मुंबई:
बॉलिवूडचा बहुचर्चित आणि मल्टीस्टारर चित्रपट 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला असून बॉक्सऑफिसवर देखील तो दणकून आपटलाय. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूडचे मोठे कालाकार असून देखील प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली. तसंच समीक्षकांनीही चित्रपटाबद्दल फार काही चांगलं मत व्यक्त केलं नाही. त्यामुळं या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी आमिरनं स्वीकारली असून प्रेक्षकांची माफी देखील मागितली आहे.
मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात आमिरनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या दरम्यान 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'बद्दल विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची त्यानं उत्तर दिली. 'प्रेक्षकांना आमच्या चित्रटाकडून अनेक अपेक्षा होत्या. आम्ही त्यांचं मनोरंजन करण्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. प्रेक्षक आणि समिक्षकांना चित्रपट आवडला नाही. त्या सर्वांची मी माफी मागतो आणि अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो', असं आमिरनं म्हटलं आहे.
'माझे चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पोटच्या मुलांसारखं मी माझ्या चित्रपटांवर प्रेम करतो. गेली दोन वर्षे चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं अफाट मेहनत घेतली होती. काही लोकांना हा चित्रपट आवडला देखील आहे. त्यांचे मी आभार मानतो. पण मला माहीत आहे त्यांची संख्या फार कमी आहे'असं आमिर मिश्किलपणे म्हणाला.
'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची निवड सहसा चुकत नाही. आजवर अनेक चित्रपटांतून ते दिसून आलं आहे. पण पहिल्याच दिवशी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'नं ५२ कोटी कमावून रेकार्डब्रेक केला खरा. पण नंतर समीक्षकांची टीका आणि प्रेक्षकांची नाराजी चित्रपटाला भोवलीय.
बॉलिवूडचा बहुचर्चित आणि मल्टीस्टारर चित्रपट 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला असून बॉक्सऑफिसवर देखील तो दणकून आपटलाय. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूडचे मोठे कालाकार असून देखील प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली. तसंच समीक्षकांनीही चित्रपटाबद्दल फार काही चांगलं मत व्यक्त केलं नाही. त्यामुळं या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी आमिरनं स्वीकारली असून प्रेक्षकांची माफी देखील मागितली आहे.
मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात आमिरनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या दरम्यान 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'बद्दल विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची त्यानं उत्तर दिली. 'प्रेक्षकांना आमच्या चित्रटाकडून अनेक अपेक्षा होत्या. आम्ही त्यांचं मनोरंजन करण्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. प्रेक्षक आणि समिक्षकांना चित्रपट आवडला नाही. त्या सर्वांची मी माफी मागतो आणि अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो', असं आमिरनं म्हटलं आहे.
'माझे चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पोटच्या मुलांसारखं मी माझ्या चित्रपटांवर प्रेम करतो. गेली दोन वर्षे चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं अफाट मेहनत घेतली होती. काही लोकांना हा चित्रपट आवडला देखील आहे. त्यांचे मी आभार मानतो. पण मला माहीत आहे त्यांची संख्या फार कमी आहे'असं आमिर मिश्किलपणे म्हणाला.
'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची निवड सहसा चुकत नाही. आजवर अनेक चित्रपटांतून ते दिसून आलं आहे. पण पहिल्याच दिवशी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'नं ५२ कोटी कमावून रेकार्डब्रेक केला खरा. पण नंतर समीक्षकांची टीका आणि प्रेक्षकांची नाराजी चित्रपटाला भोवलीय.