अ‍ॅपशहर

वडिलांची प्रकृती गंभीर; शूटिंग अर्ध्यावर सोडून मनोज बाजपेयी दिल्लीला रवाना

अभिनेता मनोज बाजपेयी याच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले आहे. वडिलांनी रुग्णालयात ठेवल्याची बातमी ऐकल्यावर मनोज चित्रीकरण अर्ध्यावर सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाला आहे.

Lipi 17 Sep 2021, 7:28 pm
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी याच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. वडिलांच्या तब्येतीची बातमी समजल्यावर मनोजने त्याचे सुरू असलेले चित्रीकरण अर्ध्यावर सोडत दिल्लीला रवाना झाला आहे. केरळमध्ये मनोजच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे.मनोज बाजपेयीच्या वडिलांचे नाव राधाकांत बाजपेयी असे आहे. मनोजचे वडील शेतकरी आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम actor manoj bajpayee father hospitalized actor flay delhi to be with family
वडिलांची प्रकृती गंभीर; शूटिंग अर्ध्यावर सोडून मनोज बाजपेयी दिल्लीला रवाना





दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयीने कमाल राशिद खानच्या विरोधात इंदौर येथील एका न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यामुळे मनोज चर्चेत आला होता. केआरकेने मनोजच्या विरोधात एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये केआरकेने 'द फॅमिली मॅन २' मध्ये मनोजच्या कामाबद्दल अतिशय वाईट भाषेत टीका केली होती. यामुळे मनोजची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे संतप्त मनोजने केआरकेविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

शेतक-याचा मुलगा झाला अभिनेता
मनोजने इथपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यांनी बेतिया जिल्ह्यातील राजा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सत्यवती कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने दिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्राममध्ये शिकण्यासाठी अर्ज केला होता. परंतु चारवेळा त्याचा अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर त्याने बॅरी ड्रामा स्कूलमधून बॅरी जॉनसोबत नाटकाचे प्रशिक्षण घेतले.


मनोजने त्याच्या अभिनयाची सुरुवात दूरदर्शवरून केली. दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या 'स्वाभिमान' मालिकेत काम केले होते. तर शेखर कपूर यांनी त्याला सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी दिली. हा सिनेमा होता 'बैंडिट क्वीन.' त्यानंतर मनोजला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा यांच्या १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्या' सिनेमाने. 'सत्या' आणि त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'शूल' या दोन्ही सिनेमांसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. तसेच 'पिंजर' या सिनेमात त्याने केलेल्या अभिनयासाठी त्यांना परीक्षकांकडून दिले जाणारे विशेष राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज