दीडदमडी : दिवाळीचे (अ)राजकीय उखाणे
सत्तेवर असलेल्या आणि नसलेल्या राजकारण्यांच्या बायकांनी एकमेकींशी संपर्क साधला, 'आपल्या नवऱ्यांना काय राजकारण करायचं ते करू देत, एकमेकांवर काय टीका करायची ती करू देत, दिवाळीच्या निमित्तानं आपण ते सगळं विसरून एकत्र येऊ आणि धम्माल करू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2020, 8:20 am
सत्तेवर असलेल्या आणि नसलेल्या राजकारण्यांच्या बायकांनी एकमेकींशी संपर्क साधला, 'आपल्या नवऱ्यांना काय राजकारण करायचं ते करू देत, एकमेकांवर काय टीका करायची ती करू देत, दिवाळीच्या निमित्तानं आपण ते सगळं विसरून एकत्र येऊ आणि धम्माल करू. आपले नवरे ऑनलाइन मीटिंगा घेतात, पण आपण प्रत्यक्षच भेटू एकमेकींना. आपल्या नवऱ्यांना दाखवून देऊ, आम्ही तुम्हाला तर घाबरत नाहीच, आम्ही करोनालाही भीक घालत नाही.' सोशल डिस्टन्सिंग पाळून, ब्रँडेड मुखपट्ट्या लावून, नटून-थटून सगळ्या एकत्र आल्या. त्या 'सिक्रेट गेट टुगेदर'चा सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलेला हा वृत्तांत...
दिवाळीचा फराळ झाला, गप्पा झाल्या, भरपूर हसणं-खिदळणं झालं. मग कोणी तरी टूम काढली, निरोप घेण्यापूर्वी सगळ्यांनी उखाण्यात नाव घ्यायचं. प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून रश्मीताई ठाकरे यांनी सर्वप्रथम नाव घ्यावं असं ठरलं; परंतु त्यांनी मोठ्या मनानं, 'नको, मिसेस पवारांना आधी घेऊ द्या' असं म्हटलं. तेव्हा मिसेस सुनेत्रा अजित पवार उत्साहानं पुढं आल्या; पण मग त्यांच्याच लक्षात आलं, की रश्मीताई ठाकरेंना अपेक्षित असलेल्या मिसेस पवार आपण नव्हे आणि त्यांनी आपलं पाऊल मागे घेतलं. प्रतिभाताईंनी हसतमुखानं तो सन्मान स्वीकारला आणि मनाशी शब्दांची जुळवाजुळव केली-
'काल संध्याकाळी ते काय म्हणाले,
याचा अर्थ लावत मी रात्र रात्र जागते
शरदराव एका जन्मात कळणार नाहीत
म्हणूनच तर मी सात जन्म मागते'
सगळ्यांनीच टाळ्या वाजवून प्रतिभाताईंच्या प्रतिभेला दाद दिली. टाळ्यांचा गजर थांबल्यावर, रश्मीताईंनी घसा साफ केला. सत्तेच्या तेजानं त्यांचा चेहरा उजळलेला होता. 'आपला पती जागतिक ख्यातीचा छायाचित्रकार होणार' असं वाटत असताना अचानक 'नव्हत्याचे होते' झाले. हा सर्व प्रवास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. व्यक्तिमत्त्वाचा डौल सांभाळत त्यांनी उखाणा घेतला-
'मुख्यमंत्रीपदाच्या भरजरी वस्त्राला
माझ्या साहचर्याचा सोनेरी काठ आहे
कुणी काही म्हणो, कुणी काही म्हणो
मी उद्धवरावांची 'आतली गाठ' आहे'
या वास्तववादी उखाण्यावर सगळ्या बायकांनी सहमतीचा एकच कलकलाट केला आणि मनापासून टाळ्या वाजवल्या. राज्य पुरुषांचे असले तरी, त्याची सूत्रे कायम स्त्रियांच्या हाती असतात, हे जागतिक सत्यच रश्मीताईंनी त्यांच्या उखाण्यातून अधोरेखित केलं होतं.'आता आपला नंबर' असे समजून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी पुन्हा समोर आल्या, त्याच वेळी 'माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी' म्हणून अमृताताईही पुढे सरकल्या. दोघींनी एकमेकींकडे हसून पाहिलं. अमृताताई म्हणाल्या, 'सुनेत्राताई, तुम्हीच घ्या उखाणा, आपल्यातलं अंडरस्टँडिंग कायम राहिलं पाहिजे.
'सुनेत्राताईंनी आपलं घरंदाज व्यक्तिमत्व सांभाळत, पतीच्या पदाचा आब राखत, उखाण्यातून आपल्या भावनांना वाट करून दिली-
'स्पष्ट बोलले तर म्हणतात, तुसडे!
आग्रह धरला तर म्हणतात, हेका!
अजितरावांनी काहीही केलं तरी,
सगळे विचारतात, 'का? का ?'
या उखाण्यानं वातावरण थोडं गंभीर झालं खरं, परतुं सुनेत्राताईंनी लगेचच हसून 'अमृताताई, आता होऊन जाऊ द्या', असं म्हणत वातावरणातला तणाव थोडा सैल केला. अमृताताई त्यांचं ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाल्या-
'पुन्हा एकदा पहाट होईल
पुन्हा ते शपथ घेतीलच,
देवेंद्रजी पुन्हा येतील,
तेव्हा मीही पुन्हा येईनच'
अमृताताईंच्या या आशावादाला सर्वांनीच राजकीय संदर्भ मागे टाकून टाळ्यांचा कटकडाट करत मोकळी दाद दिली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्यामुळे गेट-टुगेदरचं नेतृत्व आपोआपच रश्मीताईंकडे आलं होतं. त्या अधिकारातच त्यांनी कांचनताई गडकरींना आग्रहाने समोर बोलावले आणि उखाणा घेण्याचा आग्रह केला. कांचनताईंनी आपला उखाणा सादर केला-
'ह्यांच्या हजारो कोटींच्या घोषणा ऐकून
आता माझ्याच नाकी आले नऊ
हातखर्चाला पैसे मागितले तरी
नितीनराव विचारतात, किती कोटी देऊ?'
कांचनताईंच्या मनमोकळ्या वऱ्हाडी कबुलीजवाबाचं सगळ्यांनी तोंड भरुन कौतुक केलं. 'पुढची पार्टी माझ्याकडे' या त्यांच्या आमंत्रणाचाही सगळ्यांनी स्वीकार केला. आणखी तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी गेट-टुगेदरला आलेल्या होत्या. त्यात आपोआपच ज्येष्ठताक्रम ठरून गेला आणि सगळ्यांनी नीलम राणे यांना उखाण्याचा आग्रह केला. नीलमताई रुबाबात पुढे आल्या आणि त्यांनी उखाणा घेतला-
'मला राजकारणातलं काही कळत नाही
काहीच राहत नाही माझ्या लक्षात
रोज सकाळी नारायणरावांना विचारते
'का हो, आज तुम्ही कुठल्या पक्षात?'
नीलमताईंच्या या मालवणी विनोदाला आणि मोकळेपणाला सर्वच मैंत्रिणींनी गडगडाटी प्रतिसाद दिला आणि अमिताताई अशोकराव चव्हाण यांना पुढील उखाण्यासाठी पाचारण केलं. सगळ्याच मैत्रिणी मोकळेपणानं आपापल्या पतींविषयी मतप्रदर्शन करत आहेत हे पाहून अमिताताईंनीही भावनांना वाट करून दिली-
'स्थितप्रज्ञतेचा पदर त्यांच्या
चेहऱ्यावरून कधी ढळत नाही
अशोकरावांचा होकार आणि नकार
मला तर अजूनही कळत नाही'
'वाहवा वाहवा...' करत सगळ्या मैत्रिणींनी अमिताताईंच्या उत्तम निरीक्षणाला दाद दिल्यावर, सगळ्या अपेक्षेनं सत्त्वशीलाताई चव्हाण यांच्याकडे पाहू लागल्या. त्या खरं तर या कार्यक्रमाला यायला राजीच होत नव्हत्या. परंतु प्रतिभाताई पवारांनी स्वतः फोन करुन आग्रह केला म्हणून त्या आल्या होत्या. नवऱ्याचं नाव घेणं, उखाणा वगैरे प्रकारही त्यांना मंजूर नव्हते. परंतु तिथलं आनंदाचं वातावरण पाहून त्यांनी आपल्या स्वभावाला मुरड घातली आणि उखाणा घेण्यासाठी पुढे सरसावल्या-
'दात ओठ खाल्ले तरी ते
मनातल्या मनातच खातात
पृथ्वीराज एवढे सावध आहेत,
की गार दूधही फुंकून पितात'
सत्त्वशीलाताईंच्या स्पष्टवक्तेपणाला चांगलीच दाद मिळाली... आणि मग, सत्तेच्या परिघात नसूनही सतत वलयाच्या प्रकाशात असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई यांच्याकडे कौतुकानं पाहत रश्मीताईंनी तिला आग्रह केला. 'तूही सांग ग आता तुझ्या मनातलं, आपल्या आपणच आहोत इथं.' शर्मिलाताई ठाकरेही आढेवेढे न घेता पुढे आल्या-
'आमदार नाहीत, खासदार नाहीत
पण डोक्यावर गर्दीचा 'ताज' आहे
एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा
त्याच्या नावातच 'राज' आहे'
शर्मिलाताईंना सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यावर, उखाण्यांचा हा सिलसिला पुढे बराच वेळ सुरू राहिला.
ताजा कलम- या कार्यक्रमाबाबत कळल्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यात, आपण अविवाहित असल्यामुळे मुद्दामच दिवाळीच्या निमित्ताने 'फक्त बायकांचा' असा कार्यक्रम करण्यात आला, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे!-तंबी दुराई
दिवाळीचा फराळ झाला, गप्पा झाल्या, भरपूर हसणं-खिदळणं झालं. मग कोणी तरी टूम काढली, निरोप घेण्यापूर्वी सगळ्यांनी उखाण्यात नाव घ्यायचं. प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून रश्मीताई ठाकरे यांनी सर्वप्रथम नाव घ्यावं असं ठरलं; परंतु त्यांनी मोठ्या मनानं, 'नको, मिसेस पवारांना आधी घेऊ द्या' असं म्हटलं. तेव्हा मिसेस सुनेत्रा अजित पवार उत्साहानं पुढं आल्या; पण मग त्यांच्याच लक्षात आलं, की रश्मीताई ठाकरेंना अपेक्षित असलेल्या मिसेस पवार आपण नव्हे आणि त्यांनी आपलं पाऊल मागे घेतलं. प्रतिभाताईंनी हसतमुखानं तो सन्मान स्वीकारला आणि मनाशी शब्दांची जुळवाजुळव केली-
'काल संध्याकाळी ते काय म्हणाले,
याचा अर्थ लावत मी रात्र रात्र जागते
शरदराव एका जन्मात कळणार नाहीत
म्हणूनच तर मी सात जन्म मागते'
सगळ्यांनीच टाळ्या वाजवून प्रतिभाताईंच्या प्रतिभेला दाद दिली. टाळ्यांचा गजर थांबल्यावर, रश्मीताईंनी घसा साफ केला. सत्तेच्या तेजानं त्यांचा चेहरा उजळलेला होता. 'आपला पती जागतिक ख्यातीचा छायाचित्रकार होणार' असं वाटत असताना अचानक 'नव्हत्याचे होते' झाले. हा सर्व प्रवास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. व्यक्तिमत्त्वाचा डौल सांभाळत त्यांनी उखाणा घेतला-
'मुख्यमंत्रीपदाच्या भरजरी वस्त्राला
माझ्या साहचर्याचा सोनेरी काठ आहे
कुणी काही म्हणो, कुणी काही म्हणो
मी उद्धवरावांची 'आतली गाठ' आहे'
या वास्तववादी उखाण्यावर सगळ्या बायकांनी सहमतीचा एकच कलकलाट केला आणि मनापासून टाळ्या वाजवल्या. राज्य पुरुषांचे असले तरी, त्याची सूत्रे कायम स्त्रियांच्या हाती असतात, हे जागतिक सत्यच रश्मीताईंनी त्यांच्या उखाण्यातून अधोरेखित केलं होतं.'आता आपला नंबर' असे समजून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी पुन्हा समोर आल्या, त्याच वेळी 'माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी' म्हणून अमृताताईही पुढे सरकल्या. दोघींनी एकमेकींकडे हसून पाहिलं. अमृताताई म्हणाल्या, 'सुनेत्राताई, तुम्हीच घ्या उखाणा, आपल्यातलं अंडरस्टँडिंग कायम राहिलं पाहिजे.
'सुनेत्राताईंनी आपलं घरंदाज व्यक्तिमत्व सांभाळत, पतीच्या पदाचा आब राखत, उखाण्यातून आपल्या भावनांना वाट करून दिली-
'स्पष्ट बोलले तर म्हणतात, तुसडे!
आग्रह धरला तर म्हणतात, हेका!
अजितरावांनी काहीही केलं तरी,
सगळे विचारतात, 'का? का ?'
या उखाण्यानं वातावरण थोडं गंभीर झालं खरं, परतुं सुनेत्राताईंनी लगेचच हसून 'अमृताताई, आता होऊन जाऊ द्या', असं म्हणत वातावरणातला तणाव थोडा सैल केला. अमृताताई त्यांचं ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाल्या-
'पुन्हा एकदा पहाट होईल
पुन्हा ते शपथ घेतीलच,
देवेंद्रजी पुन्हा येतील,
तेव्हा मीही पुन्हा येईनच'
अमृताताईंच्या या आशावादाला सर्वांनीच राजकीय संदर्भ मागे टाकून टाळ्यांचा कटकडाट करत मोकळी दाद दिली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्यामुळे गेट-टुगेदरचं नेतृत्व आपोआपच रश्मीताईंकडे आलं होतं. त्या अधिकारातच त्यांनी कांचनताई गडकरींना आग्रहाने समोर बोलावले आणि उखाणा घेण्याचा आग्रह केला. कांचनताईंनी आपला उखाणा सादर केला-
'ह्यांच्या हजारो कोटींच्या घोषणा ऐकून
आता माझ्याच नाकी आले नऊ
हातखर्चाला पैसे मागितले तरी
नितीनराव विचारतात, किती कोटी देऊ?'
कांचनताईंच्या मनमोकळ्या वऱ्हाडी कबुलीजवाबाचं सगळ्यांनी तोंड भरुन कौतुक केलं. 'पुढची पार्टी माझ्याकडे' या त्यांच्या आमंत्रणाचाही सगळ्यांनी स्वीकार केला. आणखी तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी गेट-टुगेदरला आलेल्या होत्या. त्यात आपोआपच ज्येष्ठताक्रम ठरून गेला आणि सगळ्यांनी नीलम राणे यांना उखाण्याचा आग्रह केला. नीलमताई रुबाबात पुढे आल्या आणि त्यांनी उखाणा घेतला-
'मला राजकारणातलं काही कळत नाही
काहीच राहत नाही माझ्या लक्षात
रोज सकाळी नारायणरावांना विचारते
'का हो, आज तुम्ही कुठल्या पक्षात?'
नीलमताईंच्या या मालवणी विनोदाला आणि मोकळेपणाला सर्वच मैंत्रिणींनी गडगडाटी प्रतिसाद दिला आणि अमिताताई अशोकराव चव्हाण यांना पुढील उखाण्यासाठी पाचारण केलं. सगळ्याच मैत्रिणी मोकळेपणानं आपापल्या पतींविषयी मतप्रदर्शन करत आहेत हे पाहून अमिताताईंनीही भावनांना वाट करून दिली-
'स्थितप्रज्ञतेचा पदर त्यांच्या
चेहऱ्यावरून कधी ढळत नाही
अशोकरावांचा होकार आणि नकार
मला तर अजूनही कळत नाही'
'वाहवा वाहवा...' करत सगळ्या मैत्रिणींनी अमिताताईंच्या उत्तम निरीक्षणाला दाद दिल्यावर, सगळ्या अपेक्षेनं सत्त्वशीलाताई चव्हाण यांच्याकडे पाहू लागल्या. त्या खरं तर या कार्यक्रमाला यायला राजीच होत नव्हत्या. परंतु प्रतिभाताई पवारांनी स्वतः फोन करुन आग्रह केला म्हणून त्या आल्या होत्या. नवऱ्याचं नाव घेणं, उखाणा वगैरे प्रकारही त्यांना मंजूर नव्हते. परंतु तिथलं आनंदाचं वातावरण पाहून त्यांनी आपल्या स्वभावाला मुरड घातली आणि उखाणा घेण्यासाठी पुढे सरसावल्या-
'दात ओठ खाल्ले तरी ते
मनातल्या मनातच खातात
पृथ्वीराज एवढे सावध आहेत,
की गार दूधही फुंकून पितात'
सत्त्वशीलाताईंच्या स्पष्टवक्तेपणाला चांगलीच दाद मिळाली... आणि मग, सत्तेच्या परिघात नसूनही सतत वलयाच्या प्रकाशात असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई यांच्याकडे कौतुकानं पाहत रश्मीताईंनी तिला आग्रह केला. 'तूही सांग ग आता तुझ्या मनातलं, आपल्या आपणच आहोत इथं.' शर्मिलाताई ठाकरेही आढेवेढे न घेता पुढे आल्या-
'आमदार नाहीत, खासदार नाहीत
पण डोक्यावर गर्दीचा 'ताज' आहे
एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा
त्याच्या नावातच 'राज' आहे'
शर्मिलाताईंना सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यावर, उखाण्यांचा हा सिलसिला पुढे बराच वेळ सुरू राहिला.
ताजा कलम- या कार्यक्रमाबाबत कळल्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यात, आपण अविवाहित असल्यामुळे मुद्दामच दिवाळीच्या निमित्ताने 'फक्त बायकांचा' असा कार्यक्रम करण्यात आला, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे!-तंबी दुराई