अ‍ॅपशहर

'सदा चले थके ना तू, रुके ना तू झुके ना तू', असं म्हणत बिग बींचा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम

महानायक अमिताभ बच्चन यांनी करोना योद्धे आणि फ्रंटलाईनवर काम करणा-या सर्व कर्मचा-यांचा उत्साह वाढवत त्यांना धीर देण्यासाठी हरिवंशराय बच्चन यांची कविता सादर केली आहे. त्यांनी म्हटलेल्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

Lipi 12 May 2021, 12:01 pm
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करोना लढ्यासाठी कोणताही गाजावाजा न करत मदत करत आहेत. इतकेच नाही तर या करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये फ्रंटलाइन कर्मचारी, करोना योद्ध्यांची हिंमत कायम रहावी यासाठी ते त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. अलिकडेच अमिताभ बच्चन या सर्व करोना योद्ध्यांसाठी खास एक व्हिडीओ तयार केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh bachchan sing his father poem for corona frontline warriors
'सदा चले थके ना तू, रुके ना तू झुके ना तू', असं म्हणत बिग बींचा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम


या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील आणि कवी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता वाचून दाखवली आहे. अमिताभ बच्चन यांनी ज्या उत्साहात, ही कविता करोना योद्ध्यांसाठी सादर केली ती पाहून त्यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. देशावर करोनाचे संकट आले आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बच्चन यांनी केले आहे.

'तारक मेहता...'मधील 'टप्पू'ला पितृशोक, वडिलांचं करोनामुळे निधन

काय म्हणता आहेत बिग बी?

या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी

'रुके ना तू, धनुष उठा प्रहार कर,

तू सबसे पहला वार कर,

अग्नि सी धधक-धधक,

हिरण सी सजग-सजग,

सिंग सी धहाड़ कर,

शंख सी पुकार कर,

रुके ना तू थके ना तू, झुके न तू '

कविता सादर केल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, 'कवितेचे हे शब्द माझे वडील हरिवंशराय बच्चन यांचे असून हे शब्द सर्वांचे मनोबल वाढवणारे आहेत. देशापुढे अनेक संकटे आली होती त्या काळात त्यांनी ही कविता लिहिली होती. आज देशात जी परिस्थिती आहे त्याला ही कविता अगदी तंतोतंत लागू पडते आहे. ही कविता आज करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक करोना योद्ध्यांसाठी, फ्रण्टलाइन कर्मचाऱ्यांसाठी आहे.

'हे खरंच भारतीय आहेत का?' औषधांच्या काळ्याबाजारावर भडकला सलमान

View this post on Instagram A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

ही कविता या सर्वांचा उत्साह, मनोबल वाढवणारी आहे. हे सर्वजण आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आता त्यांचे मनोबल कायम राहण्याची गरज आहे. ही आपल्या सर्वांची देखील लढाई आहे. त्यासाठी आपण जेवढे करू शकतो ते सर्वकाही करायचे आहे. भारताच्या सुरक्षेसाठी आपल्या सर्वांना एकत्र यायचे आहे.'


आपण एकत्र येऊ तेव्हाच जिंकू


अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना लिहिले आहे, 'आपण लढणार, सर्वजण एकत्र येऊन लढणार आणि जिंकणार आहोत.' अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी एका सेमिनारमध्ये सहभागी झाले होते. या सेमिनारला जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नेते मंडळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, पोप फ्रान्सिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतात करोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची माहिती दिली. तसेच देशामध्ये करोना व्हॅक्सिनची मोहिमेबद्दल माहिती दिली होती.

View this post on Instagram A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामासंदर्भात सांगायचे तर 'चेहरे' हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. परंतु करोना परिस्थितीमुळे त्याचे प्रदर्शन लांबले आहे. यासह त्यांचे अनेक सिनेमे त्यांच्याकडे आहेत. छोट्या पडद्यावरही कौन बनेगा करोडपती १३ या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन लवकरच दिसणार आहेत. सध्या या कार्यक्रमाच्या प्रमोशनमध्ये ते व्यग्र आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज