बंडू येवले
vachak.vishesh@gmail.com
पर्यटनाच्या गोंडस नावाखाली मावळातील गड-किल्ले, लेण्या व पर्यटनस्थळे दारू, हुक्कापार्लर व मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची केंद्रे बनली आहेत. या ठिकाणी होणारा चंगळवाद, हुल्लडबाजी, तसेच विकृत संस्कृतीमुळे गड-किल्ले, लेण्या व पर्यटनस्थळांचा लौकिक आणि पावित्र्य धोक्यात आला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या दिवशी (३१ डिसेंबर) विसापूर किल्ल्यावर पर्यटकांना झालेल्या मारहाणीमुळे हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
मावळ तालुक्यासह मावळातील थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून देश-विदेशात नावलौकिक असलेल्या लोणावळा, खंडाळ्याला लाभलेल्या निसर्ग संपदेसह शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कल्पकतेची अनमोल किनार लाभलेली आहे. येथील प्राचीन व पुरातन कार्ला, भाजे व बेडसे या लेण्या, शिवरायांनी उभारलेले विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची, कोराईगड गड-किल्ले, विस्तीर्ण पवना, वलवण, लोणावळा, भुशी, शोरोता, उकसान, मळवंडीठुले, तुंगार्ली हे जलाशय, टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची, नागफणी (ड्युक्सनोज) हे पॉइंट, पावसाळ्यात कोसळणारा मुबलक पाऊस, पावसाळ्यातील विलोभनीय व रमणीय नैसर्गिक दृश्य, तिन्ही ऋतुतील वातावरण, थंड हवा अशा अनेक कारणांमुळे मावळ व लोणावळा-खंडाळ्यातील पर्यटनथळे आकर्षण ठरतात. काही वर्षापासून या भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येतात.
दशकापूर्वी येथे येणारे पर्यटक हे खऱ्या अर्थाने येथील पर्यटनाचा व निसर्गाचा आनंद लुटत होते. त्यांच्यामध्ये निसर्ग प्रेम होते. मात्र आता तरुणाईमध्ये वाढलेला चंगळवाद, मादक पदार्थांच्या सेवनाची विकृत संस्कृती समाजाला घातक ठरत आहे. लोणावळा, खंडाळा आणि मावळातील गड-किल्ले, लेण्या, धरण परिसर व पर्यटनस्थळांवर सावर्जनिक ठिकाणी होणाऱ्या दारूच्या पार्ट्या, हुक्क्याचे धूर, काही मादक पदार्थांचे सेवन करून अलिशान कारमधील साउंड सिस्टीमवर धांगडधिंगा घालणारे पर्यटकांचे थवे, असे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटनस्थळांवर आढळणाऱ्या दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचे ग्लास, बाटल्या यांचे ढीग यामुळे ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. या क्लेशदायक प्रकारांमुळे निसर्गप्रेमी पर्यटक या परिसरापासून दुरावत चालला आहे.
स्थानिक नागरिकही जबाबदार
गड-किल्ले, लेण्या आणि धार्मिक स्थळे आपली स्फूर्तिस्थळे आहेत. या वारशाचे पावित्र्य राखणे, संवर्धन करणे हे प्रशासनासह प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, प्रत्येक जण आपले कर्तव्य विसरत चालला आहे. वारशाची प्रेरणा घेण्याऐवजी विकृत संस्कृतीमुळे त्यांचे पावित्र्य धोक्यात आणले जात आहे. पर्यटन, विविध उपक्रमांच्या गोंडस नावाखाली ही स्थळे व्यसन करणाऱ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. अशा विकृतीला सरकान, पोलिस प्रशासन, भारतीय पुरातत्व विभागाइतकेच आणि स्थानिक नागरिकही जबाबदार आहेत. या विकृत संस्कृतीला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले पाहिजे. यामुळे विसापूर येथे नुकतीच पर्यटकांना झालेली मारहाण, तसेच लोणावळा-खंडाळ्यात यापूर्वी झालेल्या रेव्ह पार्ट्या, पर्यटन स्थळांवर रात्री-अपरात्री होणारा तरुणाईचा धांगडधिंगा, छुप्प्या आणि खुलेआम पार्ट्या, असे प्रकार घडणार नाहीत. स्थानिक व्यावसायिकांनीही पर्यटकांची गरज ओळखून त्यांना त्रास देण्याचे प्रकार टाळण्याची गरज आहे.
vachak.vishesh@gmail.com
पर्यटनाच्या गोंडस नावाखाली मावळातील गड-किल्ले, लेण्या व पर्यटनस्थळे दारू, हुक्कापार्लर व मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची केंद्रे बनली आहेत. या ठिकाणी होणारा चंगळवाद, हुल्लडबाजी, तसेच विकृत संस्कृतीमुळे गड-किल्ले, लेण्या व पर्यटनस्थळांचा लौकिक आणि पावित्र्य धोक्यात आला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या दिवशी (३१ डिसेंबर) विसापूर किल्ल्यावर पर्यटकांना झालेल्या मारहाणीमुळे हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
मावळ तालुक्यासह मावळातील थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून देश-विदेशात नावलौकिक असलेल्या लोणावळा, खंडाळ्याला लाभलेल्या निसर्ग संपदेसह शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कल्पकतेची अनमोल किनार लाभलेली आहे. येथील प्राचीन व पुरातन कार्ला, भाजे व बेडसे या लेण्या, शिवरायांनी उभारलेले विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची, कोराईगड गड-किल्ले, विस्तीर्ण पवना, वलवण, लोणावळा, भुशी, शोरोता, उकसान, मळवंडीठुले, तुंगार्ली हे जलाशय, टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची, नागफणी (ड्युक्सनोज) हे पॉइंट, पावसाळ्यात कोसळणारा मुबलक पाऊस, पावसाळ्यातील विलोभनीय व रमणीय नैसर्गिक दृश्य, तिन्ही ऋतुतील वातावरण, थंड हवा अशा अनेक कारणांमुळे मावळ व लोणावळा-खंडाळ्यातील पर्यटनथळे आकर्षण ठरतात. काही वर्षापासून या भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येतात.
दशकापूर्वी येथे येणारे पर्यटक हे खऱ्या अर्थाने येथील पर्यटनाचा व निसर्गाचा आनंद लुटत होते. त्यांच्यामध्ये निसर्ग प्रेम होते. मात्र आता तरुणाईमध्ये वाढलेला चंगळवाद, मादक पदार्थांच्या सेवनाची विकृत संस्कृती समाजाला घातक ठरत आहे. लोणावळा, खंडाळा आणि मावळातील गड-किल्ले, लेण्या, धरण परिसर व पर्यटनस्थळांवर सावर्जनिक ठिकाणी होणाऱ्या दारूच्या पार्ट्या, हुक्क्याचे धूर, काही मादक पदार्थांचे सेवन करून अलिशान कारमधील साउंड सिस्टीमवर धांगडधिंगा घालणारे पर्यटकांचे थवे, असे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटनस्थळांवर आढळणाऱ्या दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचे ग्लास, बाटल्या यांचे ढीग यामुळे ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. या क्लेशदायक प्रकारांमुळे निसर्गप्रेमी पर्यटक या परिसरापासून दुरावत चालला आहे.
स्थानिक नागरिकही जबाबदार
गड-किल्ले, लेण्या आणि धार्मिक स्थळे आपली स्फूर्तिस्थळे आहेत. या वारशाचे पावित्र्य राखणे, संवर्धन करणे हे प्रशासनासह प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, प्रत्येक जण आपले कर्तव्य विसरत चालला आहे. वारशाची प्रेरणा घेण्याऐवजी विकृत संस्कृतीमुळे त्यांचे पावित्र्य धोक्यात आणले जात आहे. पर्यटन, विविध उपक्रमांच्या गोंडस नावाखाली ही स्थळे व्यसन करणाऱ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. अशा विकृतीला सरकान, पोलिस प्रशासन, भारतीय पुरातत्व विभागाइतकेच आणि स्थानिक नागरिकही जबाबदार आहेत. या विकृत संस्कृतीला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले पाहिजे. यामुळे विसापूर येथे नुकतीच पर्यटकांना झालेली मारहाण, तसेच लोणावळा-खंडाळ्यात यापूर्वी झालेल्या रेव्ह पार्ट्या, पर्यटन स्थळांवर रात्री-अपरात्री होणारा तरुणाईचा धांगडधिंगा, छुप्प्या आणि खुलेआम पार्ट्या, असे प्रकार घडणार नाहीत. स्थानिक व्यावसायिकांनीही पर्यटकांची गरज ओळखून त्यांना त्रास देण्याचे प्रकार टाळण्याची गरज आहे.