न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री
प्रथम आनंदाचं अस्तित्व असतं का? का तो मानावा लागतो, वा मानण्यात असतो, हे कळणं सामान्यांसाठी कठीणच आहे. तसा आनंद हा शब्द खूप फसवा आहे. 'आनंद' या शब्दात अनेक जण अडकत असतात. अडकलेलेच आनंदावर बोलतात. आनंदाला मान देतात. 'आनंद' शब्द हा भाग्यवान आहे. सर्व धर्मांत, सर्व स्तरांवर याला मान आहे. काही धर्म स्वर्गात आनंद मानतात, तर स्वर्गासाठी उपलब्ध जन्माला मानतच नाहीत. त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यालाही ते दु:खी करतात. दु:खाचं ज्ञान करून देतात. समाधानी जगणाऱ्याला असमाधानाचं वितरण करतात. चेहरा कायम दु:खी असतो. त्यांचे शिष्य त्यांना वैराग्यवान मानतात. परम अर्थ ज्याच्याकडे आहे, त्यांनी दु:खी असावं, हे बुद्धिमानांना पटत नाही. याउलट त्यांच्याकडे पाहून काही जण अध्यात्माचा विचार करणं सोडून देतात. आनंद सर्वांना पाहिजे; पण असा दु:खी दिसणारा जो स्वत:ला आनंदी समजतो, तसा नको आहे. आनंद देणारा किमान स्वत: आनंदी असला पाहिजे. चित्रपटात जो नट चांगला दिसतो, लोक त्याचं अनुकरण करतात. तो जसा चित्रपटात असतो, तसा वास्तवात नसतो, हे सर्वांना माहीत आहे; तरीदेखील लोक त्याला मानतात. दिसणं आणि दाखवणं ही सामान्यांची विशेषता असते.
संत आनंदी असल्यामुळे त्यांची वाणी प्रसादयुक्त असते. हृदयातील शब्द हृदयाला आनंद देतात. संतांची वाणी विचारयुक्त असतेच; परंतु केवळ तेवढीच असते असं नाही. जगात विचारवंतांची काही कमतरता नाही. त्यांच्या विचारांचा विचार आपण करूच शकत नाही, एवढे विचारवंत आहेत. मुळात विचार कसा करावा, याच्यावर आपण विचार करत नाही. व्यायामाला जशी शिस्त असते, तशी विचारालाही असते, याचा आपण विचार करतच नाही. फक्त आवडलं म्हणून बोललो, एवढंच. विचार करायला शिकवतात, तेच संत असतात. विचार करता करता अर्थ कळतो. मग रस येतो. माऊली रसातून परतत्त्वाचा स्पर्श देतात. हा शुद्ध आनंद आहे. फसवा नाही. फसवत नाही. आपण रसापर्यंतच थांबायला नको. रसात परतत्त्व आहे, याची जाणीव असायला हवी. परतत्त्वस्पर्शासाठी तरल संवेदना हव्यात. संवेदना हृदयात असतात, जिथे आपली प्रसन्नता विराजमान असते. आपण इंद्रियांना, मनाला प्रसन्न करणाऱ्या मनोरंजनात रमतो. विषयाशिवाय जो आनंद असतो, त्याला आनंदघन म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या अक्षरांत आनंदघन विराजमान आहे. त्याचा स्वाद हा इंद्रिये आणि मनाशिवाय घ्यावा लागतो. इंद्रियाधीन असणाऱ्यांना कळणं कठीण आहे.
प्रथम आनंदाचं अस्तित्व असतं का? का तो मानावा लागतो, वा मानण्यात असतो, हे कळणं सामान्यांसाठी कठीणच आहे. तसा आनंद हा शब्द खूप फसवा आहे. 'आनंद' या शब्दात अनेक जण अडकत असतात. अडकलेलेच आनंदावर बोलतात. आनंदाला मान देतात. 'आनंद' शब्द हा भाग्यवान आहे. सर्व धर्मांत, सर्व स्तरांवर याला मान आहे. काही धर्म स्वर्गात आनंद मानतात, तर स्वर्गासाठी उपलब्ध जन्माला मानतच नाहीत. त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यालाही ते दु:खी करतात. दु:खाचं ज्ञान करून देतात. समाधानी जगणाऱ्याला असमाधानाचं वितरण करतात. चेहरा कायम दु:खी असतो. त्यांचे शिष्य त्यांना वैराग्यवान मानतात. परम अर्थ ज्याच्याकडे आहे, त्यांनी दु:खी असावं, हे बुद्धिमानांना पटत नाही. याउलट त्यांच्याकडे पाहून काही जण अध्यात्माचा विचार करणं सोडून देतात. आनंद सर्वांना पाहिजे; पण असा दु:खी दिसणारा जो स्वत:ला आनंदी समजतो, तसा नको आहे. आनंद देणारा किमान स्वत: आनंदी असला पाहिजे. चित्रपटात जो नट चांगला दिसतो, लोक त्याचं अनुकरण करतात. तो जसा चित्रपटात असतो, तसा वास्तवात नसतो, हे सर्वांना माहीत आहे; तरीदेखील लोक त्याला मानतात. दिसणं आणि दाखवणं ही सामान्यांची विशेषता असते.
संत आनंदी असल्यामुळे त्यांची वाणी प्रसादयुक्त असते. हृदयातील शब्द हृदयाला आनंद देतात. संतांची वाणी विचारयुक्त असतेच; परंतु केवळ तेवढीच असते असं नाही. जगात विचारवंतांची काही कमतरता नाही. त्यांच्या विचारांचा विचार आपण करूच शकत नाही, एवढे विचारवंत आहेत. मुळात विचार कसा करावा, याच्यावर आपण विचार करत नाही. व्यायामाला जशी शिस्त असते, तशी विचारालाही असते, याचा आपण विचार करतच नाही. फक्त आवडलं म्हणून बोललो, एवढंच. विचार करायला शिकवतात, तेच संत असतात. विचार करता करता अर्थ कळतो. मग रस येतो. माऊली रसातून परतत्त्वाचा स्पर्श देतात. हा शुद्ध आनंद आहे. फसवा नाही. फसवत नाही. आपण रसापर्यंतच थांबायला नको. रसात परतत्त्व आहे, याची जाणीव असायला हवी. परतत्त्वस्पर्शासाठी तरल संवेदना हव्यात. संवेदना हृदयात असतात, जिथे आपली प्रसन्नता विराजमान असते. आपण इंद्रियांना, मनाला प्रसन्न करणाऱ्या मनोरंजनात रमतो. विषयाशिवाय जो आनंद असतो, त्याला आनंदघन म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या अक्षरांत आनंदघन विराजमान आहे. त्याचा स्वाद हा इंद्रिये आणि मनाशिवाय घ्यावा लागतो. इंद्रियाधीन असणाऱ्यांना कळणं कठीण आहे.