मुंबई: आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूडची क्विन अर्थात कंगना रनौट पुन्हा एकदा चर्चैत आली आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कंगना लवकरच एका सिनेमाची निर्मिती करणार असून हा सिनेमा अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर असणार आहे. 'अपराजित अयोध्या' असं या सिनेमाचं नावं असणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती कंगनाच्या निर्मिती संस्थेकडून केली जाणार आहे. तिच्या कंपनीकडून निर्मिती होत असलेला 'अपराजित अयोध्या' हा पहिलाच सिनेमा असणार आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि खटला या विषयावर सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असून बाहुबली सीरीजचे निर्माते के.वी विजयेंद्र प्रसाद या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद अनेक दशके जुना आहे. ८०च्या दशकातील पिढीला अयोध्या प्रकरणाची केवळ नकारात्मक बाजू माहीत होती. या प्रकरणामुळं भारतीय राजकराणाला एक वेगळं वळण मिळालं. राजकारणाचा चेहरा बदलला. सर्वोच्च न्यायालयानं नुकताच जो निकाल दिला त्यामुळं अनेक वर्षे सुरू असलेला वाद सध्या तरी मिटला आहे. हा मुद्दा एका प्रकारे माझ्या खासगी आयुष्यातील प्रवासही दाखवतो. माझ्या कंपनीकडून निर्मिती होत असलेल्या पहिल्या सिनेमासाठी यापेक्षा चांगला विषय असू शकत नाही, त्यामुळं या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असं कंगनानं म्हटलं आहे.
वाचा: जयललितांच्या बायोपिकसाठी कंगनानं घेतले २४ कोटीचे मानधन
याशिवाय कंगना लवकरच 'थलाइवी' नावाच्या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. जयललिता यांची भूमिका अधिकाधिक नेमकेपणानं साकारता यावी, यासाठी कंगना तमीळ भाषा शिकते आहे. परंतु, तमीळ शिकणं तिला प्रचंड अवघड काम वाटतंय. जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगना प्रचंड मेहनत घेते आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली,' जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मला आमच्या दोघींमध्ये बऱ्याच बाबतीत साम्य आढळते. परंतु, ही भूमिका मला अधिक उत्तमरित्या पडद्यावर साकारता यावी, ती प्रेक्षकांना खरी वाटावी यासाठी मी तामीळ शिकते आहे. मला नेहमीच प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट करायचे होते. माझ्या चित्रपटांचे प्रमोशन करताना मी वेगवगेळ्या राज्यांत फिरायचे तेव्हा मला जाणवलं होतं की प्रादेशिक सिनेमा बनवणाऱ्यांकडे किती जबरदस्त आशय आहे. मी एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत होते आणि या चित्रपटामुळे मला ती मिळाली.'
वाचा: जयललितांवर बायोपिक; कंगना मुख्य भूमिकेत
या चित्रपटाची निर्मिती कंगनाच्या निर्मिती संस्थेकडून केली जाणार आहे. तिच्या कंपनीकडून निर्मिती होत असलेला 'अपराजित अयोध्या' हा पहिलाच सिनेमा असणार आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि खटला या विषयावर सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असून बाहुबली सीरीजचे निर्माते के.वी विजयेंद्र प्रसाद या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद अनेक दशके जुना आहे. ८०च्या दशकातील पिढीला अयोध्या प्रकरणाची केवळ नकारात्मक बाजू माहीत होती. या प्रकरणामुळं भारतीय राजकराणाला एक वेगळं वळण मिळालं. राजकारणाचा चेहरा बदलला. सर्वोच्च न्यायालयानं नुकताच जो निकाल दिला त्यामुळं अनेक वर्षे सुरू असलेला वाद सध्या तरी मिटला आहे. हा मुद्दा एका प्रकारे माझ्या खासगी आयुष्यातील प्रवासही दाखवतो. माझ्या कंपनीकडून निर्मिती होत असलेल्या पहिल्या सिनेमासाठी यापेक्षा चांगला विषय असू शकत नाही, त्यामुळं या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असं कंगनानं म्हटलं आहे.
वाचा: जयललितांच्या बायोपिकसाठी कंगनानं घेतले २४ कोटीचे मानधन
याशिवाय कंगना लवकरच 'थलाइवी' नावाच्या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. जयललिता यांची भूमिका अधिकाधिक नेमकेपणानं साकारता यावी, यासाठी कंगना तमीळ भाषा शिकते आहे. परंतु, तमीळ शिकणं तिला प्रचंड अवघड काम वाटतंय. जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगना प्रचंड मेहनत घेते आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली,' जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मला आमच्या दोघींमध्ये बऱ्याच बाबतीत साम्य आढळते. परंतु, ही भूमिका मला अधिक उत्तमरित्या पडद्यावर साकारता यावी, ती प्रेक्षकांना खरी वाटावी यासाठी मी तामीळ शिकते आहे. मला नेहमीच प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट करायचे होते. माझ्या चित्रपटांचे प्रमोशन करताना मी वेगवगेळ्या राज्यांत फिरायचे तेव्हा मला जाणवलं होतं की प्रादेशिक सिनेमा बनवणाऱ्यांकडे किती जबरदस्त आशय आहे. मी एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत होते आणि या चित्रपटामुळे मला ती मिळाली.'
वाचा: जयललितांवर बायोपिक; कंगना मुख्य भूमिकेत