अमेय गुप्ते
लेखक दीपक बीचे यांचे 'संत शिरोमणी बाबा नामदेव' हे संत नामदेवांचे महत्त्वपूर्ण चरित्र अतिशय वाचनीय झाले आहे. नामदेवांचे योगदान आपल्या महाराष्ट्रासाठी फार मोठे असून भागवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत त्यांनी पोहचवली. पंजाबमधील घुमान मध्ये वारकरी पंथाची बीजे रोवून स्वार्थ, परमार्थ, इहलोक, परलोक, यांचा समन्वय करून भागवत धर्माचा प्रसार त्यांनी कसा केला त्याची यथार्थ माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. शीखांच्या 'गुरुग्रंथसाहिबा' या पवित्र ग्रंथात 'नामदेवजी की मुखबानी' असा स्वतंत्र विभाग असून त्यांच्या वाणीला प्राप्त झालेले विश्वव्यापी परिणाम आपल्या महाराष्ट्राचे भूषण ठरले आहे.
पुस्तकात नामदेवांच्या तीर्थयात्रांचा तपशील, अभंगवाणीची वैशिष्टे, नामदेवांचे शिष्यगण, शीखधर्म आणि नामदेवांचा अनुबंध, राष्ट्रीय एकात्मता अशी विविध प्रकरणे असून लेखकाने साध्या सोप्या शब्दांत त्यांची मांडणी केली आहे. नामदेवांच्या ६१ रचना या त्यांना अवगत असणाऱ्या गुजरी, सोरत, धनश्री, तोडी, तिलंग, रामकली, बिलावल, बसंत, सारंग, मल्हार, प्रभाती, कानडा, या रागांवरील असून या रचनांना शीखसमाजात मिळालेले पवित्र स्थान आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या ६१ अभंगांचा अर्थ लेखकाने विस्तृतपणे मराठीत दिला आहे. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' हे नामदेवांचे महाराष्ट्रातील ब्रीदवाक्य तर, 'नामे नारायण नही भेद' हे पंजाब मधील ब्रीदवाक्य. पंजाबमध्ये नामदेवांची मंदिरे असून, तेथे दररोज पूजा-अर्चा चालते, तसेच त्यांची जयंती-पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी होते. साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची विस्तृत प्रस्तावनेमुळे या पुस्तकाला आणखी एक वैचारिक पैलू प्राप्त झाला आहे.
..........................................................................
संत शिरोमणी बाबा नामदेव
लेखक : दीपक बीचे
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स ,पुणे
पृष्ठं : ३२०
किंमत : ३५० रु.
लेखक दीपक बीचे यांचे 'संत शिरोमणी बाबा नामदेव' हे संत नामदेवांचे महत्त्वपूर्ण चरित्र अतिशय वाचनीय झाले आहे. नामदेवांचे योगदान आपल्या महाराष्ट्रासाठी फार मोठे असून भागवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत त्यांनी पोहचवली. पंजाबमधील घुमान मध्ये वारकरी पंथाची बीजे रोवून स्वार्थ, परमार्थ, इहलोक, परलोक, यांचा समन्वय करून भागवत धर्माचा प्रसार त्यांनी कसा केला त्याची यथार्थ माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. शीखांच्या 'गुरुग्रंथसाहिबा' या पवित्र ग्रंथात 'नामदेवजी की मुखबानी' असा स्वतंत्र विभाग असून त्यांच्या वाणीला प्राप्त झालेले विश्वव्यापी परिणाम आपल्या महाराष्ट्राचे भूषण ठरले आहे.
पुस्तकात नामदेवांच्या तीर्थयात्रांचा तपशील, अभंगवाणीची वैशिष्टे, नामदेवांचे शिष्यगण, शीखधर्म आणि नामदेवांचा अनुबंध, राष्ट्रीय एकात्मता अशी विविध प्रकरणे असून लेखकाने साध्या सोप्या शब्दांत त्यांची मांडणी केली आहे. नामदेवांच्या ६१ रचना या त्यांना अवगत असणाऱ्या गुजरी, सोरत, धनश्री, तोडी, तिलंग, रामकली, बिलावल, बसंत, सारंग, मल्हार, प्रभाती, कानडा, या रागांवरील असून या रचनांना शीखसमाजात मिळालेले पवित्र स्थान आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या ६१ अभंगांचा अर्थ लेखकाने विस्तृतपणे मराठीत दिला आहे. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' हे नामदेवांचे महाराष्ट्रातील ब्रीदवाक्य तर, 'नामे नारायण नही भेद' हे पंजाब मधील ब्रीदवाक्य. पंजाबमध्ये नामदेवांची मंदिरे असून, तेथे दररोज पूजा-अर्चा चालते, तसेच त्यांची जयंती-पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी होते. साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची विस्तृत प्रस्तावनेमुळे या पुस्तकाला आणखी एक वैचारिक पैलू प्राप्त झाला आहे.
..........................................................................
संत शिरोमणी बाबा नामदेव
लेखक : दीपक बीचे
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स ,पुणे
पृष्ठं : ३२०
किंमत : ३५० रु.