अ. ना. नाडकर्णी
राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत पुण्यप्रभाव’ या नाटकाला येत्या जून महिन्यात शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रसिकांना कायम भुरळ पाडणाऱ्या या नाटकाची रसभरीत कहाणी…
‘सं. पुण्यप्रभाव’ हे गडकऱ्यांचे स्वतःची पद्यरचना असलेले हे एकमेव पूर्ण नाटक! हे नाटक १९१६च्या जून-जुलैच्या सुमारास रंगभूमीवर आले. पण त्याचे लेखन गडकऱ्यांनी १९१४च्या सुमारास सुरू केले होते. भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या पातिव्रत्याला व तिच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून ‘पातिव्रत्य’ हा विषय केंद्रीभूत ठेवून त्यांनी कथेची कल्पनारम्य उभारणी करून हे नाटक लिहावयास घेतले.
गडकरी नाटके नेहमी उलट्या क्रमाने लिहीत. ‘पुण्यप्रभाव’चा सहाव्या अंकातील शेवटचा वृंदावन-वसुंधरेचा हार घालण्याचा अटीतटीचा प्रवेश प्रथम लिहून व सहावा अंक प्रथम लिहून, उरलेले अंक उलट्या क्रमाने लिहून व शेवटी पहिला अंक लिहून त्यांनी नाटक पूर्ण केले.
सन १९१३च्या सुमारास किर्लोस्कर सं. नाटक मंडळीत काही कारणामुळे फाटाफूट होऊन टेंबे, बोडस व बालगंधर्व कंपनीतून बाहेर पडले व त्यांनी समाईक भागिदारीची गंधर्व नाटक मंडळी स्थापन केली. साहजिकच किर्लोस्कर नाटक मंडळीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कंपनीचे मालक शंकरराव मुजुमदार नव्या नाटकाच्या शोधात होते. गंधर्व नाटक मंडळीसुद्धा स्वतःच्या हक्काच्या नव्या नाटकाच्या शोधात होती.
दरम्यान गडकरी मास्तरांनी नवीन नाटक लिहावयास घेतल्याचे बोडसांना समजले. त्यांनी या नाटकाची मागणी गडकऱ्यांकडे केली. म्हणून गडकऱ्यांनी ‘पुण्यप्रभाव’चा ६व्या अंकाचा शेवटचा प्रवेश वाचावयास दिला. तो वाचून बोडस खूश झाले. गंधर्व मंडळीत त्याचे वाचन करण्यास हस्तलिखित गडकऱ्यांच्या परवानगीने घेऊन गेले.
गंधर्व मंडळीचा नकार
गंधर्व कंपनीत या प्रवेशाचे वाचन बोडसांनी केले. सर्व नटवर्ग, बालगंधर्व आणि विशेष म्हणजे गोविंद बल्लाळ देवल फारा वर्षांनी कंपनीत आले होते. देवल खुर्चीत बसून व डोळे मिटून वाचन ऐकू लागले. वृंदावन आणि वसुंधरा यांचा हार घालण्याविषयीचा अटीतटीचा प्रसंग बेमालूम संवादानिशी गडकऱ्यांनी उभा केला होता. शेवटी वसुंधरेच्या भूपालाच्याविषयी असणाऱ्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे वृंदावनाच्या हृदयातील परमेश्वर जागृत होऊन त्याचे परिवर्तन होते व तो वसुंधरेचे पाय धरतो. झाले! वाचन संपले! क्षणभर सारे दिडःमूढ झाले. एक सन्नाटा पसरला. कुणी काहीही बोलेना. ऐकत असताना मिटलेले डोळे उघडून देवलांनी एक कटाक्ष बोडसांच्याकडे टाकीत म्हटले, ‘हा लेखक फार बुद्धिवान आहे. त्याला हातचा जाऊ देऊ नका.’ ‘सं. पुण्यप्रभाव’ गंधर्व कंपनीने घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे गडकऱ्यांना कळविले गेले. गडकरी गंधर्व कंपनीत घाईघाईने आले व बोडसांना म्हणाले, माझ्या तीन अटी आहेत. त्या अशा :
१) नाटक पदांसहित लिहून झाल्यावर चार महिन्यांच्या मुदतीत तालमी घेऊन त्याचा प्रयोग केला जाईल. पदांच्या चाली गंधर्व कंपनीने द्याव्यात, पदे मी लिहून देईन.
२) पात्रांची वाटणी गंधर्व कंपनीने करावी. पण कालिंदीचे काम करणारा नट मी ठरवणार.
३) नाटकाच्या मोनोपॉलीचे रु. ३०००/- कंपनीने मला द्यावेत.
बोडस म्हणाले, ‘मास्तर, आम्ही कोल्हटकर आणि खाडिलकर यांना रु. २००० ते २५००/- देतो. तुमच्या नाटकाला रु. ३०००/- कसे देणार.’ बरेच काही झाले. शेवटी बोलणी फिस्कटली.
इकडे ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’चे मालक श्री. मुजूमदार यांनी गडकऱ्यांना आश्वासित केले की, तुमचे नाटक आमची कंपनी करणार व रंगमंचावर आणणार. गडकरी खूश झाले. त्यांनी ६ महिन्यांत नाटक लिहून पूर्ण केले व कंपनीचे हवाली केले. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचे व त्यांच्या कंपनीचे अभिमानी होते. म्हणूनच अण्णांची कंपनी टिकली पाहिजे, ही नाटक किर्लोस्कर कंपनीला देण्यामागची त्यांची प्रेरणा होती. सर्व पात्रांच्या वाटण्या झाल्या. चिंतामण कोल्हटकरांनी नाटक छान बसविले.
गडकऱ्यांना संगीताचे - स्वराचे ज्ञान नव्हते. पण पारंपरिक चाली पुष्कळ माहीत होत्या. म्हणून संगीतासाठी पदांच्या चाली गाणाऱ्या नटवर्गाकडून घ्यावयाचे ठरले. त्या वेळच्या प्रख्यात गायिका/गायक मलकाजान, गोहरजान, मौजुद्दीन, प्यारासाहेब, झोराबाई यांच्या विविध ढंगाच्या शास्त्रीय चिजा ग्रामोफोनवर उपलब्ध असत, त्यावरून काही चाली घेतल्या. काही चाली गोव्याच्या हिराबाई पेडणेकरांकडून घेतल्या. ऊर्दू नाटकांचा दरवाजा चालीसाठी सदैव खुला असे. काही चाली पारंपरिक होत्या. या प्रकारे अनेक माध्यमांचा उपयोग ‘पुण्यप्रभाव’च्या चालींना झाला. शेवटी या नाटकाचा संगीत प्रयोग किर्लोस्कर कंपनीच्या रंगमंचावर जून १९१६ रोजी मुंबई मुक्कामी झाला. त्या प्रयोगात पुढील नटांनी भूमिका केल्या- १)वृंदावन (चिंतामणराव कोल्हटकर) २) भूपाल (विसूभाऊ भडकमकर) ३) नुपूर (चिंतौबा गुरव (दिवेकर)) ४) कंकण (बाबूराव गाडेकर) ५) सुदाम (कृष्णराव मिरजकर) ६) युवराज (मास्टर रत्नू) ७) राजा (महाडकर) ८) ईश्वर (यशवंतराव आठवले) ९) वसुंधरा (कृष्णराव कोल्हापुरे) १०) कालिंदी (विनायकराव बेहेरे) ११) किंकिणी (मास्टर दीनानाथ मंगेशकर) १२) दामिनी (बाळकोबा गोखले).
पहिला प्रयोग तुफान रंगला. मुंबईकर प्रेक्षक-रसिक आनंदून गेले. वृत्तपत्रांतून स्तुतीचा वर्षाव झाला. बेहेरे, कोल्हापुरे व मा. दीनानाथांच्या गायनाने प्रेक्षकांची पकड घेतली. किर्लोस्करच्या नटवर्गाचे सर्वतोपरी कौतुक झाले. ओळीने चार प्रयोग मुंबईस झाले. पुणेकर प्रेक्षकांनी व विद्वानांनी ‘पुण्यप्रभाव’चे सहर्ष स्वागत केले; तर नागपूरकरांनी नाटक डोक्यावर घेतले.
‘पुण्यप्रभाव’ची लोकप्रियता
‘पुण्यप्रभाव’ मुख्यतः गाजले ते गडकऱ्यांच्या असामान्य भाषाशैलीमुळे. कथेतील संघर्ष हा वृंदावन व वसुंधरा यांच्यामध्ये उभारून तो प्रत्येक अंकागणिक इतका तीव्र करीत नेलेला आहे की प्रेक्षकांवर त्याचा अपरिहार्य परिणाम होऊन मनावर भीतीचे दडपण तयार होते व त्याचा कडेलोट शेवटच्या प्रवेशात होतो. शेवटी वृंदावन वसुंधरेकडून हार गळ्यात घालून घेण्यासाठी वाकला असताना तो हाराचा स्वीकार न करता तिचे पाय धरून लोटांगण घालतो. अखेर जीव मुठीत धरून बसलेल्या प्रेक्षकसुद्धा शेवटचा एकदाचा सुखद निःश्वास टाकतात. नाटकाचा शेवट आनंद पर्यवसायी होतो.
या नाटकाच्या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे वेगवेगळ्या नाटक कंपन्यांचा मिळालेला सर्वोत्कृष्ट नटवर्ग! हे नाटक ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ (गद्य स्वरूपात) ‘किर्लोस्कर’, ‘बलवंत’, ‘ललित कलादर्श’, ‘मनोरमा संगीत मंडळी’, ‘यशवंत नाटक मंडळी’ (गद्य), हिराबाई बडोदेकरांची ‘नूतन नाट्य संगीत मंडळी’, तसेच गोव्याकडच्या अनेक लहान-मोठ्या नाटक मंडळ्या गद्य व संगीत स्वरूपात करीत असत. चित्रकार पु. श्री. काळे आपल्या ‘ललित कलेच्या सहवासात’ या चरित्रात म्हणतात, ‘पुण्यप्रभाव इतके लालित्यपूर्ण दुसरे नाटक ‘ललित कलादर्श’च्या रंगमंचावर पूर्वी व नंतर आले नाही.’ केशवराव दाते, चिंतामण कोल्हटकर, नानासाहेब फाटक, मास्टर दीनानाथ मंगेशकर, बापूराव पेंढारकर, नूतन पेंढारकर, (मास्टर दामले), मास्टर दत्ताराम, रजनी जोशी, नयना आपटे, अरविंद पिळगावकर, भार्गवराम आचरेकर, जयश्री शेजवाडकर, राजा गोसावी, दामुअण्णा मालवणकर, वसंत शिंदे अशा मोठ्या नटनट्यांनी हे नाटक केले.
पुण्यप्रभावचे संगीत
‘पुण्यप्रभाव’कडे संगीताच्या दृष्टीने कुणी फारसे पाहिले नाही. नाटक ‘स्त्रीप्रधान’ असल्याने वसुंधरा कालिंदीची पदे स्त्रीगीतासारखीच आहे; व त्या त्या प्रसंगात शोभून दिसतात. उदाहरणार्थ वसुंधरेची ‘नाचत ना गगनात नाथा’, ‘बोल ब्रिजलाला रे’, ‘रणवीर कुमारा’, तर कालिंदीची ‘वाजीव रे बाळा वेल्हाळा रुमझुम घुंगूरवाळा’, ‘निरोप घ्यावा माझा’, ‘चतुराचातुरी’, ‘रंग अहा भरला’ ही गाणी. भूपालाला शास्त्रीय चालीवरची पदे आहेत. उदा. ‘करा करुणामया’, ‘प्रलयाची हतदशा’ (देसकार). पण या पदांत गायकीला अवसर नसल्याने ती थोडक्यात आटोपतात. फक्त किंकिणीची पदे तिच्या नखरेल व छचोर भूमिकेला साजून जातात. उदा. ‘सदा रंगे या हृदयी तरंगे’ (छांडो छाडोजी), ‘अनुकार जनाने कालांतरी थोरपदा’ (उपचार तुझे), ‘घडे नाथा प्रमाद जरि आतां क्षमाच तरि हो तयां’ (भले आहे कुंवर तोरे). मास्टर दीनानाथ किंकिणी करीत. भाषा, अभिनय, संगीत सर्व दृष्टीने किंकिणीची पदे त्या काळात भलताच भाव खाऊन गेली.
बेका कंपनीने या नाटकातील गाण्याच्या ७/८ ध्वनिमुद्रिका काढल्या असे ऐकिवात आहे. या नाटकाने मराठी रंगभूमीला दोन गोष्ट बहाल केल्या. एक, मास्टर दीनानाथ मंगेशकर हा अजोड अलौकिक गायकीचा नट आणि दोन, नटवर्य चिंतामण कोल्हटकर हा श्रेष्ठ गद्य नट व उत्कृष्ट दिग्दर्शक.
राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत पुण्यप्रभाव’ या नाटकाला येत्या जून महिन्यात शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रसिकांना कायम भुरळ पाडणाऱ्या या नाटकाची रसभरीत कहाणी…
‘सं. पुण्यप्रभाव’ हे गडकऱ्यांचे स्वतःची पद्यरचना असलेले हे एकमेव पूर्ण नाटक! हे नाटक १९१६च्या जून-जुलैच्या सुमारास रंगभूमीवर आले. पण त्याचे लेखन गडकऱ्यांनी १९१४च्या सुमारास सुरू केले होते. भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या पातिव्रत्याला व तिच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून ‘पातिव्रत्य’ हा विषय केंद्रीभूत ठेवून त्यांनी कथेची कल्पनारम्य उभारणी करून हे नाटक लिहावयास घेतले.
गडकरी नाटके नेहमी उलट्या क्रमाने लिहीत. ‘पुण्यप्रभाव’चा सहाव्या अंकातील शेवटचा वृंदावन-वसुंधरेचा हार घालण्याचा अटीतटीचा प्रवेश प्रथम लिहून व सहावा अंक प्रथम लिहून, उरलेले अंक उलट्या क्रमाने लिहून व शेवटी पहिला अंक लिहून त्यांनी नाटक पूर्ण केले.
सन १९१३च्या सुमारास किर्लोस्कर सं. नाटक मंडळीत काही कारणामुळे फाटाफूट होऊन टेंबे, बोडस व बालगंधर्व कंपनीतून बाहेर पडले व त्यांनी समाईक भागिदारीची गंधर्व नाटक मंडळी स्थापन केली. साहजिकच किर्लोस्कर नाटक मंडळीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कंपनीचे मालक शंकरराव मुजुमदार नव्या नाटकाच्या शोधात होते. गंधर्व नाटक मंडळीसुद्धा स्वतःच्या हक्काच्या नव्या नाटकाच्या शोधात होती.
दरम्यान गडकरी मास्तरांनी नवीन नाटक लिहावयास घेतल्याचे बोडसांना समजले. त्यांनी या नाटकाची मागणी गडकऱ्यांकडे केली. म्हणून गडकऱ्यांनी ‘पुण्यप्रभाव’चा ६व्या अंकाचा शेवटचा प्रवेश वाचावयास दिला. तो वाचून बोडस खूश झाले. गंधर्व मंडळीत त्याचे वाचन करण्यास हस्तलिखित गडकऱ्यांच्या परवानगीने घेऊन गेले.
गंधर्व मंडळीचा नकार
गंधर्व कंपनीत या प्रवेशाचे वाचन बोडसांनी केले. सर्व नटवर्ग, बालगंधर्व आणि विशेष म्हणजे गोविंद बल्लाळ देवल फारा वर्षांनी कंपनीत आले होते. देवल खुर्चीत बसून व डोळे मिटून वाचन ऐकू लागले. वृंदावन आणि वसुंधरा यांचा हार घालण्याविषयीचा अटीतटीचा प्रसंग बेमालूम संवादानिशी गडकऱ्यांनी उभा केला होता. शेवटी वसुंधरेच्या भूपालाच्याविषयी असणाऱ्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे वृंदावनाच्या हृदयातील परमेश्वर जागृत होऊन त्याचे परिवर्तन होते व तो वसुंधरेचे पाय धरतो. झाले! वाचन संपले! क्षणभर सारे दिडःमूढ झाले. एक सन्नाटा पसरला. कुणी काहीही बोलेना. ऐकत असताना मिटलेले डोळे उघडून देवलांनी एक कटाक्ष बोडसांच्याकडे टाकीत म्हटले, ‘हा लेखक फार बुद्धिवान आहे. त्याला हातचा जाऊ देऊ नका.’ ‘सं. पुण्यप्रभाव’ गंधर्व कंपनीने घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे गडकऱ्यांना कळविले गेले. गडकरी गंधर्व कंपनीत घाईघाईने आले व बोडसांना म्हणाले, माझ्या तीन अटी आहेत. त्या अशा :
१) नाटक पदांसहित लिहून झाल्यावर चार महिन्यांच्या मुदतीत तालमी घेऊन त्याचा प्रयोग केला जाईल. पदांच्या चाली गंधर्व कंपनीने द्याव्यात, पदे मी लिहून देईन.
२) पात्रांची वाटणी गंधर्व कंपनीने करावी. पण कालिंदीचे काम करणारा नट मी ठरवणार.
३) नाटकाच्या मोनोपॉलीचे रु. ३०००/- कंपनीने मला द्यावेत.
बोडस म्हणाले, ‘मास्तर, आम्ही कोल्हटकर आणि खाडिलकर यांना रु. २००० ते २५००/- देतो. तुमच्या नाटकाला रु. ३०००/- कसे देणार.’ बरेच काही झाले. शेवटी बोलणी फिस्कटली.
इकडे ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’चे मालक श्री. मुजूमदार यांनी गडकऱ्यांना आश्वासित केले की, तुमचे नाटक आमची कंपनी करणार व रंगमंचावर आणणार. गडकरी खूश झाले. त्यांनी ६ महिन्यांत नाटक लिहून पूर्ण केले व कंपनीचे हवाली केले. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचे व त्यांच्या कंपनीचे अभिमानी होते. म्हणूनच अण्णांची कंपनी टिकली पाहिजे, ही नाटक किर्लोस्कर कंपनीला देण्यामागची त्यांची प्रेरणा होती. सर्व पात्रांच्या वाटण्या झाल्या. चिंतामण कोल्हटकरांनी नाटक छान बसविले.
गडकऱ्यांना संगीताचे - स्वराचे ज्ञान नव्हते. पण पारंपरिक चाली पुष्कळ माहीत होत्या. म्हणून संगीतासाठी पदांच्या चाली गाणाऱ्या नटवर्गाकडून घ्यावयाचे ठरले. त्या वेळच्या प्रख्यात गायिका/गायक मलकाजान, गोहरजान, मौजुद्दीन, प्यारासाहेब, झोराबाई यांच्या विविध ढंगाच्या शास्त्रीय चिजा ग्रामोफोनवर उपलब्ध असत, त्यावरून काही चाली घेतल्या. काही चाली गोव्याच्या हिराबाई पेडणेकरांकडून घेतल्या. ऊर्दू नाटकांचा दरवाजा चालीसाठी सदैव खुला असे. काही चाली पारंपरिक होत्या. या प्रकारे अनेक माध्यमांचा उपयोग ‘पुण्यप्रभाव’च्या चालींना झाला. शेवटी या नाटकाचा संगीत प्रयोग किर्लोस्कर कंपनीच्या रंगमंचावर जून १९१६ रोजी मुंबई मुक्कामी झाला. त्या प्रयोगात पुढील नटांनी भूमिका केल्या- १)वृंदावन (चिंतामणराव कोल्हटकर) २) भूपाल (विसूभाऊ भडकमकर) ३) नुपूर (चिंतौबा गुरव (दिवेकर)) ४) कंकण (बाबूराव गाडेकर) ५) सुदाम (कृष्णराव मिरजकर) ६) युवराज (मास्टर रत्नू) ७) राजा (महाडकर) ८) ईश्वर (यशवंतराव आठवले) ९) वसुंधरा (कृष्णराव कोल्हापुरे) १०) कालिंदी (विनायकराव बेहेरे) ११) किंकिणी (मास्टर दीनानाथ मंगेशकर) १२) दामिनी (बाळकोबा गोखले).
पहिला प्रयोग तुफान रंगला. मुंबईकर प्रेक्षक-रसिक आनंदून गेले. वृत्तपत्रांतून स्तुतीचा वर्षाव झाला. बेहेरे, कोल्हापुरे व मा. दीनानाथांच्या गायनाने प्रेक्षकांची पकड घेतली. किर्लोस्करच्या नटवर्गाचे सर्वतोपरी कौतुक झाले. ओळीने चार प्रयोग मुंबईस झाले. पुणेकर प्रेक्षकांनी व विद्वानांनी ‘पुण्यप्रभाव’चे सहर्ष स्वागत केले; तर नागपूरकरांनी नाटक डोक्यावर घेतले.
‘पुण्यप्रभाव’ची लोकप्रियता
‘पुण्यप्रभाव’ मुख्यतः गाजले ते गडकऱ्यांच्या असामान्य भाषाशैलीमुळे. कथेतील संघर्ष हा वृंदावन व वसुंधरा यांच्यामध्ये उभारून तो प्रत्येक अंकागणिक इतका तीव्र करीत नेलेला आहे की प्रेक्षकांवर त्याचा अपरिहार्य परिणाम होऊन मनावर भीतीचे दडपण तयार होते व त्याचा कडेलोट शेवटच्या प्रवेशात होतो. शेवटी वृंदावन वसुंधरेकडून हार गळ्यात घालून घेण्यासाठी वाकला असताना तो हाराचा स्वीकार न करता तिचे पाय धरून लोटांगण घालतो. अखेर जीव मुठीत धरून बसलेल्या प्रेक्षकसुद्धा शेवटचा एकदाचा सुखद निःश्वास टाकतात. नाटकाचा शेवट आनंद पर्यवसायी होतो.
या नाटकाच्या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे वेगवेगळ्या नाटक कंपन्यांचा मिळालेला सर्वोत्कृष्ट नटवर्ग! हे नाटक ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ (गद्य स्वरूपात) ‘किर्लोस्कर’, ‘बलवंत’, ‘ललित कलादर्श’, ‘मनोरमा संगीत मंडळी’, ‘यशवंत नाटक मंडळी’ (गद्य), हिराबाई बडोदेकरांची ‘नूतन नाट्य संगीत मंडळी’, तसेच गोव्याकडच्या अनेक लहान-मोठ्या नाटक मंडळ्या गद्य व संगीत स्वरूपात करीत असत. चित्रकार पु. श्री. काळे आपल्या ‘ललित कलेच्या सहवासात’ या चरित्रात म्हणतात, ‘पुण्यप्रभाव इतके लालित्यपूर्ण दुसरे नाटक ‘ललित कलादर्श’च्या रंगमंचावर पूर्वी व नंतर आले नाही.’ केशवराव दाते, चिंतामण कोल्हटकर, नानासाहेब फाटक, मास्टर दीनानाथ मंगेशकर, बापूराव पेंढारकर, नूतन पेंढारकर, (मास्टर दामले), मास्टर दत्ताराम, रजनी जोशी, नयना आपटे, अरविंद पिळगावकर, भार्गवराम आचरेकर, जयश्री शेजवाडकर, राजा गोसावी, दामुअण्णा मालवणकर, वसंत शिंदे अशा मोठ्या नटनट्यांनी हे नाटक केले.
पुण्यप्रभावचे संगीत
‘पुण्यप्रभाव’कडे संगीताच्या दृष्टीने कुणी फारसे पाहिले नाही. नाटक ‘स्त्रीप्रधान’ असल्याने वसुंधरा कालिंदीची पदे स्त्रीगीतासारखीच आहे; व त्या त्या प्रसंगात शोभून दिसतात. उदाहरणार्थ वसुंधरेची ‘नाचत ना गगनात नाथा’, ‘बोल ब्रिजलाला रे’, ‘रणवीर कुमारा’, तर कालिंदीची ‘वाजीव रे बाळा वेल्हाळा रुमझुम घुंगूरवाळा’, ‘निरोप घ्यावा माझा’, ‘चतुराचातुरी’, ‘रंग अहा भरला’ ही गाणी. भूपालाला शास्त्रीय चालीवरची पदे आहेत. उदा. ‘करा करुणामया’, ‘प्रलयाची हतदशा’ (देसकार). पण या पदांत गायकीला अवसर नसल्याने ती थोडक्यात आटोपतात. फक्त किंकिणीची पदे तिच्या नखरेल व छचोर भूमिकेला साजून जातात. उदा. ‘सदा रंगे या हृदयी तरंगे’ (छांडो छाडोजी), ‘अनुकार जनाने कालांतरी थोरपदा’ (उपचार तुझे), ‘घडे नाथा प्रमाद जरि आतां क्षमाच तरि हो तयां’ (भले आहे कुंवर तोरे). मास्टर दीनानाथ किंकिणी करीत. भाषा, अभिनय, संगीत सर्व दृष्टीने किंकिणीची पदे त्या काळात भलताच भाव खाऊन गेली.
बेका कंपनीने या नाटकातील गाण्याच्या ७/८ ध्वनिमुद्रिका काढल्या असे ऐकिवात आहे. या नाटकाने मराठी रंगभूमीला दोन गोष्ट बहाल केल्या. एक, मास्टर दीनानाथ मंगेशकर हा अजोड अलौकिक गायकीचा नट आणि दोन, नटवर्य चिंतामण कोल्हटकर हा श्रेष्ठ गद्य नट व उत्कृष्ट दिग्दर्शक.