मुंबई:
'अतिथी देवो भव:' या टास्कमध्ये टीम 'बी'चा विजय झाला आहे. या टास्कसाठी घरामध्ये काही पाहुणे आले होते. हे पाहुणे म्हणजे पहिल्या पर्वातील सदस्य पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता होते. पाहुण्यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क दिले होते.
बिग बॉसच्या घरी आलेल्या या चार पाहुण्यांनी स्पर्धकांना सळो की पळो करून सोडलं आहे. पुष्करनं साखर, चहा पावडर आणि मिठाची बरणी लपवली त्यामुळं हॉटेल चालवणाऱ्या सदस्यांची चांगलीच गोची झाली. इतकं सगळं कमी म्हणून स्पर्धकांची परिक्षा घेण्यासाठी शर्मिष्ठानं तिला देण्यात आलेल्या सुपमध्ये मुद्दाम केसाचा तुकडा टाकला. यामुळं नक्की कोणाच्या चुकीमुळं सुपमध्ये केस पडला यावरून भांडण सुरु झालं. याची शिक्षा म्हणून सईनं नेहासमोर दोन पर्याय ठेवले. एक म्हणजे मिळालेले चार स्टार परत करायचे आणि दुसरा म्हणजे कोणत्याही चार सदस्यांनी अडगळीच्या खोलीत जायचं.
घरातील सदस्यांनी देखील आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. देतील तो टास्क त्यांनी पूर्ण केला. यात अखेर टीम 'बी' विजयी ठरली. पहिल्या सीजन मधील हे सगळे स्पर्धक येऊन गेल्यानंतर आता घरातील वातावरण बदलले आहे. आता पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'अतिथी देवो भव:' या टास्कमध्ये टीम 'बी'चा विजय झाला आहे. या टास्कसाठी घरामध्ये काही पाहुणे आले होते. हे पाहुणे म्हणजे पहिल्या पर्वातील सदस्य पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता होते. पाहुण्यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क दिले होते.
बिग बॉसच्या घरी आलेल्या या चार पाहुण्यांनी स्पर्धकांना सळो की पळो करून सोडलं आहे. पुष्करनं साखर, चहा पावडर आणि मिठाची बरणी लपवली त्यामुळं हॉटेल चालवणाऱ्या सदस्यांची चांगलीच गोची झाली. इतकं सगळं कमी म्हणून स्पर्धकांची परिक्षा घेण्यासाठी शर्मिष्ठानं तिला देण्यात आलेल्या सुपमध्ये मुद्दाम केसाचा तुकडा टाकला. यामुळं नक्की कोणाच्या चुकीमुळं सुपमध्ये केस पडला यावरून भांडण सुरु झालं. याची शिक्षा म्हणून सईनं नेहासमोर दोन पर्याय ठेवले. एक म्हणजे मिळालेले चार स्टार परत करायचे आणि दुसरा म्हणजे कोणत्याही चार सदस्यांनी अडगळीच्या खोलीत जायचं.
घरातील सदस्यांनी देखील आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. देतील तो टास्क त्यांनी पूर्ण केला. यात अखेर टीम 'बी' विजयी ठरली. पहिल्या सीजन मधील हे सगळे स्पर्धक येऊन गेल्यानंतर आता घरातील वातावरण बदलले आहे. आता पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.