देवकी पंडित
गायन प्रस्तुत करताना अनेक अवधानं सांभाळावी लागतात. सर्व वाद्यांचे स्वर एकजीव होणं, आपल्याला त्यातून सूर गवसणं, काय गायचं आहे आणि त्या गाण्याचा भाव कोणता आहे, या सगळ्याचं भान ठेवूनच गायन श्रोत्यांपर्यंत पोहोचवावं लागतं. या सगळ्या अवधानांमध्ये १९५०च्या दशकापासून एक नवं अवधान जोडलं गेलं आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान किंवा साऊंड सिस्टीम.
आपल्या संगीतामध्ये या साऊंड सिस्टीमचा वापर होऊ लागल्यापासून खूप मोठं परिवर्तन घडलं. त्यामुळे गाण्यामध्ये आनुषंगिक बदल झाले. मायक्रोफोनच्या काळापूर्वीचे गायक खड्या आवाजात गात असत. याचं कारण गवयाने गायलेला प्रत्येक सूर हा प्रेक्षागारात बसलेल्या शेवटच्या रांगेतल्या रसिक श्रोत्यापर्यंत पोहोचावा, हा त्यामागे उद्देश असे. त्यामुळे गाणंही ठसठशीत होत असे. आवाजाची ठेवण, आवाजाचा जो लगाव होता तो सर्वस्वी निराळ्या प्रकारचा होता.
मायक्रोफोन आल्यानंतर हळूहळू बदल घडायला लागला असं आपल्याला दिसून येतं. नाट्यसृष्टीत रंगमंचावर मायक्रोफोन एकच असायचा आणि गायक त्यासमोर, मध्यभागी येऊन गात असत. इतर वाद्यवृंद मायक्रोफोनपासून त्या मानाने लांब असायचा. तसंच रेडिओ किंवा ध्वनिफित यांच्यासाठी स्टुडियो रेकॉर्डिंग करत असतानाही एकच माईक वापरत असत. उदाहरणार्थ, जेव्हा युगुल गीताचं रेकॉर्डिंग असे, ते एका बाजूला स्त्री गायक तर दुसऱ्या बाजूला पुरुष गायक गात असे. अशा पद्धतीनं, लाइव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. लाइव्ह रेकॉर्डिंगमुळे वाद्यवृंदाचा एकजीव होऊन आलेला स्वर, त्यात गायकाचा मिसळलेला स्वर एक वेगळा जिवंत अनुभव देत असे. या तंत्राचं भान ठेवून गायकाची आवाज लावण्याची पद्धत बदलत गेली. तसंच संगीतकारही गायकाच्या आवाजाची जातकुळी ओळखून त्यादृष्टीने संगीत तयार करू लागले. उदाहारणार्थ, गायकाची स्वरपट्टी, त्याची गाण्याची लकब आणि गुण ओळखून संगीतरचना केली जाऊ लागली. भावगीताच्या प्रस्तुतीकरणामध्येही यामुळे फरक पडत गेला.
तंत्रज्ञान आधुनिक होत गेलं तसतशी रेकॉर्डिंगची पद्धतच बदलली. प्रत्येक कलाकाराला वेगळा मायक्रोफोन मिळू लागला. मग पेटीचा, तबल्याचा, सारंगीचा व्हॉल्युम किती असायला हवा, गाणाऱ्याचा व्हॉल्युम किती असायला हवा, याची गणितं मांडली जाऊ लागली. त्यामुळे वादनाची आणि गायनाची, रेकॉर्डिंगची पद्धत हळूहळू बदलू लागली, ती अधिक नेमकी होऊ लागली. हे परिवर्तन घडायला लागलं, तसं आवाजाच्या स्वरलगावामध्येही परिवर्तन व्हायला लागलं. याला मी व्हॉइस कल्चर असं म्हणू शकत नाही, परंतु आवाजाचा एक वेगळ्या प्रकारचा विचार होऊ लागला. त्याला साऊंड सिस्टीमचा वेगळा पैलू जोडला गेला. आपण गातो आणि आपला आवाज माइकवर कसा येतो याबाबतचा विचार गायकांमध्ये होऊ लागला. हा विचार शास्त्रीय संगीतात तेवढ्या प्रकर्षानं दिसला नाही, जेवढा तो लाइट म्युझिकमध्ये दिसला. अर्थात असं शास्त्रीय संगीतातही काही प्रमाणात घडलं आहे. कारण मायक्रोफोन्स आल्यामुळे ओपन एअर प्रोग्रॅम होऊ शकले. मायक्रोफोन घेतल्यामुळे वाद्यांचं बॅलन्सिंग करावं लागलं. वादकही वेगळ्या प्रकाराने वाजवू लागले. आता तर खूपच प्रगती झाली आहे.
मायक्रोफोनमुळे मुख्य बदल जो झाला तो आवाजाची फेक, स्वरांचे उच्चार यामध्ये. त्याव्यतिरिक्त शब्दांचे उच्चार यामध्येही बदल झाला. आपण नेहमी गाताना जसे शब्दोच्चार करतो आणि मायक्रोफोन हाती घेतल्यानंतर जसे शब्दोच्चार करतो, यामध्ये फरक पडला. मायक्रोफोन हाती घेतल्यावर शब्द कसे उच्चारावेत, याविषयी विचार होणं महत्त्वाचं होतं. यामध्ये मी असं म्हणेन, की लतादीदी आणि आशाताई यांचे याबाबतीत खूप मोठे योगदान आहे. त्यांनी केवळ दिलेले शब्द न उच्चारता त्या शब्दांना सौंदर्य दिलं. सांगीतिक उच्चार कसे असावेत आणि ते मायक्रोफोनचा विचार करून कसे घडवावेत याचा या दोघींचा आवाज हा एक उत्तम वस्तुपाठच आहे. त्यांचे नैसर्गिक उच्चार मायक्रोफोनला अनुकूल करण्याचं कसब त्यांच्या अंगी आहे. केवळ स्पष्ट शब्दोच्चार न करता ते सौंदर्यपूर्ण व सांगीतिकदृष्ट्या मायक्रोफोनसमोर कसे परिणामकारक उच्चारावेत, असा विचार भावसंगीतात व्हायला लागला तो केवळ तंत्रज्ञानाचा शिरकाव किंवा वापर संगीतात व्हायला लागल्यामुळेच. असं झालं नसतं तर, प्रत्येक शब्दाचा उच्चार वेगळ्याच प्रकारचा झाला असता. मायक्रोफोनसमोर गाताना शब्दोच्चार कसा करावा, हे स्वतः दाखवून देऊन त्याचा एक मापदंड निर्माण करण्यामध्ये लतादीदींचं योगदान सर्वाधिक आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच लोक त्यांच्या शब्दोच्चारणाला अनुसरतात.
मला असं वाटतं, की मराठी भावगीतामध्ये मायक्रोफोनमुळे मोठं परिवर्तन घडलं. आज या गोष्टीचा विचार नव्या कलाकारांनाही करावाच लागेल. तुम्ही नुसते शब्द गाऊन उपयोग नसतो. ते शब्द स्वरांबरोबर आलेले आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. त्या शब्दांचे उच्चार मायक्रोफोनवर कसे करावेत याचा अभ्यास करायला हवा. उदाहरणार्थ, प, फ, भ, थ असे काही वर्ण मायक्रोफोनसोबत उच्चारताना ते डिस्टॉर्ट न होऊ देण्याची सतर्कता गायकाला ठेवावी लागेल. माइकचं तंत्र हे प्रत्येक गायकाला यायला हवं. ते शिकावंही लागतं आणि अनुभवातनंही येतं. याच्याही अगोदर तुम्ही रफीसाहेब, किशोरदा, लतादीदी, आशाताई यांच्या गाण्याचा अभ्यास करायलाच हवा. डिक्शन उत्तम असेल तर ते गाणं उठतं, अन्यथा सुंदर काव्य व चाल असूनही ते पडतं. उत्तम डिक्शनमुळे काव्याला न्याय मिळतो. त्यातले पॉझेस, त्यातली गंमत हे सगळं शब्दोच्चारातून दिसू लागतं. यामुळे संपूर्ण शब्दचित्र उभं राहतं. काही उदाहरणं द्यायची झाली तर तुम्ही लतादीदींची गैरफिल्मी गाणी घ्या, पायो जी मैंने, तुकयांचे अभंग – सुंदर ते ध्यान, कन्या सासुऱ्यासी जाये यांसारखे अभंग तुम्ही आवर्जून ऐका.
मायक्रोफोन जसा उपयुक्त आहे तसाच तो घातकही आहे. तुमच्या आवाजातला किंवा सादरीकरणातला सूक्ष्मातिसूक्ष्म दोषही मायक्रोफोन मोठा करून दाखवतो. याउलट तुम्ही थोडसं जरी चांगलं गायलात किंवा सादरीकरण केलंत तर ते खूप छान पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू शकतं. तर मायक्रोफोन हे असं दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे भावगीत, गझल, फिल्मसंगीतात केवळ उच्चारांचा विचार करून आता चालणार नाही. मायक्रोफोन आणि सांगीतिकदृष्ट्या शब्दोच्चार कसे असावेत याचा साउंड सिस्टीमला केंद्रीभूत ठेवून विचार करावा लागेल. याचं कारण साऊंड सिस्टीम हा प्रस्तुतीकरणाचा अविभाज्य घटक आहे.
गायन प्रस्तुत करताना अनेक अवधानं सांभाळावी लागतात. सर्व वाद्यांचे स्वर एकजीव होणं, आपल्याला त्यातून सूर गवसणं, काय गायचं आहे आणि त्या गाण्याचा भाव कोणता आहे, या सगळ्याचं भान ठेवूनच गायन श्रोत्यांपर्यंत पोहोचवावं लागतं. या सगळ्या अवधानांमध्ये १९५०च्या दशकापासून एक नवं अवधान जोडलं गेलं आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान किंवा साऊंड सिस्टीम.
आपल्या संगीतामध्ये या साऊंड सिस्टीमचा वापर होऊ लागल्यापासून खूप मोठं परिवर्तन घडलं. त्यामुळे गाण्यामध्ये आनुषंगिक बदल झाले. मायक्रोफोनच्या काळापूर्वीचे गायक खड्या आवाजात गात असत. याचं कारण गवयाने गायलेला प्रत्येक सूर हा प्रेक्षागारात बसलेल्या शेवटच्या रांगेतल्या रसिक श्रोत्यापर्यंत पोहोचावा, हा त्यामागे उद्देश असे. त्यामुळे गाणंही ठसठशीत होत असे. आवाजाची ठेवण, आवाजाचा जो लगाव होता तो सर्वस्वी निराळ्या प्रकारचा होता.
मायक्रोफोन आल्यानंतर हळूहळू बदल घडायला लागला असं आपल्याला दिसून येतं. नाट्यसृष्टीत रंगमंचावर मायक्रोफोन एकच असायचा आणि गायक त्यासमोर, मध्यभागी येऊन गात असत. इतर वाद्यवृंद मायक्रोफोनपासून त्या मानाने लांब असायचा. तसंच रेडिओ किंवा ध्वनिफित यांच्यासाठी स्टुडियो रेकॉर्डिंग करत असतानाही एकच माईक वापरत असत. उदाहरणार्थ, जेव्हा युगुल गीताचं रेकॉर्डिंग असे, ते एका बाजूला स्त्री गायक तर दुसऱ्या बाजूला पुरुष गायक गात असे. अशा पद्धतीनं, लाइव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. लाइव्ह रेकॉर्डिंगमुळे वाद्यवृंदाचा एकजीव होऊन आलेला स्वर, त्यात गायकाचा मिसळलेला स्वर एक वेगळा जिवंत अनुभव देत असे. या तंत्राचं भान ठेवून गायकाची आवाज लावण्याची पद्धत बदलत गेली. तसंच संगीतकारही गायकाच्या आवाजाची जातकुळी ओळखून त्यादृष्टीने संगीत तयार करू लागले. उदाहारणार्थ, गायकाची स्वरपट्टी, त्याची गाण्याची लकब आणि गुण ओळखून संगीतरचना केली जाऊ लागली. भावगीताच्या प्रस्तुतीकरणामध्येही यामुळे फरक पडत गेला.
तंत्रज्ञान आधुनिक होत गेलं तसतशी रेकॉर्डिंगची पद्धतच बदलली. प्रत्येक कलाकाराला वेगळा मायक्रोफोन मिळू लागला. मग पेटीचा, तबल्याचा, सारंगीचा व्हॉल्युम किती असायला हवा, गाणाऱ्याचा व्हॉल्युम किती असायला हवा, याची गणितं मांडली जाऊ लागली. त्यामुळे वादनाची आणि गायनाची, रेकॉर्डिंगची पद्धत हळूहळू बदलू लागली, ती अधिक नेमकी होऊ लागली. हे परिवर्तन घडायला लागलं, तसं आवाजाच्या स्वरलगावामध्येही परिवर्तन व्हायला लागलं. याला मी व्हॉइस कल्चर असं म्हणू शकत नाही, परंतु आवाजाचा एक वेगळ्या प्रकारचा विचार होऊ लागला. त्याला साऊंड सिस्टीमचा वेगळा पैलू जोडला गेला. आपण गातो आणि आपला आवाज माइकवर कसा येतो याबाबतचा विचार गायकांमध्ये होऊ लागला. हा विचार शास्त्रीय संगीतात तेवढ्या प्रकर्षानं दिसला नाही, जेवढा तो लाइट म्युझिकमध्ये दिसला. अर्थात असं शास्त्रीय संगीतातही काही प्रमाणात घडलं आहे. कारण मायक्रोफोन्स आल्यामुळे ओपन एअर प्रोग्रॅम होऊ शकले. मायक्रोफोन घेतल्यामुळे वाद्यांचं बॅलन्सिंग करावं लागलं. वादकही वेगळ्या प्रकाराने वाजवू लागले. आता तर खूपच प्रगती झाली आहे.
मायक्रोफोनमुळे मुख्य बदल जो झाला तो आवाजाची फेक, स्वरांचे उच्चार यामध्ये. त्याव्यतिरिक्त शब्दांचे उच्चार यामध्येही बदल झाला. आपण नेहमी गाताना जसे शब्दोच्चार करतो आणि मायक्रोफोन हाती घेतल्यानंतर जसे शब्दोच्चार करतो, यामध्ये फरक पडला. मायक्रोफोन हाती घेतल्यावर शब्द कसे उच्चारावेत, याविषयी विचार होणं महत्त्वाचं होतं. यामध्ये मी असं म्हणेन, की लतादीदी आणि आशाताई यांचे याबाबतीत खूप मोठे योगदान आहे. त्यांनी केवळ दिलेले शब्द न उच्चारता त्या शब्दांना सौंदर्य दिलं. सांगीतिक उच्चार कसे असावेत आणि ते मायक्रोफोनचा विचार करून कसे घडवावेत याचा या दोघींचा आवाज हा एक उत्तम वस्तुपाठच आहे. त्यांचे नैसर्गिक उच्चार मायक्रोफोनला अनुकूल करण्याचं कसब त्यांच्या अंगी आहे. केवळ स्पष्ट शब्दोच्चार न करता ते सौंदर्यपूर्ण व सांगीतिकदृष्ट्या मायक्रोफोनसमोर कसे परिणामकारक उच्चारावेत, असा विचार भावसंगीतात व्हायला लागला तो केवळ तंत्रज्ञानाचा शिरकाव किंवा वापर संगीतात व्हायला लागल्यामुळेच. असं झालं नसतं तर, प्रत्येक शब्दाचा उच्चार वेगळ्याच प्रकारचा झाला असता. मायक्रोफोनसमोर गाताना शब्दोच्चार कसा करावा, हे स्वतः दाखवून देऊन त्याचा एक मापदंड निर्माण करण्यामध्ये लतादीदींचं योगदान सर्वाधिक आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच लोक त्यांच्या शब्दोच्चारणाला अनुसरतात.
मला असं वाटतं, की मराठी भावगीतामध्ये मायक्रोफोनमुळे मोठं परिवर्तन घडलं. आज या गोष्टीचा विचार नव्या कलाकारांनाही करावाच लागेल. तुम्ही नुसते शब्द गाऊन उपयोग नसतो. ते शब्द स्वरांबरोबर आलेले आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. त्या शब्दांचे उच्चार मायक्रोफोनवर कसे करावेत याचा अभ्यास करायला हवा. उदाहरणार्थ, प, फ, भ, थ असे काही वर्ण मायक्रोफोनसोबत उच्चारताना ते डिस्टॉर्ट न होऊ देण्याची सतर्कता गायकाला ठेवावी लागेल. माइकचं तंत्र हे प्रत्येक गायकाला यायला हवं. ते शिकावंही लागतं आणि अनुभवातनंही येतं. याच्याही अगोदर तुम्ही रफीसाहेब, किशोरदा, लतादीदी, आशाताई यांच्या गाण्याचा अभ्यास करायलाच हवा. डिक्शन उत्तम असेल तर ते गाणं उठतं, अन्यथा सुंदर काव्य व चाल असूनही ते पडतं. उत्तम डिक्शनमुळे काव्याला न्याय मिळतो. त्यातले पॉझेस, त्यातली गंमत हे सगळं शब्दोच्चारातून दिसू लागतं. यामुळे संपूर्ण शब्दचित्र उभं राहतं. काही उदाहरणं द्यायची झाली तर तुम्ही लतादीदींची गैरफिल्मी गाणी घ्या, पायो जी मैंने, तुकयांचे अभंग – सुंदर ते ध्यान, कन्या सासुऱ्यासी जाये यांसारखे अभंग तुम्ही आवर्जून ऐका.
मायक्रोफोन जसा उपयुक्त आहे तसाच तो घातकही आहे. तुमच्या आवाजातला किंवा सादरीकरणातला सूक्ष्मातिसूक्ष्म दोषही मायक्रोफोन मोठा करून दाखवतो. याउलट तुम्ही थोडसं जरी चांगलं गायलात किंवा सादरीकरण केलंत तर ते खूप छान पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू शकतं. तर मायक्रोफोन हे असं दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे भावगीत, गझल, फिल्मसंगीतात केवळ उच्चारांचा विचार करून आता चालणार नाही. मायक्रोफोन आणि सांगीतिकदृष्ट्या शब्दोच्चार कसे असावेत याचा साउंड सिस्टीमला केंद्रीभूत ठेवून विचार करावा लागेल. याचं कारण साऊंड सिस्टीम हा प्रस्तुतीकरणाचा अविभाज्य घटक आहे.