निपुण धर्माधिकारी
मी जवळ जवळ १४ वर्षांपूर्वी नाट्यक्षेत्रात काम करायला लागलो. पहिली पायरी अर्थातच ‘पुरुषोत्तम करंडक’. पण आमच्या सीनियर्सने आम्हाला तिकडेच थांबू दिलं नाही. आमचा हात धरून विविध प्रायोगिक नाट्यसंस्थांच्या नाटकात आम्हाला सहभागी केलं, नाटकाच्या विविध कार्यशाळांना घेऊन गेले, अनेक नाटकं दाखवली, विचार करायची एक दिशा दिली... थोडक्यात आमच्यावर संस्कार केले! तेव्हा वय कमी होतं. फार जबाबदारी नव्हती. एकतर अभिनय करायचा किंवा रंगमंच व्यवस्था. अगदीच कधीतरी संगीत संयोजन. पडेल ते काम करायची तयारी. त्यात अमेय वाघ आणि मी हजरजबाबी (आगाऊ) असल्याने आमची थोडी ख्याती पसरली. अर्थात, काही लोकांना ते आवडायचं पण नाही. पण ‘नवीन, लहान पोरं आहेत’ म्हणत ते चालून जायचं. त्यात कामाच्या वेळेस फक्त आणि फक्त काम करत असल्याने तसा बहुतेक कोणाला आमचा त्रास व्हायचा नाही. बहुतेक. जबाबदारी कमी होती, मजा होती!
दोन वर्षात ‘पुरुषोत्तम’ची दिग्दर्शनाची धुरा मला सांभाळायला लागली. १८चा होतो तेव्हा. आपोआप मोठं झाल्याची जाणीव होऊ लागली. आपण म्हणू ते आजूबाजूचे ऐकत आहेत, बारकाईने आपल्याकडे बघत आहेत असं जाणवलं. मजा-मजा करण्याचा स्वभाव थोडा बदलू लागला. त्यात त्यावर्षीच्या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाला, अनेक पारितोषिकं मिळाली. त्यामुळे लोक वेगळ्या नजरेने पाहू लागलेत हे जाणवलं. तसं बघायला गेलं तर वयाने फार मोठा नव्हतो, पण अगदीच लहानही नव्हतो. (आपण नेमके लहान आहोत की मोठे हे कसं आणि कोण ठरवणार आणि आपण जे केलं आहे ते कितपत भारी आहे असा मला नेहमी प्रश्न पडायचा. पण त्याचं उत्तर सचिन तेंडुलकरच्या स्वरूपात मिळालं. तो साधारण १८ व्या वर्षी संपूर्ण देशाच्या आकांशा एकट्याच्या खांद्यावर समर्थपणे उचलायचा. त्याच्यासमोर आपलं त्या वयातलं कर्तृत्व नगण्य होतं. त्यामुळे आपण १८ चे होऊन फारसं काहीच कमावलं नाहीये याची सतत जाणीव होती आणि त्याने जमिनीवर राहायला मदत झाली. आणि त्याच्या उदाहरणाने ती सतत होत राहील.)
‘लागला असेल तुक्का’ किंवा ‘घडून गेलं असेल त्याच्या हातून’ किंवा ‘त्याच्या नावावर तिसऱ्या कोणीतरीच दिग्दर्शन केलं असेल’ असाही काही लोकांचा आवाज येऊ लागला. माझ्या सुदैवाने मी जे लगेच पुढचं नाटक दिग्दर्शित केलं, त्यालाही सगळीकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला आणि तात्पुरते का होईना, ते आवाज कमी ऐकू येऊ लागले. पण आता ओझं टाकण्यात आलं ते सातत्य राखण्याचं! आणि पुढची अनेक वर्षं मी त्या ओझ्याखाली झुकलो!
पुढची जवळ जवळ ९-१० वर्षं विविध नाटकं करून पहिली. अजूनही पाहतोय. ‘करून पाहिली’ म्हणतोय कारण नाटकाच्या खेळाला आपणही ‘प्रयोग’ म्हणतो. प्रयोग करत राहिलो, नाटकाच्या प्रकारांमध्ये, त्यांच्या सादरीकरणांमध्ये, कलाकारांमध्ये! माझ्या नशिबाने विविध प्रकारची नाटकं बघायला मिळाली. भारतातली, परदेशातली. लोकांना भेटायला मिळालं. कमीच आहे. अजून फार बघता येईल आणि भेटता येईल! पण या सगळ्या अनुभवातून काही न काही मिळत गेलं.
तसंच, जे प्रयोग करत होतो त्याबद्दलही प्रतिक्रिया मिळत होत्या. सगळे येणारे अनुभव पहिले-वहिलेच, त्यामुळे थोडं विचित्रही वाटत होतं. बऱ्याचदा सखोल प्रतिक्रिया या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून मिळतात. आणि त्यांचं नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. काही उदाहरणं म्हणजे, जेव्हा मी संगीत नाटक केलं तेव्हा काही जण येऊन म्हणाले की, कशाला करायचं परत तेच! तू नवीन काहीतरी कर, काय पुन्हा तेच तेच! अजून खोलात जाऊन काही लोकांनी नेपथ्य कसं चुकलंय, किंवा नटी-सूत्रधार असे कसे चालत आले, किंवा काही काही पात्र/संवाद कसे काय काढले असे प्रश्न केले. एकाच नाटकाच्या काही परीक्षणांत कसा मी नवीन, ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे असं म्हंटलं गेलं. तसंच इतर काहींमध्ये कसं मला नाटक झेपलंच नाहीये, असं ठरवून टाकण्यात आलं. जेव्हा पुन्हा काही नवीन केलं तेव्हा, कशी माझ्यातली सर्जनशीलता कमी झाली आहे, असं अगदी ‘निकट’च्या लोकांनी सांगितलं, वागण्यातून दाखवलं. ‘Intellectual statement’ कसं होत नाहीये वगैरे वगैरे. कौतुक करणारेही होते. पण माझा स्वभाव बहुतेक टीकेकडे जास्त लक्ष देणारा आहे. त्याने मला खरोखर फरक पडू लागला होता. ‘Constructive criticism’ करणारे पण होते, पण त्यांची संख्या किती कमी आहे हे जाणवतं. आणि ते खरे हितचिंतक आहेत असंही मला वाटतं!
असो. पण या सगळ्यामुळे एक प्रकारे कोशात जाऊ लागलो. स्वतःहून लोकांना आपल्या नाटकाला बोलावणं कमी झालं. आपल्याच कामाची लाज वाटू लागली. नुसत्या चुकाच दिसू लागल्या. आपण ज्या पद्धतीचं नाटक करतो ते चुकतंय असं वाटू लागलं. धड ना प्रायोगिक, ना धड व्यावसायिक. त्याचा परिणाम कामावर व्हायला लागला. ‘या निवडक लोकांना जे मी करतोय ते आवडेल का?’ असा विचार जास्ती जास्ती येऊ लागला. त्यांना जे आवडेल असंच काम करायचं असं आपसूक मनात ठरवलं गेलं.
या सगळ्यामध्ये अतुल कुमारचं प्रचंड गाजलेलं ‘पिया बेहरूपिया’ हे नाटक बघायला गेलो. शेक्सपिअरच्या ‘Twelfth Night’चं ते हिंदी रूपांतर होतं. हाऊसफुल्ल प्रयोग. प्रयोग सुरू झाला आणि उरलेल्या ८०० लोकांसारखा मी पण वेड्यासारखा हसू लागलो, टाळ्या वाजवू लागलो. काहीच नेपथ्य नाही, एक शेक्सपिअरचं मोठं चित्र फक्त! हिंदीमधले सुंदर संवाद आणि कायिक हालचालींमुळे निर्माण होणारा विनोद! त्यात मध्ये-मध्ये लाइव्ह गाणी. कुठलंही ‘statement’ नाही की काही नाही. आणि त्या प्रयोगाच्या शेवटी मला उमजलं की आपल्याला कदाचित असंच नाटक करायला आवडतं! आणि त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. त्या थोड्या लोकांना काय वाटतंय, किंवा त्यांना काय वाटेल याचा आपण किती विचार करायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला कामातून आनंदच मिळत नसेल तर काय उपयोग त्या कामाचा? तwी माणसं आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत, त्यातल्या काही जणांना आपलं भलं व्हावं असंही वाटत असेल. पण शेवटी मला काय करायचंय हे मलाच माहिती पाहिजे! त्या प्रयोगाच्या शेवटी सगळे उभे राहून टाळ्या-शिट्ट्या वाजवत होते. मी पण त्यातलाच एक होतो, फक्त मी शांतपणे रडतही होतो. नंतर मी अतुलचे आभारही मानले. त्याला कशासाठी हे सांगितलं नाही, पण मनापासून मानले!
आता फेसबुक,ट्विटरमुळे तर कोणीही तुमच्यावर वाट्टेल तशी टीका करू शकतात. करतातही. पण निदान त्या कामाबद्दल मला पूर्ण विश्वास असतो. त्याबद्दल लाज वाटत नाही. आणि जर मला सांगितलं की उद्या या जगातला माझा शेवटचा दिवस आहे, तरीही आज मी तेच काम करेन याबद्दल खात्रीही वाटते!
मी जवळ जवळ १४ वर्षांपूर्वी नाट्यक्षेत्रात काम करायला लागलो. पहिली पायरी अर्थातच ‘पुरुषोत्तम करंडक’. पण आमच्या सीनियर्सने आम्हाला तिकडेच थांबू दिलं नाही. आमचा हात धरून विविध प्रायोगिक नाट्यसंस्थांच्या नाटकात आम्हाला सहभागी केलं, नाटकाच्या विविध कार्यशाळांना घेऊन गेले, अनेक नाटकं दाखवली, विचार करायची एक दिशा दिली... थोडक्यात आमच्यावर संस्कार केले! तेव्हा वय कमी होतं. फार जबाबदारी नव्हती. एकतर अभिनय करायचा किंवा रंगमंच व्यवस्था. अगदीच कधीतरी संगीत संयोजन. पडेल ते काम करायची तयारी. त्यात अमेय वाघ आणि मी हजरजबाबी (आगाऊ) असल्याने आमची थोडी ख्याती पसरली. अर्थात, काही लोकांना ते आवडायचं पण नाही. पण ‘नवीन, लहान पोरं आहेत’ म्हणत ते चालून जायचं. त्यात कामाच्या वेळेस फक्त आणि फक्त काम करत असल्याने तसा बहुतेक कोणाला आमचा त्रास व्हायचा नाही. बहुतेक. जबाबदारी कमी होती, मजा होती!
दोन वर्षात ‘पुरुषोत्तम’ची दिग्दर्शनाची धुरा मला सांभाळायला लागली. १८चा होतो तेव्हा. आपोआप मोठं झाल्याची जाणीव होऊ लागली. आपण म्हणू ते आजूबाजूचे ऐकत आहेत, बारकाईने आपल्याकडे बघत आहेत असं जाणवलं. मजा-मजा करण्याचा स्वभाव थोडा बदलू लागला. त्यात त्यावर्षीच्या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाला, अनेक पारितोषिकं मिळाली. त्यामुळे लोक वेगळ्या नजरेने पाहू लागलेत हे जाणवलं. तसं बघायला गेलं तर वयाने फार मोठा नव्हतो, पण अगदीच लहानही नव्हतो. (आपण नेमके लहान आहोत की मोठे हे कसं आणि कोण ठरवणार आणि आपण जे केलं आहे ते कितपत भारी आहे असा मला नेहमी प्रश्न पडायचा. पण त्याचं उत्तर सचिन तेंडुलकरच्या स्वरूपात मिळालं. तो साधारण १८ व्या वर्षी संपूर्ण देशाच्या आकांशा एकट्याच्या खांद्यावर समर्थपणे उचलायचा. त्याच्यासमोर आपलं त्या वयातलं कर्तृत्व नगण्य होतं. त्यामुळे आपण १८ चे होऊन फारसं काहीच कमावलं नाहीये याची सतत जाणीव होती आणि त्याने जमिनीवर राहायला मदत झाली. आणि त्याच्या उदाहरणाने ती सतत होत राहील.)
‘लागला असेल तुक्का’ किंवा ‘घडून गेलं असेल त्याच्या हातून’ किंवा ‘त्याच्या नावावर तिसऱ्या कोणीतरीच दिग्दर्शन केलं असेल’ असाही काही लोकांचा आवाज येऊ लागला. माझ्या सुदैवाने मी जे लगेच पुढचं नाटक दिग्दर्शित केलं, त्यालाही सगळीकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला आणि तात्पुरते का होईना, ते आवाज कमी ऐकू येऊ लागले. पण आता ओझं टाकण्यात आलं ते सातत्य राखण्याचं! आणि पुढची अनेक वर्षं मी त्या ओझ्याखाली झुकलो!
पुढची जवळ जवळ ९-१० वर्षं विविध नाटकं करून पहिली. अजूनही पाहतोय. ‘करून पाहिली’ म्हणतोय कारण नाटकाच्या खेळाला आपणही ‘प्रयोग’ म्हणतो. प्रयोग करत राहिलो, नाटकाच्या प्रकारांमध्ये, त्यांच्या सादरीकरणांमध्ये, कलाकारांमध्ये! माझ्या नशिबाने विविध प्रकारची नाटकं बघायला मिळाली. भारतातली, परदेशातली. लोकांना भेटायला मिळालं. कमीच आहे. अजून फार बघता येईल आणि भेटता येईल! पण या सगळ्या अनुभवातून काही न काही मिळत गेलं.
तसंच, जे प्रयोग करत होतो त्याबद्दलही प्रतिक्रिया मिळत होत्या. सगळे येणारे अनुभव पहिले-वहिलेच, त्यामुळे थोडं विचित्रही वाटत होतं. बऱ्याचदा सखोल प्रतिक्रिया या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून मिळतात. आणि त्यांचं नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. काही उदाहरणं म्हणजे, जेव्हा मी संगीत नाटक केलं तेव्हा काही जण येऊन म्हणाले की, कशाला करायचं परत तेच! तू नवीन काहीतरी कर, काय पुन्हा तेच तेच! अजून खोलात जाऊन काही लोकांनी नेपथ्य कसं चुकलंय, किंवा नटी-सूत्रधार असे कसे चालत आले, किंवा काही काही पात्र/संवाद कसे काय काढले असे प्रश्न केले. एकाच नाटकाच्या काही परीक्षणांत कसा मी नवीन, ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे असं म्हंटलं गेलं. तसंच इतर काहींमध्ये कसं मला नाटक झेपलंच नाहीये, असं ठरवून टाकण्यात आलं. जेव्हा पुन्हा काही नवीन केलं तेव्हा, कशी माझ्यातली सर्जनशीलता कमी झाली आहे, असं अगदी ‘निकट’च्या लोकांनी सांगितलं, वागण्यातून दाखवलं. ‘Intellectual statement’ कसं होत नाहीये वगैरे वगैरे. कौतुक करणारेही होते. पण माझा स्वभाव बहुतेक टीकेकडे जास्त लक्ष देणारा आहे. त्याने मला खरोखर फरक पडू लागला होता. ‘Constructive criticism’ करणारे पण होते, पण त्यांची संख्या किती कमी आहे हे जाणवतं. आणि ते खरे हितचिंतक आहेत असंही मला वाटतं!
असो. पण या सगळ्यामुळे एक प्रकारे कोशात जाऊ लागलो. स्वतःहून लोकांना आपल्या नाटकाला बोलावणं कमी झालं. आपल्याच कामाची लाज वाटू लागली. नुसत्या चुकाच दिसू लागल्या. आपण ज्या पद्धतीचं नाटक करतो ते चुकतंय असं वाटू लागलं. धड ना प्रायोगिक, ना धड व्यावसायिक. त्याचा परिणाम कामावर व्हायला लागला. ‘या निवडक लोकांना जे मी करतोय ते आवडेल का?’ असा विचार जास्ती जास्ती येऊ लागला. त्यांना जे आवडेल असंच काम करायचं असं आपसूक मनात ठरवलं गेलं.
या सगळ्यामध्ये अतुल कुमारचं प्रचंड गाजलेलं ‘पिया बेहरूपिया’ हे नाटक बघायला गेलो. शेक्सपिअरच्या ‘Twelfth Night’चं ते हिंदी रूपांतर होतं. हाऊसफुल्ल प्रयोग. प्रयोग सुरू झाला आणि उरलेल्या ८०० लोकांसारखा मी पण वेड्यासारखा हसू लागलो, टाळ्या वाजवू लागलो. काहीच नेपथ्य नाही, एक शेक्सपिअरचं मोठं चित्र फक्त! हिंदीमधले सुंदर संवाद आणि कायिक हालचालींमुळे निर्माण होणारा विनोद! त्यात मध्ये-मध्ये लाइव्ह गाणी. कुठलंही ‘statement’ नाही की काही नाही. आणि त्या प्रयोगाच्या शेवटी मला उमजलं की आपल्याला कदाचित असंच नाटक करायला आवडतं! आणि त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. त्या थोड्या लोकांना काय वाटतंय, किंवा त्यांना काय वाटेल याचा आपण किती विचार करायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला कामातून आनंदच मिळत नसेल तर काय उपयोग त्या कामाचा? तwी माणसं आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत, त्यातल्या काही जणांना आपलं भलं व्हावं असंही वाटत असेल. पण शेवटी मला काय करायचंय हे मलाच माहिती पाहिजे! त्या प्रयोगाच्या शेवटी सगळे उभे राहून टाळ्या-शिट्ट्या वाजवत होते. मी पण त्यातलाच एक होतो, फक्त मी शांतपणे रडतही होतो. नंतर मी अतुलचे आभारही मानले. त्याला कशासाठी हे सांगितलं नाही, पण मनापासून मानले!
आता फेसबुक,ट्विटरमुळे तर कोणीही तुमच्यावर वाट्टेल तशी टीका करू शकतात. करतातही. पण निदान त्या कामाबद्दल मला पूर्ण विश्वास असतो. त्याबद्दल लाज वाटत नाही. आणि जर मला सांगितलं की उद्या या जगातला माझा शेवटचा दिवस आहे, तरीही आज मी तेच काम करेन याबद्दल खात्रीही वाटते!