मुंबई-ठाण्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती इतरत्रही तुटल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत त्यांना आपली खरीखुरी शक्ती आजमावता येईल. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत युती तुटली तेव्हाच तिचे भवितव्य स्पष्ट झाले होते; पण युतीचा पोपट मेला आहे, हे सांगण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त शोधावा लागला. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी युती होणार नसल्याची कल्पना दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांना आधीच होती. त्यामुळे तिथे युतीची चर्चा करताना देखील आनंदच होता. यापूर्वी ‘काहीही झाले तरी युती करायची’ हे ठरवून चर्चा होत असे. यंदा वातावरण वेगळे होते.
एका अर्थाने जे झाले ते दोन्ही पक्षांसाठी चांगलेच झाले. राजकीय पक्षांमधील युती किंवा आघाडी ही इतक्या दीर्घकाळ चालणारी नसावीच. युतीमध्ये पंचवीस वर्षे सडली हे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान अगदीच चूक नाही. युतीमुळे या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची एक पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापासून लांब राहिली, ही वस्तुस्थिती अखेर उद्धव यांनी मान्य केली. भारतीय जनता पक्षाची मंडळी न बोलता शहाणी ठरली. भाजप हा पहिल्यापासून शहरी तोंडवळा असलेला पक्ष. युती झाली तेव्हा भाजपला शहरांमध्ये आणि शिवसेनेला ग्रामीण भागांमध्ये फायदा होईल, हे साधे अंकगणित होते. गेल्या वीस वर्षांत मुंबई वगळला, तर बाकीच्या शहरांमध्ये या अंकगणिताचा या दोन्ही पक्षांना फायदाच झाला. मात्र, शहरीकरण वाढले आणि पर्यायाने भाजपची ताकदही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी झंझावात निर्माण केला. या निवडणुकीत त्यांची लाट होती, हे निकालांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपला आपली ताकद फार वाढल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतरच्या गेल्या अडीच तीन वर्षांत मोदी लाट कायम असल्याचे भाजपला वाटत आहे.
नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना त्रास झाला; परंतु त्याही स्थितीत नागरिकांनी मोदींना मनापासून साथ दिली. या काळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी भागांत झालेल्या नगरपालिका निवडणुकांत भाजपला सर्वाधिक यश मिळाले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, संपूर्ण राज्यात आपली ताकद अजमाविण्याची योग्य वेळ आल्याची त्याची भावना आहे. मुंबईबाहेर शिवसेना नेहमीच भावनेवर चालणारी संघटना राहिली आहे. तिची पक्षबांधणी फारशी दिसणारी नसली, तरी राज्याच्या अनेक भागांत तिने मतदारांशी नाते जोडण्यामध्ये यश मिळविले आहे. त्यामुळे या पुढच्या काळात या दोन पक्षांमध्येच सत्तेची लढाई चालेल, असा अंदाज या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा आहे. त्यामुळे युती करणे कोणालाच परवडणारे नव्हते. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र आल्यास गणिती तर्कानुसार त्यांना लाभ होऊ शकतो. आघाडी करण्याचे शहाणपण ते दाखवितात का, यावर भाजप आणि शिवसेना यांच्या स्वतंत्र लढतीचे यश अवलंबून आहे. मोदींचा करिष्मा कायम आहे का, फडणवीसांच्या कामगिरीला राज्यातील नागरिक पावती देतात का याची उत्तरेही या निमित्ताने मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतो आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे.
एका अर्थाने जे झाले ते दोन्ही पक्षांसाठी चांगलेच झाले. राजकीय पक्षांमधील युती किंवा आघाडी ही इतक्या दीर्घकाळ चालणारी नसावीच. युतीमध्ये पंचवीस वर्षे सडली हे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान अगदीच चूक नाही. युतीमुळे या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची एक पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापासून लांब राहिली, ही वस्तुस्थिती अखेर उद्धव यांनी मान्य केली. भारतीय जनता पक्षाची मंडळी न बोलता शहाणी ठरली. भाजप हा पहिल्यापासून शहरी तोंडवळा असलेला पक्ष. युती झाली तेव्हा भाजपला शहरांमध्ये आणि शिवसेनेला ग्रामीण भागांमध्ये फायदा होईल, हे साधे अंकगणित होते. गेल्या वीस वर्षांत मुंबई वगळला, तर बाकीच्या शहरांमध्ये या अंकगणिताचा या दोन्ही पक्षांना फायदाच झाला. मात्र, शहरीकरण वाढले आणि पर्यायाने भाजपची ताकदही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी झंझावात निर्माण केला. या निवडणुकीत त्यांची लाट होती, हे निकालांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपला आपली ताकद फार वाढल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतरच्या गेल्या अडीच तीन वर्षांत मोदी लाट कायम असल्याचे भाजपला वाटत आहे.
नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना त्रास झाला; परंतु त्याही स्थितीत नागरिकांनी मोदींना मनापासून साथ दिली. या काळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी भागांत झालेल्या नगरपालिका निवडणुकांत भाजपला सर्वाधिक यश मिळाले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, संपूर्ण राज्यात आपली ताकद अजमाविण्याची योग्य वेळ आल्याची त्याची भावना आहे. मुंबईबाहेर शिवसेना नेहमीच भावनेवर चालणारी संघटना राहिली आहे. तिची पक्षबांधणी फारशी दिसणारी नसली, तरी राज्याच्या अनेक भागांत तिने मतदारांशी नाते जोडण्यामध्ये यश मिळविले आहे. त्यामुळे या पुढच्या काळात या दोन पक्षांमध्येच सत्तेची लढाई चालेल, असा अंदाज या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा आहे. त्यामुळे युती करणे कोणालाच परवडणारे नव्हते. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र आल्यास गणिती तर्कानुसार त्यांना लाभ होऊ शकतो. आघाडी करण्याचे शहाणपण ते दाखवितात का, यावर भाजप आणि शिवसेना यांच्या स्वतंत्र लढतीचे यश अवलंबून आहे. मोदींचा करिष्मा कायम आहे का, फडणवीसांच्या कामगिरीला राज्यातील नागरिक पावती देतात का याची उत्तरेही या निमित्ताने मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतो आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे.