अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी
समाजात कुणावर तरी निष्ठा ठेवावीच लागते. सुख आणि समाधानाने जगताना नैतिकता हवी. त्यासाठी प्रेरणादायी आदर्शांची गरज असते. म्हणून तर आपण व्यक्ती, नाते, देश, धर्म, प्रांत, तत्त्व, सदाचार, शिष्टाचार, स्वविचार, इतरांचे विचार, कर्म आणि कधी कधी संपत्तीवरही निष्ठा ठेवून मार्गक्रमण करतो. अशा प्रवासात संशय नष्ट होतात, तेव्हा विश्वास दृढ होतो. त्यातूनच निष्ठेचा जन्म होतो. जी श्रद्धा असते, तो अंधविश्वास नक्कीच नसतो. अतूट श्रद्धा व प्रेम हीच निष्ठा. ती बदलली, तर व्यभिचार होतो. एकदा नोकर एक फळ आणतो. नेहमीप्रमाणे मालक त्याला एक घास देतो; पण तो पुन्हा पुन्हा फळ मागून खातो. पूर्ण फळ संपते. पूर्वी असे कधी झालेले नसते. मालक विचारतो, 'आज संपूर्ण फळ कसे खाल्लेस?' त्यावर तो म्हणतो, 'ते फळ अतिशय कडू होते. तुम्ही ते खाऊ नये, म्हणून मी संपवले.' याला म्हणतात निष्ठा. अनेकांची श्रद्धा किंवा निष्ठा नात्यावर असते. आर्थिक, सामाजिक, वैचारिक परिवर्तनामुळे येणाऱ्या अस्थिरतेला येथे वाव नसतो.
संपत्तीवर निष्ठा असलेल्यांचा इतरांवर कधी विश्वास नसतो; कारण संपत्तीशिवाय ते जगू शकत नाहीत. आपल्याला संपत्तीच वाचवेल, असे त्याला सतत वाटते. मान, सन्मान, आदर, सुख हे सारे पैशांतच आहे, असे समजून त्यासाठीच त्याची धडपड सुरू असते; परंतु संपत्ती ही चंचल आहे, हे तो कधी जाणत नाही. त्याला शाश्वत समजून तो वागत असतो. ज्या दिवशी संपत्ती हातातून निसटते, तेव्हाच ती निरूपयोगी ठरते. त्या दिवशी हा माणूस खचून जातो. स्वत:ला जगण्यास अपात्र समजतो. म्हणून संपत्तीवर अति प्रेम योग्य की अयोग्य, हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे.
निष्ठावान म्हणायचे कुणाला? देव, देश, धर्म आणि आपण ज्या संस्कृतीत जन्मलो, त्याच्यावर असलेले प्रेम कोणत्याही कारणाने बदलत नाही. भीती किंवा आमिषाला बळी न पडता, आपल्या देवाचा आणि देशाचा अपमान होणार नाही, असे वागणे ही निष्ठा. ती परावलंबी बनवते, असे कुणाला वाटत नाही; परंतु ज्या गोष्टीचा अनुभव, ज्ञान, माझ्याकडे नाही, तो ज्याच्याकडे आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून ते मिळवणे हे कर्तव्य आहे. निष्ठा ही मेहरबानी, उपकार नाही, तर ती फलप्राप्तीसाठी उत्तम उपाय आहे.
समाजात कुणावर तरी निष्ठा ठेवावीच लागते. सुख आणि समाधानाने जगताना नैतिकता हवी. त्यासाठी प्रेरणादायी आदर्शांची गरज असते. म्हणून तर आपण व्यक्ती, नाते, देश, धर्म, प्रांत, तत्त्व, सदाचार, शिष्टाचार, स्वविचार, इतरांचे विचार, कर्म आणि कधी कधी संपत्तीवरही निष्ठा ठेवून मार्गक्रमण करतो. अशा प्रवासात संशय नष्ट होतात, तेव्हा विश्वास दृढ होतो. त्यातूनच निष्ठेचा जन्म होतो. जी श्रद्धा असते, तो अंधविश्वास नक्कीच नसतो. अतूट श्रद्धा व प्रेम हीच निष्ठा. ती बदलली, तर व्यभिचार होतो. एकदा नोकर एक फळ आणतो. नेहमीप्रमाणे मालक त्याला एक घास देतो; पण तो पुन्हा पुन्हा फळ मागून खातो. पूर्ण फळ संपते. पूर्वी असे कधी झालेले नसते. मालक विचारतो, 'आज संपूर्ण फळ कसे खाल्लेस?' त्यावर तो म्हणतो, 'ते फळ अतिशय कडू होते. तुम्ही ते खाऊ नये, म्हणून मी संपवले.' याला म्हणतात निष्ठा. अनेकांची श्रद्धा किंवा निष्ठा नात्यावर असते. आर्थिक, सामाजिक, वैचारिक परिवर्तनामुळे येणाऱ्या अस्थिरतेला येथे वाव नसतो.
संपत्तीवर निष्ठा असलेल्यांचा इतरांवर कधी विश्वास नसतो; कारण संपत्तीशिवाय ते जगू शकत नाहीत. आपल्याला संपत्तीच वाचवेल, असे त्याला सतत वाटते. मान, सन्मान, आदर, सुख हे सारे पैशांतच आहे, असे समजून त्यासाठीच त्याची धडपड सुरू असते; परंतु संपत्ती ही चंचल आहे, हे तो कधी जाणत नाही. त्याला शाश्वत समजून तो वागत असतो. ज्या दिवशी संपत्ती हातातून निसटते, तेव्हाच ती निरूपयोगी ठरते. त्या दिवशी हा माणूस खचून जातो. स्वत:ला जगण्यास अपात्र समजतो. म्हणून संपत्तीवर अति प्रेम योग्य की अयोग्य, हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे.
निष्ठावान म्हणायचे कुणाला? देव, देश, धर्म आणि आपण ज्या संस्कृतीत जन्मलो, त्याच्यावर असलेले प्रेम कोणत्याही कारणाने बदलत नाही. भीती किंवा आमिषाला बळी न पडता, आपल्या देवाचा आणि देशाचा अपमान होणार नाही, असे वागणे ही निष्ठा. ती परावलंबी बनवते, असे कुणाला वाटत नाही; परंतु ज्या गोष्टीचा अनुभव, ज्ञान, माझ्याकडे नाही, तो ज्याच्याकडे आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून ते मिळवणे हे कर्तव्य आहे. निष्ठा ही मेहरबानी, उपकार नाही, तर ती फलप्राप्तीसाठी उत्तम उपाय आहे.