मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि इंडियन आयडल १२ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण विविध कारणांमुळे कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्यावर एक विशेष भाग प्रसारित करण्यात आला होता. यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आणि कार्यक्रमाच्या परीक्षकांनी किशोर कुमार यांची गाणी गायली. मात्र, हा कार्यक्रम प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. या कार्यक्रमात स्पर्धकांनी आणि परीक्षकांनी किशोर कुमार यांची गाणी अतिशय वाईट पद्धतीने सादर केली. तसेच त्यांच्या गाण्यांवर अन्याय केली, अशी टीका अनेक प्रेक्षकांनी केली होती. या कार्यक्रमात किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतरही त्यांनीही या भागावर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली होती. याचप्रकरणी पुन्हा एकदा आदित्य नारायणने आपल्या कार्यक्रमाच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे.
आपल्या कार्यक्रमावर होणारी टीका ही अनाठायीच असल्याचे आदित्यचे म्हणणे आहे. तो म्हणाला की, ' प्रेक्षक आमच्यावर चिडले कारण अचानकपणे आयपीएलच्या मॅचेस बंद करण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी हा राग इंडियन आयडल १२ कार्यक्रमावर काढला.' आदित्य पुढे म्हणाला, ' घरातल्या आई-वडिलांनी टिव्हीचा रिमोट आपल्या हातात घेत इंडियन आयडल कार्यक्रम बघायला सुरुवात केली. त्यामुळे आताच्या नवीन पिढीला खूप राग आला. आपला राग कुणावर काढायचा हे त्यांना समजले नाही. माझ्या पिढीतील अनेकांच्या बाबतीत अनेकदा असे प्रसंग घडतात. अचानक रिकामपण येते. जसे संध्याकाळचे सात-साडेसात वाजतात, तेव्हा मी देखील खूप उत्साहात आणि आनंदात असतो. मी फोनवर क्रिकेट टीम देखील तयार केली होती. गेल्यावर्षीपासून आपण सर्वजण घरी असल्याने वेळ ही खूप मिळत असल्याने खूप वेळ टिव्ही पाहिला जातो आहे'
दरम्यान, इंडियन आयडल १२ या स्पर्धेत ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांना आदरांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी देखील या भागाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, 'हा भाग लोकांना का आवडला नाही याचे कारण मी समजू शकतो. खरे तर हे आहे की, कुणीही किशोर कुमार यांच्यासारखे गाऊ शकत नाही. त्यांचे व्यक्तिमत्तव उत्तुंग पर्वतासारखे होते. आजच्या युवा पिढीला त्यांच्याबदद्ल काहीच माहिती नाही. त्यांना फक्त रूप तेरा मस्ताना आणि आराधना याबद्दलच फक्त माहिती आहे.'अमित कुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतरही आदित्य नारायणने आपले मत व्यक्त केले होते. तेव्हा आदित्य म्हणाला होता की, ' अमितजींनी याआधी अनेकदा आमच्या कार्यक्रमाची, स्पर्धकांची आणि कार्यक्रमाच्या टीमचे भरभरून कौतुक केले आहे. या भागात त्यांनीही देखील किशोर कुमार यांच्याशी संबंधित काही व्यक्तिगत आठवणी, काही किस्से सांगितले. त्यांना जर कार्यक्रमामधील एखादी गोष्ट आवडली नव्हती तर त्याचवेळी त्यांनी ती सांगायल हवी होती. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यक्रमात बदल आम्ही आनंदाने केला असता...'
आपल्या कार्यक्रमावर होणारी टीका ही अनाठायीच असल्याचे आदित्यचे म्हणणे आहे. तो म्हणाला की, ' प्रेक्षक आमच्यावर चिडले कारण अचानकपणे आयपीएलच्या मॅचेस बंद करण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी हा राग इंडियन आयडल १२ कार्यक्रमावर काढला.' आदित्य पुढे म्हणाला, ' घरातल्या आई-वडिलांनी टिव्हीचा रिमोट आपल्या हातात घेत इंडियन आयडल कार्यक्रम बघायला सुरुवात केली. त्यामुळे आताच्या नवीन पिढीला खूप राग आला. आपला राग कुणावर काढायचा हे त्यांना समजले नाही. माझ्या पिढीतील अनेकांच्या बाबतीत अनेकदा असे प्रसंग घडतात. अचानक रिकामपण येते. जसे संध्याकाळचे सात-साडेसात वाजतात, तेव्हा मी देखील खूप उत्साहात आणि आनंदात असतो. मी फोनवर क्रिकेट टीम देखील तयार केली होती. गेल्यावर्षीपासून आपण सर्वजण घरी असल्याने वेळ ही खूप मिळत असल्याने खूप वेळ टिव्ही पाहिला जातो आहे'
दरम्यान, इंडियन आयडल १२ या स्पर्धेत ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांना आदरांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी देखील या भागाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, 'हा भाग लोकांना का आवडला नाही याचे कारण मी समजू शकतो. खरे तर हे आहे की, कुणीही किशोर कुमार यांच्यासारखे गाऊ शकत नाही. त्यांचे व्यक्तिमत्तव उत्तुंग पर्वतासारखे होते. आजच्या युवा पिढीला त्यांच्याबदद्ल काहीच माहिती नाही. त्यांना फक्त रूप तेरा मस्ताना आणि आराधना याबद्दलच फक्त माहिती आहे.'अमित कुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतरही आदित्य नारायणने आपले मत व्यक्त केले होते. तेव्हा आदित्य म्हणाला होता की, ' अमितजींनी याआधी अनेकदा आमच्या कार्यक्रमाची, स्पर्धकांची आणि कार्यक्रमाच्या टीमचे भरभरून कौतुक केले आहे. या भागात त्यांनीही देखील किशोर कुमार यांच्याशी संबंधित काही व्यक्तिगत आठवणी, काही किस्से सांगितले. त्यांना जर कार्यक्रमामधील एखादी गोष्ट आवडली नव्हती तर त्याचवेळी त्यांनी ती सांगायल हवी होती. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यक्रमात बदल आम्ही आनंदाने केला असता...'