मुंबई:
बिग बॉसच्या घरातील सदस्यांची एकमेकांसोबत असलेली समीकरणं कधी आणि कशी बदलतील हे सांगता येत नाही. एरव्ही घरात मेघा आणि आस्तादचे खटके उडताना आपण अनेकदा पाहिलंय. परंतु, एका टास्कदरम्यान ही दोघंही एकमेकांशी चांगल्या गप्पा मारताना दिसली. इतकेच नव्हे तर मेघाने आस्तादचे भरभरून कौतुकही केले.
कॅप्टनपद ठरवण्यासाठी देण्यात आलेल्या 'ध्वज विजयाचा उंच धरा रे' या टास्कदरम्यान मेघाकडून झालेल्या चुकीबद्दल तिने आस्तादची माफी तर मागितली शिवाय त्याच्या निश्चयाचे आणि हुशारीचे कौतुकही केले. आस्तादशी बोलताना मेघाने सांगितले की तिला आस्तादविषयी अभिमान वाटतो. त्याचा मूळ स्वभाव फार वेगळा आहे. परंतु, घरात येऊन , इतक्या लोकांसोबत राहण्यासाठी त्याने स्वत:च्या स्वभावात जो बदल घडवलाय तो वाखणण्याजोगा आहे. आस्तादने एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर ती गोष्ट तो साध्य करतोच असंही ती म्हणाली.
त्यामुळे एरव्ही घरात एकमेकांना कसंबसं सहन करणाऱ्या मेघा आणि आस्तादमध्ये झालेल्या या मैत्रीपूर्ण संभाषणामुळे घरातील वातावरण मात्र शांत होणार की नवा काही वाद निर्माण होणार हे लवकरच कळेल.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांची एकमेकांसोबत असलेली समीकरणं कधी आणि कशी बदलतील हे सांगता येत नाही. एरव्ही घरात मेघा आणि आस्तादचे खटके उडताना आपण अनेकदा पाहिलंय. परंतु, एका टास्कदरम्यान ही दोघंही एकमेकांशी चांगल्या गप्पा मारताना दिसली. इतकेच नव्हे तर मेघाने आस्तादचे भरभरून कौतुकही केले.
कॅप्टनपद ठरवण्यासाठी देण्यात आलेल्या 'ध्वज विजयाचा उंच धरा रे' या टास्कदरम्यान मेघाकडून झालेल्या चुकीबद्दल तिने आस्तादची माफी तर मागितली शिवाय त्याच्या निश्चयाचे आणि हुशारीचे कौतुकही केले. आस्तादशी बोलताना मेघाने सांगितले की तिला आस्तादविषयी अभिमान वाटतो. त्याचा मूळ स्वभाव फार वेगळा आहे. परंतु, घरात येऊन , इतक्या लोकांसोबत राहण्यासाठी त्याने स्वत:च्या स्वभावात जो बदल घडवलाय तो वाखणण्याजोगा आहे. आस्तादने एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर ती गोष्ट तो साध्य करतोच असंही ती म्हणाली.
त्यामुळे एरव्ही घरात एकमेकांना कसंबसं सहन करणाऱ्या मेघा आणि आस्तादमध्ये झालेल्या या मैत्रीपूर्ण संभाषणामुळे घरातील वातावरण मात्र शांत होणार की नवा काही वाद निर्माण होणार हे लवकरच कळेल.