मुंबई: कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअलिटी शो बिग बॉस १४ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. रुबीना दिलैक या सीझनची विजेती ठरली. तिनं ३६ लाखांची रोख रक्कम आणि ट्रॉफी जिंकली. तर दुसरीकडे राखी सावंतनं १४ लाखांची रक्कम आपल्या नावावर केली. राखी सावंतनं वाइल्ड कार्डद्वारे चॅलेंजर म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती. जी सर्वच स्पर्धकांच्या खांद्याला खांदा लावून फक्त खेळलीच नाही तर अगदी टॉप ५ स्पर्धकांच्या यादी पर्यंत तिनं मजल मारली. बिग बॉसच्या या सीझनमध्ये अनेकदा राखी वादाच्या भोवऱ्यात सापडली. पण सर्वाधिक चर्चेत राहिलं ते तिचं आणि अभिनव शुक्लाचं भांडण. राखीनं शोमध्ये मस्करी करताना अभिनवच्या शॉर्ट्सची नॉड खेचली होती. जो या शोमधील सर्वाधिक वादाचा मुद्दा ठरला होता. यावरून मेकर्सवरही खूप टीका झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र राखीनं आता यावर भाष्य केलं आहे. ई-टाइम्सशी बोलताना राखीनं सांगितलं, 'अभिनव रुबीना आणि बाकी सर्वजण जेव्हा स्विमिंग पूलमध्ये एकमेकांसोबत अशी मस्करी करायचे, एकमेकांच्या पॅन्ट खेचायचे त्यावेळी ते कोणाला चुकीचं वाटलं नाही. जेव्हा माझा मुद्दा आला तेव्हा लोकांनी त्यावर वाद घालायला सुरुवात केली. मी फक्त त्याच्या पॅन्टची नॉड खेचली होती. त्याची पॅन्ट नाही.'
राखी सावंत पुढे म्हणाली, 'अभिनवच्या शॉर्ट्स कमरेवर टाइट होत्या हे मला माहित होतं. त्यामुळे मी जे केलं ते चुकीचं वाटत नाही. मला बिग बॉसनं टास्क दिला होता आणि मी तोच पूर्ण करत होते. त्याच्या आसपास राहणं, मसाज करणं किंवा फ्लर्ट करणं हे सर्व बिग बॉसनं दिलेल्या टास्कचा भाग होता. मी माझं काम करत होते पण रुबीनानं मला चुकीचं समजलं.'
या मुलाखतीत राखी म्हणाली, 'जेव्हा रुबीनानं माझ्यावर पाणी टाकलं त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं. मी एकमेव स्पर्धक होते जिच्यामुळे अभिनव चर्चेत आला होता. त्याआधी तो कोणाचं मनोरंजन करत नाही असंच सर्वांना वाटतं होतं.' दरम्यान या मुद्द्यावरून सोशल मीडियावरही खूप वाद झाला होता. अनेक युझर्सनी बिग बॉस मेकर आणि सलमान खानवर टीका केली होती.
राखी सावंत पुढे म्हणाली, 'अभिनवच्या शॉर्ट्स कमरेवर टाइट होत्या हे मला माहित होतं. त्यामुळे मी जे केलं ते चुकीचं वाटत नाही. मला बिग बॉसनं टास्क दिला होता आणि मी तोच पूर्ण करत होते. त्याच्या आसपास राहणं, मसाज करणं किंवा फ्लर्ट करणं हे सर्व बिग बॉसनं दिलेल्या टास्कचा भाग होता. मी माझं काम करत होते पण रुबीनानं मला चुकीचं समजलं.'
या मुलाखतीत राखी म्हणाली, 'जेव्हा रुबीनानं माझ्यावर पाणी टाकलं त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं. मी एकमेव स्पर्धक होते जिच्यामुळे अभिनव चर्चेत आला होता. त्याआधी तो कोणाचं मनोरंजन करत नाही असंच सर्वांना वाटतं होतं.' दरम्यान या मुद्द्यावरून सोशल मीडियावरही खूप वाद झाला होता. अनेक युझर्सनी बिग बॉस मेकर आणि सलमान खानवर टीका केली होती.