यवतमाळः युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची हीच योग्य वेळ असून आदित्य ठाकरे यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा येथे झालेल्या शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात केला आहे. आदित्य ठाकरे यांनी केवळ अर्ज दाखल करावा, प्रचाराला आले नाही तरी त्यांचे विजयी प्रमाणपत्र घेऊन आम्ही येऊ, असे संजय राठोड म्हणाले. दिग्रस मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या संजय राठोड यांनी दिग्रस मतदारसंघ शिवसेनेसाठी मजबूत केला आहे. मागील निवडणुकीत विदर्भातून दुसऱ्या क्रमांकाने ते विजयी झाले होते.
आदित्य यांनी लढवावीदिग्रसमधून निवडणूक
यवतमाळः युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची हीच योग्य वेळ असून आदित्य ठाकरे यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2019, 4:00 am