मुंबई :महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याने प्रेक्षकांबरोबरच स्पर्धकांनाही धक्का बसला. अभिजीत केळकर सुद्धा याला अपवाद नाही. सुरेखाताई घरातून बाहेर पडल्यापासून अभिजीतला सतत त्यांची आठवण येत असल्याचे.'वूट अनसीन अनदेखा'च्या एका व्हिडिओत पाहायला मिळत आहे घरातल्या जेष्ठ व्यक्तीचा नेहमीच आपल्याला आधार वाटत असतो. सुरेखा ताई बाहेर गेल्यामुळे अस्वस्थ झाल्याचं अभिजीतने सांगितलं. 'सुरेखाताईंकडे बघुन मला लहानपणी सांभाळायला येणाऱ्या मावशींची आठवण येते. माझे आई-बाबा कामासाठी बाहेर जायचे तेव्हा मला काय हवं नको ते त्याच बघायच्या. त्या माझे इतके लाड करायच्या की मी नेमका कोणाचा मुलगा आहे हेच लोकांना कळायचं नाही. ही गोष्ट मी सुरेखा ताईंशी कधी बोललो नाही पण मनाने माझं एक नातं त्यांच्याशी जोडलं गेलं होतं. ' अशा शब्दात अभिजीतनेही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.बिग बॉस विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा मागच्या आठवड्यात सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. त्यांच्या जाण्याने घरात अनेक बदल होत आहेत, असं सगळ्याच स्पर्धकांना वाटतंय.
सुरेखाताईंच्या आठवणीने अभिजीत झाला भावूक
महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याने प्रेक्षकांबरोबरच स्पर्धकांनाही धक्का बसला. अभिजीत केळकर सुद्धा याला अपवाद नाही. सुरेखाताई घरातून बाहेर पडल्यापासून अभिजीतला सतत त्यांची आठवण येत असल्याचे.'वूट अनसीन अनदेखा'च्या एका व्हिडिओत पाहायला मिळत आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2019, 1:02 pm