मुंबई:
हिंदी चित्रपट सृष्टीतील अजरामर गीतकार साहीर लुधयानवी आणि अष्टपैलू कवयित्री, लेखिका अमृता प्रीतम यांची प्रेमकहाणीही तितकीच विलक्षण होती. साहीर आणि अमृताची ही कथा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना गेली अनेक वर्ष या कथेवर चित्रपट करायची इच्छा होती. मात्र, गेल्या काही वर्षात ते शक्य झालं नाही. आता मात्र भन्साळी यांनी साहीर आणि अमृताच्या कथेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
तापसी आणि अभिषेक ‘मनमर्झिया’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. तापसीआधी अमृता प्रीतम यांची भूमिका ऐश्वर्या राय-बच्चन साकारणार होती. मात्र काही कारणानं या चित्रपटातून तिनं माघार घेतली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अजरामर गीतकार साहीर लुधयानवी आणि अष्टपैलू कवयित्री, लेखिका अमृता प्रीतम यांची प्रेमकहाणीही तितकीच विलक्षण होती. साहीर आणि अमृताची ही कथा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना गेली अनेक वर्ष या कथेवर चित्रपट करायची इच्छा होती. मात्र, गेल्या काही वर्षात ते शक्य झालं नाही. आता मात्र भन्साळी यांनी साहीर आणि अमृताच्या कथेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
तापसी आणि अभिषेक ‘मनमर्झिया’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. तापसीआधी अमृता प्रीतम यांची भूमिका ऐश्वर्या राय-बच्चन साकारणार होती. मात्र काही कारणानं या चित्रपटातून तिनं माघार घेतली.