>> प्रवीण लोणकर
धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकरमहाराज विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार करून नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून अमरावती जिल्ह्यात आंदोलने पेटले आहे. निवेदनांच्या माध्यमातून कारवाईची मागणीही जोर धरू लागलीय. यातील वास्तव चौकशीनंतर समोर येणार असले तरी ‘इंद्रजाल’सारखी पुस्तके वाचूनच हा प्रकार झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ‘अघोरी’ पुस्तकांच्या बाजारावर लक्ष केंद्रीत झाले आहे.
नागपुरातील अघोरी पुस्तकांचा ठावठिकाणा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडला आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पुढाकार घेत पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तत्परता दाखवत गणेशपेठ परिसरातील ७२३ अघोरी पुस्तकांचा साठा जप्त करून दुकान मालक निसार खान घोर याला अटक केली. नागपुरात झालेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. मात्र या पुस्तकांच्या प्रकाशन संस्था दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात असून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात या पुस्तकांचा बाजार पसरला आहे. या अघोरी पुस्तकांचा शोध घेऊन त्यांना नष्ट केले तर अंधश्रद्धेमुळे बळी पडणाऱ्यांना यापासून वाचविता येणे शक्य आहे.
सामाजिक सुरक्षा धोक्यात
दिल्ली येथील ‘मंगला प्रकाशन’ची ही पुस्तके बाजारात सर्रास विकली जातात. तांत्रिक शंभूनाथच्या नावाने विकल्या जात असलेल्या या पुस्तकात अनेक आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख आहे. कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेल्या अघोरी बाबी या पुस्तकात लिहिल्या असल्याने अशा पुस्तकांमुळे सामाजिक सुरक्षाच धोक्यात आली आहे. नागपुरात झालेली कारवाई नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र दिल्लीत बसलेल्या या पुस्तकांच्या प्रकाशकांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. धन प्राप्त करण्याच्या विविध कला, मृत्युपासून सुटकेचे उपाय, मंत्राने चोर पकडले, प्रेताला वश करण्यासाठी अघोरी उपाय, राक्षसाला वश करण्याचे उपाय, माणसाला माकड बनविणे, गर्भधारणेचे अघोरी उपाय, नपुंसक बनविण्याचा मंत्र यासारख्या कुठल्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या अघोरी बाबी या पुस्तकात लिहिल्या असल्याने आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा बळी घेण्याची प्रवृत्ती ही पुस्तके वाचून वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
समस्येच्या मुळावर घाव
इंद्रजाल, बडी मोहिनी, सर्व मनोकामना पूर्ण टोटके, तंत्र-मंत्र व टोटके, असली कलकत्ते का बडा वशीकरण मंत्र, वशीकरण मंत्र, महाइंद्रजाल, असली कलकत्ते का बडा मोहिनी मंत्र, सर्व मनोकामना सिद्धी, सचित्र करामात, इच्छापूरक जादुई, अलौकिक शक्तीयोके चमत्कार, तंत्र-मंत्र का गुप्त ज्ञान, यंत्रसिद्धी, मनोकामना सिद्धी, काली सिद्धी, असली कलकत्ते का चीन व आसाम बंगाल का जादू या सारख्या पुस्तकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरविण्याचे जाळे विणले जात आहे. समस्या प्रत्येकालाच असते. या समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब होणे तेवढेच आवश्यक आहे. काही व्यक्ती आपल्या समस्या सोडविण्यासाठी अघोरी उपायांवर अधिक विश्वास ठेवतात. इंद्रजालसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून यात भर पडत असून देशाच्या वेगवेगळ्या भागात अमानुष गुन्हे घडत आहेत. गुन्हे घडल्यानंतर त्यावर खंत व्यक्त केली जाते. देशभरातून हळहळ व्यक्त होते. मात्र समस्येच्या मुळाशी जाऊन ती मिटवून टाकण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. नागपुरात झालेली कारवाई या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता राज्याच्या इतर भागांत दडलेल्या या अघोरी पुस्तकांना शोधून काढण्याची गरज आहे.
कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ मध्ये कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार गुन्हापात्र कृत्याची जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणेही गुन्हा ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम राबविण्यासाठी अंमलबजावणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्याला दक्षता अधिकारी म्हणून नेमण्यात येते. कुणाची तक्रार नसतानाही गुन्हा घडला हे माहीत असेल तर हा अधिकारी स्वतःहून तक्रार दाखल करून कारवाई करू शकतो. या कायद्याच्या अनुसूचीमध्ये १२ मुद्द्यांचा उल्लेख असून तसे कृत्य घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.
अंमलबजावणीची हवी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्याकर्त्याच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन’ कायदा अस्तित्वात आला आहे. अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा २०१३चा कायदा आज अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सहा महिने ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच पाच ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदा अस्तित्वात येणे ही नक्कीच मोठी उपलब्धी आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची अधिक गरज आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, छाया सावरकर, सुनाल वंजारी, सुरेश झुरमुरे, उत्तम सुळके, सुधीर आंडे यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतके लोक अशा अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठविताना दिसतात. मात्र अंधश्रद्धेचा समूळ नाश करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. सर्वांनी या विरोधात आवाज उठविला तर कुणाचाही नरबळी जाणार नाही.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकरमहाराज विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार करून नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून अमरावती जिल्ह्यात आंदोलने पेटले आहे. निवेदनांच्या माध्यमातून कारवाईची मागणीही जोर धरू लागलीय. यातील वास्तव चौकशीनंतर समोर येणार असले तरी ‘इंद्रजाल’सारखी पुस्तके वाचूनच हा प्रकार झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ‘अघोरी’ पुस्तकांच्या बाजारावर लक्ष केंद्रीत झाले आहे.
नागपुरातील अघोरी पुस्तकांचा ठावठिकाणा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडला आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पुढाकार घेत पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तत्परता दाखवत गणेशपेठ परिसरातील ७२३ अघोरी पुस्तकांचा साठा जप्त करून दुकान मालक निसार खान घोर याला अटक केली. नागपुरात झालेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. मात्र या पुस्तकांच्या प्रकाशन संस्था दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात असून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात या पुस्तकांचा बाजार पसरला आहे. या अघोरी पुस्तकांचा शोध घेऊन त्यांना नष्ट केले तर अंधश्रद्धेमुळे बळी पडणाऱ्यांना यापासून वाचविता येणे शक्य आहे.
सामाजिक सुरक्षा धोक्यात
दिल्ली येथील ‘मंगला प्रकाशन’ची ही पुस्तके बाजारात सर्रास विकली जातात. तांत्रिक शंभूनाथच्या नावाने विकल्या जात असलेल्या या पुस्तकात अनेक आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख आहे. कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेल्या अघोरी बाबी या पुस्तकात लिहिल्या असल्याने अशा पुस्तकांमुळे सामाजिक सुरक्षाच धोक्यात आली आहे. नागपुरात झालेली कारवाई नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र दिल्लीत बसलेल्या या पुस्तकांच्या प्रकाशकांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. धन प्राप्त करण्याच्या विविध कला, मृत्युपासून सुटकेचे उपाय, मंत्राने चोर पकडले, प्रेताला वश करण्यासाठी अघोरी उपाय, राक्षसाला वश करण्याचे उपाय, माणसाला माकड बनविणे, गर्भधारणेचे अघोरी उपाय, नपुंसक बनविण्याचा मंत्र यासारख्या कुठल्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या अघोरी बाबी या पुस्तकात लिहिल्या असल्याने आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा बळी घेण्याची प्रवृत्ती ही पुस्तके वाचून वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
समस्येच्या मुळावर घाव
इंद्रजाल, बडी मोहिनी, सर्व मनोकामना पूर्ण टोटके, तंत्र-मंत्र व टोटके, असली कलकत्ते का बडा वशीकरण मंत्र, वशीकरण मंत्र, महाइंद्रजाल, असली कलकत्ते का बडा मोहिनी मंत्र, सर्व मनोकामना सिद्धी, सचित्र करामात, इच्छापूरक जादुई, अलौकिक शक्तीयोके चमत्कार, तंत्र-मंत्र का गुप्त ज्ञान, यंत्रसिद्धी, मनोकामना सिद्धी, काली सिद्धी, असली कलकत्ते का चीन व आसाम बंगाल का जादू या सारख्या पुस्तकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरविण्याचे जाळे विणले जात आहे. समस्या प्रत्येकालाच असते. या समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब होणे तेवढेच आवश्यक आहे. काही व्यक्ती आपल्या समस्या सोडविण्यासाठी अघोरी उपायांवर अधिक विश्वास ठेवतात. इंद्रजालसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून यात भर पडत असून देशाच्या वेगवेगळ्या भागात अमानुष गुन्हे घडत आहेत. गुन्हे घडल्यानंतर त्यावर खंत व्यक्त केली जाते. देशभरातून हळहळ व्यक्त होते. मात्र समस्येच्या मुळाशी जाऊन ती मिटवून टाकण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. नागपुरात झालेली कारवाई या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता राज्याच्या इतर भागांत दडलेल्या या अघोरी पुस्तकांना शोधून काढण्याची गरज आहे.
कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ मध्ये कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार गुन्हापात्र कृत्याची जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणेही गुन्हा ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम राबविण्यासाठी अंमलबजावणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्याला दक्षता अधिकारी म्हणून नेमण्यात येते. कुणाची तक्रार नसतानाही गुन्हा घडला हे माहीत असेल तर हा अधिकारी स्वतःहून तक्रार दाखल करून कारवाई करू शकतो. या कायद्याच्या अनुसूचीमध्ये १२ मुद्द्यांचा उल्लेख असून तसे कृत्य घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.
अंमलबजावणीची हवी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्याकर्त्याच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन’ कायदा अस्तित्वात आला आहे. अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा २०१३चा कायदा आज अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सहा महिने ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच पाच ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदा अस्तित्वात येणे ही नक्कीच मोठी उपलब्धी आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची अधिक गरज आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, छाया सावरकर, सुनाल वंजारी, सुरेश झुरमुरे, उत्तम सुळके, सुधीर आंडे यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतके लोक अशा अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठविताना दिसतात. मात्र अंधश्रद्धेचा समूळ नाश करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. सर्वांनी या विरोधात आवाज उठविला तर कुणाचाही नरबळी जाणार नाही.