मनोज जालनावाला
साठच्या दशकात लोककवी हरेंद्र जाधव यांनी 'जलसाकार' म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंबेडकरी विचारधारा पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम केले. पूर्वी कव्वालीच्या माध्यमातून भीमगीतांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होत असे, त्यात ते शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारित अशी अनेक गीते रचलेली आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक भीमगीते, आंबेडकरी चळवळीला आजही मार्गदर्शक ठरतात. 'हे खरंच आहे खरं, श्री भीमराव रामजी आंबेडकर' अशी त्यांची गीते आजही सारा समाज आवडीने एकतो. 'दलितांचा कंठमणी' या कॅसेटमध्ये त्यांनी केलेला बाबासाहेबांचा पोवाडा आजही गाजतो आहे. भगवान बुद्धांच्या जीवनावरील पोवाडाही प्रसिद्ध आहे.
त्यांनी लावणीसाठीही काव्य लिहिली. 'माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू, बाय देव पावलाय गो', 'हिऱ्या मोत्यांचं बाशिंग बांध नवरीला' (रोशन सातारकर), 'मला हवा गं असाच संसार हवा', 'माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो' (सुलोचना चव्हाण), 'बोलणं झालं बाबांचं आईचं, लगीन ठरलं ताईचं' (गायक, संगीत कृष्णा शिंदे), 'आगरान गेलू मी डोंगरान गेलू गो, पायान काटा पायन काटा माजे भरलान गो' (गायक : रंजना शिंदे, संगीत : मधुकर पाठक), 'डोलकरा माझे डोलकरा' (गायिका : सुलोचना चव्हाण, संगीत : विठ्ठल शिंदे) यांसारखी कोळीगीते आजही श्रोते आवडीने ऐकतात.
'सख्या सजणीचा मित्र-मैत्रिणीचा, दिवाळीचा सण भाऊ-बहिणीचा', 'ही मर्दाची धरती जगभर गाजते, महाराष्ट्राची किर्ती जगभर गाजते' (गायक : किसन खरात) यांसारखी महाराष्ट्राची संस्कृती उलगडणारी गीतेही त्यांनी लिहिली.
शरीर थकले असले, तरी अखेरपर्यंत त्यांची लेखणी सुरू राहिली. 'गीत भीमायण' आणि 'गीत रमायण' ही दोन पुस्तके त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहेत. साहित्य सेवेतून लोकरंजनाद्वारे समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी आपल्या लिखाणातून कायम भर दिला. पोवाडे, अभंग, गण-गवळणी, लावण्या, लोकगीते, लोकनाट्ये भक्तीगीते, कथा, भजने अशा प्रकारे कवी हरेंद्र जाधव यांनी चौफेर लिखाण केले आहे.
जाधव यांच्या 'नॉन स्टॉप भीमगीते', 'जय नामांतर' (पोवाडा), 'भीमसूर्य', 'जिवाचा जिव्हाळा', 'कथा भीमरायाची', 'दलितांचा प्राणदाता', 'कथा गौतम बुद्धाची', 'संपूर्ण बुद्ध वंदना', 'वंदन भीमरायाला', 'धुरंदर, महान घटनाकार, घटनापती, ज्ञानसागर, बुद्ध विहार, भारतरत्न भीमराया' (आकाशवाणीवर प्रसारीत लोकनाट्य) या व यासारख्या भरपूर कॅसेट बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची गीते गायक अजित कडकडे, विठ्ठल भेडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, शाहीर कृष्णा शिंदे, शाहीर साबळे, कृष्णा शिंदे, किसन खरात, दत्ता जाधव, शाहीर विठ्ठल उमप, भिकाजी भंडारे, त्यागराज खाडीलकर, अरुण इंगळे, रविंद्र बिजूर, श्रीकांत नारायण, मंगेश दत्त, नितीन डिस्कळकर, स्वप्निल बांदोडकर, छगन चौगुले, श्रीकांत कुलकर्णी, रामदास पाटील, नागसेन सावदेकर, साहेबराव सुरवाडे, अनंत चिपळेकर, प्रमोद खडताळे, दत्ता पाटील, शामकांत वाघमारे, प्रभाकर पांचाळ, विठ्ठल हेदुकर, अनंत मोरे, चंद्रकांत शिंदे, बाबासाहेब साबळे यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी गायली आहेत.
साहित्य सेवेतून लोकरंजनाद्वारे समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी आपल्या लिखाणातून कायम भर दिला. आयुष्यातील ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी साहित्य क्षेत्रात लोकरंजनातून समाजप्रबोधनासाठी दिला; मात्र सरकारकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही. ही खंत त्यांच्या मनामध्ये कायमची राहिली.
-
साठच्या दशकात लोककवी हरेंद्र जाधव यांनी 'जलसाकार' म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंबेडकरी विचारधारा पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम केले. पूर्वी कव्वालीच्या माध्यमातून भीमगीतांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होत असे, त्यात ते शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारित अशी अनेक गीते रचलेली आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक भीमगीते, आंबेडकरी चळवळीला आजही मार्गदर्शक ठरतात. 'हे खरंच आहे खरं, श्री भीमराव रामजी आंबेडकर' अशी त्यांची गीते आजही सारा समाज आवडीने एकतो. 'दलितांचा कंठमणी' या कॅसेटमध्ये त्यांनी केलेला बाबासाहेबांचा पोवाडा आजही गाजतो आहे. भगवान बुद्धांच्या जीवनावरील पोवाडाही प्रसिद्ध आहे.
त्यांनी लावणीसाठीही काव्य लिहिली. 'माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू, बाय देव पावलाय गो', 'हिऱ्या मोत्यांचं बाशिंग बांध नवरीला' (रोशन सातारकर), 'मला हवा गं असाच संसार हवा', 'माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो' (सुलोचना चव्हाण), 'बोलणं झालं बाबांचं आईचं, लगीन ठरलं ताईचं' (गायक, संगीत कृष्णा शिंदे), 'आगरान गेलू मी डोंगरान गेलू गो, पायान काटा पायन काटा माजे भरलान गो' (गायक : रंजना शिंदे, संगीत : मधुकर पाठक), 'डोलकरा माझे डोलकरा' (गायिका : सुलोचना चव्हाण, संगीत : विठ्ठल शिंदे) यांसारखी कोळीगीते आजही श्रोते आवडीने ऐकतात.
'सख्या सजणीचा मित्र-मैत्रिणीचा, दिवाळीचा सण भाऊ-बहिणीचा', 'ही मर्दाची धरती जगभर गाजते, महाराष्ट्राची किर्ती जगभर गाजते' (गायक : किसन खरात) यांसारखी महाराष्ट्राची संस्कृती उलगडणारी गीतेही त्यांनी लिहिली.
शरीर थकले असले, तरी अखेरपर्यंत त्यांची लेखणी सुरू राहिली. 'गीत भीमायण' आणि 'गीत रमायण' ही दोन पुस्तके त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहेत. साहित्य सेवेतून लोकरंजनाद्वारे समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी आपल्या लिखाणातून कायम भर दिला. पोवाडे, अभंग, गण-गवळणी, लावण्या, लोकगीते, लोकनाट्ये भक्तीगीते, कथा, भजने अशा प्रकारे कवी हरेंद्र जाधव यांनी चौफेर लिखाण केले आहे.
जाधव यांच्या 'नॉन स्टॉप भीमगीते', 'जय नामांतर' (पोवाडा), 'भीमसूर्य', 'जिवाचा जिव्हाळा', 'कथा भीमरायाची', 'दलितांचा प्राणदाता', 'कथा गौतम बुद्धाची', 'संपूर्ण बुद्ध वंदना', 'वंदन भीमरायाला', 'धुरंदर, महान घटनाकार, घटनापती, ज्ञानसागर, बुद्ध विहार, भारतरत्न भीमराया' (आकाशवाणीवर प्रसारीत लोकनाट्य) या व यासारख्या भरपूर कॅसेट बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची गीते गायक अजित कडकडे, विठ्ठल भेडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, शाहीर कृष्णा शिंदे, शाहीर साबळे, कृष्णा शिंदे, किसन खरात, दत्ता जाधव, शाहीर विठ्ठल उमप, भिकाजी भंडारे, त्यागराज खाडीलकर, अरुण इंगळे, रविंद्र बिजूर, श्रीकांत नारायण, मंगेश दत्त, नितीन डिस्कळकर, स्वप्निल बांदोडकर, छगन चौगुले, श्रीकांत कुलकर्णी, रामदास पाटील, नागसेन सावदेकर, साहेबराव सुरवाडे, अनंत चिपळेकर, प्रमोद खडताळे, दत्ता पाटील, शामकांत वाघमारे, प्रभाकर पांचाळ, विठ्ठल हेदुकर, अनंत मोरे, चंद्रकांत शिंदे, बाबासाहेब साबळे यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी गायली आहेत.
साहित्य सेवेतून लोकरंजनाद्वारे समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी आपल्या लिखाणातून कायम भर दिला. आयुष्यातील ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी साहित्य क्षेत्रात लोकरंजनातून समाजप्रबोधनासाठी दिला; मात्र सरकारकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही. ही खंत त्यांच्या मनामध्ये कायमची राहिली.
-