मुंबई- बॉलिवूडमध्ये अनेक उदाहरणं देता येतील ज्यासाठी सुरुवातीला एका वेगळ्या अभिनेत्याची निवड केली जाते परंतु, काही कारणामुळे त्या अभिनेत्याने नकार दिल्याने तो चित्रपट दुसऱ्याचं अभिनेत्याला मिळतो आणि हिटदेखील होतो. बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र यांच्यासोबतही असंच काहीसं झालं होतं. अमिताभ यांनी केलेले दोन चित्रपट सुरुवातीला धर्मेंद्र यांना देण्यात आले होते. परंतु, काही कारणांमुळे ते चित्रपट करू शकले नाहीत. परंतु, त्या चित्रपटांनी अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंग मॅन' हा 'किताब मिळवून दिला. आर्शी खानला करोनाची लागण, दोन दिवसांपूर्वी पंजाबहून परतली आहे अभिनेत्री
धर्मेंद्र आता मोठ्या पडद्यापासून भलेही दूर असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल काही खास गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला 'जंजीर' चित्रपट आधी त्यांना ऑफर केला गेला होता. इतकंच नाही तर 'आनंद' चित्रपटातही त्यांना भूमिका करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे ते हे चित्रपट करू शकले नाहीत. ते म्हणाले, 'तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की प्रकाश मेहरा यांचा 'जंजीर' माझा होता. मी हा चित्रपट करण्यासाठी पूर्णपणे तयार होतो पण काही वैयक्तिक कारणांमुळे मी चित्रपट करू शकलो नाही.'
७० टक्के शूटिंग करुनही 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग'मध्ये मृणाल ठाकूर का नाही? समोर आलं खरं कारण
त्यानंतर त्यांनी चित्रपट 'आनंद' बद्दलही एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'हृषीकेश मुखर्जी माझे जवळचे मित्र होते. आम्ही बंगळुरूच्या एका विमानात सोबत होतो. तिथे त्यांनी मला 'आनंद' चित्रपटाची कथा ऐकवली. मला ती प्रचंड आवडली आणि मी चित्रपटासाठी होकार दिला. परंतु, त्यानंतर मला सांगण्यात आलं की या चित्रपटात आणखी एक अभिनेतादेखील काम करणार आहे. घरी गेल्यावर दारूच्या नशेत मी त्यांना रात्रभर फोन केले आणि त्यांना सारखा सांगत राहिलो की हा चित्रपट फक्त माझा आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या अभिनेत्याला चित्रपटात घेतलं. यासर्व प्रकारामुळे अत्यंत हिट चित्रपटांमध्ये मोडले जाणारे 'जंजीर' आणि 'आनंद' हे दोन्ही चित्रपट धर्मेंद्र यांच्या हातातून निसटून गेले.
धर्मेंद्र आता मोठ्या पडद्यापासून भलेही दूर असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल काही खास गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला 'जंजीर' चित्रपट आधी त्यांना ऑफर केला गेला होता. इतकंच नाही तर 'आनंद' चित्रपटातही त्यांना भूमिका करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे ते हे चित्रपट करू शकले नाहीत. ते म्हणाले, 'तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की प्रकाश मेहरा यांचा 'जंजीर' माझा होता. मी हा चित्रपट करण्यासाठी पूर्णपणे तयार होतो पण काही वैयक्तिक कारणांमुळे मी चित्रपट करू शकलो नाही.'
७० टक्के शूटिंग करुनही 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग'मध्ये मृणाल ठाकूर का नाही? समोर आलं खरं कारण
त्यानंतर त्यांनी चित्रपट 'आनंद' बद्दलही एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'हृषीकेश मुखर्जी माझे जवळचे मित्र होते. आम्ही बंगळुरूच्या एका विमानात सोबत होतो. तिथे त्यांनी मला 'आनंद' चित्रपटाची कथा ऐकवली. मला ती प्रचंड आवडली आणि मी चित्रपटासाठी होकार दिला. परंतु, त्यानंतर मला सांगण्यात आलं की या चित्रपटात आणखी एक अभिनेतादेखील काम करणार आहे. घरी गेल्यावर दारूच्या नशेत मी त्यांना रात्रभर फोन केले आणि त्यांना सारखा सांगत राहिलो की हा चित्रपट फक्त माझा आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या अभिनेत्याला चित्रपटात घेतलं. यासर्व प्रकारामुळे अत्यंत हिट चित्रपटांमध्ये मोडले जाणारे 'जंजीर' आणि 'आनंद' हे दोन्ही चित्रपट धर्मेंद्र यांच्या हातातून निसटून गेले.