मुंबई:
'थलैवा' रजनीकांत आणि अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या 2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची कमाई केली आहे. उत्तर भारत आणि इतर हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.
मागील आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल ६४ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई तुलनेनं कमी झाली. बॉक्सऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ४५ कोटी रुपये कमवले तर, तिसऱ्या दिवशी ५६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंतचा आकडा १६५ कोटींवर पोहोचला आहे. रविवारची आकडेवारी अद्याप हाती आलेली नसली तरी हा सिनेमा पहिल्या आठवड्यात ३०० कोटींचा आकडा आोलांडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तब्बल ५५० कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेला हा बॉलिवूडचा सगळ्यात महागडा सिनेमा आहे.
तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईत अचानक लोकांचे खून होऊ लागतात. संपर्कासाठी वापरले जाणारे मोबाइल लोकांचे प्राण घेत असल्याचं समोर येतं. मोबाइलसारखा एक खूप मोठा पक्षी शहरावर घिरट्या घालू लागतो. या पक्ष्यापासून शहराला वाचवण्यासाठी वशीकरण पुन्हा चिट्टीला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. पण शहरातील काही लोकं त्याचा विरोध करतात, असं या सिनेमाचं कथानक आहे.
'थलैवा' रजनीकांत आणि अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या 2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची कमाई केली आहे. उत्तर भारत आणि इतर हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.
मागील आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल ६४ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई तुलनेनं कमी झाली. बॉक्सऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ४५ कोटी रुपये कमवले तर, तिसऱ्या दिवशी ५६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंतचा आकडा १६५ कोटींवर पोहोचला आहे. रविवारची आकडेवारी अद्याप हाती आलेली नसली तरी हा सिनेमा पहिल्या आठवड्यात ३०० कोटींचा आकडा आोलांडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तब्बल ५५० कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेला हा बॉलिवूडचा सगळ्यात महागडा सिनेमा आहे.
तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईत अचानक लोकांचे खून होऊ लागतात. संपर्कासाठी वापरले जाणारे मोबाइल लोकांचे प्राण घेत असल्याचं समोर येतं. मोबाइलसारखा एक खूप मोठा पक्षी शहरावर घिरट्या घालू लागतो. या पक्ष्यापासून शहराला वाचवण्यासाठी वशीकरण पुन्हा चिट्टीला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. पण शहरातील काही लोकं त्याचा विरोध करतात, असं या सिनेमाचं कथानक आहे.