स्वामी मकरंदनाथ
आजच्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर, शांत राहण्यासाठी ध्यानाची अत्यंत आवश्यकता आहे. ध्यान ही अवघड गोष्ट नाही; तशी सोपीही नाही. कधी कधी ध्यान चांगले लागते, तर कधी विचारांमध्ये मन गुंतून गेल्यास अजिबात लागतही नाही. अभ्यासाने मात्र ध्यान जमू लागते.
ध्यान चांगले लागणे, म्हणजे विचार कमी येणे किंवा आले, तरी त्यांच्याकडे साक्षित्वाने पाहिल्यामुळे, त्यांबरोबर वाहवत न जाणे. ध्यानाला बसल्यानंतर विचार कमी होतात, निस्तरंगता प्राप्त होते. कधी कधी मात्र काही केल्या विचार थांबतच नाहीत. एका पाठोपाठ एक विचारांची मालिकाच चालू राहते. ध्यान करणारे आपण, म्हणजेच ध्याता, विचारांच्या बरोबर फिरत राहतो.
ध्यान उत्तम साधण्यासाठी आपल्या चित्तात प्रथम ध्यान करण्यास अनुकूल भाव निर्माण व्हायला हवा. मनापासून परमेश्वराची, सद्गुरूंची, पूर्वसुरींची स्मरणपूर्वक प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये चित्त एकाग्र करावे. सद्गुरू माझ्याबरोबर आहेत, ते मला आशीर्वाद देत आहेत, असा भाव ठेवावा. मध्यमेतून सोऽहं भावाने काही दीर्घ श्वास घ्यावेत. प्रत्यक्ष ध्यान करताना कोणत्याही विचारांचा पाठलाग न करणे, हे अगदी सावधानतेने सांभाळावे, म्हणजे ध्यान उत्तम होण्यासाठी त्याची मदत होते. एवढे केले, तरी मनाचेही एक अजब तंत्र आहे. कधी ध्यान चांगले होईल, तर कधी होणार नाही. स्वामी माधवनाथ म्हणत, 'एखादा दगड शंभराव्या घावाला फुटला, तरी आधीचे नव्याण्णव घाव वाया गेले असे नसून, या नव्याण्णव घावांच्या प्रयत्नांमुळेच तो दगड शंभराव्या घावाला फुटतो.' तसेच ध्यान साधण्याबाबत आहे.
सातत्य आणि पुरेसा वेळ दिल्यास रोजचे ध्यान उत्तम होते. ध्यानातून उठताना पुन्हा एकदा मन एकत्र करून, एक-दोन सोऽहंचे दीर्घ श्वास घेऊन, 'मी तोच आहे' अशा प्रसन्न, शांत भावाने उठावे. प्रसन्न मनाने ध्यानाला बसावे आणि प्रसन्नतेनेच ध्यानातून उठावे. ध्यान अवघड आहे, मला ते जमणार नाही, अशी पराभूत मनोवृत्तीही नको. आपण परमात्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत आहोत, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, म्हणून ध्यानाला बसताना आणि ध्यानातून उठताना सद्गुरूंची आपल्यावर पूर्ण कृपा आहे, असाच भाव ठेवावा. या भावासहित निश्चयपूर्वक, नित्यनेमाने ध्यानाचा अभ्यास करावा; त्यामुळे थोड्या वेळातही ध्यानात रंगून जाण्याचा अनुभव साधकाला आल्याखेरीज राहणार नाही.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर, शांत राहण्यासाठी ध्यानाची अत्यंत आवश्यकता आहे. ध्यान ही अवघड गोष्ट नाही; तशी सोपीही नाही. कधी कधी ध्यान चांगले लागते, तर कधी विचारांमध्ये मन गुंतून गेल्यास अजिबात लागतही नाही. अभ्यासाने मात्र ध्यान जमू लागते.
ध्यान चांगले लागणे, म्हणजे विचार कमी येणे किंवा आले, तरी त्यांच्याकडे साक्षित्वाने पाहिल्यामुळे, त्यांबरोबर वाहवत न जाणे. ध्यानाला बसल्यानंतर विचार कमी होतात, निस्तरंगता प्राप्त होते. कधी कधी मात्र काही केल्या विचार थांबतच नाहीत. एका पाठोपाठ एक विचारांची मालिकाच चालू राहते. ध्यान करणारे आपण, म्हणजेच ध्याता, विचारांच्या बरोबर फिरत राहतो.
ध्यान उत्तम साधण्यासाठी आपल्या चित्तात प्रथम ध्यान करण्यास अनुकूल भाव निर्माण व्हायला हवा. मनापासून परमेश्वराची, सद्गुरूंची, पूर्वसुरींची स्मरणपूर्वक प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये चित्त एकाग्र करावे. सद्गुरू माझ्याबरोबर आहेत, ते मला आशीर्वाद देत आहेत, असा भाव ठेवावा. मध्यमेतून सोऽहं भावाने काही दीर्घ श्वास घ्यावेत. प्रत्यक्ष ध्यान करताना कोणत्याही विचारांचा पाठलाग न करणे, हे अगदी सावधानतेने सांभाळावे, म्हणजे ध्यान उत्तम होण्यासाठी त्याची मदत होते. एवढे केले, तरी मनाचेही एक अजब तंत्र आहे. कधी ध्यान चांगले होईल, तर कधी होणार नाही. स्वामी माधवनाथ म्हणत, 'एखादा दगड शंभराव्या घावाला फुटला, तरी आधीचे नव्याण्णव घाव वाया गेले असे नसून, या नव्याण्णव घावांच्या प्रयत्नांमुळेच तो दगड शंभराव्या घावाला फुटतो.' तसेच ध्यान साधण्याबाबत आहे.
सातत्य आणि पुरेसा वेळ दिल्यास रोजचे ध्यान उत्तम होते. ध्यानातून उठताना पुन्हा एकदा मन एकत्र करून, एक-दोन सोऽहंचे दीर्घ श्वास घेऊन, 'मी तोच आहे' अशा प्रसन्न, शांत भावाने उठावे. प्रसन्न मनाने ध्यानाला बसावे आणि प्रसन्नतेनेच ध्यानातून उठावे. ध्यान अवघड आहे, मला ते जमणार नाही, अशी पराभूत मनोवृत्तीही नको. आपण परमात्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत आहोत, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, म्हणून ध्यानाला बसताना आणि ध्यानातून उठताना सद्गुरूंची आपल्यावर पूर्ण कृपा आहे, असाच भाव ठेवावा. या भावासहित निश्चयपूर्वक, नित्यनेमाने ध्यानाचा अभ्यास करावा; त्यामुळे थोड्या वेळातही ध्यानात रंगून जाण्याचा अनुभव साधकाला आल्याखेरीज राहणार नाही.