विश्राम गुप्ते
कुठल्याही भारतीय भाषेत अभिजात ठरेल अशी संवेदनशीलता लाभलेल्या महाबळेश्वर सैल यांच्या ‘हावठण’ या कादंबरीला नुकताच सरस्वती सन्मान जाहीर झाला, त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि साहित्याचा घेतलेला मागोवा…
गोव्याचे सुप्रसिद्ध कोकणी लेखक महाबळेश्वर सैल ह्यांना देशातला प्रतिष्ठेचा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ हा सर्वोत्तम साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. हा पुरस्कार देशातला सर्वात श्रीमंत साहित्य पुरस्कार आहे. पंधरा लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९९१ पासून सुरू झालेला हा पुरस्कार आजपर्यंत देशातल्या एकूण २२ अनुसूचित भारतीय भाषांमधल्या २५ लेखकांना प्राप्त झाला आहे. कोकणी भाषेसाठी हा योग प्रथमच जुळून आला आहे. एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर दहा वर्षांपर्यंत त्या पुस्तकाचा ‘सरस्वती सन्माना’साठी विचार केला जातो. ज्या ‘हावठण’ ह्या कादंबरीस तो जाहीर झाला ती कोकणी कादंबरी २००९ साली प्रकाशित झाली आहे. हावठण म्हणजे कुंभाराची भट्टी. नव्या काळात कुंभारांच्या जीवनात आलेल्या अटळ संक्रमणाबद्दलची ही कादंबरी मराठी आणि इंग्रजीतसुद्धा अनुवादित झाली आहे.
चौऱ्याहत्तर वर्षांचे श्री. सैल सैन्यदलात सैनिक म्हणून भरती झाले होते. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता. एकेकाळी सैनिक म्हणून खांद्यावर बंदुक पेलणारे सैल प्रवृत्तीने शांतीवादी आहेत. आजपर्यंत त्यांचे पाच कोकणी कथासंग्रह, सात कादंबऱ्या, एक वैचारिक लेखसंग्रह, एक बालकादंबरी आणि एक अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्याशिवाय त्यांनी मराठीतसुद्धा वेचक कथा, नाटकं आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांची ‘तांडव’ ही गाजलेली मराठी कादंबरी गोव्यात घडलेल्या धर्मांतराची गोष्ट सांगते.
कारवार तालुक्यातल्या माजळी गावात एका गरीब घरात जन्मलेल्या, जेमतेम शिकलेल्या श्री. सैलांनी सोळाव्या वर्षांपर्यंत शेतात कष्ट उपसलेत, नंतर घरातून पळून जाऊन ते सैन्यात भरती झाले. तिथे युद्ध लढून ते गोव्याच्या ग्रामीण पोस्ट ऑफिसात पोस्टमास्तर म्हणून रुजू झाले. आज ते मडगावातल्या दोन बेडरूम्सच्या फ्लॅटमध्ये कुटुंबासोबत राहतात. कम्प्युटरऐवजी ते पेनने लिहितात. त्यांना कार ड्राइव्ह करता येत नाही. ते आप्तमित्रांमध्ये रमतात, आणि बोलण्याऐवजी ते ऐकणंच पसंत करतात.
‘मी माणूस म्हणून खडबडीत आहे, पण लिहायला बसलो की मी सर्वस्व पणाला लावून लिहितो’ असं ते स्वतःबद्दल म्हणतात. हाडापेराने उंचपुरे, पण स्वभावाने अत्यंत ऋजू असलेले श्री. सैल मडगावच्या मासळी बाजारातल्या गर्दीत सहज लपून जातील, पण लेखक म्हणून ते कुठल्याही भारतीय भाषेत उठून दिसतील अशी त्यांची कारकीर्द आहे. २०१५ साली ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने त्यांच्या दोन लघुकादंबऱ्यांचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला आहे.
हळुवार शैलीत बोलणाऱ्या श्री. सैलांना आज प्राप्त झालेला ‘सरस्वती सन्मान’ ह्या पूर्वी सुप्रसिद्ध हिंदी कवी श्री. हरिवंशराय बच्चन, बंगाली कादंबरीकार श्री. सुनील गंगोपाध्याय, कन्नड कादंबरीकार श्री. भैरप्पा, ओरिया लेखक श्री. रमाकांत रथ ह्यांना प्राप्त झाला आहे. मराठीत तो आजपर्यंत श्री. विजय तेंडुलकर आणि श्री. महेश एलकुंचवार ह्यांना प्राप्त झाला आहे. सैलांच्या ह्या सन्मानामुळे आज मराठी आणि कोकणी साहित्यक्षेत्रात सर्वत्र आनंद आणि समाधान व्यक्त केलं जात आहे.
‘हावठण’चं स्थळ आहे गोव्याजवळचं पण कर्नाटकातलं रम्य गाव माजळी, आणि काळ आहे साधारण १९९२-९३चा. ह्याच काळात ‘शहराकडे चला’ हा औद्योगिकरणाचा मंत्र गोवा-कारवारच्या लहानसहान गावात रुजू लागला होता. दारिद्र्य, भूक, रूढी आणि परंपरांच्या विळख्यात जखडलेल्या माजळीलगतच्या कुंभारवाड्यात आठ-दहा कुंभारांची कुटुंबं मातीची गाडगी, पणत्या, कुंभ, घट, माठ इत्यादी वस्तू करून पिढ्यानपिढ्या कशीबशी तगून आहेत. गावाजवळच्या तळ्यावर सरकारी धरण बांधायचं घाटतं. ही बातमी ऐकून कुंभारवाड्यात हाहा:कार होतो. ‘आमच्यासाठी माती म्हणजेच धन. ही मातीच नसेल तर आम्हाला माती खावी लागेल’, असं पडलेल्या चेहऱ्याने शिवराम कुंभार म्हणतो. ‘लोण्यासारखी मऊमऊ माती देणारं तळं आम्हाला खुलं हवंय. पण सरकार आमचं ऐकत नाही कारण आम्ही गरीब बापडे, मातीच्या गोळ्यासारखे. कोणीही यावं आणि आम्हाला चिरडून जावं’, ही कुंभारांची व्यथा आहे.
बदललेल्या काळात माणसं रोजच्या स्वयंपाकात गाडगी-मडकी न वापरता स्टीलची भांडी वापरू लागली. माठांऐवजी प्लॅस्टिकच्या कळशा लोकप्रिय झाल्या, ज्या घरात मरण होतं तिथेच तिरडीसाठी माठ विकला जातो, एरवी हा व्यवसाय मरणपंथालाच लागलेला. ही बदलत्या काळाची किमया साध्या भोळ्या कुंभारांना कळत नाही. दिवसरात्र ओल्या मातीला आकार देणारे हे कुंभार त्या मातीसारखेच मऊ स्वभावाचे. त्यांना इतर अनुसूचित जातीचे फायदे नाहीत. त्यांच्या बायका गाडगी-मडकी डोक्यावर घेऊन विक्रीला गावभर भटकणाऱ्या, तर त्यांचे दादले फिरत्या चाकावर मातीचे गोळे धरून त्यांना गाडग्या-मडक्यांचा आकार देण्यात दंग. त्यांना राग, संताप, संघर्ष माहीतच नाही. पूर्ण दैवाधीन असं हे जगणं.
गरिबी हा सगळ्यात मोठा गुन्हा. कारण तिच्यामुळे माणूस अमानुष होतो आणि त्याला स्वतःच्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळत नाही. सदानंद हा चुणचुणीत मुलगा. वर्गात हुशार. पण बाप गरीब कुंभार. त्याला पुढे शिकवू शकत नाही. हा मग तिरीमिरीत बापाने केलेली गाडगी मडकी एका दांड्याने फोडून टाकून घरातून पळून पुण्याला जातो. अहोरात्र कष्ट करतो. तिथे एस.पी. कॉलेजातून बी.ए. होतो. नोकरी करतो, माणूस म्हणून जगतो.
‘हावठण’ही एका गरीब जमातीची गोष्ट आहे. तिच्यात मानवी प्रेम, द्वेष, लोभ, भय, आनंद इत्यादी भावनांचा तीव्र-सुंदर आविष्कार आहे. कुंभारवाड्यावरच्या हुशार सखारामवर भाळून दुसऱ्या गावातली, दुसऱ्या जातीतली एक तरतरीत पोर, शीला गावात सखारामसोबत पळून लग्न करून येते. तिच्या मागावर तिच्या गावातले काही दांडगे येतात, तेव्हा कुंभारवाड्यावरची गरीब माणसं प्रेमी युगुलाला जंगलात पळून जायला मदत करतात. ते रानात पळून जातात तेव्हा ‘आकाशात नितळ स्वच्छ ऊन पडलं होतं. त्या उन्हात ते प्रेमी जणूकाही वाहून जातायत असं वाटलं’, असं सैल लिहितात.
‘खरंतर कुंभारांनी आजपर्यंत हजारो गणपती केले, पण त्यापैकी एकही कोणाला पावला नाही’, ही व्यथा कुंभारांच्या दारिद्र्याची रूपककथा म्हणून लेखक सादर करतो. अंगावर लक्तरं घालणारे, पावसाळ्यात अर्धपोटी राहाणारे हे कुंभार आणि त्यांच्या कष्टकरी बायकांचं जगणं वाचताना डोळ्याच्या कडा पाणावतात.
पावसाळ्यात बुरुबुरू पाऊस पडतोय. त्यात एक कुंभार तळ्याकाठी ओली माती आणायला जातो. ते ओझं डोक्यावर घेऊन तो बांधावरून कसाबसा चालत येतोय. पोट रिकामं असल्याने तो अशक्त झालाय. त्यामुळे ‘एखादा दारुडा जसा झोकांड्या देतो तशा देत तो गावाकडे परतून येतो’ अशी चित्रमय आणि अर्थपूर्ण वर्णनं ही सैलांच्या निवेदनाची विशेषता आहे.
‘हावठण’ ही फक्त कुंभारवाड्यावरच्या कष्टकरी कुंभारांचीच कथा नाही, तर ती अवघ्या गावाची, तिथल्या लहान-सहान माणसांची, त्यांच्या सुख-दुःखाची, त्यांच्या बारक्यासारक्या आशा-आकांक्षांची कथा आहे. ह्या कथेचा जाणीवपूर्वक रचलेला प्लॉट नाही. कुंभारवाड्यातल्या बाया-माणसांचं संघर्षमय, कारुण्यजनक जगणं आणि जगता जगता बदलणं किंवा विरून जाणं हे ‘हावठण’चं विधान आहे. ह्या कादंबरीचा प्रवाह रानातून शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखा आहे. ह्या नदीत क्वचित भोवरे आहेत, पण इथे उथळ पाण्याचा खळखळाट नाही.
कुठल्याही भारतीय भाषेत अभिजात ठरेल अशी संवेदनशीलता लाभलेले श्री. सैल जगाकडे एका निरागस नजरेने बघतात. रसाळ भाषा, चित्रमय वर्णनं, मानवी अवस्थेबद्दल प्रगाढ आस्था आणि काव्यात्मक शैलीच्या बळावर सैलांनी फक्त कोकणी साहित्यातच नाही, तर भारतीय साहित्यात अमीट ठसा उमटवला आहे. त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
कुठल्याही भारतीय भाषेत अभिजात ठरेल अशी संवेदनशीलता लाभलेल्या महाबळेश्वर सैल यांच्या ‘हावठण’ या कादंबरीला नुकताच सरस्वती सन्मान जाहीर झाला, त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि साहित्याचा घेतलेला मागोवा…
गोव्याचे सुप्रसिद्ध कोकणी लेखक महाबळेश्वर सैल ह्यांना देशातला प्रतिष्ठेचा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ हा सर्वोत्तम साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. हा पुरस्कार देशातला सर्वात श्रीमंत साहित्य पुरस्कार आहे. पंधरा लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९९१ पासून सुरू झालेला हा पुरस्कार आजपर्यंत देशातल्या एकूण २२ अनुसूचित भारतीय भाषांमधल्या २५ लेखकांना प्राप्त झाला आहे. कोकणी भाषेसाठी हा योग प्रथमच जुळून आला आहे. एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर दहा वर्षांपर्यंत त्या पुस्तकाचा ‘सरस्वती सन्माना’साठी विचार केला जातो. ज्या ‘हावठण’ ह्या कादंबरीस तो जाहीर झाला ती कोकणी कादंबरी २००९ साली प्रकाशित झाली आहे. हावठण म्हणजे कुंभाराची भट्टी. नव्या काळात कुंभारांच्या जीवनात आलेल्या अटळ संक्रमणाबद्दलची ही कादंबरी मराठी आणि इंग्रजीतसुद्धा अनुवादित झाली आहे.
चौऱ्याहत्तर वर्षांचे श्री. सैल सैन्यदलात सैनिक म्हणून भरती झाले होते. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता. एकेकाळी सैनिक म्हणून खांद्यावर बंदुक पेलणारे सैल प्रवृत्तीने शांतीवादी आहेत. आजपर्यंत त्यांचे पाच कोकणी कथासंग्रह, सात कादंबऱ्या, एक वैचारिक लेखसंग्रह, एक बालकादंबरी आणि एक अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्याशिवाय त्यांनी मराठीतसुद्धा वेचक कथा, नाटकं आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांची ‘तांडव’ ही गाजलेली मराठी कादंबरी गोव्यात घडलेल्या धर्मांतराची गोष्ट सांगते.
कारवार तालुक्यातल्या माजळी गावात एका गरीब घरात जन्मलेल्या, जेमतेम शिकलेल्या श्री. सैलांनी सोळाव्या वर्षांपर्यंत शेतात कष्ट उपसलेत, नंतर घरातून पळून जाऊन ते सैन्यात भरती झाले. तिथे युद्ध लढून ते गोव्याच्या ग्रामीण पोस्ट ऑफिसात पोस्टमास्तर म्हणून रुजू झाले. आज ते मडगावातल्या दोन बेडरूम्सच्या फ्लॅटमध्ये कुटुंबासोबत राहतात. कम्प्युटरऐवजी ते पेनने लिहितात. त्यांना कार ड्राइव्ह करता येत नाही. ते आप्तमित्रांमध्ये रमतात, आणि बोलण्याऐवजी ते ऐकणंच पसंत करतात.
‘मी माणूस म्हणून खडबडीत आहे, पण लिहायला बसलो की मी सर्वस्व पणाला लावून लिहितो’ असं ते स्वतःबद्दल म्हणतात. हाडापेराने उंचपुरे, पण स्वभावाने अत्यंत ऋजू असलेले श्री. सैल मडगावच्या मासळी बाजारातल्या गर्दीत सहज लपून जातील, पण लेखक म्हणून ते कुठल्याही भारतीय भाषेत उठून दिसतील अशी त्यांची कारकीर्द आहे. २०१५ साली ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने त्यांच्या दोन लघुकादंबऱ्यांचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला आहे.
हळुवार शैलीत बोलणाऱ्या श्री. सैलांना आज प्राप्त झालेला ‘सरस्वती सन्मान’ ह्या पूर्वी सुप्रसिद्ध हिंदी कवी श्री. हरिवंशराय बच्चन, बंगाली कादंबरीकार श्री. सुनील गंगोपाध्याय, कन्नड कादंबरीकार श्री. भैरप्पा, ओरिया लेखक श्री. रमाकांत रथ ह्यांना प्राप्त झाला आहे. मराठीत तो आजपर्यंत श्री. विजय तेंडुलकर आणि श्री. महेश एलकुंचवार ह्यांना प्राप्त झाला आहे. सैलांच्या ह्या सन्मानामुळे आज मराठी आणि कोकणी साहित्यक्षेत्रात सर्वत्र आनंद आणि समाधान व्यक्त केलं जात आहे.
‘हावठण’चं स्थळ आहे गोव्याजवळचं पण कर्नाटकातलं रम्य गाव माजळी, आणि काळ आहे साधारण १९९२-९३चा. ह्याच काळात ‘शहराकडे चला’ हा औद्योगिकरणाचा मंत्र गोवा-कारवारच्या लहानसहान गावात रुजू लागला होता. दारिद्र्य, भूक, रूढी आणि परंपरांच्या विळख्यात जखडलेल्या माजळीलगतच्या कुंभारवाड्यात आठ-दहा कुंभारांची कुटुंबं मातीची गाडगी, पणत्या, कुंभ, घट, माठ इत्यादी वस्तू करून पिढ्यानपिढ्या कशीबशी तगून आहेत. गावाजवळच्या तळ्यावर सरकारी धरण बांधायचं घाटतं. ही बातमी ऐकून कुंभारवाड्यात हाहा:कार होतो. ‘आमच्यासाठी माती म्हणजेच धन. ही मातीच नसेल तर आम्हाला माती खावी लागेल’, असं पडलेल्या चेहऱ्याने शिवराम कुंभार म्हणतो. ‘लोण्यासारखी मऊमऊ माती देणारं तळं आम्हाला खुलं हवंय. पण सरकार आमचं ऐकत नाही कारण आम्ही गरीब बापडे, मातीच्या गोळ्यासारखे. कोणीही यावं आणि आम्हाला चिरडून जावं’, ही कुंभारांची व्यथा आहे.
बदललेल्या काळात माणसं रोजच्या स्वयंपाकात गाडगी-मडकी न वापरता स्टीलची भांडी वापरू लागली. माठांऐवजी प्लॅस्टिकच्या कळशा लोकप्रिय झाल्या, ज्या घरात मरण होतं तिथेच तिरडीसाठी माठ विकला जातो, एरवी हा व्यवसाय मरणपंथालाच लागलेला. ही बदलत्या काळाची किमया साध्या भोळ्या कुंभारांना कळत नाही. दिवसरात्र ओल्या मातीला आकार देणारे हे कुंभार त्या मातीसारखेच मऊ स्वभावाचे. त्यांना इतर अनुसूचित जातीचे फायदे नाहीत. त्यांच्या बायका गाडगी-मडकी डोक्यावर घेऊन विक्रीला गावभर भटकणाऱ्या, तर त्यांचे दादले फिरत्या चाकावर मातीचे गोळे धरून त्यांना गाडग्या-मडक्यांचा आकार देण्यात दंग. त्यांना राग, संताप, संघर्ष माहीतच नाही. पूर्ण दैवाधीन असं हे जगणं.
गरिबी हा सगळ्यात मोठा गुन्हा. कारण तिच्यामुळे माणूस अमानुष होतो आणि त्याला स्वतःच्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळत नाही. सदानंद हा चुणचुणीत मुलगा. वर्गात हुशार. पण बाप गरीब कुंभार. त्याला पुढे शिकवू शकत नाही. हा मग तिरीमिरीत बापाने केलेली गाडगी मडकी एका दांड्याने फोडून टाकून घरातून पळून पुण्याला जातो. अहोरात्र कष्ट करतो. तिथे एस.पी. कॉलेजातून बी.ए. होतो. नोकरी करतो, माणूस म्हणून जगतो.
‘हावठण’ही एका गरीब जमातीची गोष्ट आहे. तिच्यात मानवी प्रेम, द्वेष, लोभ, भय, आनंद इत्यादी भावनांचा तीव्र-सुंदर आविष्कार आहे. कुंभारवाड्यावरच्या हुशार सखारामवर भाळून दुसऱ्या गावातली, दुसऱ्या जातीतली एक तरतरीत पोर, शीला गावात सखारामसोबत पळून लग्न करून येते. तिच्या मागावर तिच्या गावातले काही दांडगे येतात, तेव्हा कुंभारवाड्यावरची गरीब माणसं प्रेमी युगुलाला जंगलात पळून जायला मदत करतात. ते रानात पळून जातात तेव्हा ‘आकाशात नितळ स्वच्छ ऊन पडलं होतं. त्या उन्हात ते प्रेमी जणूकाही वाहून जातायत असं वाटलं’, असं सैल लिहितात.
‘खरंतर कुंभारांनी आजपर्यंत हजारो गणपती केले, पण त्यापैकी एकही कोणाला पावला नाही’, ही व्यथा कुंभारांच्या दारिद्र्याची रूपककथा म्हणून लेखक सादर करतो. अंगावर लक्तरं घालणारे, पावसाळ्यात अर्धपोटी राहाणारे हे कुंभार आणि त्यांच्या कष्टकरी बायकांचं जगणं वाचताना डोळ्याच्या कडा पाणावतात.
पावसाळ्यात बुरुबुरू पाऊस पडतोय. त्यात एक कुंभार तळ्याकाठी ओली माती आणायला जातो. ते ओझं डोक्यावर घेऊन तो बांधावरून कसाबसा चालत येतोय. पोट रिकामं असल्याने तो अशक्त झालाय. त्यामुळे ‘एखादा दारुडा जसा झोकांड्या देतो तशा देत तो गावाकडे परतून येतो’ अशी चित्रमय आणि अर्थपूर्ण वर्णनं ही सैलांच्या निवेदनाची विशेषता आहे.
‘हावठण’ ही फक्त कुंभारवाड्यावरच्या कष्टकरी कुंभारांचीच कथा नाही, तर ती अवघ्या गावाची, तिथल्या लहान-सहान माणसांची, त्यांच्या सुख-दुःखाची, त्यांच्या बारक्यासारक्या आशा-आकांक्षांची कथा आहे. ह्या कथेचा जाणीवपूर्वक रचलेला प्लॉट नाही. कुंभारवाड्यातल्या बाया-माणसांचं संघर्षमय, कारुण्यजनक जगणं आणि जगता जगता बदलणं किंवा विरून जाणं हे ‘हावठण’चं विधान आहे. ह्या कादंबरीचा प्रवाह रानातून शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखा आहे. ह्या नदीत क्वचित भोवरे आहेत, पण इथे उथळ पाण्याचा खळखळाट नाही.
कुठल्याही भारतीय भाषेत अभिजात ठरेल अशी संवेदनशीलता लाभलेले श्री. सैल जगाकडे एका निरागस नजरेने बघतात. रसाळ भाषा, चित्रमय वर्णनं, मानवी अवस्थेबद्दल प्रगाढ आस्था आणि काव्यात्मक शैलीच्या बळावर सैलांनी फक्त कोकणी साहित्यातच नाही, तर भारतीय साहित्यात अमीट ठसा उमटवला आहे. त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!