अ‍ॅपशहर

'मी तुझ्यावर ओरडले मला माफ कर...' एक्स वाइफ रिनाचं पत्र वाचून आलं आमिरच्या डोळ्यात पाणी

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटासाठी आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी रिना निर्माती बनली होती. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आलेल्या रिनाच्या पत्राने खुद्द आमिर खानला अश्रू अनावर झाले होते.

Lipi 16 Jun 2021, 1:50 pm
मुंबई- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असणारा अभिनेता आमिर खान याने आपल्या कारकिर्दीत एकाहून एक उत्कृष्ट चित्रपटात काम केलं. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'लगान'. नुकतीच 'लगान' चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली. 'लगान' चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले. चित्रपटाचं सगळ्यांनीच प्रचंड कौतुक केलं. शिवाय चित्रपटाला ऑस्करसाठी 'बेस्ट फॉरेन लँग्वेज सिनेमा' साठी नामांकनही देण्यात आलं होतं. परंतु, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची निर्मिती आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी रिना दत्ता हिने केली होती आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर रिनाने सगळ्यांसाठी खास पत्रही लिहिलं होतं. जे वाचून आमिरच्याही डोळयात पाणी आलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aamir khan get emotional after reading a letter from his ex wife reena dutta
'मी तुझ्यावर ओरडले मला माफ कर...' एक्स वाइफ रिनाचं पत्र वाचून आलं आमिरच्या डोळ्यात पाणी


नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातलेली लग्नाची मागणी

'लगान' चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं होतं. तर आमिरची पत्नी किरण रावने सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किरण आणि आमिर जवळ आले होते. या चित्रपटासाठी आमिरनेच रिनाला निर्माती होण्याची गळ घातली होती. एका मुलाखतीत आमिरने ही माहिती दिली होती. आमिरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आमिरने रिनाला निर्माती होण्यास सांगितलं तेव्हा तिने साफ नकार दिला. कारण तिला या क्षेत्राबद्दल काहीही माहीत नव्हतं. परंतु, आमिरसाठी तिने निर्माती होण्याचं ठरवलं. रिना स्वतः या चित्रपटासाठी सुभाष घई यांना भेटली. तिने सगळं समजून घेतलं.

आमिरने दिलेल्या माहितीनुसार, रिना चित्रपटाच्या सेटवर सगळ्यांना ओरडत असे. अगदी आमिरला देखील. परंतु, जेव्हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा रिनाने सगळ्यांसाठी एक पत्र पाठवलं होतं. रिना या क्षेत्रातील नव्हती तरीही तिने निर्माती म्हणून सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्या पत्रात रिनाने सगळ्यांची माफी मागितली होती. तिने लिहिलं होतं, 'मला माफ कर. या कठीण वातावरणात हिंमत न हारता चित्रपट पूर्ण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं कौतुक. मी तुम्हाला ओरडले. मला माफ करा.' संपूर्ण पत्र आमिरच्या लक्षात नव्हतं परंतु, तिने मागितलेली माफी वाचून आमिरच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

संपत्तीच्या बाबतीत शाहरुख- अक्षयला लाजवतील मिथून चक्रवर्ती

महत्वाचे लेख