडून विकसनशील होतानाही इथल्या लोकांचा परंपरागत पेहराव बदलला नाही. स्त्रियांचे अंगभर कपडे आणि पुरूषांच्या ‘घो’ पेहराव अशा तिथल्या लोकांच्या कपड्यातून त्यांचे वेगळेपण जाणवते. हा देश कार्बन न्यूट्रल नव्हे, कार्बन निगेटिव्ह आहे. अर्थात प्रदूषण तिथे अजिबात नाही. ‘ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट’ पेक्षा ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ तिथे महत्त्वाचा आहे. शिक्षण, वैद्यकीय सुविधा सर्वच नागरिकांना विनामूल्य मिळतात. जे विद्यार्थी मेहनत, अभ्यास करतात त्यांच्यासाठी कॉलेज शिक्षणही फुकट आहे आणि हे सगळे शक्य होते उपलब्ध साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर केल्यामुळेच.
उंचच उंच डोंगरांवरील घरांमध्येही मॉनेस्ट्रीमध्ये वीज, पाणी, सुविधा आहेत. विकासासाठी त्यांनी पर्यावरण, संस्कृतीचा बळी दिलेला नाही. सध्या त्यांची ७२ % जमीन वनाच्छादित आहे. तेथील नियमानुसार ती किमान ६० % तरी वनाच्छादित हवी. तेथील लोकांनी न मागताच राजाने त्यांना लोकशाही दिली. तेथील राजा ६५ व्या वर्षी निवृत्त होतो. चवथ्या राजा वयाच्या ५१ व्या वर्षीच लोकप्रियतेच्या शिखरावर असताना निवृत्त झाला. आत्ताचा राजा तरुणांमध्ये मिसळतो. सगळ्यांचा लाडका आहे. आम्ही तिथे असतानाच या राजाच्या नवजात बाळाच्या आगमनानिमित्त उत्सव साजरा झाला. यानिमित्ताने मोठी पार्टी, जेवणावळी याऐवजी एक लाख आठ हजार झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात आला. आपल्याकडे वयोवृद्ध नेतेही निवृत्तीचे नाव घेत नाहीत आणि अनेकदा चर्चा होऊनही वाढदिवसाचे होर्डिंग्ज, पार्ट्या कमी होत नाहीत.
थिम्पूहून पुन्हाकाला जाताना धोचूला पास बघितला. उल्फा अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या सैनिकांचे ते स्मारक आहे. याविषयी सांगतानाही आमच्या राजाने आधी समोपचाराने समजावले तरीही ऐकले नाही तेव्हा जंगलात लपलेल्या भारतीय अतिरेक्यांचा खातमा करण्याची योजना आखली हे सांगतानाही राजा म्हणजे दैवी अवतार अशी भावना व त्याच्याविषयीचे आदरयुक्त प्रेम जाणवत होते. थिम्फूजवळ १६९ फूट उंच बुद्धाचा भव्य पुतळा, त्याच्या भोवतीच्या आपल्याकडच्या ६४ योगिनींसारख्या देवता याचा समावेश जगातील आश्चर्यात होणार आहे. शेवटचा मुक्काम पारो येथे होता. तेथील ‘टायगर नेस्ट’ हे डोंगरांच्यामध्ये सुमारे तीन किलोमीटर ट्रेक आणि आठशे पायऱ्या चढून जावे लागणारे ठिकाण दाखवताना कुणी मागे राहिले म्हणून परत बघायला जाऊन येणाऱ्या सराफ, प्रेमा यांच्या चेहऱ्यावरचे हसणे कायम होते. आठ दिवसांच्या या प्रवासात भव्य मॉनेस्ट्री मंदिर, झाँग अशी ठिकाणे बघताना भव्यतेबरोबर स्वच्छता जाणवत होती.
अनेक अंधश्रद्धा-श्रद्धाही तेथे बघायला मिळाल्या, अनेक रुढी ते श्रद्धेने पाळतात. मॉनेस्ट्रीच्या भिंतीवर अनेक कथा चितारलेल्या आहेत. त्यात जटायू, गणपती आपल्याकडच्या देवता, राक्षस अशा आकृती आढळतात. डोंगरांच्या कपारींमधून अनेक ठिकाणी मोदकाच्या आकाराच्या असंख्य सोंगट्या दिसल्या. मृतांच्या मुक्तीसाठी आत्म्याच्या शांतीसाठी ते ठेवले जाते असे कळले. तेथील मुली आलेल्या पाहुण्याला मिठाई, गोड पदार्थ देत नाहीत. कारण असे केल्यास त्या मुलीचे ज्याला मिठाई देईल त्याच्याशी लग्न ठरले असे मानले जाते. पहिले दोन दिवस आम्हालाही त्यामुळे जेवणात गोड मिळाले नाही पण नंतर टूरीस्ट आहोत म्हणून समजूत काढून व्यवस्था झाली. आठ दिवस तेथील जेवण केले. त्यात रोज बटाटे होतेच त्यासोबत कधी ढोबळी मिरची, कधी पनीर. आपल्यासारखे खाद्यपदार्थाचे वैविध्य इथे नाही. कदाचित त्यामुळेच लठ्ठ भूतानी स्त्री पुरूष दिसले नाहीत. शिवाय चालणे, डोंगर चढणे हा व्यायाम त्यांना रोजचाच. शेजाऱ्याकडे गप्पा मारायला जायचे तरी दुसऱ्या डोंगरावर अशी अनेक ठिकाणी परिस्थिती. तिथे जाऊन काय फक्त मॉनेस्ट्री आणि गरिबी बघायची असे अनेक जण म्हणाले होते पण मॉनेस्ट्रीची भव्यता, शिस्त परिस्थितीवर मात करून देशविकास करण्याची धडपड, हसरे चेहरे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण विरहीत मुक्त निसर्गसौंदर्य, डोळे निववणारी हिरवाई हे बघून या देशाची गणना आनंदी देश म्हणून केली जाते ते योग्यच आहे असे वाटले.
‘ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट’पेक्षा ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ महत्त्वाचा मानला जाणारा भूतान हा देश कार्बन न्यूट्रल नव्हे कार्बन निगेटिव्ह आहे. राजपुत्राच्या जन्मोत्सवानिमित्त तेथे नुकतीच एक लाख ऐंशी हजार झाडे लावली गेली. अविकसिततेकडून विकसनशील होताना तिथे संस्कृती, पर्यावरण याचा बळी दिला जात नाहीये. या देशाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा.
भूतानला जाताय? एकदम भूतान काय, त्यापेक्षा बँकॉक पटायाला जा की, तिथे जाऊन काय फक्त मॉनेस्ट्री आणि गरीब लोक बघणार, अशी एक प्रतिक्रिया आणि ‘अरे वा, भूतान, मस्त! निसर्गसौंदर्य भरपूर आहे तिथे’ अशा विरूद्ध प्रतिक्रिया ऐकत भूतान ट्रीपला निघाले.
नेपाळ, भूतान, बांगलादेश हे सर्वच देश जवळ असलेल्या भारतातल्या बागडोगरा या गावातील विमानतळावरून बाहेर पडल्यावर तिथली गर्दी, बकालपण, उकाडा बघून वाटलं खरंच चुकलं की काय आपलं... रस्ता खराब व ट्रॅफिक आहे म्हणून आपला ग्रुप बस किंवा मिनीबस ऐवजी वेगवेगळ्या कार्सने फोइन्टशोलिंगला जातोय, असे आमचा टूर मॅनेजर संदीप पाटील याने सांगितले. जेवणाच्या ब्रेकनंतर भोवतालचा परिसर हळूहळू बदलायला लागला. पाच तासांच्या प्रवासानंतर फोइन्टशोलिंगला पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजत आल्याने अंधार झाला होता. हॉटेलवर पोहचल्यावर आधी गॅलरीत गेलो आणि तेथून अगदी जवळ दिसणारे डोंगर, त्यावरचे लुकलुकते दिवे दुसऱ्या बाजूने गावातले स्वच्छ, अगदी तुरळक वाहतुकीचे रस्ते बघून खुश झालो. दुसऱ्या दिवशीचा प्रवास मिनीबसने होता. १४ प्रवासी आणि लोकल गाइड प्रेमा उर्फ पी. जे. आणि स्थानिक ड्रायव्हर यांच्यासह बस निघाली. दुसऱ्या बसमध्ये सराफ हा लोकल गाइड होता. सराफ हा तेथील बऱ्यापैकी चित्रपट कलावंत, अभिनेता. इतर वेळी गाइड म्हणून काम करतो हे ओळख झाली तेव्हा कळले. भारतीय हिंदी चित्रपट व कलावंत तिकडे खूपच लोकप्रिय. तिथे थिएटरमध्ये परवानगी नसली तरी, विविध वाहिन्या, सीडी यामुळे तिकडे हिंदी सिनेमा सगळेच बघतात. सराफ जरा अबोल होता पण बडबड्या पेमा गाइडने आम्हाला शाहरूख, सलमान, आमीर, सनी देओल आदिंच्या नकला करून दाखवल्या. फून्टशोलिंगहून वळणावळणाच्या निसर्गसुंदर रस्त्याने थिम्पूला आलो, तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात आली तिथे ‘शहरात’ कुठेही पोस्टरवर हिरो, हिरोइन अथवा मॉडेल्स दिसले नाहीत. गाडीच्या काचांपासून हॉटेलमधील फ्रेम्सपर्यंत सगळीकडे त्यांच्या राजाराणीचे हसरे फोटोच होते.
भूतानमध्ये प्रवेश केल्यावर दुसऱ्या दिवशी आमचे इमिग्रेशन झाले. टूरिस्ट असल्यामुळे सगळ्यांचे एक दीड तासात काम झाले पण तिथे मुख्यत: रस्त्याच्या कामासाठी नेपाळ, आसाम, बांगला देश येथून आलेल्या तरुणांची गर्दी बघून त्यांचे काम एकदिवसात तरी होईल की नाही असे वाटले. या तरुणांना काही काळापुरता व्हिसा मिळतो. मात्र एखाद्या तरुणाने तिथल्या मुलीशी लग्न केले. तर त्याला नागरिकत्व मिळते. निसर्गाने आपल्या संपत्तीची मुक्त हस्ते इथे उधळण केलेली असली तरी उपजीविकेची फारशी साधने इथे नाहीत. पर्यटन क्षेत्राचा आता विकास होतोय आणि काही मोबाइल, कम्प्युटर कंपन्या इथे आहेत. तिथे रोजगार मिळतो. भारत आणि इतरही देशांच्याकडून मिळणाऱ्या अनुदानावर इथली विकासाची बरीचशी कामे होत आहेत. इथे मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक. त्यामुळे बहुपत्नीत्व सर्रास आढळते. हॉटेल्स, दुकाने येथे काम करणाऱ्यांमध्ये मुलीच जास्त. थिम्पू ही भूतानची राजधानी. तिथे राजवाडा, स्तूप, चाईल्ड मॉनेस्ट्री, झाँग हे सगळे बघताना जाणवत होते. लोकांच्या मनात राजाविषयी असलेले प्रेम आणि आदर. राजेशाही असूनही राजानेच नागरिकांना लोकशाहीचा रस्ता दाखवला आहे. निसर्गसंपन्न परंतु अविकसित असे हे चिमुकले राष्ट्र विकासासाठी प्रयत्न करीत असताना संस्कृतीची जपणूक हे त्यांचे एक मुख्य ध्येय आहे. चीन व भारत या आकार व लोकसंख्या दोन्ही बाबतीत खूप मोठ्या असलेल्या देशांच्या मध्ये असलेल्या भूतानची लोकसंख्या फक्त सात लाख आहे. अविकसितकडून विकसनशील होतानाही इथल्या लोकांचा परंपरागत पेहराव बदलला नाही. स्त्रियांचे अंगभर कपडे आणि पुरूषांच्या ‘घो’ पेहराव अशा तिथल्या लोकांच्या कपड्यातून त्यांचे वेगळेपण जाणवते. हा देश कार्बन न्यूट्रल नव्हे, कार्बन निगेटिव्ह आहे. अर्थात प्रदूषण तिथे अजिबात नाही. ‘ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट’ पेक्षा ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ तिथे महत्त्वाचा आहे. शिक्षण, वैद्यकीय सुविधा सर्वच नागरिकांना विनामूल्य मिळतात. जे विद्यार्थी मेहनत, अभ्यास करतात त्यांच्यासाठी कॉलेज शिक्षणही फुकट आहे आणि हे सगळे शक्य होते उपलब्ध साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर केल्यामुळेच.
उंचच उंच डोंगरांवरील घरांमध्येही मॉनेस्ट्रीमध्ये वीज, पाणी, सुविधा आहेत. विकासासाठी त्यांनी पर्यावरण, संस्कृतीचा बळी दिलेला नाही. सध्या त्यांची ७२ % जमीन वनाच्छादित आहे. तेथील नियमानुसार ती किमान ६० % तरी वनाच्छादित हवी. तेथील लोकांनी न मागताच राजाने त्यांना लोकशाही दिली. तेथील राजा ६५ व्या वर्षी निवृत्त होतो. चवथ्या राजा वयाच्या ५१ व्या वर्षीच लोकप्रियतेच्या शिखरावर असताना निवृत्त झाला. आत्ताचा राजा तरुणांमध्ये मिसळतो. सगळ्यांचा लाडका आहे. आम्ही तिथे असतानाच या राजाच्या नवजात बाळाच्या आगमनानिमित्त उत्सव साजरा झाला. यानिमित्ताने मोठी पार्टी, जेवणावळी याऐवजी एक लाख आठ हजार झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात आला. आपल्याकडे वयोवृद्ध नेतेही निवृत्तीचे नाव घेत नाहीत आणि अनेकदा चर्चा होऊनही वाढदिवसाचे होर्डिंग्ज, पार्ट्या कमी होत नाहीत.
थिम्पूहून पुन्हाकाला जाताना धोचूला पास बघितला. उल्फा अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या सैनिकांचे ते स्मारक आहे. याविषयी सांगतानाही आमच्या राजाने आधी समोपचाराने समजावले तरीही ऐकले नाही तेव्हा जंगलात लपलेल्या भारतीय अतिरेक्यांचा खातमा करण्याची योजना आखली हे सांगतानाही राजा म्हणजे दैवी अवतार अशी भावना व त्याच्याविषयीचे आदरयुक्त प्रेम जाणवत होते. थिम्फूजवळ १६९ फूट उंच बुद्धाचा भव्य पुतळा, त्याच्या भोवतीच्या आपल्याकडच्या ६४ योगिनींसारख्या देवता याचा समावेश जगातील आश्चर्यात होणार आहे. शेवटचा मुक्काम पारो येथे होता. तेथील ‘टायगर नेस्ट’ हे डोंगरांच्यामध्ये सुमारे तीन किलोमीटर ट्रेक आणि आठशे पायऱ्या चढून जावे लागणारे ठिकाण दाखवताना कुणी मागे राहिले म्हणून परत बघायला जाऊन येणाऱ्या सराफ, प्रेमा यांच्या चेहऱ्यावरचे हसणे कायम होते. आठ दिवसांच्या या प्रवासात भव्य मॉनेस्ट्री मंदिर, झाँग अशी ठिकाणे बघताना भव्यतेबरोबर स्वच्छता जाणवत होती.
अनेक अंधश्रद्धा-श्रद्धाही तेथे बघायला मिळाल्या, अनेक रुढी ते श्रद्धेने पाळतात. मॉनेस्ट्रीच्या भिंतीवर अनेक कथा चितारलेल्या आहेत. त्यात जटायू, गणपती आपल्याकडच्या देवता, राक्षस अशा आकृती आढळतात. डोंगरांच्या कपारींमधून अनेक ठिकाणी मोदकाच्या आकाराच्या असंख्य सोंगट्या दिसल्या. मृतांच्या मुक्तीसाठी आत्म्याच्या शांतीसाठी ते ठेवले जाते असे कळले. तेथील मुली आलेल्या पाहुण्याला मिठाई, गोड पदार्थ देत नाहीत. कारण असे केल्यास त्या मुलीचे ज्याला मिठाई देईल त्याच्याशी लग्न ठरले असे मानले जाते. पहिले दोन दिवस आम्हालाही त्यामुळे जेवणात गोड मिळाले नाही पण नंतर टूरीस्ट आहोत म्हणून समजूत काढून व्यवस्था झाली. आठ दिवस तेथील जेवण केले. त्यात रोज बटाटे होतेच त्यासोबत कधी ढोबळी मिरची, कधी पनीर. आपल्यासारखे खाद्यपदार्थाचे वैविध्य इथे नाही. कदाचित त्यामुळेच लठ्ठ भूतानी स्त्री पुरूष दिसले नाहीत. शिवाय चालणे, डोंगर चढणे हा व्यायाम त्यांना रोजचाच. शेजाऱ्याकडे गप्पा मारायला जायचे तरी दुसऱ्या डोंगरावर अशी अनेक ठिकाणी परिस्थिती. तिथे जाऊन काय फक्त मॉनेस्ट्री आणि गरिबी बघायची असे अनेक जण म्हणाले होते पण मॉनेस्ट्रीची भव्यता, शिस्त परिस्थितीवर मात करून देशविकास करण्याची धडपड, हसरे चेहरे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण विरहीत मुक्त निसर्गसौंदर्य, डोळे निववणारी हिरवाई हे बघून या देशाची गणना आनंदी देश म्हणून केली जाते ते योग्यच आहे असे वाटले.