प्रसादमहाराज अंमळनेरकर
नेणो ब्रह्म मार्ग चुकले। उघडे पंढरपुरासी आले।
भक्त पुंडलिके देखिले। उभे ठेले विटेवरी।।
श्रीकृष्णावताराची समाप्ती करण्यासाठी प्रवृत्त झालेले भगवान आपल्या अवतारकार्याचे पुनरावलोकन करीत, नकळत पुंडलिकरायांकडे आकर्षित झाले. वैकुंठीचा मार्ग विसरलेत आणि आपला अवतारसमाप्तीचा नियतमार्ग व उद्देश बदलून अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, सर्वांसाठी हा परमात्मा श्रीविठ्ठल रूपाने प्रकट व सहज सेव्य झाला. दीन-दुःखी जीवांच्या कळवळ्यामुळेच भगवंताची जीवमात्रांविषयी असणारी ही प्रेमस्वरूप अहैतुकी कृपाच अनाकलनीय आहे. हा या श्रीहरिचा अंर्तस्वभाव आहे.
एवढे प्रेम प्रभू जीवमात्रावर अकारण का करतो? हे अद्याप वेद-श्रुती-पुराण यांनाही कळले नाही; परंतु ते मात्र भक्त पुंडलिकांसाठी साकार झाले. तसा हा श्रीहरि
'रूप पाहता डोळसु। सुंदर पाहता गोपवेशु।' असा आहे. ही बाळमूर्ती भोळी आहे; तसेच भोळ्या भाविकांवर प्रीती करणारी आहे. सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथांना त्यांचे श्रीगुरू गहिनीनाथांनी लोककल्याण विचाराने प्रवृत्ति देऊन, स्त्री-शूद्रादिकांनाही आत्मोद्धाराचा व भक्ती उपासनेचा अधिकार गीता-भागवताने वर्णन केल्यानुसार प्रदान व प्रकट करावा यासाठी, श्रीज्ञानदेवांकरवी श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करवून, भावार्थदीपिकेच्या रूपाने भागवतधर्म मंदिराची सुसंपन्न व सुघटित पायाभरणी करविली. तसे पाहता 'नाथसंप्रदाय' हा 'अलक्ष' निरंजन स्वरूपाचे ध्यान-उपासना करणारा निर्गुणोपासक संप्रदाय!
पांडवांच्या स्वर्गारोहणानंतर कलियुगारंभ झाला. श्रीमद्भागवत ग्रंथांच्या आधारे राजा परीक्षितापासून अदमासे तीनशे वर्षांचा इतिहास सांगता येतो. पुढे एक हजार वर्षे हा इतिहास संदिग्ध व अज्ञातच आहे. केवळ नैमिषारण्यात हजार वर्षांपर्यंत चालणाऱ्या ८८००० ऋषींनी संकल्पित यज्ञाच्या अनुष्ठानाचे वर्णन करीत सुत-शौनकांच्या संवादाने पुराण प्रस्तावना केलेली आढळते.
सुमारे चार हजार वर्षांपूर्वी समाजात वैदिक कर्मांचा होणारा स्वार्थमूलक व हिंसास्वरूप असा सकाम कर्माचरणांचा अवलंब, भोगवादी-चंगळवादी प्रवृत्तीचे आणि वर्ग-वर्णभेदांचे परिणाम पाहून, नास्तिक दर्शनशास्त्र विचारांचे प्रवर्तक चार्वाक, भगवान बुद्ध व त्यानंतर भगवान महावीर अर्थात जैनमताचा प्रभाव वाढीस लागला. याच परिवर्तन काळात निर्गुण-निराकाराच्या चिंतन-उपासनेचा आग्रह व सगुण-साकार विग्रहपूजेचा तसेच कर्मकांडाचा तिरस्कार यातूनच श्रीगुरू मत्स्येंद्रनाथांच्या माध्यमातून काश्मीर प्रांतातून नाथसंप्रदायाचा उद्गम होऊन, पुढे भारतभर त्याचा प्रसार-प्रचार व विकास झाला. पुढे श्रीमत्स्येंद्र (मीननाथ) श्रीगोरक्षनाथ-श्रीगहिनीनाथ-श्रीनिवृत्तीनाथ-श्रीज्ञानोबाराय अशी सगुण-निर्गुण उभयभक्ती साधन समन्वय करणारी परंपरा कराल कलिकाळाच्या विचारातून पुढे आली.
'ना आदिगुरू शंकरा। पासोनि हे शिष्यपरंपरा। बोधाचा जाहला। संसरू आमुते।।' असे वर्णन करित, 'तेणे कळिकाळितु भूतां। आला देखोनि निरूता। ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा। दिधली ऐसी।।' हे कारण दिक्षा परंपरेचे श्री ज्ञानदेवांनी सांगितले. श्रीनिवृत्तिनाथही याच अनुषंगाने सांगतात,
'निवृत्तिचे गुज विठ्ठल सहज।
गहिनीराये मज सांगितले।।'
नेणो ब्रह्म मार्ग चुकले। उघडे पंढरपुरासी आले।
भक्त पुंडलिके देखिले। उभे ठेले विटेवरी।।
श्रीकृष्णावताराची समाप्ती करण्यासाठी प्रवृत्त झालेले भगवान आपल्या अवतारकार्याचे पुनरावलोकन करीत, नकळत पुंडलिकरायांकडे आकर्षित झाले. वैकुंठीचा मार्ग विसरलेत आणि आपला अवतारसमाप्तीचा नियतमार्ग व उद्देश बदलून अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, सर्वांसाठी हा परमात्मा श्रीविठ्ठल रूपाने प्रकट व सहज सेव्य झाला. दीन-दुःखी जीवांच्या कळवळ्यामुळेच भगवंताची जीवमात्रांविषयी असणारी ही प्रेमस्वरूप अहैतुकी कृपाच अनाकलनीय आहे. हा या श्रीहरिचा अंर्तस्वभाव आहे.
एवढे प्रेम प्रभू जीवमात्रावर अकारण का करतो? हे अद्याप वेद-श्रुती-पुराण यांनाही कळले नाही; परंतु ते मात्र भक्त पुंडलिकांसाठी साकार झाले. तसा हा श्रीहरि
'रूप पाहता डोळसु। सुंदर पाहता गोपवेशु।' असा आहे. ही बाळमूर्ती भोळी आहे; तसेच भोळ्या भाविकांवर प्रीती करणारी आहे. सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथांना त्यांचे श्रीगुरू गहिनीनाथांनी लोककल्याण विचाराने प्रवृत्ति देऊन, स्त्री-शूद्रादिकांनाही आत्मोद्धाराचा व भक्ती उपासनेचा अधिकार गीता-भागवताने वर्णन केल्यानुसार प्रदान व प्रकट करावा यासाठी, श्रीज्ञानदेवांकरवी श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करवून, भावार्थदीपिकेच्या रूपाने भागवतधर्म मंदिराची सुसंपन्न व सुघटित पायाभरणी करविली. तसे पाहता 'नाथसंप्रदाय' हा 'अलक्ष' निरंजन स्वरूपाचे ध्यान-उपासना करणारा निर्गुणोपासक संप्रदाय!
पांडवांच्या स्वर्गारोहणानंतर कलियुगारंभ झाला. श्रीमद्भागवत ग्रंथांच्या आधारे राजा परीक्षितापासून अदमासे तीनशे वर्षांचा इतिहास सांगता येतो. पुढे एक हजार वर्षे हा इतिहास संदिग्ध व अज्ञातच आहे. केवळ नैमिषारण्यात हजार वर्षांपर्यंत चालणाऱ्या ८८००० ऋषींनी संकल्पित यज्ञाच्या अनुष्ठानाचे वर्णन करीत सुत-शौनकांच्या संवादाने पुराण प्रस्तावना केलेली आढळते.
सुमारे चार हजार वर्षांपूर्वी समाजात वैदिक कर्मांचा होणारा स्वार्थमूलक व हिंसास्वरूप असा सकाम कर्माचरणांचा अवलंब, भोगवादी-चंगळवादी प्रवृत्तीचे आणि वर्ग-वर्णभेदांचे परिणाम पाहून, नास्तिक दर्शनशास्त्र विचारांचे प्रवर्तक चार्वाक, भगवान बुद्ध व त्यानंतर भगवान महावीर अर्थात जैनमताचा प्रभाव वाढीस लागला. याच परिवर्तन काळात निर्गुण-निराकाराच्या चिंतन-उपासनेचा आग्रह व सगुण-साकार विग्रहपूजेचा तसेच कर्मकांडाचा तिरस्कार यातूनच श्रीगुरू मत्स्येंद्रनाथांच्या माध्यमातून काश्मीर प्रांतातून नाथसंप्रदायाचा उद्गम होऊन, पुढे भारतभर त्याचा प्रसार-प्रचार व विकास झाला. पुढे श्रीमत्स्येंद्र (मीननाथ) श्रीगोरक्षनाथ-श्रीगहिनीनाथ-श्रीनिवृत्तीनाथ-श्रीज्ञानोबाराय अशी सगुण-निर्गुण उभयभक्ती साधन समन्वय करणारी परंपरा कराल कलिकाळाच्या विचारातून पुढे आली.
'ना आदिगुरू शंकरा। पासोनि हे शिष्यपरंपरा। बोधाचा जाहला। संसरू आमुते।।' असे वर्णन करित, 'तेणे कळिकाळितु भूतां। आला देखोनि निरूता। ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा। दिधली ऐसी।।' हे कारण दिक्षा परंपरेचे श्री ज्ञानदेवांनी सांगितले. श्रीनिवृत्तिनाथही याच अनुषंगाने सांगतात,
'निवृत्तिचे गुज विठ्ठल सहज।
गहिनीराये मज सांगितले।।'