कुणाकडे तरी आरोपाचे एक बोट दाखवताना
तीन बोटे म्हणे स्वतःकडे वळलेली असतात,
अशा वेळी अंगठ्याची मात्र
फार केविलवाणी अवस्था असते;
कारण त्याची भूमिका काय
ते त्याचे त्यालाच कळत नसते.
राजकारणाच्या खेळाला
देशभर बहर आला आहे
आणि सामान्य माणसाचा
आता असाच 'अंगठा' झाला आहे.
नसलेल्या इन्कमला बसणाऱ्या
टॅक्सच्या झळा आम्ही सोसतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही नुसतेच आपले आ वासतो
भावना गवळींचे शंभर कोटी वाचून
आम्ही श्वास घेत नाही,
तोवर मुश्रीफांचे १२७ कोटी येतात
शिवाय, मधल्या काळात
दहा-अकरा मंत्र्यांना
सोमय्या तलवारीच्या
पात्यावर घेतात.
आधीचे आरोप
हवेत बागडत असतानाच
नव्यांचा बार उडतो
नव्यांचा सेन्सेक्स चढता झाला,
की जुन्यांचा भाव पडतो
कोटींच्या आरोपांच्या फैरींनंतर
'आता हे नक्की संपलेच,'
असे वाटून वारंवार फसतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही आपले नुसतेच आ वासतो.
काल याच आरोपात न्हायलेले नारायणराव
आज धुतले तांदूळ होतात
आणि विचारधारांमध्ये पोहत पोहत
कमळाच्या तळ्यात येतात
'येथे सर्व स्वच्छ करून मिळेल'
असा त्यांना दिलासा मिळतो
आणि आरोपाचे भेंडोळे घेऊन
बसलेल्यांनाही,
पक्षाचा इशारा कळतो.
मग आरोपांचे गाठोडे
तात्पुरते माळ्यावर जाते
आपुलकीचे साजूक तूप
आरोपीच्या पोळ्यांवर येते.
नाव शंकराचे आणि कृपा लक्ष्मीची
म्हणून जो बदनाम झाला
तो कालांतराने
'रसभरा पका आम' होतो.
'पक्षांतराचा झिम्मा खेळतो
संपत्तीचा रस गळतो'
असे नवे गाणे गात
आतल्या आत धुसफुसतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही आपले आ वासतो.
***
आरोप, चौकशा, कोठडी,
तुरुंग आणि खटले
हे सगळे राजकीय अलंकार आहेत,
जरी कितीही नाही म्हटले.
आजचे आरोपी
उद्याचे उमेदवार असतात;
कारण
त्यांच्यात प्रत्येकाला
'दुभत्या गायी' दिसतात.
आरोप म्हणजे गुन्हा नव्हे
हा बिनतोड युक्तीवाद,
गाठीशी असतो
आणि प्रत्येक पक्ष,
आतून त्यांच्या
पाठीशी असतो.
त्याला डोक्यावर बसवायचं,
की त्याच्या मानगुटीवर बसायचं
याचं उत्तर
परिस्थितीवर अवलंबून असतं.
दिसतं तसंच असतं
आणि तरीही जग फसतं
सत्तेची मस्तानी
त्यांच्या महालात नांदते
मतदार मात्र
एक शून्य बाजीराव असतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही आपले नुसतेच आ वासतो.
- तंबी दुराई
तीन बोटे म्हणे स्वतःकडे वळलेली असतात,
अशा वेळी अंगठ्याची मात्र
फार केविलवाणी अवस्था असते;
कारण त्याची भूमिका काय
ते त्याचे त्यालाच कळत नसते.
राजकारणाच्या खेळाला
देशभर बहर आला आहे
आणि सामान्य माणसाचा
आता असाच 'अंगठा' झाला आहे.
नसलेल्या इन्कमला बसणाऱ्या
टॅक्सच्या झळा आम्ही सोसतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही नुसतेच आपले आ वासतो
भावना गवळींचे शंभर कोटी वाचून
आम्ही श्वास घेत नाही,
तोवर मुश्रीफांचे १२७ कोटी येतात
शिवाय, मधल्या काळात
दहा-अकरा मंत्र्यांना
सोमय्या तलवारीच्या
पात्यावर घेतात.
आधीचे आरोप
हवेत बागडत असतानाच
नव्यांचा बार उडतो
नव्यांचा सेन्सेक्स चढता झाला,
की जुन्यांचा भाव पडतो
कोटींच्या आरोपांच्या फैरींनंतर
'आता हे नक्की संपलेच,'
असे वाटून वारंवार फसतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही आपले नुसतेच आ वासतो.
काल याच आरोपात न्हायलेले नारायणराव
आज धुतले तांदूळ होतात
आणि विचारधारांमध्ये पोहत पोहत
कमळाच्या तळ्यात येतात
'येथे सर्व स्वच्छ करून मिळेल'
असा त्यांना दिलासा मिळतो
आणि आरोपाचे भेंडोळे घेऊन
बसलेल्यांनाही,
पक्षाचा इशारा कळतो.
मग आरोपांचे गाठोडे
तात्पुरते माळ्यावर जाते
आपुलकीचे साजूक तूप
आरोपीच्या पोळ्यांवर येते.
नाव शंकराचे आणि कृपा लक्ष्मीची
म्हणून जो बदनाम झाला
तो कालांतराने
'रसभरा पका आम' होतो.
'पक्षांतराचा झिम्मा खेळतो
संपत्तीचा रस गळतो'
असे नवे गाणे गात
आतल्या आत धुसफुसतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही आपले आ वासतो.
***
आरोप, चौकशा, कोठडी,
तुरुंग आणि खटले
हे सगळे राजकीय अलंकार आहेत,
जरी कितीही नाही म्हटले.
आजचे आरोपी
उद्याचे उमेदवार असतात;
कारण
त्यांच्यात प्रत्येकाला
'दुभत्या गायी' दिसतात.
आरोप म्हणजे गुन्हा नव्हे
हा बिनतोड युक्तीवाद,
गाठीशी असतो
आणि प्रत्येक पक्ष,
आतून त्यांच्या
पाठीशी असतो.
त्याला डोक्यावर बसवायचं,
की त्याच्या मानगुटीवर बसायचं
याचं उत्तर
परिस्थितीवर अवलंबून असतं.
दिसतं तसंच असतं
आणि तरीही जग फसतं
सत्तेची मस्तानी
त्यांच्या महालात नांदते
मतदार मात्र
एक शून्य बाजीराव असतो
आणि आरोपातल्या रकमा वाचून
आम्ही आपले नुसतेच आ वासतो.
- तंबी दुराई