देवेंद्र पेम
हसणं हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नुसतं अन्न, वस्त्र, निवारा असून काही होत नाही. हल्ली टेन्शन इतकी असतात की या तीन गोष्टी असूनही आयुष्य एन्जॉय करता येत नाही. त्यामुळे बॅलन्स साधायचा असेल तर 'हसणं' हवंच... त्यात आज 'आंतरराष्ट्रीय विनोद दिन'. तर आज हसायलाच हवे. म्हणतात ना 'हसणं टॉनिक आहे.'
हे विनोदाचे टॉनिक देण्याचे काम गेली दीडशे वर्षे मराठी विनोदी नाटकं करत आहेत आणि यापुढेही करत राहतील. मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासात डोकावले तर समजेल की, सुरुवातीच्या संगीत नाटकातही विनोद असायचाच. पण, एखाद्या पात्राच्या किंवा सहाय्यकी कथानकाच्या रूपाने. 'भाऊबंदकी' नाटकातील चमकशास्त्री नमकशास्त्री ही पात्रे आठवतायेत का? गडकरींच्या 'प्रेमसंन्यास' नाटकातील गोकुळ व मथुरा ही पात्र!! एखादी गोष्ट विसरू नये म्हणून आठवणीसाठी प्रत्येक गोष्टीची गाठ मारून ठेवायचे. नंतर कुठली गाठ कुठल्या गोष्टीसाठी मारली हेच ते विसरायचे. 'भावबंधन'मधल्या कामण्णाची भूमिका करणारा दिनकर नावाचा नट इतका लोकप्रिय झाला की आयुष्यभर तो 'दिनकर कामण्णा' नावाने ओळखला गेला. अर्थात 'संगीत' हाच या नाटकांचा प्राण असल्याने विनोदाचा वापर हा तडका देण्यापुरताच व्हायचा. पण, या तडक्याला मिळणारा प्रचंड हास्याचा, टाळ्यांचा प्रतिसाद पाहून संपूर्ण नाटकच विनोदी का करू नये, असा विचार झाला असणार. त्यातूनच मग जन्माला आले 'संगीत संशय कल्लोळ'. या नाटकात संगीत आणि विनोद अगदी हातात हात घालून नांदत होते. म्हणूनच मला वाटते पहिले विनोदी नाटक म्हणून 'संगीत संशय कल्लोळ'कडे बघता येईल.
पुढे गद्य नाटकांचा काळ सुरू झाला, तेव्हा गंभीर नाटकांची संख्या जास्त होती. 'कडाष्टक'सारखी भन्नाट विनोदी नाटकेही आली...पण त्या काळात विनोदाचे 'टॉनिक' देण्याचे काम अर्थातच विनोदाची परंपरा सांभाळली ती तमाशा आणि वगनाट्याने. नारायण गांवकर, विठाबाई यांचे तमाशे तर तुफान प्रसिद्ध होते. दादू इंदुरीकर हे सुद्धा वगनाट्यातले दादा नाव. ज्यांच्याकडून नंतर पुढे आले विनोदाचे बादशाह, 'दादा कोंडके'. वसंत सबनीसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' या लोकनाट्याला दादांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. पण लोककला आणि नाटक यांची योग्य सांगड घालून 'मुक्त लोकनाट्य' प्रकार खऱ्या अर्थाने लोकांमासमोर आणला तो 'शाहीर साबळे' यांनी. सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, शरद तळवलकर, राजा गोसावी, राजा मयेकर, सतीश दुभाषी असा अनेक दिग्गजांची विनोदी फटकेबाजी चालूच राहिली. आणि पुलं, अत्रे, कानेटकर, तोरडमल यांसारख्या महान लेखकांची भन्नाट विनोदी नाटकं येतच राहिली. ' लेकुरे उदंड झाली', 'तरुण तुर्क...', 'सूर्याची पिल्ले', 'सौजन्याची ऐशीतैशी', 'ती फुलराणी', 'प्रेम तुझा रंग कसा?', 'कार्टी प्रेमात पडली', 'वटवट सावित्री' अशा असंख्य विनोदी नाटकांशी मराठी माणसांची नाळ जोडली गेली. त्या नाटकातले प्रसंग आठवून, विविध पात्र आठवून आजही ते हसतात, आनंदून जातात. अशी या नाटकांची विलक्षण किमया आहे. तोरडमलांचे प्राध्यापक बारटक्के आठवा, 'हाहा हीही हूहूsss'चे संवाद आणि विजय चव्हाण याची 'मोरूची मावशी' आजही रसिकांच्या डोळ्यांसमोर आहे.
अनेक अशी नाटकं एका बाजूने रंगभूमीवर येत असताना विनोदी नाटकांचे इतर फॉर्मस ही दिग्गजांकडून हाताळले जात होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा 'बटाट्याची चाळ' चा एकपात्रीनाट्य तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर 'वऱ्हाड निघालंय लंडनला', 'मी अत्रे बोलतोय', 'राशीचक्र' असा एकपात्री विनोदी नाट्यप्रकारांचे हजारो प्रयोग झाले. 'नांदा सौख्य भरे' नाटकाद्वारे सई परांजपे यांनी रेव्यू नाटकाचा वेगळा प्रकार रंगभूमीवर आणला. तसेच 'ब्लॅक कॉमेडी' हा विनोदाचा खूप कठीण प्रकार सतीश आळेकर यांनी 'महानिर्वाण' या नाटकातून अत्यंत यशस्वीरित्या आणला आणि मराठी रंगभूमीचा नव्या पर्वाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. या शैलीतील नाटकांच्या संचात ट्रेंड सेटर ठरले ते बबन प्रभू यांचे 'झोपी गेलेला जागा झाला' हा फार्स. अतिशयोक्ती विनोद असलेल्या 'फार्स' हा नाट्यप्रकार रंगभूमीवर बबन प्रभू, आत्माराम भेंडे या जोडगोळीने आणला आणि लिलया पेलला.
आता रंगभूमीने आपला हक्काचा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. यात अधिक भर पाडली ती 'बोलीभाषेच्या' नाटकांनी. विनोदाचे एक वेगळेच रूप घेऊन आलेले भन्नाट नाटक म्हणजे गंगाराम गवाणकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित 'वस्त्रहरण'. मालवणी लोकभाषेतील या नाटकाचे पाच हजारच्या वर प्रयोग झाले. या नाटकातून रंगभूमीला मिळाले मालवणी विनोदसम्राट 'मच्छिंद्र कांबळी'. मालवणी भाषेचा झेंडा त्यांनी आयुष्यभर रंगभूमीवर फडकवत ठेवला आणि नाट्यरसिकांना पोट धरून मालवणीतून हसायला भाग पाडले. बोलीभाषेला रंगभूमीवर महत्त्वाचे स्थान या नाटकामुळे मिळाल्याने 'वस्त्रहरण' मैलाचा दगड ठरला. मग १९८३ साली मुक्तनाट्य व लोकनाट्य यांचे मिश्रण करून वेगळाच फॉर्म पुरुषोत्तम बेर्डे यांनी 'टूरटूर'च्या नाटकाद्वारे आणला आणि रंगभूमीवर सुरू झाले, 'टायमिंग पर्व', ज्याचे नाव होते लक्ष्मीकांत बेर्डे. भन्नाट टायमिंग सेन्स असलेल्या या कलाकाराने शेवटपर्यंत रसिकांच्या मनावर राज्य केले. 'शांतेचं कार्ट..', 'उघडले स्वर्गाचे दार' यांसारख्या नाटकातून लक्ष्याने स्वतःचे असे विनोदाचे 'टॉनिक' बनवून रसिकांना दिले आणि मनसोक्त हसवले. लक्ष्मीकांत बेर्डेप्रमाणे 'टूरटूर' मधला प्रत्येक कलाकार स्टार झाला. 'ब्रह्मचारी'नंतर प्रशांत दामले यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 'गेला प्रशांत कुणीकडे' म्हणता म्हणता दामले 'साखर खाल्लेला माणूस'पर्यंत पोहोचले.
नव्वदच्या दशकात पूर्णपणे नवीन कलाकरांना घेऊन माझे 'ऑल दी बेस्ट' नाटक आले. या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर या त्रिकुटाने अक्षरशः रंगभूमीवर धुमाकूळ घातला. त्यानंतर संतोष पवारच्या 'यदा कदाचित'ने रंगभूमी हलवून सोडली. 'सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो?' या त्याच्या प्रश्नाने सर्वांचीच झोप उडवली. मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकाचा लेखाजोखा एका नाटकाच्या उल्लेखाविना कधीच पूर्ण होणार नाही. ते नाटक म्हणजे केदार शिंदे लिखित दिग्दर्शित आणि भरत जाधव अभिनित 'सही रे सही'. रंगभूमी व सिनेसृष्टी दोन्हीकडे भरत 'सुपरस्टार'पद भूषवू लागला. याच दरम्यान विनोदातले आणखी एक मोठ्ठे नाव म्हणजे निर्मिती सावंत. पुरुषप्रधान इंडस्ट्रीत 'जाऊ बाई जोरात', 'श्री बाई समर्थ' आदी नाटकांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ती 'कॉमेडी क्वीन' ठरली. 'गेला उडत' म्हणत सिद्धार्थ जाधव उडत गेला तो थेट हिंदी सिनेमात.
गोरा गोमटा अशी हिरो पर्सनॅलिटी नसतानाही आपल्या सर्वांचा लाडका विनोदवीर भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, पंढरीनाथ कांबळी, सुहास परांजपे, समीर चौघुले, श्रेया बुगडे, नम्रता आवटे, मयुरेश पेम, भूषण कडू, अभिजित चव्हाण ही कलावंत रसिकांना आज विनोदाचे टॉनिक पाजत आहेत. एकीकडे गंभीर, अभिजात नाटकं रंगभूमीवर आली, रंगभूमीचा मानबिंदू ठरली, त्या नाटकांमुळे रंगभूमी समृद्ध झाली. पण, रंगभूमीचा आर्थिक डोलारा प्रत्येक काळात विनोदी नाटकांनीच सांभाळला आहे. ज्याप्रमाणे एका कुटुंबात कुटुंबप्रमुख पैशांची तजवीज करतो, तसे विनोदी नाटक हे रंगभूमी या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख आहे.
एकांकिका हा खूप महत्त्वाचा नाट्यप्रकार. तरुणवर्ग नाटकाकडे वळत नाही असे म्हणणारे व्यावसायिक रंगकर्मी एकांकिका करणाऱ्या तरुणाकडे स्वतःही वळत नाही. गोविंद चव्हाणसारखी काही नावं याला अपवाद ठरतील.
नाटकाकडे प्रेक्षक येत नाहीत! हे वाक्यच मुळी विनोदी आहे. कारण, जेव्हा 'अलबत्या गलबत्या'चे एका महिन्यात पन्नासहून अधिक प्रयोग होतात, प्रशांत-भरतच्या नाटकांना आजही हाऊसफुल्लचे बोर्ड लागतात. आजही वर्तमानपत्राची दोन-दोन पाने नाटकांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. त्यामुळे ज्यांना वाटतंय प्रेक्षक येत नाहीत त्यांनी नाटकांप्रमाणे नाटकाच्या जाहिरातींमध्येही नवनवीन प्रयोग करावेत आणि प्रेक्षकांना खेचून आणावे!!!
चला, आंतरराष्ट्रीय विनोद दिनाच्या निमित्ताने नवीन विनोदी नाटक लिहायला घेतो, कारण मला रसिकांना सतत हसवायचं आहे...आणि मला माहीत आहे, विनोदी नाटकांचं टॉनिक'च पूर्वीही रसिकांना हसवत होते, हसवत आहे आणि यापुढेही हसवत राहील!!!
(लेखक प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आहेत)
हसणं हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नुसतं अन्न, वस्त्र, निवारा असून काही होत नाही. हल्ली टेन्शन इतकी असतात की या तीन गोष्टी असूनही आयुष्य एन्जॉय करता येत नाही. त्यामुळे बॅलन्स साधायचा असेल तर 'हसणं' हवंच... त्यात आज 'आंतरराष्ट्रीय विनोद दिन'. तर आज हसायलाच हवे. म्हणतात ना 'हसणं टॉनिक आहे.'
पुढे गद्य नाटकांचा काळ सुरू झाला, तेव्हा गंभीर नाटकांची संख्या जास्त होती. 'कडाष्टक'सारखी भन्नाट विनोदी नाटकेही आली...पण त्या काळात विनोदाचे 'टॉनिक' देण्याचे काम अर्थातच विनोदाची परंपरा सांभाळली ती तमाशा आणि वगनाट्याने. नारायण गांवकर, विठाबाई यांचे तमाशे तर तुफान प्रसिद्ध होते. दादू इंदुरीकर हे सुद्धा वगनाट्यातले दादा नाव. ज्यांच्याकडून नंतर पुढे आले विनोदाचे बादशाह, 'दादा कोंडके'. वसंत सबनीसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' या लोकनाट्याला दादांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. पण लोककला आणि नाटक यांची योग्य सांगड घालून 'मुक्त लोकनाट्य' प्रकार खऱ्या अर्थाने लोकांमासमोर आणला तो 'शाहीर साबळे' यांनी. सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, शरद तळवलकर, राजा गोसावी, राजा मयेकर, सतीश दुभाषी असा अनेक दिग्गजांची विनोदी फटकेबाजी चालूच राहिली. आणि पुलं, अत्रे, कानेटकर, तोरडमल यांसारख्या महान लेखकांची भन्नाट विनोदी नाटकं येतच राहिली. ' लेकुरे उदंड झाली', 'तरुण तुर्क...', 'सूर्याची पिल्ले', 'सौजन्याची ऐशीतैशी', 'ती फुलराणी', 'प्रेम तुझा रंग कसा?', 'कार्टी प्रेमात पडली', 'वटवट सावित्री' अशा असंख्य विनोदी नाटकांशी मराठी माणसांची नाळ जोडली गेली. त्या नाटकातले प्रसंग आठवून, विविध पात्र आठवून आजही ते हसतात, आनंदून जातात. अशी या नाटकांची विलक्षण किमया आहे. तोरडमलांचे प्राध्यापक बारटक्के आठवा, 'हाहा हीही हूहूsss'चे संवाद आणि विजय चव्हाण याची 'मोरूची मावशी' आजही रसिकांच्या डोळ्यांसमोर आहे.
अनेक अशी नाटकं एका बाजूने रंगभूमीवर येत असताना विनोदी नाटकांचे इतर फॉर्मस ही दिग्गजांकडून हाताळले जात होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा 'बटाट्याची चाळ' चा एकपात्रीनाट्य तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर 'वऱ्हाड निघालंय लंडनला', 'मी अत्रे बोलतोय', 'राशीचक्र' असा एकपात्री विनोदी नाट्यप्रकारांचे हजारो प्रयोग झाले. 'नांदा सौख्य भरे' नाटकाद्वारे सई परांजपे यांनी रेव्यू नाटकाचा वेगळा प्रकार रंगभूमीवर आणला. तसेच 'ब्लॅक कॉमेडी' हा विनोदाचा खूप कठीण प्रकार सतीश आळेकर यांनी 'महानिर्वाण' या नाटकातून अत्यंत यशस्वीरित्या आणला आणि मराठी रंगभूमीचा नव्या पर्वाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. या शैलीतील नाटकांच्या संचात ट्रेंड सेटर ठरले ते बबन प्रभू यांचे 'झोपी गेलेला जागा झाला' हा फार्स. अतिशयोक्ती विनोद असलेल्या 'फार्स' हा नाट्यप्रकार रंगभूमीवर बबन प्रभू, आत्माराम भेंडे या जोडगोळीने आणला आणि लिलया पेलला.
आता रंगभूमीने आपला हक्काचा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. यात अधिक भर पाडली ती 'बोलीभाषेच्या' नाटकांनी. विनोदाचे एक वेगळेच रूप घेऊन आलेले भन्नाट नाटक म्हणजे गंगाराम गवाणकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित 'वस्त्रहरण'. मालवणी लोकभाषेतील या नाटकाचे पाच हजारच्या वर प्रयोग झाले. या नाटकातून रंगभूमीला मिळाले मालवणी विनोदसम्राट 'मच्छिंद्र कांबळी'. मालवणी भाषेचा झेंडा त्यांनी आयुष्यभर रंगभूमीवर फडकवत ठेवला आणि नाट्यरसिकांना पोट धरून मालवणीतून हसायला भाग पाडले. बोलीभाषेला रंगभूमीवर महत्त्वाचे स्थान या नाटकामुळे मिळाल्याने 'वस्त्रहरण' मैलाचा दगड ठरला. मग १९८३ साली मुक्तनाट्य व लोकनाट्य यांचे मिश्रण करून वेगळाच फॉर्म पुरुषोत्तम बेर्डे यांनी 'टूरटूर'च्या नाटकाद्वारे आणला आणि रंगभूमीवर सुरू झाले, 'टायमिंग पर्व', ज्याचे नाव होते लक्ष्मीकांत बेर्डे. भन्नाट टायमिंग सेन्स असलेल्या या कलाकाराने शेवटपर्यंत रसिकांच्या मनावर राज्य केले. 'शांतेचं कार्ट..', 'उघडले स्वर्गाचे दार' यांसारख्या नाटकातून लक्ष्याने स्वतःचे असे विनोदाचे 'टॉनिक' बनवून रसिकांना दिले आणि मनसोक्त हसवले. लक्ष्मीकांत बेर्डेप्रमाणे 'टूरटूर' मधला प्रत्येक कलाकार स्टार झाला. 'ब्रह्मचारी'नंतर प्रशांत दामले यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 'गेला प्रशांत कुणीकडे' म्हणता म्हणता दामले 'साखर खाल्लेला माणूस'पर्यंत पोहोचले.
नव्वदच्या दशकात पूर्णपणे नवीन कलाकरांना घेऊन माझे 'ऑल दी बेस्ट' नाटक आले. या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर या त्रिकुटाने अक्षरशः रंगभूमीवर धुमाकूळ घातला. त्यानंतर संतोष पवारच्या 'यदा कदाचित'ने रंगभूमी हलवून सोडली. 'सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो?' या त्याच्या प्रश्नाने सर्वांचीच झोप उडवली. मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकाचा लेखाजोखा एका नाटकाच्या उल्लेखाविना कधीच पूर्ण होणार नाही. ते नाटक म्हणजे केदार शिंदे लिखित दिग्दर्शित आणि भरत जाधव अभिनित 'सही रे सही'. रंगभूमी व सिनेसृष्टी दोन्हीकडे भरत 'सुपरस्टार'पद भूषवू लागला. याच दरम्यान विनोदातले आणखी एक मोठ्ठे नाव म्हणजे निर्मिती सावंत. पुरुषप्रधान इंडस्ट्रीत 'जाऊ बाई जोरात', 'श्री बाई समर्थ' आदी नाटकांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ती 'कॉमेडी क्वीन' ठरली. 'गेला उडत' म्हणत सिद्धार्थ जाधव उडत गेला तो थेट हिंदी सिनेमात.
गोरा गोमटा अशी हिरो पर्सनॅलिटी नसतानाही आपल्या सर्वांचा लाडका विनोदवीर भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, पंढरीनाथ कांबळी, सुहास परांजपे, समीर चौघुले, श्रेया बुगडे, नम्रता आवटे, मयुरेश पेम, भूषण कडू, अभिजित चव्हाण ही कलावंत रसिकांना आज विनोदाचे टॉनिक पाजत आहेत. एकीकडे गंभीर, अभिजात नाटकं रंगभूमीवर आली, रंगभूमीचा मानबिंदू ठरली, त्या नाटकांमुळे रंगभूमी समृद्ध झाली. पण, रंगभूमीचा आर्थिक डोलारा प्रत्येक काळात विनोदी नाटकांनीच सांभाळला आहे. ज्याप्रमाणे एका कुटुंबात कुटुंबप्रमुख पैशांची तजवीज करतो, तसे विनोदी नाटक हे रंगभूमी या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख आहे.
एकांकिका हा खूप महत्त्वाचा नाट्यप्रकार. तरुणवर्ग नाटकाकडे वळत नाही असे म्हणणारे व्यावसायिक रंगकर्मी एकांकिका करणाऱ्या तरुणाकडे स्वतःही वळत नाही. गोविंद चव्हाणसारखी काही नावं याला अपवाद ठरतील.
नाटकाकडे प्रेक्षक येत नाहीत! हे वाक्यच मुळी विनोदी आहे. कारण, जेव्हा 'अलबत्या गलबत्या'चे एका महिन्यात पन्नासहून अधिक प्रयोग होतात, प्रशांत-भरतच्या नाटकांना आजही हाऊसफुल्लचे बोर्ड लागतात. आजही वर्तमानपत्राची दोन-दोन पाने नाटकांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. त्यामुळे ज्यांना वाटतंय प्रेक्षक येत नाहीत त्यांनी नाटकांप्रमाणे नाटकाच्या जाहिरातींमध्येही नवनवीन प्रयोग करावेत आणि प्रेक्षकांना खेचून आणावे!!!
चला, आंतरराष्ट्रीय विनोद दिनाच्या निमित्ताने नवीन विनोदी नाटक लिहायला घेतो, कारण मला रसिकांना सतत हसवायचं आहे...आणि मला माहीत आहे, विनोदी नाटकांचं टॉनिक'च पूर्वीही रसिकांना हसवत होते, हसवत आहे आणि यापुढेही हसवत राहील!!!
(लेखक प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आहेत)