मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रणौत तिचा बिन्धास्त स्वभाव आणि सतत वाद या गोष्टींवरून नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाउंटमुळे ती चर्चेत होती. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर तिथे उसळलेल्या हिंसाचारावर काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले. त्यानंतर ती इतर सोशल मीडिया अकाउंटवर सक्रीय झाली. अलिकडेच तिने आपल्या चाहत्यांना फेसबुकवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना तिने रॉयल लुकमधील फोटो शेअर केला आहे. अर्थात सोशल मीडिया कुठला ही असला तरी कंगनाला युझर्स ट्रोल करतातच. आता देखील तिने हा फोटो आणि ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर तिला युझर्सने खूप ट्रोल केले आहे. एका युझरने लिहिले, 'कंगना, ईदच्या मुहूर्तावर तू एक शपथ घे की यानंतर तू माणूस म्हणून वागशील.', तर दुसऱ्याने लिहिले की, 'तिरस्कार करणाऱ्यांवरही आम्ही प्रेम करतो, ईद मुबारक कंगना दीदी!' आणखी एका युझरने लिहिले 'ताई, तू सगळं पोस्ट करते आणि निघून जातेस आणि इथे भक्तांना ट्रोल केले जाते.' तर आणखी एका युझरने लिहिले की, ' कंगना, तू कसल्या शुभेच्छा देतेस, तू दोन धर्मांमध्ये भांडणे लावतेस.'
दरम्यान, कंगनाने सातत्याने द्वेषयुक्त भाषा आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. त्यानंतर आपले विचार मांडण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा आधार घेतला. अलिकडेच इस्रायल आणि पॅलिस्टाइन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्यावरही कंगनाने तिचे विचार मांडले आहेत.
तिने लिहिले की, 'कट्टर इस्लामी दहशतवादाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात भारताने इस्रायलची साथ दिली आहे. आपल्या देशाला आणि नागरिकांना दहशतवादापासून वाचवणे हे प्रत्येक राष्ट्राचा मूलभूत अधिकार आहे. या प्रकरणात भारताने इस्रायलची साथ दिली आहे.' कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'जे दहशतवाद पसरवतात, त्यांना तुम्ही चोख उत्तर देतात तेव्हा ते पिडीत होतात. तुम्ही जेव्हा निदर्शने करतात तेव्हा ते तुमची संसद, पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवतात. ज्या लोकांना चोख उत्तर द्यायचे आहे, त्यांनी इस्रायलकडून शिकायला हवे.'
हे मत मांडल्यानंतर कंगनाला ट्रोल करण्यात आले आहे. एका युझरने लिहिले की, 'कंगना ही भारताची परराष्ट्र सचिव आहे का? ' तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'कंगनाला हे देखील माहिती नसेल की तिथे नेमके काय सुरू आहे आणि कशासाठी होत आहे. लोकांनी तर पॅलेस्टाईनकडे न पाहण्याची शपथ घेतली आहे.' कंगनाने केलेल्या या वक्तव्यानंतर तर तिचे इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, कंगनाने सातत्याने द्वेषयुक्त भाषा आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. त्यानंतर आपले विचार मांडण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा आधार घेतला. अलिकडेच इस्रायल आणि पॅलिस्टाइन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्यावरही कंगनाने तिचे विचार मांडले आहेत.
तिने लिहिले की, 'कट्टर इस्लामी दहशतवादाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात भारताने इस्रायलची साथ दिली आहे. आपल्या देशाला आणि नागरिकांना दहशतवादापासून वाचवणे हे प्रत्येक राष्ट्राचा मूलभूत अधिकार आहे. या प्रकरणात भारताने इस्रायलची साथ दिली आहे.' कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'जे दहशतवाद पसरवतात, त्यांना तुम्ही चोख उत्तर देतात तेव्हा ते पिडीत होतात. तुम्ही जेव्हा निदर्शने करतात तेव्हा ते तुमची संसद, पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवतात. ज्या लोकांना चोख उत्तर द्यायचे आहे, त्यांनी इस्रायलकडून शिकायला हवे.'
हे मत मांडल्यानंतर कंगनाला ट्रोल करण्यात आले आहे. एका युझरने लिहिले की, 'कंगना ही भारताची परराष्ट्र सचिव आहे का? ' तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'कंगनाला हे देखील माहिती नसेल की तिथे नेमके काय सुरू आहे आणि कशासाठी होत आहे. लोकांनी तर पॅलेस्टाईनकडे न पाहण्याची शपथ घेतली आहे.' कंगनाने केलेल्या या वक्तव्यानंतर तर तिचे इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.