अ‍ॅपशहर

वरुण धवनने बाहुबलीला का मारलं?

बाहुबली २ सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आदी तमाम लोकांना एकच प्रश्न पडला होता - कटप्पाने बाहुबलीला का मारलं. या प्रश्नाचं उत्तर तर सापडलं. पण एक नवा प्रश्न निर्माण झालाय - वरुण धवनने बाहुबलीला का मारलं?

Maharashtra Times 21 Jun 2017, 12:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after katappa varun dhawan kills baahubali aka prabhas
वरुण धवनने बाहुबलीला का मारलं?


'बाहुबली २' सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आदी तमाम लोकांना एकच प्रश्न पडला होता - कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर तर सापडलं. पण एक नवा प्रश्न निर्माण झालाय - वरुण धवनने बाहुबलीला का मारलं?

या प्रश्नाचं उत्तर वरुण आणि 'बाहुबली' साकारणाऱ्या प्रभासच्या भेटीत आहे. अलिकडेच जेव्हा अभिनेता वरुण धवनने प्रभासची भेट घेतली. यावेळी त्याने कटप्पा बनून प्रभासच्या पाठीत तलवारीने वार केला! अर्थात खोटाखोटा. त्याला बाहुबलीचा तो शेवटचा सीन पुन्हा साकारायचा होता.

'बाहुबली २' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता प्रभास सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तो अलिकडेच परतला. एका पार्टीत प्रभास वरुणला भेटला, त्यावेळी वरुणने तो ऐतिहासिक सीन करून पाहिला. हा फोटो त्याने आपल्या टि्वटर अकाउंटवरदेखील पोस्ट केलाय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज