अमरेन्द्र धनेश्वर
बॅ. नाथ पै या उदारमतवादाचा मेरुमणी असणाऱ्या अनन्यसाधारण राजकीय नेत्याची जन्मशताब्दी २५ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. त्या निमित्त या मधुरभाषी, शब्दप्रभू नेत्याचे हे स्मृतिचित्र...
'खरा नेता सर्वसंमतीचा फक्त शोध घेऊन समाधान मानत नाही, तो आपल्या प्रयत्नांमधून सर्वसंमती निर्माण करतो,' अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांचा शहीद झालेला नेता मार्टिन ल्यूथर किंग याचे हे उद्गार. स्वतंत्र भारताची संसद आपल्या अमोघ वक्तव्याने गाजविणारे समाजवादी संसदपटू बॅ. नाथ पै हे अशा प्रकारे राजकारणात सर्वसंमती प्रस्थापित करू पाहणारे नेते होते. आपल्या वाक्पटुत्वाने लोकांचे मतपरिवर्तन करण्यावर आणि त्यांना आपल्या मार्गाकडे वळवण्यावर त्यांनी भर दिला. वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी संसदेत प्रवेश केला. १९५७पासून ते १९७०पर्यंत, म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लोकसभेत ते आपल्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने चमकले. २५ सप्टेंबर रोजी या अनन्यसाधारण राजकीय नेत्याची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याची आणि पराक्रम कथेची उजळणी करणे उचित ठरेल.
लोकशाही समाजवादी चळवळीचे स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात सुरुवातीच्या साडेतीन दशकांत महत्त्वाचे स्थान होते. १९४२च्या 'भारत छोडो' आंदोलनात तेव्हाच्या काँग्रेस पक्षातील समाजवादी तरुणांनी असीम त्याग आणि धैर्याचे प्रदर्शन केले. गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला 'चले जाव'चा इशारा देताच त्यांना आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या बहुतांश सदस्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर भूमिगत राहून ब्रिटिश राज्यकर्त्यांना हैराण करणाऱ्या बंडाचे नेतृत्व जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, एस. एम. जोशी आदी समाजवाद्यांनी केले. त्यातून या नेत्यांना आणि त्यांच्या ध्येयनिष्ठ अनुयायांना वलय लाभले. नाथ पै हे विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य आंदोलनाकडे आकृष्ट झाले. १९४२च्या आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला.
सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला करण्याइतपतच हिंसा करावी, मनुष्यहानी होऊ देऊ नये, असा पवित्रा घेऊन समाजवाद्यांनी ही चळवळ चालविण्याचा प्रयत्न केला. बेळगावच्या सीमेवर लष्कराची डेअरी होती. तिच्या समोरील गवताच्या गंजी पेटविणे, बेळगाव-शहापूरला बॉम्बचा कारखाना सुरू करणे, भित्तीपत्रकांना बॉम्ब चिकटविणे वगैरे योजना आखून, पार पाडून नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सतावून सोडले. त्यांना अटक होणे अपरिहार्य होते. त्यांचे चरित्रकार वासू देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे, हँडग्रेनेड आणि डायनामाइट संबंधात नाथना सतत दोन महिने मारहाण करण्यात आली. त्यांच्या छातीला मारझोडीमुळे सूज आली. त्यातूनच त्यांना हृदयविकाराचे दुखणे जडले. मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या वेताच्या छडीने (सुंद्री) मारहाण करणे; तसेच मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या वहाणेने झोडपून काढणे (भरमाप्पा) असे शारीरीक छळाचे प्रकारही नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहन केले.
स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागामुळे आणि स्वातंत्र्योत्तर काळात श्रमिकांचे लढे लढल्यामुळे, समाजवाद्यांची लढाऊ प्रतिमा लोकांसमोर आली. या शिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलन यांतही उडी घेऊन कर्तव्यपरायणता सिद्ध केल्यामुळे, त्यांना निवडणुकांमध्ये मर्यादित का असेना; पण यश मिळत गेले. या चळवळीने भारतातील संसदीय लोकशाहीला बहुमोल योगदान दिले आहे. अनेक कर्तृत्ववान संसद सदस्यांनी वक्तृत्वगुणाच्या जोरावर, अध्ययनाच्या आधारे आणि बांधिलकीने संसदेच्या व्यासपीठाचा श्रमिकांच्या व एकूण देशवासियांच्या हितासाठी उपयोग केला. या मालिकेत राममनोहर लोहिया, मधू लिमये, ह. वि. कामथ, हेम बरुआ, सुरेंद्रनाथ द्विवेदी, मधू दंडवते, रवी राय, जॉर्ज फर्नांडिस यांच्याइतकेच महत्त्वाचे नाव बॅ. नाथ पै यांचे आहे. १९५७मध्ये ते कोकणातल्या राजापूर मतदार संघातून लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर सतत, म्हणजे १९७१मध्ये अकाली मृत्यू होईपर्यंत ते आपल्या पल्लेदार आणि शैलीदार भाषणांनी लोकसभा गाजवत राहिले. १९६२मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे फक्त तीन खासदार निवडून आले होते; पण केवळ संख्याबळ महत्त्वाचे नसते. गुणवत्ताही तितकीच; किंबहुना अधिक महत्त्वाची असते, याविषयी नाथ पैंना प्रचंड आत्मविश्वास होता. ते म्हणत, 'मी, सुरेंद्रनाथ द्विवेदी आणि हेम बरुआ असे आम्ही तिघेच असलो, तरी सत्ताधारी पक्षाला निश्चित धारेवर धरू.'
नाथ पैंचे संसदेतील पहिले भाषण संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरचे होते. त्या भाषणातला आवेग, निर्धार, सुस्पष्ट विचार आणि मांडणी ऐकून, संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. सभापती हुकूमसिंह यांनी आपल्या आसनावरून खाली येऊन, या नवनिर्वाचित खासदाराची पाठ थोपटली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नाथ पैंना आपल्या कक्षात आमंत्रित करून त्यांचे आभिनंदन केले. 'मूक जनतेच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी संसदेच्या मंचाचा उपयोग करा,' असा वडिलकीचा आणि मित्रत्वाचा सल्लाही दिला, ही गोष्ट नेहरूंविषयीही बरेच काही सांगून जाते. नाथ पैंना नेहरू न्याहरीसाठी आपल्या घरी बोलावत आणि विविध प्रश्नांवरील त्यांचे मते आस्थापूर्वक ऐकून घेत. असे सौजन्य आणि सौहार्द राजकारणातून केव्हाच लुप्त झाले आहे.
नाथ पैंची लोकसभेतील भाषणे चांगलीच गाजली. त्यांच्या समकालीनांमध्ये हिरेन मुखर्जी, इंद्रजित सेनगुप्ता, ए. के. गोपालन, आचार्य कृपलानी, मिनू मसानी, प्रकाशवीर शास्त्री इत्यादी मुरब्बी नेते आणि वक्ते होते. हिरेन मुखर्जींच्या केंब्रिज उच्चारण शैलीच्या इंग्रजी भाषेची सर्वत्र वाखाणणी होत असे; पण तरीही संसदपटू मधू लिमये यांनी नमूद केल्याप्रमाणे, इंग्रजी भाषेत भाषण करणारे सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून नाथ पैंचेच नाव घ्यावे लागेल. तिसऱ्या लोकसभेत परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना त्यांनी टीका केली होती, की स्वातंत्र्योत्तर काळातही देशाचे परराष्ट्र धोरण परतंत्र राष्ट्रासारखेच चालविले जात आहे. 'एका थोर, स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राच्या स्वाभिमानाला, हिताला आणि दर्जाला साजेसा बदल या धोरणात करायला हवा.'
सोव्हिएत युनियन आपल्या अधिकाराखाली असणाऱ्या देशांमध्ये लोकशाहीचे थोडेफार अंकुर दृष्टोत्पत्तीस आले, तर तिथे सैन्य आणि रणगाडे पाठवून ते चिरडून टाकत असे. १९५६मध्ये हंगेरीत, १९६८मध्ये झेकोस्लोव्हाकियात लोकशाहीचा प्रयोग असाच उधळून टाकण्यात आला होता. भारत सरकारने यावर गुळमुळीत धोरण स्वीकारले होते. त्यावर प्रखर टीका करताना, नाथ पैंनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान चेंबर्लेन यांनी हिटलरला झेकोस्लोव्हाकिया पादाक्रांत करू दिल्याबद्दल नेहरूंनी जी उद्विग्नता व्यक्त केली होती, तिचा दाखला देऊन इंदिरा गांधींना निरुत्तर केले होते.
नाथ पैंच्या घुमारदार आवाजात कमालीचे मार्दव होते. एखाद्या रियाजी गवयाच्या आवाजात असते तसे. मराठी आणि इंग्रजी भाषेवर अफाट प्रभुत्व. वाणी ओघवती. संस्कृत सुभाषित आणि श्लोक ते सहजासहजी उद्धृत करीत. कुसुमाग्रज, बोरकर, बापट, पाडगावकर यांच्या काव्यपंक्ती त्यांच्या ओठांवर असत. तेच शेक्सपिअर आणि बाउनिंगबाबत म्हणता येईल. त्यांच्या वाग्विलासाचा दिाग्विजयी आविष्कार मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात श्रोत्यांनी अनुभवला होता. लोकशाहीत घटनादुरुस्तीचा अमर्याद अधिकार संसदेला आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानुसार त्यांनी एक विधेयक संसदेत मांडले होते. घटनातज्ज्ञ बॅ. नाना पालखीवाला यांचे मत विरुद्ध टोकाचे हेते. त्यांचा वादविवाद/जाहीर चर्चा घडवून आणण्याची कल्पना, सरकारी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बलसारा यांच्या डोक्यातून निघाली. नाथ पैंनी आपल्या आर्जवी आणि आग्रही प्रतिपादनाच्या जोरावर सभा जिंकली. नाथ पैंचा हेतू उदात्त होता; पण त्यांच्या युक्तिवादात हुकूमशाहीची बीजे दडली होती, हे त्यांच्या ध्यानात आले नसावे. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आणि त्या बरोबरच्या घटना दुरुस्ती संसदेतल्या पाशवी बहुमताच्या आधारेच रेटल्या होत्या. आता तर घटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूपच पाशवी बहुमताच्या जोरावर बदलण्याच्या वल्गना केल्या जात आहेत.
ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया वगैरे पाश्चात्य देशांतील कल्याणकारी राजवटींच्या समाजवादाचा प्रभाव, भारतातील काही समाजवादी नेत्यांवर पडला होता. मिनू मसानी, अशोक मेहता किंवा युसूफ मेहरअली त्यात होते. नाथ पैं ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेले होते. तिथे मजूर पक्ष; तसेच इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट यूथशी त्यांचा निकटचा संबंध आला. मजूर पक्षाच्या धुरीणांनी नाथ पैंचे गुण हेरले होते. मजूर पक्षामुळे कामगार संघटनांच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आणि भारतात परतल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात; तसेच कामगारांच्या अन्य चळवळींमध्ये ते सक्रीय राहिले.
१९७१मध्ये बांगला देशाचा पेचप्रसंग सुरू झाल्यानंतर, पंतप्रधान इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायण यांना विविध पाश्चात्य लोकशाही देशांना भेट देऊन भारताची भूमिका समजावून सांगण्याची विनंती केली होती. जेपींनी ही जबाबदारी फार खुबीने पार पाडली. नाथ पैंनी गोव्यावर भारताचा कसा आधिकार आहे आणि तो कसा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे पाश्चात्य देशांतील विविध व्यासपीठांमधून समजावून सांगितले. भारत सरकारवर नववसाहत वादाचा आरोप करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा प्रचार त्यामुळे निष्प्रभ ठरला. ब्रिटन, हॉलंड, स्वीडन, फिनलंड, नॉर्वे वगैरे देशांमधल्या मजूर पक्षाने गोवा मुक्ती संग्रामाला पाठिंबा जाहीर केला, त्याला नाथ पैंची यशस्वी शिष्टाई कारणीभूत होती.
पाश्चात्य लोकशाही प्रणालीच्या अध्ययनातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून नाथ पैंना उदारमतवादाची शिकवण मिळाली होती. ती त्यांनी अंगी बाणवली आणि आचरणात आणली. उदारमतवादी विचार आणि आचाराला अकारण 'बूज्र्वा' अथवा क्रांतिद्रोही ठरविण्याची पद्धत कम्युनिझमच्या प्रभावामुळे बोकाळली होती. नाथ पैंसारखा विनयशील मधुरभाषी, शब्दप्रभू आणि सुसंस्कृत नेता उदारमतवादाचा मेरुमणी होता. गेली काही वर्षे राजकारणातूनच नव्हे, तर एकूण सार्वजनिक जीवनातून आदब, ऋYजुता आणि सभ्यतापूर्ण व्यवहार हद्दपार झाला आहे. परमतसहिष्णुता तर नावालाही उरलेली नाही. आपल्यापेक्षा भिन्न मत बाळगणाऱ्यांवर किंवा विरोधी मत नोंदविणाऱ्यांवर सर्रास 'देशद्रोही' असा शिक्का मारून, त्यांच्या विरोधात अपप्रचाराची राळ समाजमाध्यमांमधून उडविली जाते. अशा वेळी आपल्या शालीन व्यक्तिमत्वातून विरोधकांनाही भुरळ घालणाऱ्या बॅ. नाथ पैंची आठवण येणे स्वाभाविक आहे. पु. ल. देशपांडे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षाच्या बाजूने झंझावाती प्रचार करीत; पण ती त्यांची पहिली खेप नव्हती. १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी नाथ पैंच्या प्रचारात सक्रीय भूमिका वठवली होती. 'नाथ हा माझा मोही खलां' असे ते नाथ पैंचे वर्णन करीत असत.
नाथ पैंचे बालपण बेळगावात गेले. बेळगाव, कारवार, निपाणी हे भाग महाराष्ट्रात समविष्ट व्हावेत, यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. या उद्दिष्टासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत झगडत राहिले. बेळगावातच १६ जानेवारी १९७१ रोजी रात्री जाहीर सभेत भाषण केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. सीमा प्रश्नावरून १९६९मध्ये मुंबईत शिवसेनेने हिंसक आंदोलन करत उडपी खाद्यगृहांचा विध्वंस केला होता. दादर, परळ भागातल्या दंगलग्रस्त उडप्यांशी वार्तालाप करून आणि त्यांचे अश्रू पुसून नाथ पैंनी सहानुभूती व्यक्त केली होती, हे अनेकांना आठवत असेल.
युसुफ मेहरअली वयाची पन्नाशी गाठण्यापूर्वीच निधन पावले. नाथ पैंची जीवनयात्राही वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी संपली. हा समाजवादी तारा अकाली निखळला नसता, तर देशाच्या राजकारणाला विधायक वळण देण्यात त्याने कळीची भूमिका बजावली असती, याबाबत शंका नाही.
बॅ. नाथ पै या उदारमतवादाचा मेरुमणी असणाऱ्या अनन्यसाधारण राजकीय नेत्याची जन्मशताब्दी २५ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. त्या निमित्त या मधुरभाषी, शब्दप्रभू नेत्याचे हे स्मृतिचित्र...
'खरा नेता सर्वसंमतीचा फक्त शोध घेऊन समाधान मानत नाही, तो आपल्या प्रयत्नांमधून सर्वसंमती निर्माण करतो,' अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांचा शहीद झालेला नेता मार्टिन ल्यूथर किंग याचे हे उद्गार. स्वतंत्र भारताची संसद आपल्या अमोघ वक्तव्याने गाजविणारे समाजवादी संसदपटू बॅ. नाथ पै हे अशा प्रकारे राजकारणात सर्वसंमती प्रस्थापित करू पाहणारे नेते होते. आपल्या वाक्पटुत्वाने लोकांचे मतपरिवर्तन करण्यावर आणि त्यांना आपल्या मार्गाकडे वळवण्यावर त्यांनी भर दिला. वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी संसदेत प्रवेश केला. १९५७पासून ते १९७०पर्यंत, म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लोकसभेत ते आपल्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने चमकले. २५ सप्टेंबर रोजी या अनन्यसाधारण राजकीय नेत्याची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याची आणि पराक्रम कथेची उजळणी करणे उचित ठरेल.
लोकशाही समाजवादी चळवळीचे स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात सुरुवातीच्या साडेतीन दशकांत महत्त्वाचे स्थान होते. १९४२च्या 'भारत छोडो' आंदोलनात तेव्हाच्या काँग्रेस पक्षातील समाजवादी तरुणांनी असीम त्याग आणि धैर्याचे प्रदर्शन केले. गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला 'चले जाव'चा इशारा देताच त्यांना आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या बहुतांश सदस्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर भूमिगत राहून ब्रिटिश राज्यकर्त्यांना हैराण करणाऱ्या बंडाचे नेतृत्व जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, एस. एम. जोशी आदी समाजवाद्यांनी केले. त्यातून या नेत्यांना आणि त्यांच्या ध्येयनिष्ठ अनुयायांना वलय लाभले. नाथ पै हे विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य आंदोलनाकडे आकृष्ट झाले. १९४२च्या आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला.
सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला करण्याइतपतच हिंसा करावी, मनुष्यहानी होऊ देऊ नये, असा पवित्रा घेऊन समाजवाद्यांनी ही चळवळ चालविण्याचा प्रयत्न केला. बेळगावच्या सीमेवर लष्कराची डेअरी होती. तिच्या समोरील गवताच्या गंजी पेटविणे, बेळगाव-शहापूरला बॉम्बचा कारखाना सुरू करणे, भित्तीपत्रकांना बॉम्ब चिकटविणे वगैरे योजना आखून, पार पाडून नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सतावून सोडले. त्यांना अटक होणे अपरिहार्य होते. त्यांचे चरित्रकार वासू देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे, हँडग्रेनेड आणि डायनामाइट संबंधात नाथना सतत दोन महिने मारहाण करण्यात आली. त्यांच्या छातीला मारझोडीमुळे सूज आली. त्यातूनच त्यांना हृदयविकाराचे दुखणे जडले. मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या वेताच्या छडीने (सुंद्री) मारहाण करणे; तसेच मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या वहाणेने झोडपून काढणे (भरमाप्पा) असे शारीरीक छळाचे प्रकारही नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहन केले.
स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागामुळे आणि स्वातंत्र्योत्तर काळात श्रमिकांचे लढे लढल्यामुळे, समाजवाद्यांची लढाऊ प्रतिमा लोकांसमोर आली. या शिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलन यांतही उडी घेऊन कर्तव्यपरायणता सिद्ध केल्यामुळे, त्यांना निवडणुकांमध्ये मर्यादित का असेना; पण यश मिळत गेले. या चळवळीने भारतातील संसदीय लोकशाहीला बहुमोल योगदान दिले आहे. अनेक कर्तृत्ववान संसद सदस्यांनी वक्तृत्वगुणाच्या जोरावर, अध्ययनाच्या आधारे आणि बांधिलकीने संसदेच्या व्यासपीठाचा श्रमिकांच्या व एकूण देशवासियांच्या हितासाठी उपयोग केला. या मालिकेत राममनोहर लोहिया, मधू लिमये, ह. वि. कामथ, हेम बरुआ, सुरेंद्रनाथ द्विवेदी, मधू दंडवते, रवी राय, जॉर्ज फर्नांडिस यांच्याइतकेच महत्त्वाचे नाव बॅ. नाथ पै यांचे आहे. १९५७मध्ये ते कोकणातल्या राजापूर मतदार संघातून लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर सतत, म्हणजे १९७१मध्ये अकाली मृत्यू होईपर्यंत ते आपल्या पल्लेदार आणि शैलीदार भाषणांनी लोकसभा गाजवत राहिले. १९६२मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे फक्त तीन खासदार निवडून आले होते; पण केवळ संख्याबळ महत्त्वाचे नसते. गुणवत्ताही तितकीच; किंबहुना अधिक महत्त्वाची असते, याविषयी नाथ पैंना प्रचंड आत्मविश्वास होता. ते म्हणत, 'मी, सुरेंद्रनाथ द्विवेदी आणि हेम बरुआ असे आम्ही तिघेच असलो, तरी सत्ताधारी पक्षाला निश्चित धारेवर धरू.'
नाथ पैंचे संसदेतील पहिले भाषण संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरचे होते. त्या भाषणातला आवेग, निर्धार, सुस्पष्ट विचार आणि मांडणी ऐकून, संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. सभापती हुकूमसिंह यांनी आपल्या आसनावरून खाली येऊन, या नवनिर्वाचित खासदाराची पाठ थोपटली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नाथ पैंना आपल्या कक्षात आमंत्रित करून त्यांचे आभिनंदन केले. 'मूक जनतेच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी संसदेच्या मंचाचा उपयोग करा,' असा वडिलकीचा आणि मित्रत्वाचा सल्लाही दिला, ही गोष्ट नेहरूंविषयीही बरेच काही सांगून जाते. नाथ पैंना नेहरू न्याहरीसाठी आपल्या घरी बोलावत आणि विविध प्रश्नांवरील त्यांचे मते आस्थापूर्वक ऐकून घेत. असे सौजन्य आणि सौहार्द राजकारणातून केव्हाच लुप्त झाले आहे.
नाथ पैंची लोकसभेतील भाषणे चांगलीच गाजली. त्यांच्या समकालीनांमध्ये हिरेन मुखर्जी, इंद्रजित सेनगुप्ता, ए. के. गोपालन, आचार्य कृपलानी, मिनू मसानी, प्रकाशवीर शास्त्री इत्यादी मुरब्बी नेते आणि वक्ते होते. हिरेन मुखर्जींच्या केंब्रिज उच्चारण शैलीच्या इंग्रजी भाषेची सर्वत्र वाखाणणी होत असे; पण तरीही संसदपटू मधू लिमये यांनी नमूद केल्याप्रमाणे, इंग्रजी भाषेत भाषण करणारे सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून नाथ पैंचेच नाव घ्यावे लागेल. तिसऱ्या लोकसभेत परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना त्यांनी टीका केली होती, की स्वातंत्र्योत्तर काळातही देशाचे परराष्ट्र धोरण परतंत्र राष्ट्रासारखेच चालविले जात आहे. 'एका थोर, स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राच्या स्वाभिमानाला, हिताला आणि दर्जाला साजेसा बदल या धोरणात करायला हवा.'
सोव्हिएत युनियन आपल्या अधिकाराखाली असणाऱ्या देशांमध्ये लोकशाहीचे थोडेफार अंकुर दृष्टोत्पत्तीस आले, तर तिथे सैन्य आणि रणगाडे पाठवून ते चिरडून टाकत असे. १९५६मध्ये हंगेरीत, १९६८मध्ये झेकोस्लोव्हाकियात लोकशाहीचा प्रयोग असाच उधळून टाकण्यात आला होता. भारत सरकारने यावर गुळमुळीत धोरण स्वीकारले होते. त्यावर प्रखर टीका करताना, नाथ पैंनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान चेंबर्लेन यांनी हिटलरला झेकोस्लोव्हाकिया पादाक्रांत करू दिल्याबद्दल नेहरूंनी जी उद्विग्नता व्यक्त केली होती, तिचा दाखला देऊन इंदिरा गांधींना निरुत्तर केले होते.
नाथ पैंच्या घुमारदार आवाजात कमालीचे मार्दव होते. एखाद्या रियाजी गवयाच्या आवाजात असते तसे. मराठी आणि इंग्रजी भाषेवर अफाट प्रभुत्व. वाणी ओघवती. संस्कृत सुभाषित आणि श्लोक ते सहजासहजी उद्धृत करीत. कुसुमाग्रज, बोरकर, बापट, पाडगावकर यांच्या काव्यपंक्ती त्यांच्या ओठांवर असत. तेच शेक्सपिअर आणि बाउनिंगबाबत म्हणता येईल. त्यांच्या वाग्विलासाचा दिाग्विजयी आविष्कार मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात श्रोत्यांनी अनुभवला होता. लोकशाहीत घटनादुरुस्तीचा अमर्याद अधिकार संसदेला आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानुसार त्यांनी एक विधेयक संसदेत मांडले होते. घटनातज्ज्ञ बॅ. नाना पालखीवाला यांचे मत विरुद्ध टोकाचे हेते. त्यांचा वादविवाद/जाहीर चर्चा घडवून आणण्याची कल्पना, सरकारी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बलसारा यांच्या डोक्यातून निघाली. नाथ पैंनी आपल्या आर्जवी आणि आग्रही प्रतिपादनाच्या जोरावर सभा जिंकली. नाथ पैंचा हेतू उदात्त होता; पण त्यांच्या युक्तिवादात हुकूमशाहीची बीजे दडली होती, हे त्यांच्या ध्यानात आले नसावे. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आणि त्या बरोबरच्या घटना दुरुस्ती संसदेतल्या पाशवी बहुमताच्या आधारेच रेटल्या होत्या. आता तर घटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूपच पाशवी बहुमताच्या जोरावर बदलण्याच्या वल्गना केल्या जात आहेत.
ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया वगैरे पाश्चात्य देशांतील कल्याणकारी राजवटींच्या समाजवादाचा प्रभाव, भारतातील काही समाजवादी नेत्यांवर पडला होता. मिनू मसानी, अशोक मेहता किंवा युसूफ मेहरअली त्यात होते. नाथ पैं ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेले होते. तिथे मजूर पक्ष; तसेच इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट यूथशी त्यांचा निकटचा संबंध आला. मजूर पक्षाच्या धुरीणांनी नाथ पैंचे गुण हेरले होते. मजूर पक्षामुळे कामगार संघटनांच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आणि भारतात परतल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात; तसेच कामगारांच्या अन्य चळवळींमध्ये ते सक्रीय राहिले.
१९७१मध्ये बांगला देशाचा पेचप्रसंग सुरू झाल्यानंतर, पंतप्रधान इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायण यांना विविध पाश्चात्य लोकशाही देशांना भेट देऊन भारताची भूमिका समजावून सांगण्याची विनंती केली होती. जेपींनी ही जबाबदारी फार खुबीने पार पाडली. नाथ पैंनी गोव्यावर भारताचा कसा आधिकार आहे आणि तो कसा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे पाश्चात्य देशांतील विविध व्यासपीठांमधून समजावून सांगितले. भारत सरकारवर नववसाहत वादाचा आरोप करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा प्रचार त्यामुळे निष्प्रभ ठरला. ब्रिटन, हॉलंड, स्वीडन, फिनलंड, नॉर्वे वगैरे देशांमधल्या मजूर पक्षाने गोवा मुक्ती संग्रामाला पाठिंबा जाहीर केला, त्याला नाथ पैंची यशस्वी शिष्टाई कारणीभूत होती.
पाश्चात्य लोकशाही प्रणालीच्या अध्ययनातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून नाथ पैंना उदारमतवादाची शिकवण मिळाली होती. ती त्यांनी अंगी बाणवली आणि आचरणात आणली. उदारमतवादी विचार आणि आचाराला अकारण 'बूज्र्वा' अथवा क्रांतिद्रोही ठरविण्याची पद्धत कम्युनिझमच्या प्रभावामुळे बोकाळली होती. नाथ पैंसारखा विनयशील मधुरभाषी, शब्दप्रभू आणि सुसंस्कृत नेता उदारमतवादाचा मेरुमणी होता. गेली काही वर्षे राजकारणातूनच नव्हे, तर एकूण सार्वजनिक जीवनातून आदब, ऋYजुता आणि सभ्यतापूर्ण व्यवहार हद्दपार झाला आहे. परमतसहिष्णुता तर नावालाही उरलेली नाही. आपल्यापेक्षा भिन्न मत बाळगणाऱ्यांवर किंवा विरोधी मत नोंदविणाऱ्यांवर सर्रास 'देशद्रोही' असा शिक्का मारून, त्यांच्या विरोधात अपप्रचाराची राळ समाजमाध्यमांमधून उडविली जाते. अशा वेळी आपल्या शालीन व्यक्तिमत्वातून विरोधकांनाही भुरळ घालणाऱ्या बॅ. नाथ पैंची आठवण येणे स्वाभाविक आहे. पु. ल. देशपांडे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षाच्या बाजूने झंझावाती प्रचार करीत; पण ती त्यांची पहिली खेप नव्हती. १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी नाथ पैंच्या प्रचारात सक्रीय भूमिका वठवली होती. 'नाथ हा माझा मोही खलां' असे ते नाथ पैंचे वर्णन करीत असत.
नाथ पैंचे बालपण बेळगावात गेले. बेळगाव, कारवार, निपाणी हे भाग महाराष्ट्रात समविष्ट व्हावेत, यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. या उद्दिष्टासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत झगडत राहिले. बेळगावातच १६ जानेवारी १९७१ रोजी रात्री जाहीर सभेत भाषण केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. सीमा प्रश्नावरून १९६९मध्ये मुंबईत शिवसेनेने हिंसक आंदोलन करत उडपी खाद्यगृहांचा विध्वंस केला होता. दादर, परळ भागातल्या दंगलग्रस्त उडप्यांशी वार्तालाप करून आणि त्यांचे अश्रू पुसून नाथ पैंनी सहानुभूती व्यक्त केली होती, हे अनेकांना आठवत असेल.
युसुफ मेहरअली वयाची पन्नाशी गाठण्यापूर्वीच निधन पावले. नाथ पैंची जीवनयात्राही वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी संपली. हा समाजवादी तारा अकाली निखळला नसता, तर देशाच्या राजकारणाला विधायक वळण देण्यात त्याने कळीची भूमिका बजावली असती, याबाबत शंका नाही.