महेंद्र कानिटकर
....
दहशतवाद जसा मोठा प्रश्न मानला जातो, तितका अंमली पदार्थांची तस्करी हा महत्त्वाचा किंवा दाहक प्रश्न मानला जात नाही. अंमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने मरणाऱ्या माणसांची संख्या दहशतवाद्यांनी मारलेल्या माणसांपेक्षा जास्त आहे. उडता पंजाब थोडा अतिरंजित वाटला तरी समस्या दाहक आहे हे विसरून चालणार नाही. फक्त भयानकता दाखवून, वास्तव पाहायला लावला म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यावर मुळातून उपाय व्हायला हवेत.
...................
‘उडता पंजाब’ पाहून बाहेर पडलो, आणि डोळ्यासमोर जस्सी आला. जसवंत सिंग, जालंदरचा राहणारा. मुक्तांगणमध्ये आला, तेव्हा सबंध हातभार सुयांचे व्रण. जांघेत, काखेत, हातावर असे शक्य तिथे सुया खुपसलेल्या होत्या. ही गोष्ट आहे, १९९८मधली आहे. मग पाठोपाठ अनेक जण आले. दुसऱ्या एका केंद्रात मेघालय आसाम आणि मणिपूर इथले ड्रग्जचे व्यसनी पाहिले.
त्यांची अवस्था पाहून मी कमलीचा अस्वस्थ व्हायचो. त्यात ब्राउन शुगरचे व्यसनी भरती व्हायचे आणि त्यांची वियोग लक्षणे (विड्रॉवल सिम्टम्स) पाहून अंगावर काटा यायचा. काही जण ओरडायचे, ओकायचे. त्यांना बांधून ठेवायला लागायचे. त्यांच्यासोबत राहणारी मंडळी सुरुवातीला घाबरायचे. त्या वेळी सुनील सुखटणकर आणि सुमित्रा भावे यांनी ‘मुक्ती’ नावाचा लघुपट काढला होता. त्यातली दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. त्यात मुख्य भूमिका केलेला माझा मित्र बरा होऊन तिथेच काम करायचा. त्यातल्या कहाण्या अविश्वसनीय होत्या. ही मंडळी स्मशानात राहायची. माल आणायला कुर्ल्याला जायचे तर कधी धारावीत. पोलिसांनी या लोकांना पकडून मेंटल हॉस्पिटलला भरती केले होते. तिथे त्यांना वियोग लक्षणे दूर होण्यासाठी झोपेच्या गोळ्या देत. मग ते काही तरी गडबड घोटाळा करून झोपेच्या गोळ्या चोरायचे. कुणी दोघे खून केलेले होते. त्याने सहज सांगितले, की बाईच्या गळ्यातली साखळी ओढायला गेलो, तर खपलीच म्हातारी. पकडला गेलो. कोठडीत वियोग लक्षणे सुरू झाली, तेव्हा एका हवालदारानेच पुडी दिली.’ सारे ऐकून थक्क झालो.
याबद्दल खूप लिहिले गेले आहे. ‘मुक्तांगणची गोष्ट’ या पुस्तकात अनिल अवचट यांनी व्यसनातून बाहेर पडताना होणाऱ्या कष्टमय प्रवासाची कहाणी लिहिली आहे. तुषार नातूने तर व्यसनाधीन काळातले आत्मचरित्रच लिहिले आहे. पण लिहून प्रश्न सुटत नाहीत. महाराष्ट्रात अनिता अवचट, अनिल अवचट, फादर जो परेरा, डॉ. आनंद नाडकर्णी अशा दिग्गजांच्या पुढाकाराने गर्द, गांजा, चरस, अफू यांच्या व्यसनाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. पण नशा कमी झालेली नाही. व्यसनी माणूस नेहमीच पर्यायी पदार्थांच्या शोधात असतो. मग त्यांचा मोर्चा प्रिस्क्रिप्शन ड्रग्जकडे गेला. मध्यंतरी खोकल्याच्या औषधांचे व्यसन प्रचंड प्रमाणात बोकाळले होते. त्याने अभ्यास चांगला होतो हा भ्रम. मग त्याच्यावर बंदी आणली गेली, तर मनोविकारतज्ज्ञ देत असलेल्या औषधांच्या व्यसनाची लाट आली. माझा एक मित्र तर एका वेळी पाच पाच स्ट्रिप्स टपकवायचा. माजी पंतप्रधानांचा भाच्याचा अनुभव तर भयंकर आहे. थेट शहीद कपूरसारखा. तो एका रॉक बँडमध्ये काम करायचा. पंधरा दिवस ठीक राहिला. मग तेव्हाच्या सुरक्षाव्यवस्थेवर मत करून पळून गेला. त्याचा पाठलाग करण्यासाठी मी मोटारसायकलने त्याच्या मागे गेलो. अगदी चित्रपटात शोभावे असे पाठलागाचे दृश्य होते ते. त्याच्या मागे मागे मी पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो. पण सिनेमात दाखवतात तशी गाडी स्टेशनात थोडीच घुसवणार? पाच दिवसांनी तो घरी पोचल्याचे समजले. त्याचे कुटुंब मोठे होते. पण सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती.
पंजाब आणि पूर्वोत्तर राज्यात जे होते आहे, ते भयानक आहे. तिथे जंबिये, पिस्तुले सगळ्याचा सरसकट वापर होतो. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. गोव्यात मी एक वर्षभर काम केले. तिथेही अंमली पदार्थांचा वापर प्रचंड आहे. गोवा पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी विभाग जीवाचे रान करत आहे. पण प्रश्न आटोक्यात येत नाही. राजस्थान अफूने झिंगले आहे. दारूच्या व्यसनातून बाहेर पडलेल्यांची टक्केवारी खूपच कमी आहे आणि जे बरे होतात त्यातले बहुतेक काही काळाने पुन्हा केंद्रात दाखल होतात.
पंजाबमध्ये सुद्धा व्यसनमुक्तीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची मदतही घेण्यात आली आहे. पण प्रश्न अद्यापही कायम आहे. आता उडता पंजाब या सिनेमाकडे वळूया. चित्रपट म्हणून हा सिनेमा निर्मात्या दिग्दर्शकाने अतिरंजितपणे मांडला आहे. पण ही भयानकता दाखवून प्रश्न सुटणार आहे का? सिगारेटच्या पाकिटावर धूम्रपानाने कर्करोग होतो, असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते. पण त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी अनुदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा व्हायला हवा. माणसे व्यसनाकडे का वळतात, याची कित्येक कारणे सांगितली जातात. पण वास्तवापासून पळणे, आणि भ्रामक जगात वावरणे, हे एकच खरे कारण त्यामागे आहे. वास्तव इतके दाहक आहे की त्यापासून पळणे हा मार्ग अनेकांना सोपा वाटतो. काही जणांच्या मेंदूतच मुळात बिघाड असतो आणि म्हणून ते व्यसनाकडे जातात. पण दोन प्रश्न राहतात,
दहशतवाद जसा मोठा प्रश्न मानला जातो, तितका अंमली पदार्थांची तस्करी हा महत्त्वाचा किंवा दाहक प्रश्न मानला जात नाही. अंमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने मरणाऱ्या माणसांची संख्या दहशतवाद्यांनी मारलेल्या माणसांपेक्षा जास्त आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. किती किलो अंमली पदार्थ पकडले हा नियंत्रणाचा निकष असू शकतो का? बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार हे न संपणारे प्रश्न आहेत, आणि ते व्यसनांच्या प्रसाराला हातभार लावतात. या मुळांवर घाव घालायला हवा. घोषणा आणि वास्तव यातलं अंतर मिटवायला हवा. उडता पंजाब थोडा अतिरंजित वाटला तरी समस्या दाहक आहे हे विसरून चालणार नाही. फक्त भयानकता दाखवून, वास्तव पाहायला लावला म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यावर मुळातून उपाय व्हायला हवेत.
....
दहशतवाद जसा मोठा प्रश्न मानला जातो, तितका अंमली पदार्थांची तस्करी हा महत्त्वाचा किंवा दाहक प्रश्न मानला जात नाही. अंमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने मरणाऱ्या माणसांची संख्या दहशतवाद्यांनी मारलेल्या माणसांपेक्षा जास्त आहे. उडता पंजाब थोडा अतिरंजित वाटला तरी समस्या दाहक आहे हे विसरून चालणार नाही. फक्त भयानकता दाखवून, वास्तव पाहायला लावला म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यावर मुळातून उपाय व्हायला हवेत.
...................
‘उडता पंजाब’ पाहून बाहेर पडलो, आणि डोळ्यासमोर जस्सी आला. जसवंत सिंग, जालंदरचा राहणारा. मुक्तांगणमध्ये आला, तेव्हा सबंध हातभार सुयांचे व्रण. जांघेत, काखेत, हातावर असे शक्य तिथे सुया खुपसलेल्या होत्या. ही गोष्ट आहे, १९९८मधली आहे. मग पाठोपाठ अनेक जण आले. दुसऱ्या एका केंद्रात मेघालय आसाम आणि मणिपूर इथले ड्रग्जचे व्यसनी पाहिले.
त्यांची अवस्था पाहून मी कमलीचा अस्वस्थ व्हायचो. त्यात ब्राउन शुगरचे व्यसनी भरती व्हायचे आणि त्यांची वियोग लक्षणे (विड्रॉवल सिम्टम्स) पाहून अंगावर काटा यायचा. काही जण ओरडायचे, ओकायचे. त्यांना बांधून ठेवायला लागायचे. त्यांच्यासोबत राहणारी मंडळी सुरुवातीला घाबरायचे. त्या वेळी सुनील सुखटणकर आणि सुमित्रा भावे यांनी ‘मुक्ती’ नावाचा लघुपट काढला होता. त्यातली दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. त्यात मुख्य भूमिका केलेला माझा मित्र बरा होऊन तिथेच काम करायचा. त्यातल्या कहाण्या अविश्वसनीय होत्या. ही मंडळी स्मशानात राहायची. माल आणायला कुर्ल्याला जायचे तर कधी धारावीत. पोलिसांनी या लोकांना पकडून मेंटल हॉस्पिटलला भरती केले होते. तिथे त्यांना वियोग लक्षणे दूर होण्यासाठी झोपेच्या गोळ्या देत. मग ते काही तरी गडबड घोटाळा करून झोपेच्या गोळ्या चोरायचे. कुणी दोघे खून केलेले होते. त्याने सहज सांगितले, की बाईच्या गळ्यातली साखळी ओढायला गेलो, तर खपलीच म्हातारी. पकडला गेलो. कोठडीत वियोग लक्षणे सुरू झाली, तेव्हा एका हवालदारानेच पुडी दिली.’ सारे ऐकून थक्क झालो.
याबद्दल खूप लिहिले गेले आहे. ‘मुक्तांगणची गोष्ट’ या पुस्तकात अनिल अवचट यांनी व्यसनातून बाहेर पडताना होणाऱ्या कष्टमय प्रवासाची कहाणी लिहिली आहे. तुषार नातूने तर व्यसनाधीन काळातले आत्मचरित्रच लिहिले आहे. पण लिहून प्रश्न सुटत नाहीत. महाराष्ट्रात अनिता अवचट, अनिल अवचट, फादर जो परेरा, डॉ. आनंद नाडकर्णी अशा दिग्गजांच्या पुढाकाराने गर्द, गांजा, चरस, अफू यांच्या व्यसनाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. पण नशा कमी झालेली नाही. व्यसनी माणूस नेहमीच पर्यायी पदार्थांच्या शोधात असतो. मग त्यांचा मोर्चा प्रिस्क्रिप्शन ड्रग्जकडे गेला. मध्यंतरी खोकल्याच्या औषधांचे व्यसन प्रचंड प्रमाणात बोकाळले होते. त्याने अभ्यास चांगला होतो हा भ्रम. मग त्याच्यावर बंदी आणली गेली, तर मनोविकारतज्ज्ञ देत असलेल्या औषधांच्या व्यसनाची लाट आली. माझा एक मित्र तर एका वेळी पाच पाच स्ट्रिप्स टपकवायचा. माजी पंतप्रधानांचा भाच्याचा अनुभव तर भयंकर आहे. थेट शहीद कपूरसारखा. तो एका रॉक बँडमध्ये काम करायचा. पंधरा दिवस ठीक राहिला. मग तेव्हाच्या सुरक्षाव्यवस्थेवर मत करून पळून गेला. त्याचा पाठलाग करण्यासाठी मी मोटारसायकलने त्याच्या मागे गेलो. अगदी चित्रपटात शोभावे असे पाठलागाचे दृश्य होते ते. त्याच्या मागे मागे मी पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो. पण सिनेमात दाखवतात तशी गाडी स्टेशनात थोडीच घुसवणार? पाच दिवसांनी तो घरी पोचल्याचे समजले. त्याचे कुटुंब मोठे होते. पण सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती.
पंजाब आणि पूर्वोत्तर राज्यात जे होते आहे, ते भयानक आहे. तिथे जंबिये, पिस्तुले सगळ्याचा सरसकट वापर होतो. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. गोव्यात मी एक वर्षभर काम केले. तिथेही अंमली पदार्थांचा वापर प्रचंड आहे. गोवा पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी विभाग जीवाचे रान करत आहे. पण प्रश्न आटोक्यात येत नाही. राजस्थान अफूने झिंगले आहे. दारूच्या व्यसनातून बाहेर पडलेल्यांची टक्केवारी खूपच कमी आहे आणि जे बरे होतात त्यातले बहुतेक काही काळाने पुन्हा केंद्रात दाखल होतात.
पंजाबमध्ये सुद्धा व्यसनमुक्तीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची मदतही घेण्यात आली आहे. पण प्रश्न अद्यापही कायम आहे. आता उडता पंजाब या सिनेमाकडे वळूया. चित्रपट म्हणून हा सिनेमा निर्मात्या दिग्दर्शकाने अतिरंजितपणे मांडला आहे. पण ही भयानकता दाखवून प्रश्न सुटणार आहे का? सिगारेटच्या पाकिटावर धूम्रपानाने कर्करोग होतो, असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते. पण त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी अनुदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा व्हायला हवा. माणसे व्यसनाकडे का वळतात, याची कित्येक कारणे सांगितली जातात. पण वास्तवापासून पळणे, आणि भ्रामक जगात वावरणे, हे एकच खरे कारण त्यामागे आहे. वास्तव इतके दाहक आहे की त्यापासून पळणे हा मार्ग अनेकांना सोपा वाटतो. काही जणांच्या मेंदूतच मुळात बिघाड असतो आणि म्हणून ते व्यसनाकडे जातात. पण दोन प्रश्न राहतात,
दहशतवाद जसा मोठा प्रश्न मानला जातो, तितका अंमली पदार्थांची तस्करी हा महत्त्वाचा किंवा दाहक प्रश्न मानला जात नाही. अंमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने मरणाऱ्या माणसांची संख्या दहशतवाद्यांनी मारलेल्या माणसांपेक्षा जास्त आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. किती किलो अंमली पदार्थ पकडले हा नियंत्रणाचा निकष असू शकतो का? बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार हे न संपणारे प्रश्न आहेत, आणि ते व्यसनांच्या प्रसाराला हातभार लावतात. या मुळांवर घाव घालायला हवा. घोषणा आणि वास्तव यातलं अंतर मिटवायला हवा. उडता पंजाब थोडा अतिरंजित वाटला तरी समस्या दाहक आहे हे विसरून चालणार नाही. फक्त भयानकता दाखवून, वास्तव पाहायला लावला म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यावर मुळातून उपाय व्हायला हवेत.